




🦋किल्ले माहीती🦋
📙 मार्कंड्या 📙
*******
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा सातमाळ
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडापासून सुरु होणार्या डोंगररांगेत अनेक किल्ले वसलेले आहेत. सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप इ. किल्ले या डोंगररांगेत येतात. सप्तशृंगी गडासमोरच दिसणार्या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रावळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पूरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो. Continue Reading
इतिहासकालीन प्रसिद्ध आणि महाकाय तोफा
चौदाव्या आणि पंधराव्या शतकात जगात तोफांचा बराच प्रसार होऊ लागला होता. मोठमोठय़ा तोफा बनवण्याची अहमहमिका लागली होती. त्यात बॉम्बार्ड नावाचा तोफांचा प्रकार प्रामुख्याने अस्तित्वात होता. या प्रकारच्या तोफा कॅनन आणि मॉर्टर या वर्गात मोडत आणि त्या मोठय़ा कॅलिबरच्या म्हणजे बॅरलचा व्यास खूप मोठा असलेल्या असत. त्यांचा उपयोग मुख्यत्वे शत्रूच्या किल्ल्यांची आणि नगरांची तटबंदी भेदणे हा असे. Continue Reading
बसून कंटाळा आला तर मुलांनाही टीव्ही मोबाईल त्याच्या शिवाय वेगळा पर्याय नाही चला तर मग मुलांना दाखवायचे तर काहीतरी चांगलं दाखवूया यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि आपल्या काही संतांचे चित्रपट असलेली युट्युब ची लिंक पाठवत आहे याच्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे तसेच जुन्या संतांचे बरेचसे चित्रपट पाहायला मिळतील
जास्तीतजास्त शेयर करा आजच्या बच्चेकंपनी ला छञपती काय होतें हे समजणे आवश्यक आहे असें मला वाटते….
जय महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज व संतावरील सर्व
जुने चित्रपट YOUTUBE LINK Continue Reading
।। संत तुकारामांचे अभंगशतक ।।
कर्जदारांची कर्ज माफ करणारे जगातील पहिले संत तुकाराम. हे सतराव्या शतकातील लोकसंत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म, अनागोंदी त्याचप्रमाणे लोकांच्या मनातील भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा संत तुकारामांनी प्रयत्न केला. लोकांच्यावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा, देण्याचं काम केलं. रोजचे जीवन जगताना कशा प्रकारे जगावे हे आपल्याला त्यांच्या अभंगातून दिले. त्यांचे सर्व अभंग मानवी जीवनाला हितकारक, उपकारक ठरले आहेत. तुकारामांचे अनेक अभंग आहेत त्यातील शंभर अभंगांचे संक्षिप्त विवेचन सरळ, साध्या, सोप्या भाषेत असणारा “संत तुकारामांचे अभंगशतक” असा ग्रंथ डॉ.आ.ह साळुंखे यांनी आपल्याला समोर ठेवला आहे. हा ग्रंथ 191 पृष्टी असून शंभर अभंग या ग्रंथात असल्याकारणाने ग्रंथाचे नाव ‘संत तुकारामांचे अभंगशतक’ असे दिले आहे. या ग्रंथात एकूण सतरा प्रकरणे दिली आहेत. हे सर्व प्रकरण जन्म, विवाह, मृत्यू , गृहप्रवेश, नामकरण, वाढदिवस, आनंद, उत्सव, मंगलकाम, प्रसंग, कृतज्ञता, समारंभ, विविध संस्कार इत्यादी प्रसंगी या अभंगाचे वाचन करू शकू असे अभंग आहेत. प्रथम ‘आईवडील’ या प्रकरणाने सुरुवात केली आहे. जगामधे जिथं आपलं मस्त नम्रपणानं झुकवावं असं आपलं पहिलं श्रद्धास्थान म्हणजे आपले आईवडील. या पहिल्या प्रकरणात आठ अभंग दिले आहेत. दुसरे प्रकरण संत असं दिलं आहे. यातील पहिल्या अभंगाची सुरुवात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले। या अभंगाने केली आहे. Continue Reading