Back to Top

Author Archives: swarda

गाथा बलिदानाची 1

गाथा बलिदानाची

महामानव बाबा आमटे
(मुरलीधर देवीदास आमटे)

जन्म : 26 दिसम्बर 1914
हिंगनघाट, वर्धा,ब्रिटिश भारत
(वर्तमान में महाराष्ट्र, भारत)

मृत्यु : 9 फ़रवरी 2008
(वय 94)
(आनंदवन,वरोरा, चंद्रपूर, महाराष्ट्र, भारत)
राष्ट्रीयता : भारतीय
पत्नी : साधना आमटे
अपत्ये : डॉ. विकास आमटे
डॉ. प्रकाश आमटे

मुरलीधर देविदास आमटे यांनाच लोक बाबा आमटे म्हणून ओळखतात. हे महाराष्ट्राचे एक थोर सुपुत्र असून भारतातील सामाजिक कार्यकर्ता होते. विशेषतः कुष्ठरोग्यांची सेवा व गोरगरीबांची व्यथा ऐकुन त्यांना मदतीचा हात देणारे एक थोर सक्रीय सामाजिक कार्यकर्ता होते. गरीबांच्या कल्याणा साठी त्यांनी नेहमीच सकारात्मक भुमिका घेतली.

💁‍♂ समाजसेवी बाबा आमटे यांचे जीवनचरीत्र

बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्हयातील हिंगणघाट शहरात झाला. त्यांच्या वडीलांचे नाव देविदास आमटे व आईचे नाव लक्ष्मीबाई आमटे होते त्यांचे वडील मोठे सावकार होते घरी संपत्तीचा अंबार होता, बालपणीच मुरलीधर यांचे टोपण नाव बाबा ठेवले गेले होते. बालपणापासुन बाबा फार दयाळु होते.

गरीबांचे दुःख त्यांना असहय व्हायचे. परिवाराचे ते एकुलते एक अपत्य होते, त्यामुळे त्यांचे फार लाड व्हायचे, वयाच्या 14 व्या वर्षी वडीलांनी त्यांना एक बंदुक भेट दिली होती. त्या बंदूकीने बाबा छोटया मोठया जंगली प्राण्यांची शिकार करायचे, जेव्हा ते 18 वर्षाचे झाले त्यांना वडीलांनी एक अॅम्बेसिडर गाडी भेट दिली होती. त्यांना निच्च जातींच्या मूलांसोबत खेळण्यास कधीच मनाई केली गेली नाही. स्वतः बाबांनाही जाती व्यवस्था मान्य नव्हती.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी वर्धा येथून कायदयाचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. महात्मा गांधी जेव्हां वर्ध्यात सेवाग्राम येथे आले होते तेथे ते गांधीजींना भेटले त्यांच्या मनात याचा फार प्रभाव पडला. पुढे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयात सक्रीय सहभाग दर्शवीला.

त्यांनी गांधीजींच्या खादी बनवण्याच्या चरख्याचा स्विकार केला व खादी कपडेच घालायचे ठरविले. अनेक नेत्यांच्या तुरूंगवासा दरम्यान त्यांची कायदयाची बाजू बाबा सांभाळत. गांधीजींनी त्यांचे अभय साधक असे नामकरण केले होते.

त्याकाळात कुष्ठरोग समाजात फार तेजीने पसरत चालला होता. अनेक लोक या रोगामुळे बाधीत झाले होते यामुळे ते सामान्य जीवनापासुनच नाही तर त्याचे कुटूंबही कुष्ठ रोग्यांना त्याग करून घराबाहेर काढू लागले होते. कुष्ठरोग पापी माणसाची निशाणी बनली होती, समाजात त्यांना फारच हिन भावनेचा सामना करावा लागत होता.

बाबांनी अशाच निराधार लोकांची सेवा करायचे ठरविले लोकांना ते या आजाराबद्दल जागरूक करून याची लक्षणे व प्रतिबंध कसा करायचा याचीही माहिती देत. कुष्ठरोग्यांना योग्य सामाजिक स्थान मिळविण्यासाठी त्यांनी आपली कंबर कसली. त्यांनी 15 आॅगस्ट 1949 रोजी महाराष्ट्रात तीन आश्रमांची स्थापना केली, त्यांना त्यांनी नंदनवन हे नाव दिले येथे कुष्ठरोग्यांना राहण्या व उपचाराची सोय उपलब्ध होती त्यासोबत त्यांना रोजगाराची सोयही उपलब्ध करून दिली.

1973 साली गडचिरोली जिल्हयातील माडिया गोंड जमातीच्या आदिवासी समुदायांना संघटीत करून त्यांनी लोक बिरादरी प्रकल्प स्थापन केला.

