शिवरायांचे शूर शिलेदार
येसाजी कंक

जे स्वराज्य द्रोही होते ते हत्तीच्या पायाखाली गेले तर काही स्वामिनिष्ठ होते त्यांनी हत्तीलाही नमवल अशाच एका रणझुंझार मावळ्याची कथा.

१६७६ साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली मोगल शाही संपवण्यासाठी. त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहा शी हात मिळवणी केली गोवळकोंड्या त महाराज्यांच जंगी स्वागत झालं. मुगल शाही आदिलशाही निजामशाही अश्या साऱ्या शह्यांच्या उरावर उभ राहून स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा आलाय म्हणून लोकांनी खूप गर्दी केली. महाराजांसोबत सरनोबत हंबीरराव मोहिते,सूर्याजी मालुसरे,येसाजी कंक इत्यादी निवडक मावळे होते या सगळ्यांनी महालात प्रवेश केला.

गोवळकोंड्याचा कुतुबशहा महाराजांना म्हणतोय महाराज आपकी फौज देखकरं हमे बडी खुशी हु ई लेकीन ताजू ब की बात ये हे की आपकी फौज मे हमने हाथी नही देखा. यावर महाराज उत्तरले आमच्या कडे पन्नास हजार हत्ती आहेत म्हणजे आमचा एक एक मावळा हत्तीच्या ताकतीचं आहे. यावर कुतुबशहा म्हणतोय हत्तीच्या ताकतीचां माणूस कस शक्य आणि असेल एका दा असा मावळा तर काय तो माझ्या हत्तिशी झुंज देईल. महाराज म्हणतायत का नाही यातील कोणताही मावळा निवडा तो तुमच्या हत्तीशी झुंज देईल.

कुतुबशहा न प्रत्येक मावळ्यावर कुंचीतसी नजर फिरवली व येसाजी कडे बोट दाखवत विचारलं. क्या ये सिपाई लढेगा हाथी से महाराजांनी मोठ्या आत्मविश्वासानं उत्तर दिलं का नाही माझा हा मावळा तुमच्या उन्मत्त हत्तीला च काय इंद्राच्या ऐरावतालही लोळण घालायला भाग पाडेल. मग युद्धाचा दिवस ठरला किल्ल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या पटांगणात गोलाकार मैदान बनवण्यात आले महराज आणि कुतुबशहा साठी बाजूला शामियाना उभारण्यात आला. येसाजी ने महाराजांना झुकून मुजरा केला आणि नंग्या तलवारी निशी मैदानात उतरला. हत्तीला ही साखदंडांतून मोकळ करून मैदानात आणण्यात आले.

युद्धाला सुरुवात झाली येसाजिला पाहून हत्ती चवताळून येसाजिच्या अंगावर धावून गेला. येसाजी न डाव्या अंगाला उडी मारून हत्तीला हुलकावणी दिली. हत्ती आपला वेग रोखू न शकल्या मूळे तसाच पुढे गेला. हत्ती आता चवतळला होता. दोन अडीच तास झुंज चालू होती. कधी येसाजी पुढे तर कधी येसाजी हत्तीच्या मागे. आता हत्ती बेभान झाला होता. त्याने येसाजीला आपल्या सोंडत पकडलं. लोकांना वाटल आता संपला येसाजी, पण येसाजी न हत्तीच्या सोंडवर तलवारीने असा घाव केला की जखमी झालेला हत्ती वेड्यासारखा पळत सुटला तो पुन्हा आलाच नाही.

कुतुबशहा च्या हट्टपायी एका हत्तीचा जीव गेला होता.

पण महाराजांचा एक एक मावळा हा हत्तीच्या ताकतीचां असतो हे सिद्ध झालं.

कुतुबशहा न येसाजीला आपल्या गळ्यातील हार भेट देऊ केला पण येसाजीन तो हार न घेता आमचं कौतुक करायला आमचा राजा समर्थ हाय माझा हा पराक्रम माझ्या राज्याच्या चरणी अर्पण करतो अस सांगितलं.

💎 धोरण

पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात असलेल्या भाटघर धरणाला आता येसाजी कंक जलसागर म्हणतात.

🎞 चित्रपट

शिवाजी महाराजांचे शूर सरदार येसाजी कंक यांनी फत्ते केलेल्या एका कामगिरीवर ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट आधारित आहे.

🚩 हर हर महादेव…! 🚩