आद्यशिक्षिका
ज्ञानज्योती, क्रांतिज्योती
ज्ञानाई
सावित्रीबाई ज्योतीराव फुले
जन्म : ३ जानेवारी १८३१
(नायगाव, सातारा, महाराष्ट्र)
मृत्यू : १० मार्च १८९७
(पुणे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र)
आद्यशिक्षिका
ज्ञानज्योती, क्रांतिज्योती
ज्ञानाई
सावित्रीबाई ज्योतीराव फुले
जन्म : ३ जानेवारी १८३१
(नायगाव, सातारा, महाराष्ट्र)
मृत्यू : १० मार्च १८९७
(पुणे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र)
क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे
जन्म : 2 जानेवारी 1888
(तळेगाव(ढमढेरे) महाराष्ट्र, भारत)
फाशी : 16 नोव्हेंबर 1915
(लाहोर कारागृह, पाकीस्तान)
स्वा. सावरकरांच्या ‘अभिनव भारत’ या संघटनेद्वारा पसरलेली क्रांतीची ज्वाळा ते काळ्या पाण्यावर गेले तरी विझली नाही. त्यांच्या पासून स्फूर्ती घेतलेले हिंदुस्थानचे युवक चारी खंडात पसरले आणि पहिलं महायुद्ध सुरु होताच त्यांनी सशस्त्र क्रांतीनं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी निकराचा प्रयत्न केला तो गदर उत्थान म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाला. गदर चळवळीतील एक महत्वाचं नाव म्हणजे क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे !
शहीद-ए-आजम
पंजाबशार्दूल
सरदार उधमसिंग
जन्म : 28 डिसेंबर 1899
(सुनम , पंजाब , ब्रिटिश भारत)
मृत्यू : 31 जुलै 1940
(वय 40)
(बार्न्सबरी , इंग्लंड, यूके)
ठाकूर रणमत सिंह
जगदीशपूरचे ८० वर्षीय योध्दा बाबू कुंवरसिंह १८५७ च्या स्वातंत्र्य युध्दात इंग्रजांना हुलकावणा देत , जेव्हा रेवा संस्थानात आपल्या ४५ हजार सैनिकांसह शिरले आणि त्यांनी रेवानगरी पासून ८ मैलावर आपल्या सैन्याचा पडाव टाकला, तेव्हा रेवा संस्थानच्या राजाने तेथल्या राजनैतिक एजंट लेफ्टनंट असबोर्न याला भिऊन कुंवरसिंहाला पत्र पत्र पाठविले की , तुम्ही आमच्या संस्थानातून निघून जावे. पत्र वाचून स्वाभिमानी वीर कुंवरसिंह पश्चिमेकडे बांद्याकडे आपल्या सैन्याराह निघून गेले.
शिक्षण महर्षी, कृषीरत्न
डॉ. पंजाबराव उपाख्य
भाऊसाहेब देशमुख
जन्म : २७ डिसेंबर १८९८
(पापळ, अमरावती, महाराष्ट्र )
मृत्यू : १० एप्रिल १९६५
(दिल्ली)
राष्ट्रीयत्व : भारतीय
टोपणनाव : भाऊसाहेब
नागरिकत्व : भारतीय
महामानव बाबा आमटे
(मुरलीधर देवीदास आमटे)
जन्म : 26 दिसम्बर 1914
हिंगनघाट, वर्धा,ब्रिटिश भारत
(वर्तमान में महाराष्ट्र, भारत)
मृत्यु : 9 फ़रवरी 2008
(वय 94)
(आनंदवन,वरोरा, चंद्रपूर, महाराष्ट्र, भारत)
राष्ट्रीयता : भारतीय
पत्नी : साधना आमटे
अपत्ये : डॉ. विकास आमटे
डॉ. प्रकाश आमटे
मनातील कचरा
‘जागृत मन’ म्हणजे आपल्या मनात येणारे, आपल्याला जाणवणारे विचार असतात. आपण अशी कल्पना करू की, आपले मन हे घरासारखे आहे. त्यातील पाहुण्यांची बसायची व्यवस्था असते ती बाहेरील खोली म्हणजे ‘जागृत मन’ होय. आपण ती खोली व्यवस्थित ठेवतो. धुण्याचे कपडे, बाजारातून आणलेल्या वस्तू या आतील खोलीत ठेवतो, तसे ‘सुप्त मन’ असते. बाह्य़ मनात येणारे जे विचार/भावना आपण नाकारतो, त्यांना पापी, नकारात्मक असे लेबल लावतो; ते सुप्त मनात साठत राहतात. आपल्या घरात कचरा तयार होतो, तसाच मनातदेखील तयार होतो.