बाबा आमटे हे आपल्या जीवना अखेरपर्यंत सामाजिक कार्यात मग्न होते. सामाजिक एकता व समभाव निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जंगली जनावरांच्या कत्तली व तस्करी करण्यापासुन रोखण्यास लोकांना प्रेरीत केले.
त्यांनी नर्मदा बचाओ आंदोलनातही सहभाग घेतला. त्यांच्या असाधारण समाजसेवेसाठी भारत सरकारने त्यांना 1971 साली पद्मश्री पुरस्कार देवून सन्मानीत केले.

परिवाराची त्यांना फार सहाय्यता मिळाली त्यांची पत्नी इंदु घुले ज्यांना ते साधना असे म्हणत त्यांनी फार सोबत केली. नेहमी त्या बाबांच्या पाठीशी राहील्या. त्यांचे दोन मुलं आहेत डाॅ. विकास आमटे व डाॅ. प्रकाश आमटे यांनीही आपल्या व्यवसायातुन मोलाचा वेळ काढुन बाबांना मदत केली. बाबांच्या दोन्ही सुना डाॅ. मंदाकिनी आणि डाॅ. भारती हया देखील बाबांच्या कार्यात सहभागी आहेत. डाॅ. प्रकाश आमटे हे आपल्या पत्नी डाॅ. मंदाकिनी सोबत गडचिरोली येथील हेमलकसा गावात माडिया गोंड जमातीच्या लोकांसाठी एक शाळा व एक हाॅस्पीटल चालवतात.

डाॅ.मंदाकिनी यांनी सरकारी नौकरी सोडून डाॅ. प्रकाश आमटे यांच्या सोबत हेमलकसा येथे स्थायीक झाल्या त्या गोरगरीबांची व जखमी जनावरांची सेवा करतात.

त्यांचे दोन मुले आहेत दिगंत जो डाॅक्टर असुन हेमलकसा येथेच काम करतो दुसरा मुलगा अनिकेत जो एक इंजिनियर आहे ज्याचा स्वतंत्र व्यवसाय आहे. 2008 रोजी प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांना सामाजिक कार्यासाठी मॅगसेसे अवाॅर्ड मिळाला आहे.

बाबांचे थोरले पुत्र विकास आमटे व त्यांची पत्नी भारती आमटे आनंदवनातील हाॅस्पीटल ची जवाबदारी सांभाळतात.

वर्तमानात हेमलकसा येथे एक मोठी शाळा व हाॅस्पीटल आहे. तर आनंदवन येथे एक युनिव्हर्सिटी एक अनाथाश्रम आणि अंध व गोर गरीबांच्या मुलांसाठी शाळा आहे. आजही स्वसंचालीत आनंदवन आश्रमात जवळपास 5000 लोक राहतात.

महाराष्ट्रातील आनंदवन सामाजिक विकास प्रकल्प आज जगात जाणल्या व प्रशंसेचे पात्र ठरले आहे. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोगींच्या उपचारासाठी सोमनाथ व अशोकवन आश्रम स्थापन केले होते.

🎖 पद्मश्री बाबा आमटे यांना मिळालेले पुरस्कार

पद्मश्री पुरस्कार सन् 1971
रमण मॅगसेसे पुरस्कार 1985
पद्म विभूषण 1986
मानव अधिकार क्षेत्रात अतुल्य योगदानासाठी संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार 1988
गांधी शांती पुरस्कार 1999
राष्ट्रीय भूषण 1978
जमनालाल बजाज अवार्ड 1979
एन.डी. दीवान अवाॅर्ड 1980
रामशास्त्री अवार्ड 1993 ( रामशासत्री प्रभुणे संस्था महाराष्ट्र )
इंदिरा गांधी मेमोरियल अवार्ड 1985
राजा राममोहन राॅय अवार्ड 1986 दिल्ली सरकार
फ्रांसीस मश्चियो प्लॅटिनम ज्युबिली अवार्ड 1987
जी.डी. बिरला इंटरनॅशनल अवार्ड 1987
आदिवासी सेवक अवार्ड 1991 भारत सरकार
मानव सेवा अवार्ड 1997 यंग मॅन गांधीयन असोसिएशन राजकोट, गुजरात.
सारथी अवाॅर्ड 1997 नागपुर
महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट अवार्ड 1997 नागपुर
कुमार गंधर्व पुरस्कार 1998
सावित्रीबाई फुले अवाॅर्ड 1998 भारत सरकार
फेडरेशन आॅफ इंडियन चेम्बर आॅफ काॅमर्स अॅंण्ड इंडस्ट्रिी अवार्ड 1988
आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र सरकार 1998
महाराष्ट्र भुषण अवार्ड 2004 महाराष्ट्र सरकार

