“हो.. माहितीये मला..”

महाराष्ट्रात सध्या जे काय चाललंय ते आपण सगळेच बघतोय. मला राजकारणातलं काही कळत नाही पण या सगळ्यामागे जे मूळ कारण आहे ते म्हणजे “संवादाचा” अभाव. ट्विटर / फेसबुक असूनही संवाद काही झाला नाहीये. आपलं तरी रोजच्या जीवनात काय झालंय? हल्ली माझ्या असं लक्षात आलंय कि कोणीही कोणाशीही बोलायला गेलं कि बोलणंच खुंटत कारण पहिल्या एक -दोन वाक्यानंतर प्रतिसाद असतो ” हो.. माहितीये मला.. ” आणि मग संवादच खुंटतो. मग ते नवरा बायको असो , पालक – बालक असो, आजी-आजोबा – नातवंड असो. मित्र असोत. गुरु -शिष्य असोत, तज्ञ-जाणकार आणि शिकाऊ असोत. पण हाच अनुभव.

Read more