Back to Top

क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे

क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे

जन्म : 2 जानेवारी 1888
(तळेगाव(ढमढेरे) महाराष्ट्र, भारत)

फाशी : 16 नोव्हेंबर 1915
(लाहोर कारागृह, पाकीस्तान)

स्वा. सावरकरांच्या ‘अभिनव भारत’ या संघटनेद्वारा पसरलेली क्रांतीची ज्वाळा ते काळ्या पाण्यावर गेले तरी विझली नाही. त्यांच्या पासून स्फूर्ती घेतलेले हिंदुस्थानचे युवक चारी खंडात पसरले आणि पहिलं महायुद्ध सुरु होताच त्यांनी सशस्त्र क्रांतीनं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी निकराचा प्रयत्न केला तो गदर उत्थान म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाला. गदर चळवळीतील एक महत्वाचं नाव म्हणजे क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे !

Read more

ठाकूर रणमत सिंह

ठाकूर रणमत सिंह

जगदीशपूरचे ८० वर्षीय योध्दा बाबू कुंवरसिंह १८५७ च्या स्वातंत्र्य युध्दात इंग्रजांना हुलकावणा देत , जेव्हा रेवा संस्थानात आपल्या ४५ हजार सैनिकांसह शिरले आणि त्यांनी रेवानगरी पासून ८ मैलावर आपल्या सैन्याचा पडाव टाकला, तेव्हा रेवा संस्थानच्या राजाने तेथल्या राजनैतिक एजंट लेफ्टनंट असबोर्न याला भिऊन कुंवरसिंहाला पत्र पत्र पाठविले की , तुम्ही आमच्या संस्थानातून निघून जावे. पत्र वाचून स्वाभिमानी वीर कुंवरसिंह पश्चिमेकडे बांद्याकडे आपल्या सैन्याराह निघून गेले.

Read more

शिक्षण महर्षी, कृषीरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख

शिक्षण महर्षी, कृषीरत्न

डॉ. पंजाबराव उपाख्य
भाऊसाहेब देशमुख

जन्म : २७ डिसेंबर १८९८
(पापळ, अमरावती, महाराष्ट्र )

मृत्यू : १० एप्रिल १९६५
(दिल्ली)

राष्ट्रीयत्व : भारतीय
टोपणनाव : भाऊसाहेब
नागरिकत्व : भारतीय

Read more

महामानव बाबा आमटे (मुरलीधर देवीदास आमटे)

महामानव बाबा आमटे
(मुरलीधर देवीदास आमटे)

जन्म : 26 दिसम्बर 1914
हिंगनघाट, वर्धा,ब्रिटिश भारत
(वर्तमान में महाराष्ट्र, भारत)

मृत्यु : 9 फ़रवरी 2008
(वय 94)
(आनंदवन,वरोरा, चंद्रपूर, महाराष्ट्र, भारत)
राष्ट्रीयता : भारतीय
पत्नी : साधना आमटे
अपत्ये : डॉ. विकास आमटे
डॉ. प्रकाश आमटे

Read more

मनातील कचरा

मनातील कचरा

‘जागृत मन’ म्हणजे आपल्या मनात येणारे, आपल्याला जाणवणारे विचार असतात. आपण अशी कल्पना करू की, आपले मन हे घरासारखे आहे. त्यातील पाहुण्यांची बसायची व्यवस्था असते ती बाहेरील खोली म्हणजे ‘जागृत मन’ होय. आपण ती खोली व्यवस्थित ठेवतो. धुण्याचे कपडे, बाजारातून आणलेल्या वस्तू या आतील खोलीत ठेवतो, तसे ‘सुप्त मन’ असते. बाह्य़ मनात येणारे जे विचार/भावना आपण नाकारतो, त्यांना पापी, नकारात्मक असे लेबल लावतो; ते सुप्त मनात साठत राहतात. आपल्या घरात कचरा तयार होतो, तसाच मनातदेखील तयार होतो.

आपल्या घराची आतील खोली स्वच्छ केलीच नाही तर? तेथील कचरा कुजेल आणि त्याची दुर्गंधी बाहेरील खोलीतदेखील येऊ लागेल. मनात असेच घडते, तेव्हा चिंतारोग, पॅनिक अटॅक, मन्त्रचळ, औदासीन्य, त्रासदायक मानसिक तणाव असे त्रास जाणवू लागतात. असे त्रास होऊ लागले, की मानसोपचार आवश्यक असतातच.