🏵 सन्मानीत पदव्या

डी.लिट – टाटा इंस्टीटयुट आॅफ सोशल सायन्स मुंबई , भारत 1999
डी.लिट – 1980 नागपुर युनिव्हर्सिटी नागपुर , भारत
डी लिट – 1985 – 86 पुणे युनिव्हर्सिटी महाराष्ट्र
देसिकोत्तमा 1988 – सन्माननीय डाॅक्टरेट, विश्वभारती युनिव्हर्सिटी, शांतीनिकेतन पश्चिम बंगाल, भारत

💎 बाबा आमटे यांचे सुविचार

“मी एक महान नेता बनण्यासाठी काम करीत नाही तर मी गरजु गोरगरीबांची मदत करू ईच्छितो.”
– बाबा आमटे

“या संसारातील काही लोक स्वतःसाठी जगतात तर काही देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात काही लोक समाजासाठी जगतात, असे जीवन जगणारे फार थोडे व्यक्ती या जगात आहेत.”
– बाबा आमटे

बाबा आमटे यांनी आपले संपुर्ण जीवन गोरगरीब व कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी समर्पित केले त्यांची आदिवासींविषयी आदरभाव व उत्कंठा त्यांच्या कार्यातून दिसून येते त्यांचे कुष्ठरोगींसाठीचे कार्य जागतीक आरोग्य संघटनेव्दाराही प्रशंसीत आहे. संयुक्तराष्ट्राच्या आरोग्य संघटनेत बाबा आमटेंविषयी एक छोटा लघुपट दाखवण्यात आला होता. जी आपणा सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. महाराष्ट्र पुत्र असल्यामुळे आपण सर्व महाराष्ट्रीयांसाठी ते प्रेरणेचे सागर आहेत.

GMRT

team of astronomers at the National Centre for Radio Astrophysics (NCRA) in Pune, India have discovered a mysterious ring of hydrogen gas around a distant galaxy, using the Giant Metrewave Radio Telescope (GMRT). The ring is much bigger than the galaxy it surrounds and has a diameter of about 380,000 light-years (about 4 times that of our Milky Way).

The galaxy (named AGC 203001), is located about 260 million light-years away from us. There is only one other such known system with such a large neutral hydrogen ring. The origin and formation of such rings is still a matter of debate among astrophysicists.

Neutral hydrogen emits radio waves at a wavelength of about 21cm. This radiation from neutral hydrogen atoms has allowed radio astronomers to map the amount and distribution of neutral hydrogen gas in our Milky Way galaxy and in other galaxies in the Universe. Typically, large reservoirs of neutral hydrogen gas are found in galaxies which are actively forming new stars. However, despite showing no signs of active star formation the galaxy AGC 203001 was known to have large amounts of hydrogen, although its exact distribution was not known. The unusual nature of this galaxy motivated astronomers in NCRA to use the GMRT to conduct high-resolution radio observation of this galaxy to find out where in the galaxy this gas lies.

The GMRT observations revealed that the neutral hydrogen is distributed in the form of a large off-centered ring extending much beyond the optical extent of this galaxy. More puzzlingly, the astronomers found that the existing optical images of the ring showed no sign of it containing stars. In collaboration with two French astronomers, Pierre-Alain Duc and Jean-Charles Cuillandre, the NCRA team obtained a very sensitive optical image of this system using the Canada-France-Hawaii-Telescope (CFHT) in Hawaii, USA. However, even these images do not show any sign of starlight associated with the hydrogen ring.

There is no clear answer today as to what could lead to the formation of such large, starless rings of hydrogen. Conventionally, galaxy-galaxy collisions were thought to lead to the formation of such off-centered rings around galaxies. However, such rings also generally contain stars. This is contrary to what is found in this ring. Figuring out how this ring was formed remains a challenge to astronomers.

Encouraged by this discovery, the team is now conducting a large survey to map the neutral hydrogen around several more similar galaxies. If some of them also show rings like this, it should help us to better understand the formation mechanism behind such rare rings.

This work was led by Omkar Bait, a doctoral student at NCRA working under the supervision of Yogesh Wadadekar. This work forms a part of Omkar’s doctoral thesis. Sushma Kurapati, who is another doctoral student at NCRA also played a role in the radio observations. Other expert scientists who contributed include, Pierre-Alain Duc (Universite de Strasbourg, Strasbourg, France), Jean-Charles Cuillandre (PSL University, Paris, France), Peter Kamphuis (Ruhr University, Bochum, Germany) and Sudhanshu Barway (Indian Institute of Astrophysics, Bengaluru, India).