आपल्या घराची आतील खोली स्वच्छ केलीच नाही तर? तेथील कचरा कुजेल आणि त्याची दुर्गंधी बाहेरील खोलीतदेखील येऊ लागेल. मनात असेच घडते, तेव्हा चिंतारोग, पॅनिक अटॅक, मन्त्रचळ, औदासीन्य, त्रासदायक मानसिक तणाव असे त्रास जाणवू लागतात. असे त्रास होऊ लागले, की मानसोपचार आवश्यक असतातच.
टीप
टेबल वर ऑर्डर घेऊन आलेला सुखदेव टेबलावरची माणसे बघून हबकून गेला.
तब्बल २५ वर्षानंतर तो हे चेहरे पुन्हा बघत होता. कदाचित त्या चौघांनी त्याला ओळखले नव्हते, किवा ओळख दाखवत नव्हते.
चौघापैकी दोघेजण मोबाईल मध्ये व्यस्त होते आणि दुसरे दोघे लॅपटॉप मध्ये.
कदाचित आत्ताच झालेल्या डील ची आकडेमोड चालली होती.
शाळेतील मित्र खुप पुढे निघून गेले होते, आणि स्वतः मात्र कॉलेज पर्यंत सुद्धा पोहचू शकला नव्हता.
नंतर दोन तीन वेळा त्यांच्या टेबल वर तो गेला, पण सुखदेव ने स्वतःची ओळख लपवून पदार्थ वाढले.
चारी बिझनेसमन मित्र जेवण संपवून निघून गेले.
आता परत कधी इकडे न आले तर बर, असा विचार त्याच्या मनात आला.
स्वतःच्या निष्फलते मुळे शाळेतील मित्रांना ओळखसुधा दाखवता आली नाही, म्हणून सुखदेव ला फार वाईट वाटले.
सुखदेव, टेबल साफ कर. तीन हजारचे बिल केले पण एक पैसा टीप म्हणून ठेवला नाही साल्यानी, मॅनेजर वैतागून बोलला.
टेबल साफ करता करता सुखदेव ने टेबलावर पडलेला पेपर नॅपकिन उचलला,
त्या चार बिझनेस मननी पेनानी कदाचित त्या नॅपकिन वर पण आकडेमोड केली होती.
पेपर टाकता टाकता सहज त्याच्या कडे लक्ष गेले,
त्यावर लिहिले होते….
तुला टीप द्यायला आमचा जीव झाला नाही, ह्या हॉटेल शेजारीच आम्ही एक फॅक्टरी घेतलीय, म्हणजे आता येणे जाणे सुरूच राहील, तू आमच्या बरोबर जेवायला बसला नाहीस, उलट आम्हाला तू वाढतोय हे कस वाटते❓
आपण तर शाळेत एकमेकाच्या डब्ब्यातून खाणारे,
आज तुझा ह्या नोकरीचा शेवटचा दिवस,. फॅक्ट्रिमध्ये कॅन्टीन तर कोणालातरी चालवलीच पाहिजे ना❓
शाळेतील तुझेच मित्र.
खाली कंपनीचे नाव आणि फोन no. लिहिला होता.
आत्तापर्यंत मिळालेल्या सर्वात मोठ्या टीप ला सुखदेव नी ओठांना लावून तो कागद खिशात व्यवस्थित ठेवला.
THIS IS THE QUALITY OF REAL FRIENDS
🤔 कुतूहल 🤔
🎯 सहावा वस्तुमान लोप
पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मिती काळापासून सुरुवात केली तर पृथ्वीवरील जीवांना आत्तापर्यंत एकूण पाच वेळा ‘वस्तुमान लोप’ या गोष्टीला सामोरे जावे लागले. त्याला केवळ नैसर्गिक कारणे होती. आता सहावा नामशेष/ वस्तुमान लोप होऊ घातला आहे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. वस्तुमान लोप म्हणजे पृथ्वीवरील अनेक प्रजातींचा अगदी कमी काळात विनाश होणे अथवा त्या नामशेष होणे. खरे म्हणजे गेल्या काही दशकांतील वन्यजीवांच्या प्रजातींचा विनाश पाहता सहावा मोठा नामशेष येऊ घातला आहे हे पटते. अर्थात यामध्ये मतमतांतरे आहेत.
पहिला नामशेष ४४३ दशलक्ष वर्षांपूर्वी झाला ज्यामध्ये अस्तित्वात असलेल्या एकूण प्रजातींच्या ८५ टक्के प्रजाती नामशेष झाल्या. दुसरा नामशेष आला ३७४ दशलक्ष वर्षांपूर्वी, ज्यात ७५ टक्के प्रजाती नष्ट झाल्या. त्यानंतरचा वस्तुमान लोप २५० दशलक्ष वर्षांपूर्वी झाला ज्यात ९५ टक्के इतक्या प्रजाती नष्ट झाल्या. चौथा नामशेष झाला २०० दशलक्ष वर्षांपूर्वी ज्यामध्ये ८० टक्के प्रजाती नष्ट झाल्या, परंतु डायनोसोरची भरभराट झाली. १४५ दशलक्ष वर्षांपूर्वी, आलेला पाचवा वस्तुमान लोप ७६ टक्के इतक्या प्रजातींना नष्ट करून गेला. ज्यामध्ये डायनोसोर नाहीसे झाले परंतु सस्तन प्राण्यांची भरभराट झाली.
