शिवरायांचे शूर शिलेदार
येसाजी कंक
जे स्वराज्य द्रोही होते ते हत्तीच्या पायाखाली गेले तर काही स्वामिनिष्ठ होते त्यांनी हत्तीलाही नमवल अशाच एका रणझुंझार मावळ्याची कथा.
१६७६ साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली मोगल शाही संपवण्यासाठी. त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहा शी हात मिळवणी केली गोवळकोंड्या त महाराज्यांच जंगी स्वागत झालं. मुगल शाही आदिलशाही निजामशाही अश्या साऱ्या शह्यांच्या उरावर उभ राहून स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा आलाय म्हणून लोकांनी खूप गर्दी केली. महाराजांसोबत सरनोबत हंबीरराव मोहिते,सूर्याजी मालुसरे,येसाजी कंक इत्यादी निवडक मावळे होते या सगळ्यांनी महालात प्रवेश केला.