“मुलानेच घेतली बापाची शाळा”

“मुलानेच घेतली बापाची शाळा”

(वयात आलेल्या सगळ्या आई – बाबांसाठी)
– योगेश गोखले

सो S S बाबा chill , असं म्हणून माझ्याच खांद्यावर थोपटून मुलगा बाहेर पडला. मी अजूनही कन्फ्युज्ड आहे.

माझा मुलगा यंदा १०वी ला आहे. तसा बऱ्यापैकी हुशार आहे. आजच सकाळी त्याचा प्रिलिम चा रिझल्ट लागला. आम्ही दोघे उभयता शाळेच्या बोलावण्यावरून पालक मिटिंग ला गेलो होतो. आमच्या मुलाचा रिझल्ट आमच्या कडे दिला (हल्ली मुलांकडे रिझल्ट द्यायला काय प्रॉब्लेम आहे माहित नाही, का मुलं फेरफार करतात , का घरी दाखवतच नाहीत , काय माहित ? पण आजकाल पालकांना बोलावून रिझल्ट द्यायची नवी पद्धत आहे ) आणि मग सगळ्या पालकांची “पेरेंट मिटिंग” झाली. मुलाला ८४% मिळाले होते. (पण हल्ली त्याने काय होतंय?).

क्लास टिचर ने सांगितलं की सगळ्याच मुलांना तसे कमी मार्क मिळाले आहेत. त्यामुळे आता पुढचे दोन महिने सगळ्यांनी माना मोडून , दिवसाचे १८ तास अभ्यास करणे गरजेचे आहे. मुलांनी अभ्यास कसा करावा , पालकांनी काय काळजी घ्यावी , मुलांना आहार काय दयावा, वगैरे वगैरे मार्गदर्शन झालं. मग प्रत्येक विषयाच्या टिचरनी अर्धा तासाचं सेशन घेतलं. प्रत्येकाने सांगितलं की सकाळी २, संध्याकाळी २ असा रोज त्यांच्या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. शेवटी क्लास टिचर ने परत अर्धा तास घेतला. हे ही सांगितलं की आम्ही मुद्दाम प्रिलिम चे पेपर खूप अवघड काढतो आणि तपासतोही खूप स्ट्रीक्ट. मुलांना कमी मार्क पडले की ती अजून अभ्यास करतात . आमच्या शाळेचा रिझल्ट कसा दर वर्षी १००% लागतो वगैरे.

आम्ही टिपिकल ओपन कॅटेगरी मध्यम वर्गीय असल्यामुळे लगेच हे सगळं सिन्सीयरली घेतलं. सौ ने सांगितलं की मी नेहमी त्याला सांगतच असते. तुम्ही जरा ओरडा. बाबांच्या सांगण्याने जरा वजन पडतं.
मी संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर चहा घेतला. चिरंजीव फुटबॉल खेळायला जायच्या तयारीत होते. मीच विषय काढला,

“काय , किती मार्क मिळाले?”

“तुम्हालातर माहित आहेत की”

“अरे पण मग कमी पडले , ८४% नी आजकाल कुठे काय होतं. हवं ते कॉलेज सोड , सायन्स ला पण ऍडमिशन मिळणार नाही. कमीत कमी ९४% तरी पडायला हवेत तर काहीतरी खरं”

तो नुसता हसला. मला त्याच्या या हसण्याची फार चीड येते. ते कुत्सीत च्याही पलीकडचे आहे असं मला वाटतं. स्वाभाविक , मी त्याला जरा मोठ्या आवाजात विचारलं

“काय म्हणतोय मी …हसण्यासारख काय आहे त्यात?”

“नाही बाबा मला गंम्मत वाटते की तुम्ही परस्परच ठरवलं की मी सायन्स ला जाणार आहे… म्हणून हसलो”

मला त्यानी बरोब्बर पकडलं होतं ..पण मी मोठा होतो ना ..त्याच अधिकाराने मी दरडावून सांगितलं

“प्रश्न तो नाही आहे ..आधी ९४% टक्के तर मिळवून दाखव ..मग पुढे काय शिकायचं ते बघू ”

“हा ..ते मिळतील ..९२% – ९४% मिळतील”

“अरे पण कसे ?..तू ८४% वरून ९४% ला कसा जाणार आहेस ? हे खेळणं वगैरे कमी करा आता ..जरा टेस्ट सिरीज लावा ..वेळ लावून पेपर सोडवा”

“बाबा chill ..मिळतील ९२%+”

“अरे गाढवा ते काय वरून पडणार आहेत का ..chill करून चालणार नाही तुला”

“बाबा ..जरा मोबाईल द्या तुमचा”

त्याने माझा मोबाईल घेतला आणि त्याच्या ई-मेल मधून एक excel ओपन करून दाखवली. त्यात त्याच्या शाळेतील गेल्या ३ वर्षातल्या मुलांचा डेटा होता ..प्रत्येकाला पडलेले प्रिलिम चे मार्क आणि फायनल बोर्डाचे मार्क्स. स्पष्ट ट्रेंड होता की ऑन अन एव्हरेज ८ ते १० टक्के वाढतात.