भूशास्त्रीय कालश्रेणीवर आत्ताच्या युगाला ‘होलोसीन’ अथवा ‘अन्थरोपोसीन’ असे संबोधले जाते ज्यामध्ये सगळीकडे मानवाचे वर्चस्व दिसते. सध्याचा प्रजाती नामशेष होण्याचे प्रमाण नैसर्गिकरीत्या प्रजाती नामशेष होण्याच्या प्रमाणाच्या तुलनेत १००-१००० पटीने जास्त आहे. ही प्रजाती तयार होण्याच्या आणि नष्ट होण्याच्या प्रमाणातील तफावत अनेक कारणांमुळे आहे. जागतिक वन्यजीव निधी या संस्थेनुसार गेल्या ४० वर्षांत पृथ्वीवरील अध्र्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. माणसाला पर्यावरणीयदृष्टय़ा अभूतपूर्व असा ‘जागतिक सुपर प्रिडेटर’ असे संबोधले आहे. प्रचंड प्रमाणात वाढणारी लोकसंख्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापर, वाढणारे सर्व प्रकारचे प्रदूषण, नैसर्गिक अधिवासाचा गरवापर, प्राण्यांची शिकार, वातावरणबदल, प्रचंड प्रमाणातील जंगलतोड, खाणकाम, कार्बन उत्सर्जन, जागतिक तापमानवाढ.. अशा अनेक गोष्टी या येणाऱ्या वस्तुमान लोपासाठी, प्रजातींच्या नामशेषासाठी कारणीभूत आहेत.
🖊 डॉ. नीलिमा कुलकर्णी office@mavipamumbai.org
➖➖➖➖➖➖➖
#वास
भर दुपारची वेळ. तिने घराचं कुलूप ऊघडून आत पाऊल टाकलं अन् भस्सकन तो वास तिच्या नाकात शिरला. ती वैतागलीच.
कालपासूनच हा वाईट वास तिला त्रास देत होता, पण गंमत म्हणजे घरात बाकी कोणालाच तो येत नव्हता. पण तिला मात्र वासाने अस्वस्थ झालेली पाहून प्रत्येकाने तिची मस्त खिल्ली ऊडवली होती.
आता मात्र तो वास बऱ्यापैकी तीव्र झालेला होता. काल आपली चेष्टा करणाऱ्या प्रत्येकाला ओढत इथे आणून आता तो वास घ्यायला लावावा असं वाटलं खरं. पण मग मात्र आपल्या चरफडण्याचं लगेचच हसू आलं तिला.
आधी स्वैपाकघरात जाऊन तिने सगळे कप्पे, भाजीची टोपली वगैरे धुंडाळले.
छे !! कुठेही शिळे अन्न, खरकटे वगैरे काहीही शिल्लक नव्हते. कुठली भाजी वगैरे पण खराब झाली नव्हती.
मग काय असावं बरं ?
‘बाप रे, उंदीर किंवा पाल वगैरे मेलंय की काय कुठे ? ई ….’
मनातल्या मनात तिने शेजाऱ्यांना शिव्या पण घातल्या. यांनी विषारी औषध घालायचं न् आम्ही निस्तरायचं …
ती आख्खी दुपार स्वैपाकघर साफ करण्यातच गेली. सगळे काने कोपरे साफ झाले. माळ्यांवर पाहिलं. पण काहीच नाही.
मग बाहेरची खोली साफ झाली. नव्हतंच विशेष सामान तर काय … पण छे ! काहीच सापडलं नाही.
संध्याकाळी एकेक मेंबर मात्र घरात शिरले ते नाक वाकडं करतच. तिच्याकडे अपराधी मुद्रेने पहात. नजरेनेच आदल्या दिवशीच्या चेष्टेबद्दल दिलगिरी व्यक्त करत तेही या शोधाशोध उर्फ साफसफाई मोहिमेत सहभागी झाले. बाकीच्या दोन खोल्या, सगळे माळे सगळीकडे पाहिलं. पण व्यर्थच.
शेवटी तळमजल्यावर घर असल्याने बाहेरूनच वास येत असावा यावर सगळ्यांचच एकमत झालं.