Read more

सुप्त मनातील विचार

सुप्त मनातील विचार

आपल्या शरीरात सतत काहीतरी घडत असते. आतडी हालचाल करीत असतात, हृदयाची गती कमीजास्त होत असते. आपल्या जागृत मनाला हे काहीच जाणवत नसते. मेंदूचा एक भाग ‘अमायग्डला’ मात्र हे सतत जाणत असते. शरीरातील या संवेदना सुप्त मनाचा भाग आहेत असे आपण म्हणू शकतो. भावना निर्माण होतात त्या वेळी शरीरात बदल होतात. त्यामुळे या संवेदना अधिक तीव्र होतात. असे असून देखील भीती वगळता अन्य भावनांच्या संवेदना आपल्याला फारशा जाणवत नाहीत.

Read more

सहावा वस्तुमान लोप

सहावा वस्तुमान लोप

पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मिती काळापासून सुरुवात केली तर पृथ्वीवरील जीवांना आत्तापर्यंत एकूण पाच वेळा ‘वस्तुमान लोप’ या गोष्टीला सामोरे जावे लागले. त्याला केवळ नैसर्गिक कारणे होती. आता सहावा नामशेष/ वस्तुमान लोप होऊ घातला आहे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. वस्तुमान लोप म्हणजे पृथ्वीवरील अनेक प्रजातींचा अगदी कमी काळात विनाश होणे अथवा त्या नामशेष होणे. खरे म्हणजे गेल्या काही दशकांतील वन्यजीवांच्या प्रजातींचा विनाश पाहता सहावा मोठा नामशेष येऊ घातला आहे हे पटते. अर्थात यामध्ये मतमतांतरे आहेत.

Read more

माइंडफुलनेसचा उगम

माइंडफुलनेसचा उगम

माइंडफुलनेस हा शब्द, पाली भाषेतील सति आणि संस्कृतमधील स्मृति या शब्दासाठी इंग्रजीत वापरला जातो. गौतम बुद्धाने महासतिपट्टणसुत्त सांगितले आहे. विपश्यना शिबिरात गोएंका गुरुजी ते समजून सांगत. असेच विपश्यना सदृश ध्यानाचे शिबीर अमेरिकेत डॉ. जॉन काबात-झिन्न यांनी सत्तरच्या दशकात केले. त्यामुळे त्यांची तणावामुळे असलेली पाठदुखी बरी झाली. त्यानंतर त्यांनी या तंत्राचा लाभ रुग्णांना करून देण्यासाठी त्याला काही योगासनांची जोड देत ‘माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन’

Read more

फुलपाखरू जन्माची गाथा

फुलपाखरू जन्माची गाथा

इतर सर्व सजीवांपेक्षा फुलपाखरू जन्माची गाथा ही थोडी निराळीच म्हणावी लागेल. कारण फुलपाखराचा जन्म हा नुसता जन्म नसून ते अवस्थांतर किंवा स्थित्यंतर आहे. अंडी- अळी- कोष- फुलपाखरू अशा विविध अवस्थांमधून जाणारं हे अवस्थांतर! फुलपाखराची मादी खाद्य वनस्पतीवर अंडी घालते, मग या अंडय़ांमधून अळी बाहेर पडते.

नवजात बाळाकरिता आईचं दूध हे जसं प्रथम अन्न म्हणून समजलं जातं त्याचप्रमाणे फुलपाखराच्या अंडय़ांची टरफलं हे त्या फुलपाखराच्या अळीचं प्रथम अन्न होय. फुलपाखराच्या जीवनक्रमातील अळी ही एकमेव अशी अवस्था आहे, की ज्या अवस्थेमध्ये ‘तोंड’ असतं. म्हणूनच मग अळी त्या खाद्य वनस्पतीची पानं खायला सुरुवात करते. प्रचंड वेगाने पानांचा फडशा पाडत असते. पुढील सर्व आयुष्याला पुरेल एवढी शक्ती व सुदृढ शरीराची काळजी तिला याच अवस्थेत घ्यायची असते. झाडाची पानं खात असताना बाहेर पडणारी फुलपाखराच्या अळीची विष्ठा हे एक उच्च दर्जाचं नैसर्गिक खत म्हणून गणलं जातं. या अवस्थेत अळीची वाढ अत्यंत जोमाने सुरू असते.

Read more