“बाबा तुमच्या पेक्षा आमचं नेटवर्क आणि इंटेलिजन्स जास्त स्ट्रॉंग आहे, शाळा मुद्दामच पेपर अवघड काढते आणि कडक तपासते , जेणे करून मुलांना आणि त्याही पेक्षा पालकांना वाटावं की अजून खूप अभ्यास करायला पाहिजे. हे तुम्हालाही आज शाळेत सांगितलं असेल पण तुम्ही पण तसं काही सांगणार नाही. मला खरंच कळत नाही इतर वेळेस तुम्ही आम्हाला जे trust आणि transparency वर लेक्चर देता ते आमच्या अभ्यासाच्या वेळी कुठे जातं. जर मुलांना रिऍलिस्टीक मार्क दिले तर मुलं काय हुरळून जाणार आहेत का ? उलट चांगले मार्क टिकवायचं टेन्शन जास्त असतं या कॉम्पिटेटिव्ह जगात. आणि प्रत्येकाला वाटतंच ना की मागच्या पेक्षा चांगलं करावं . मग रिऍलिस्टिक मार्क्स दिले तर बिघडलं कुठे ? प्रत्येक विषयाचा जर रोज ४ तास अभ्यास करायचा तर २४ तास अभ्यास झाला. कोणीतरी जरा लॉजिकल सांगायला पाहिजे ना ..मग खरं मोटिवेशन येईल नाहीतर हे सगळं फार डिप्रेसिंग आहे”

“आहो माझं ठीक आहे ..मला खात्री आहे की मी ९२% पर्यंत कसाही जाईन …पण मला काळजी निशित ची आहे. खरं तर तो ८०%-८२% पर्यंत जाईलही. त्याने प्रिलिम ला भरपूर अभ्यास केला होता. मीच त्याला काही गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. पण या अवघड पेपर आणि आतिकडक तपासणीच्या नादात त्याला ६०% मिळाले. गेले २ दिवस डिप्रेस आहे. आता अभ्यासच करणार नाही म्हणतो कारण म्हणे मी काही बाकीच्यांसारखा हुशार नाही ..कितीही अभ्यास केला तरी ६०%. आई -बाबा पण खूप ओरडले त्याला. सहामाही ला ७०% वरून ६०% वर आला. लायकी काढली त्याची.”

“त्याच्या कडेच चाललोय फुटबॉल खेळायला.. हाच आता एक मार्ग आहे की त्याला या डिप्रेशन मधून बाहेर काढून परत अभ्यासाला लावण्याचा..अर्धा तास खेळणार आणि मग त्याच्या नकळत आज सायन्स चं काय वाचलं , काय डोक्यावरून गेलं ..काय कसं लक्षात ठेवलं ह्या गप्पा मारणार, म्हणजे माझी रिव्हिजन आणि त्याची नकळत तयारी…८-१० दिवसात त्याला पेपर सोडवायला लावतो..आमची आळी – मिळी गूप चळी. मीच तपासून रिऍलिस्टिक मार्क देणार. नाही त्याला ८०% + नेला तर नाव दुसरं”

“आणि माझी काळजी करू नका , मी तुम्हाला ९२%+ ची गॅरेंटी देतो. पण त्या पुढच्या २% साठी उगाच माझ्या मागे लागू नका. मी मनापासून प्रयत्न करीन पण त्या ऍडीशनल २% ची काही गॅरंटी नाही आणि उगाच त्या खात्री नसलेल्या गोष्टी साठी मला माझा संध्याकाळचा खेळ , तबल्याचा क्लास , मित्र बंद करायचे नाही आहेत. या जगात मध्यमवर्ग नामोशेष होत चालला आहे. तोच तर एक वर्ग होता ज्याने सगळं बॅलेन्स ठेवलं होतं, इन्कलुडींग सहिष्णुता आणि संस्कृती. ऑल इसम्स आर गुड आदर दॅन एक्सट्रीझम. एक्सट्रीझम दहशदवादाला जन्म देतो. मार्कांचेही तेच झालेय, अतिरेकी मार्क पाहिजेत .. ‘९८%’ नाहीतर मग ‘पास झाला तरी बास’ कॅटेगरी. हा पण एक दहशवादच नाही का ? ८०%-९०% मार्क , खेळ , मित्र , छंद , तबला-गाणं -नाटकं अशी मध्यममार्गी मुलं नकोच आहेत कुणाला. एक तर IIT नाहीतर ITI. खरंच अवघड आहे. अरे TII पण असू शकत ना..

