Back to Top

Category: child parent psycology

सुप्त मनातील विचार

सुप्त मनातील विचार

आपल्या शरीरात सतत काहीतरी घडत असते. आतडी हालचाल करीत असतात, हृदयाची गती कमीजास्त होत असते. आपल्या जागृत मनाला हे काहीच जाणवत नसते. मेंदूचा एक भाग ‘अमायग्डला’ मात्र हे सतत जाणत असते. शरीरातील या संवेदना सुप्त मनाचा भाग आहेत असे आपण म्हणू शकतो. भावना निर्माण होतात त्या वेळी शरीरात बदल होतात. त्यामुळे या संवेदना अधिक तीव्र होतात. असे असून देखील भीती वगळता अन्य भावनांच्या संवेदना आपल्याला फारशा जाणवत नाहीत.

Read more

माइंडफुलनेसचा उगम

माइंडफुलनेसचा उगम

माइंडफुलनेस हा शब्द, पाली भाषेतील सति आणि संस्कृतमधील स्मृति या शब्दासाठी इंग्रजीत वापरला जातो. गौतम बुद्धाने महासतिपट्टणसुत्त सांगितले आहे. विपश्यना शिबिरात गोएंका गुरुजी ते समजून सांगत. असेच विपश्यना सदृश ध्यानाचे शिबीर अमेरिकेत डॉ. जॉन काबात-झिन्न यांनी सत्तरच्या दशकात केले. त्यामुळे त्यांची तणावामुळे असलेली पाठदुखी बरी झाली. त्यानंतर त्यांनी या तंत्राचा लाभ रुग्णांना करून देण्यासाठी त्याला काही योगासनांची जोड देत ‘माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन’

Read more

माणसाचे वेगळेपण

माणसाचे वेगळेपण

वर्तन चिकित्सा ही संशोधनावर आधारित चिकित्सापद्धती आहे मात्र हे संशोधन प्रामुख्याने प्राण्यांवर केले जात असे. प्रयोगशाळेत वर्तन पाहता येते, मोजता येते त्यामुळे संशोधनात त्यालाच महत्त्व दिले जाऊ लागले. भावना आणि विचार हे दाखवता येत नसल्याने ते नाकारले जाऊ लागले. मात्र त्यामुळे माणसाची इच्छा, प्रेरणा यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. नवीन कल्पना कशा सुचतात, माणूस त्याग का करतो, कष्ट सहन करीत कठोर परिश्रम का करतो याची उत्तरे वर्तन चिकित्सा देत नाही.

त्यामुळे १९४०मध्ये कार्ल रॉजर्स यांनी मानवकेंद्रित मानसशास्त्र आणि समुपदेशन यांचा पाया घातला. आत्मभान, सर्जनशीलता, व्यक्तिस्वातंत्र्य अशा मानवी संकल्पनांना महत्त्व देत अब्राहम मास्लो यांनी या शाखेचा विस्तार केला. त्यांनी सांगितलेला गरजांचा पिरामिड आजही व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वाचा मानला जातो. याच परंपरेतील व्हिक्टर फ्रांक यांनी स्वत:च्या उदाहरणातून हे दाखवून दिले की माणसाचे वर्तन हे अन्य प्राण्यांसारखे चाकोरीबद्ध नसते. अन्य प्राण्यांची प्रतिक्रिया ही ठरलेली असते. माणूस मात्र अंध प्रतिक्रिया न देता वेगवेगळा प्रतिसाद निवडू शकतो.

Read more

मनातील सुगंध

मनातील सुगंध

आपले मन घरासारखे आहे. त्यातील बाहेरची खोली म्हणजे जागरूक मन आणि आतील खोली म्हणजे सुप्त मन. या सुप्त मनातील कचरा स्वच्छ करण्यासाठी मनात येणाऱ्या विचारांकडे आणि शरीरातील संवेदनांकडे साक्षीभाव ठेवून पाहणे आवश्यक असते. असे करणे म्हणजे कचरा शोधून तो साफ करण्यासारखे आहे.

घरात कचरा खूप साठला असेल आणि दुर्गंधी येत असेल तर तो साफ करताना आपण मुद्दाम सुगंध निर्माण करण्यासाठी अगरबत्ती लावतो, रूम फ्रेशनर मारतो. शरीराला येणाऱ्या घामाचा वास कमी करण्यासाठीदेखील परफ्यूम मारतो. तसेच मनाच्या आरोग्यासाठी कर्ताभाव ठेवून समाधान, प्रेम, भक्ती, कृतज्ञता, क्षमा यांसारखे सुखद भाव मनात काही वेळ धरून ठेवणे आवश्यक असते. सर्व उपासना पद्धतीमधील प्रार्थना यासाठीच आहेत. दुर्दैवाने आरत्या मोठ्ठय़ा आवाजात म्हटल्या जातात. प्रेम,आर्तभक्ती या भावना मनात धारण करणे आवश्यक आहे हे लक्षात घेतले जात नाही.

Read more