म्हणून तुझे तूच शिकायला जा!
……….
अभ्यास शिकायला
तू शाळेत जाऊ नको राई,
तिथे खेळायला सवंगडी मिळतात
म्हणून जा.
माणसे शिकायला जा.
म्हणून तुझे तूच शिकायला जा!
……….
अभ्यास शिकायला
तू शाळेत जाऊ नको राई,
तिथे खेळायला सवंगडी मिळतात
म्हणून जा.
माणसे शिकायला जा.
रामराम
रामराम ही अभिवादनाची पुरातन रीत आहे. खेड्यापाड्यांत अजूनही रामराम करणारी अनेक मंडळी आढळतात. प्रत्येक प्रहराला बदलते अभिवादन ही इंग्लिश लोकांची रीत आहे. गुड मॉर्निंग ते गुडनाईट असा हा त्यांचा सदिच्छा प्रवास असतो.
महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक श्री. अरविंद इनामदार प्रत्येक वेळी रामराम म्हणतात. गेल्या वीस वर्षात त्यांच्या मुखातून अभिवादनाचा अन्य कोणता शब्द त्यांनी उधारल्याचे माझ्या ऐकिवात नाही.
कुसुमाग्रजांच्या तोंडून अगदी अभावितपणे बाहेर पडणारा श्रीराम हा स्वगत उद्गार आणि अरविंद इनामदारांचा, रामराम ही वाणीभूषणे होत.
तुकाराम महाराजांनी एका अभंगात लोकांचा निरोप घेताना म्हटले होते, आम्ही जातो आमच्या गावा। आमचा राम राम घ्यावा।।
!! ” साऊ “…!!
पत्र लिहिणे हे आजकाल आपण सारेच विसरत चाललोय. मात्र कधीकाळी पत्र हेच संपर्काचे व सानिध्याचेही माध्यम होते आपल्या समाजात. एक वेळ अशीही होती की , वर्षानुवर्षे पती पत्नी बोलतही नसत की एकमेकांचा हात इतरासमोर हाती देखील घेऊ शकत नसत. अशावेळी पत्र लिहून एकमेकांना आपल्या भावना पोचवल्य जायच्या . ते पण कधी तर दोघांपैकी कुणी एक परगावी जाई तेव्हाच . सावित्री – जोतीराव यांचे सहजीवन एका संपूर्ण पुस्तकाचाच विषय आहे.या सहजीवनात देखील एक बाब आहे की , त्या काळात सावित्रीने जोतीरावांना पत्र लिहिली आहेत. पण उपलब्ध असणारी तीन पत्रे हा खरेतर त्या दोघांच्या सहजीवनाचा कसलाही विषय नसून समाजातील विविध घडामोडींची माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिली गेली आहेत. इतके ” समाजमय गुंतणे ” सावित्री जोतीरावांनी त्यांच्या जीवनात अवलंबले होते. सावित्रीची तीन पत्रे काही वेगळ्या मुल्यमापनातून पाहण्याची गरज आहे.,,.पाहूया.
” आनंद लांबणीवर टाकणारी माणसं ”
✍️
बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला.
दारात शिवराम.
शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.
‘साहेब, जरा काम होतं.’
‘पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?’
‘नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.’
‘अरे व्वा ! या आत या.’
आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता.
परिक्षा व निकाल, तणावाचं वातावरण, मुलांपेक्षा आई बापालाच टेंशन जास्त. पण एवढ्यात क्लास, इंटर्नल मार्कस् मुळे गुणांची टक्केवारी वधारली असली तरी सर्वांच्या चांगल्या गुणांमुळे पुढील प्रवेशांसाठी स्पर्धा ही वाढली आहे व हे पालकांसाठी एक अजून टेंशन देणारं होत आहे. आता ही ‘कहानी घर घर की’ झाली आहे. पण यात ही आनंद आहेच. याच आनंदाचा नमुना, घरातील प्रेमाचा उमाळा, निर्मळ आनंद, यांचा प्रत्यय आज सामायिक करीत असलेल्या कथेत वाचायला मिळतो. ज्यांच्या घरात दहावी, बारावी होती त्यांनी ही अनुभवला असेलच.
–🌼–
“समाधानाचे पेढे”
लेखक – योगिया
या वर्षी आमच्याकडे एकाची १०वी आणि दुसऱ्याची १२वी आहे. १२ वी वाला HSC ला आणि १०वी वाला CBSE ला. १२ वीचा रिझल्ट लागून आता त्याच्या JEE, CET आणि बाकी इंजिनिअरिंग कॉलेज च्या एंट्रन्स चालू आहेत.