अजूनही माझ्यातला बाप जागा होता. मी त्याला दरडावून विचारले

“तुला काय म्हणायच आहे ..आम्ही दहशदवादी आहोत का ? का आम्ही तुला दहशदवादी करतोय”

तो परत एकदा तसा हसला ..कुत्सित च्या पलीकडचा.

“बाबा प्रश्न माझा नाही आहे , शाळा आणि सुज्ञ पालक त्या निशित ला दहशदवादी करायला निघाले आहेत आणि कोणीतरी, म्हणजे मी, हे थांबवलेच पाहिजे”

“पण बाबा तुम्ही माझी काळजी करू नका – ९२% नक्की मिळवतो …chill”

“चला मी निशित कडे जावून तासाभरात येतो ..आल्यावर मॅथ्स चा पेपर सोडवायचाय”

माझ्याही नकळत मी उठलो आणि बोलून गेलो “मी पण येऊ का फुटबॉल खेळायला ?”

मुलाने येऊन मला खांद्यावर थोपटले .. “बाबा chill ..तुला झेपणार नाही”

“ए आई बाबासाठी एक कप आल्याचा चहा टाक”

तो बाय करून हसत गेला सुद्धा.

तो निशितला ८०% पर्यंत आणायला गेलाय. त्याने ९२% मिळवले आणि निशितला ८०% मिळाले तर माझ्या दृष्टीने ते १००% ठरतील हे नक्की !

गेमिंग

गेमिंग करणार्या मुलांचे पालक भेटले की हमखास म्हणतात आमचा मुलगा/ मुलगी अगदी एडिक्ट झाली आहे..

मुलांच्या अति मोबाईल वापरासाठी किंवा स्क्रीन टाइमसाठी त्यांना दोषी ठरवू नका. त्यांच्या नावाने कटकट करण्याआधी ही सवय कुणी लावली ते आठवून बघा. दोष कुणाला द्यायचाच झाला तर स्वतःला द्यायला हवा. माझी मुलगी/मुलगा मोबाईल एडिक्ट आहे हे वाक्य चूक आहे. हे वाक्य असं वापरून पालक म्हणून आपण स्वतःची सुटका करून घेतो आपल्याही नकळत. काहीवेळा जे म्हणायचंय तेच शब्दप्रयोग आवश्यक आहे. पालक म्हणून आपण सोयीच्या गोष्टी करतो आणि मुलांना व्यसनाधीन म्हणतो. हा त्यांच्यावर अन्याय आहे. बाजारात जाऊन महागडी गॅजेट्स, मोबाईल, टॅब मुलं विकत आणत नाहीत. आपण घेऊन देतो, त्याचं कौतुक असतं आपल्याला, आपल्या आर्थिक क्षमतेचा गर्व, अभिमान आणि काय काय ही असतं. सुप्त मानसिक अवस्थेत. परिणाम मुलांना सवयी लागतात.
दुसरं बऱ्याच पालकांना वाटतं मोबाईल काढून घ्यायचा तर इतर महागडे पर्याय दिले पाहिजेत. तर मुळीच नाही. उलट एक रुपया ही खर्च न करता मुलांना असंख्य गोष्टींमध्ये गुंतवता येऊ शकतं. त्यांना स्वयंपाक घरात मदतीला घ्या. पाटपाणी घ्यायला सांगा. त्यांना कपड्यांच्या घड्या करायला शिकवा. त्यांना भाज्या निवडायला शिकवा. त्यांच्याशी तुम्ही खेळा. घरातल्या आवरा आवरीत मदतीला घ्या. त्यांची खेळणी स्वच्छ करायला, आवरून ठेवायला सांगा.
किंवा काहीही पर्याय देऊ नका.
तुझा तू शोध असं सांगा.
मुलं मोबाईल मिळाला नाही, टिव्हीही मिळाला नाही तर त्यांचे म्हणून पर्याय शोधतात. त्यांना ते कसे शोधायचं हे माहीत असतं. काहीच सापडलं नाही तर इतर मुलांशी जास्तवेळ खेळतात. प्रॉब्लेम आपला म्हणजे पालकांचा असतो. आपल्याला सगळं भरवायला आवडतं. त्यांनी काय करायचं, कसं करायचं, निराळे पर्याय कसे निवडायचे, कुठले निवडायचे सगळं आपण ठरवतो आणि बरहुकूम मुलांना करायला लावतो. त्यापेक्षा पर्याय द्या, त्यांना आवडले तर ठीक नाही आवडले तर त्यांचे त्यांना शोधू द्या..
स्पून फिडिंग बंद करणं ही पालकांसाठी सगळ्यात कठीण गोष्ट असते. कारण त्याचं व्यसन असतं पालकांना.
मुलं एडिक्ट नसतात, पालक असतात, वेगवेगळ्या गोष्टींचे.
एक रुपयाही खर्च न करता, कुठलंही नवं खेळणं विकत न आणता मुलांना मोबाईल पासून दूर नेता येतं… जस्ट थिंक!