दुसरा दिवस ऊजाडला. आता मात्र तो वास चांगलाच असह्य होऊ लागलेला. सगळेजण आपापल्या कामाला रवाना झाले तशी घराबाहेर फेरी मारली तिने. पण बाहेर तर वास येतच नव्हता. घरात शिरल्याबरोबर खात्रीच झाली तिची की याचा ऊगम कुठेतरी घरातच आहे. नाक वेडंवाकडं करून दीर्घ श्वास घेत इकडे-तिकडे फिरून ती वासाचा ऊगम शोधू लागली.
शेवटी त्या एका खोलीतच काहीतरी गडबड आहे याची खात्री झाली. आदल्याच दिवशी पलंगाखालचे काने-कोपरे न माळेसुद्धा साफ केले होते की !!
मग आता कुठे?
हां … खोलीतलं कपाट …
तिने कपाट ऊघडलं मात्र …
एकदम भपकारा आला. ती एकदम मागेच सरकली. तो वास जरा बाहेरच्या हवेत जिरू दिला अन् नाकावर हात धरून ती बारीक नजरेने कपाटाचं निरीक्षण करू लागली.
बघता बघता तिची नजर कपाटातल्या थेट खालच्या कप्प्यात ठेवलेल्या कपड्यांकडे गेली न् तिचे डोळेच विस्फारले. त्यावर एक लालसर काळा ओला डाग दिसत होता.
‘ई गं बाई … रक्त की काय हे ? बंद कपाटात हा ऊंदीर घुसला तरी कसा ?’ असं मनाशीच बडबडत तिने आजूबाजूला पाहिलं. छे! बाई काम ऊरकून गेली होती. घरातलं कुणीही संध्याकाळशिवाय परतणार नव्हतं. कुणाचीही मदत मिळणार नव्हती. तिला एकटीलाच हे काम करावं लागणार होतं.
जीव मुठीत धरून हळूच तिने तो कपडा पहिला. त्याला हात लावून पहिला. थंडगार ओला स्पर्श झाला. शहारत तिने हात मागे घेतला.
मग एका चिमटीत नाक पकडून मनातली किळस दाबत ती सावधपणे एकेक कपडा ओढून काढू लागली. आख्खा कप्पा रिकामा झाला पण काहीच नाही.
सगळ्या घड्या उलगडल्या. काहीच मिळालं नाही. बघता बघता वरचेही चारही कप्पे आवरले.
पण … सगळंच मुसळ केरात.
‘हे काय गौडबंगाल ???’ तिला काहीच कळेना. शेवटी परत कपडे कप्प्यात ठेवण्यासाठी ती कपाटाच्या दारासमोर फतकल मारून बसली आणि एकेक घडी व्यवस्थित ठेवू लागली.
आणि अचानक … टप्प …
कुठूनसा एक लाल-काळसर द्रवाचा ठिपका तिच्या हातावर पडला.
‘ई …..’ … बाहेर पडू पाहणारी किंकाळी कशीबशी दाबून तिने वर पाहिलं. कपाटाच्या दाराला एक पिशवी लटकलेली होती. ती तळाशी ओलसर दिसत होती आणि त्यातूनच तो ठिपका पडला होता.
झटक्यात मांडीवरचे कपडे दूर ढकलून ती ऊभी राहिली न् लांब जाऊन भयचकित नजरेने त्या पिशवीकडे पाहू लागली. ती हलत नाहीये किंवा त्यातून कुठलंही भूत बाहेर येत नाहीये याची खात्री पटल्यावर आधी तिने जाऊन हात खसाखसा धुतले. जरा बाहेर जाऊन निवांत बसली.
हे काम आपल्याला एकटीलाच निपटावे लागणार अशी मनाची तयारी करून, परत एकदा सगळं धैर्य एकवटून ती खोलीत आली. ती पिशवी हुकावरून अलगद सोडवून, ऊघडून न पाहता, ती जराही हलू न देता (जणू त्यात कधीही फुटू पहाणारा बाँबच आहे अशा) सावधगिरीने तिने बाल्कनीत ठेवली आणि बाल्कनीचं दार लावून घेतलं.
कपाटाची स्वच्छता न आवराआवर करून एकदाची ती बाल्कनीत आली. बराच काळ त्या पिशवीकडे एकटक पाहिल्यावर शेवटी मनाचा हिय्या करून तिने शक्यतो बोटाच्या फक्त टोकांनी ती पिशवी ऊचलली आणि सगळं धैर्य एकवटून ती ऊघडून आत डोकावली.
.
.
.
.
.
.
.
कधीकाळी भाजी आणायला ती पिशवी वापरली होती. गडबडीत एक टोमैटो तसाच राहिला होता न् त्यावर पांढरी बुरशी वगैरे येऊन पार सडून तो गळायला लागला होता.
तिला आतूनच वाकुल्या दाखवत होता.