आपुला संवाद आपणासी
आत्मसंवाद कसा कराल
लेखक: शाड हेल्मस्टेटर
अनुवाद: रोहिणी पेठे
मूल्य: २२५₹ टपाल ३५₹ एकूण २६०₹
तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणणारी आणि आयुष्य जगण्याचे नियंत्रण पुन्हा तुमच्या हातात देणारी आत्मसंवादाची साधीसोपी पण महत्वाची तंत्रं
“सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण”
“काकू, जयेश आहे का घरी?”
“कोण रे?”
“मी हर्षवर्धन. जयेश आणि मी कॉलेजमध्ये एकाच वर्गात आहोत. काल दसऱ्याची सुट्टी होती, त्यामुळे आमच्या प्रोजेक्ट चं प्रिंटिंग राहिलंय. मी तीच हार्डडिस्क घ्यायला आलो होतो.”
“ये ना आत. पहिल्यांदाच आलास ना आमच्या घरी? जयेश पूजेला बसलाय. दहा-पंधरा मिनिटात होईलच त्याची पूजा.”
हर्षवर्धन बैठकीच्या खोलीत बसला. साधं पण स्वच्छ आणि अतिशय टापटीप असलेलं ते घर होतं. कसलीही महागडी सजावट नव्हती. देशोदेशीच्या आकर्षक वस्तूंनी भरलेल्या शोकेस नव्हत्या. चकचकाट नव्हता. त्या साधेपणाचा विचार करता करताच त्याचे डोळे दाराच्या उंबऱ्यापाशी खिळले. उंबऱ्यावर सुबक रांगोळी काढली होती. दाराला छान ‘खऱ्या’ फुलांचं तोरण होतं. तो खुर्चीतून उठला आणि जवळ जाऊन पाहू लागला, तोच जयेशची आई आली
RULES OF LIVING WITH PEOPLE
👫👭🧍🏿🧍🏿♂️🧍🏿🚶🏿♂️
1. When you meet young people –
INSPIRE THEM.
2. When you meet children –
EDUCATE THEM👩🏻🎓.
3. When you meet old people –
HELP THEM.*
4. When you meet wise people –
STUDY THEM.
5. When you meet leaders –
HONOUR THEM🥇.
‘कुलामामाच्या देशात’ एक अदभूत वन कथा संग्रह
———————————————–
लेखक: जी बी देशमुख
पृष्ठ:१३५ मूल्य:२००/ टपाल:३५/ एकुण:२३५/
पुस्तक परिचय लेखन: श्री वा. पां.जाधव
मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी प्रकाशित केलेले “कुलामामाचे देशात “हे पुस्तक माझ्या वाचण्यात आले. दिवसेंगणिक या पुस्तकाला वाढते समिक्षण वाचून परत वाचण्याचा मोह झाला.
ध्येयवेड्याची कार्यपूर्ती
नोव्हेम्बर १९२१ मध्ये एडिम्बरो येथील स्टीव्हनसन क्लबमध्ये, स्टीव्हनसनच्या वार्षिक पुण्यतिथीनिमित्त जमलेल्या लोकात रोझेलाईन मॅसन नामक भक्ताच्या मनात स्टीव्हनसनच्या आठवणी गोळा करून एक ग्रंथ प्रकाशित करावा असे आले. वर्षभरात तीनशे जणांकडे चिकाटीने संपर्क साधत व दीडशे जणांकडून आठवणी मिळवत त्याने ‘I can Remember Robert Louis Stevenson’ हा ग्रंथ प्रकाशित केला. स्टीव्हनसन हा एक लोकप्रिय कादंबरीकार होता आणि तो जाऊन २५ वर्षे होऊन गेली होती, हे लक्षात घेतले पाहिजे.
यावरून स्फूर्ती घेत सदाशिव विनायक बापट या लोकमान्यांच्या निकटवर्तीयाने, टिळक जाताच त्यांच्या आठवणी एकत्र करण्याचा चंग बांधला. काम सोपे नव्हते. त्यांनी केसरीतून लोकांना आवाहन केले तरी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. लोकमान्यांचा ‘राष्ट्रसूत्रधार’ असा नेहमी उल्लेख करणाऱ्या बापटांनी हार न मानता, आपल्या ध्येयपूर्तीकडे वाटचाल सुरू ठेवली.