मुक्ता चैतन्य

#noscreenday #arunsadhufellowship #socialmedia #noscreenforkids

भांडणं, मारामारी, चुगल्या, तक्रारी. हे सगळं मुलं का करतात?

c&p
एका जागेवर शांतपणो तासन्तास बसून राहिलेलं मूल कोणी पाहिलंय का? मुलं सतत चालत असतात, पळत असतात. दंगा करत असतात. उद्योग-उपद्व्याप करत असतात. अखंड बडबड करतात. कितीतरी मोठय़ा माणसांना या दंग्याचा फार त्रस होत असतो. ऑफिसमधून थकून घरी आलेल्या आईबाबांना हा उत्साहसुद्धा कधीकधी पेलवत नाही. आजी-आजोबांना तर हा प्रकार पेलवतच नाही. घरात दोन मुलं असली की या उद्योग आणि दंग्याच्या जोडीला भांडणं, मारामारी, चुगल्या, तक्रारी आणि दुप्पट दंगा चालतो. त्यामुळे घरची माणसं फारच जिकिरीला येतात. एकदा का मुलं झोपली की घर कसं शांत शांत होतं. वादळ उठेर्पयत सगळे लोक आपापली कामं करून घेतात. विश्रंती घेतात. कधी एकदा ही मुलं मोठी होतात, असं घरातल्यांना होतं. 

मुलं एवढी चळवळी का असतात?
मूल कुठेही असलं तरी शांत बसत नाही. याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं कारण शास्रीय आहे. वयाच्या आठ वर्षार्पयत मुलांच्या मेंदूत एक महत्त्वाची घडामोड होत असते. ही घडामोड त्यांना आयुष्यभर पुरणारी असते. मेंदूच्या डाव्या आणि  उजव्या गोलार्धाना जोडणारा ‘कॉर्पस कलोझम’ नावाचा अवयव असतो. तो अवयव अजून विकसित झालेला नसतो. त्याची वाढ होत असते. वयाच्या साधारणपणो आठव्या वर्षाच्या आतबाहेर ही वाढ ब-यापैकी पूर्ण होते. त्यानंतर मुलांच्या शरीराला हळूहळू स्थिरता यायला लागते. दहा वर्षाच्या आसपास मुलं क्रमाक्रमानं स्थिर होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांनी या वयात शारीरिक दंगा, भरपूर हालचाल केलीच पाहिजे. कारण तसं झालं नाही तर हा अवयव योग्य प्रकारे विकसित होणार नाही. तो विकसित झाला नाही तर पन्नाशी-साठीनंतर त्यांना शरीराचा समतोल साधून चालणं अवघड जाईल. 

अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे निरीक्षण. एवढा दंगा चाललेला असला तरी त्यातही मुलं वस्तू, व्यक्ती, एखादा प्रसंग, खेळ, खेळणी,  एखादी प्रक्रिया, लोकांचं बोलणं याचं संपूर्ण निरीक्षण करत असतात. हा तर संपूर्ण शिक्षणाचा पायाच. दुपटय़ातून बाहेर पडून ज्या क्षणी मूल हालचाल करायला लागतं त्याच क्षणापासून ते सतत, प्रत्येक क्षणी काहीना काही शिकत असतं. आपण म्हणजे मोठय़ांनी न सांगता- सवरता त्याचा मेंदू त्याला आज्ञा देत असतो. त्या आज्ञेनुसार तो कामाची यादी पार पाडत असतो. त्याला आपली मदत होवो किंवा न होवो तो ज्ञान मिळवत राहातो. या काळात तो खरा ज्ञानार्थी असतो. पहिल्या काही वर्षात मुलांच्या शिकण्याचा वेग प्रचंड असतो. कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ ही पाच ज्ञानेंद्रियं अतिशय महत्त्वाची असतात. या ज्ञानेंद्रियांमधून  अनेक प्रकारची माहिती सतत मेंदूकडे पोहोचत असते. या पाचही ज्ञानेंद्रियांतून मूल नित्यनवे अनुभव घेत असतं. हे मूल एखाद्या शहरातलं असो, गावातलं. कोणत्याही आर्थिक स्तरातलं असो- मुलांना या वयात निरीक्षण करायचंच असतं आणि नवीन काहीतरी शिकायचंच असतं. 

