फर्स्ट क्लास मिळवूनही
ज्याला सातबारा आणि 8अ मधला फरक कळत नाही,
ज्याला बँकेच्या डिपोझिट आणि विड्रॉल स्लीपमधला फरक कळत नाही,
ज्याला लाईट बिलातील देयक रक्कम शोधताना प्रचंड गडबडायला होतं,
ज्याला लिफाफ्यावर टू आणि फ्रॉम खाली नक्की कुणाचं नाव टाकावं हे बिलकुल कळत नाही,
जे आजही कंम्प्युटर बंद करताना खाली वर दाबायचे बटनच वापरतात,
जे आजही रिचार्ज मारणे याला ब्यालन्स टाकणे म्हणतात,
ज्यांना बँक पासबुकावर व्याजाचा आकडाच सापडत नाही,
ज्यांना टू व्हिलरच्या पेट्रोल टाकीच्या ऑन ऑफ आणि रिजर्व्हची भानगड कळत नाही,
असे उच्चशिक्षित एकीकडे-

आणि त्या तुलनेत-

तलाठयाला त्याच्या घरी गाठून सातबारा घेणारे,
घरातला फ्यूज उडताच वायरमनची वाट न बघणारे,
बंद पडलेल्या गाडीला फार किका न मारता टाकी फुंकायला घेणारे,
मापातले लाईटबीलही तालुक्याला जावून कमी करुन घेणारे,
बँकेतल्या शिपायाला नमस्कार करुन कर्ज मंजूर करुन घेणारे,
आणि हायस्कूलमधून शाळा सोडूनही सिनीयर कॉलेजला पालक म्हणून अधून मधून भेटी देणारे,
ट्रॅफिक हवालदार ची ओळख काढून नुसत्या चहावर गाडी सोडवणारे,
निवडणुकीच्या काळात आमदार खासदार सुद्धा गुपचूप घरी येऊन भेट घेणारे…….

मला भयानक आवडतात कारण..
शिक्षण नावाच्या भ्रमातून लवकर बाहेर पडून ते जगायला सज्ज झालेले असतात.

गोष्ट इतकीच, की एवढया उलथापालथी करूनही घरातले म्हणतात.. “पळतंय लई…. पण शिक्षणान थोड् कमी हाय.”

थोडक्यात गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढते. शाळेच्या मार्कांनी नाही ….