मुलांच्या मेंदूची जडणघडण होण्यासाठी

◆ छानसं, आल्हाददायक संगीत ऐकवावं. वाद्यसंगीत, मंद संगीत ऐकवावं. आवाजाकडे लक्ष वेधून घ्यायला हवं. साधेसुधे नैसर्गिक आवाज त्याच्या कानावर पडायला हवेत.

◆ इतर भाषेतली गाणी, इतर भाषेतले शब्द ऐकवावेत. इतर भाषा बोलणारे शेजारी, नातेवाईक असतील तर त्यांना मुलांशी त्यांच्या भाषेतच बोलायला सांगावे. 

 ◆ मुलांशी बोलणारी भरपूर माणसं आसपास असतील तर त्याच्या  भाषाविकासासाठी ते चांगलंच. वेगवेगळी माणसं भेटली की मुलं आनंदी होतात. 

 ◆ मुलांना गोष्टी सांगाव्यात; पण मोबाइल/टॅब/ कॉम्प्युटरवर दाखवू नयेत. स्क्रीन मुळीच दाखवू नये.

◆ कौतुकाचा स्पर्श करणं, सतत बोलणं, गाणी म्हणणं- ऐकवणं, हे आपण अवश्य करावंच. त्यातही विविध भाषेतली गाणी ऐकवली तर जास्त चांगलं. 

◆ पावसाचे थेंब अनुभवणं, फूल- माती- दगड- मांजरासारखे प्राणी असे विविध स्पर्श देणं.

◆ जमतील तेवढे रंग, भरपूर आकार दाखवणं.

◆ मुलांना टेकडीवर, नदी- समुद्रावर,  घराच्या खिडकीत, गच्चीत नेऊन खाली-वर, डावीकडे- उजवीकडे त्यांची नजर जाईल असं करायला पाहिजे. मुला- मुलींची नजर लांबच्या वस्तूंवर जायला लागली की, समोरची टेकडी, ढग, उडणारे पक्षी, झाडावर विसावलेले पक्षी, झाडांवरची फुलं, हलणारी पानं अशा अनेक गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष वेधून घेणं. 

◆ दिवसा आणि रात्रीच्या वेळा दाखवल्या पाहिजेत.

◆ पहिल्या काही वर्षात मूल असं चैतन्यानं रसरसलेलं असतं. चळवळ, दंगा, हालचाली करणं ही त्यांच्यातली शारीरिक प्रेरणा असते. त्यांना थांबवण्यापेक्षा, त्रागा करण्यापेक्षा किंवा चिडचिड करून धपाटे घालण्याऐवजी मुलं असं का करतात, हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीचा काही काळ त्रस होणार आहे ही मनाची तयारी ठेवणंही आवश्यक आहे. तीव्र कुतूहल हीच प्रेरणा या वयातल्या मुलांच्या एकूण वर्तनामागे असते. कितीही झोप आली, दमलं तरी झोपण्याची तयारी नसते. कारण हेच. झोपण्यातला वेळ वाया कसा घालवायचा?

must show to your kids

This is very interesting as u scroll down you go deeper and deeper in the sea… this is really amazing.. Show it to your children, let them learn it.

Scroll down to 10000 ft deep in an ocean 😱

https://neal.fun/deep-sea/

Don’t miss
निळ्या लिंक वर क्लीक करा व खाली खाली या.. आणि समुद्रातील गंमत बघा… मुलांना पण दाखवा..

दोन चोरांची गोष्ट

दोन चोरांची गोष्ट

चोर १ –

अमेरिकेमध्ये ‘आर्थर बेरी’ नावाचा दागिने चोरी करण्याच्या कलेत पारंगत असलेला, आणि चोरीचं असामान्य टॅंलेंट लाभलेला चोर होऊन गेला. अमेरिकेच्या गुन्हेगारी इतिहासात त्याचं नाव आजही एक नंबरला आहे, इतका तो सफाईदार चोर होता.

एकोणीसशे वीसच्या दशकात लोकांनी त्याला ‘ग्रेटेस्ट ज्वेल थीफ’ अशी उपाधी देऊन एक प्रकारे त्याचा गौरवच केला होता. तो फक्त अतिश्रीमंत लोकांनाच टारगेट करायचा, आणि त्याने चोरी करणं, हे सुद्धा एक प्रतिष्ठेचचं लक्षण होवुन बसलं .

चोरी करणं वाईट असलं तरी लोकांमध्ये ह्या चोराबद्द्ल आकर्षण, कौतुक आणि सहानभुती होती.

त्याच्या दुर्दैवाने एक दरोडा टाकताना, पोलीसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या, आणि त्याला पकडला!

वयाची पुढची अठरा वर्षे त्याने जेलमध्ये काढली. जेलमधुन बाहेर आल्यावर त्याने गुन्हे करणं, चोर्‍या करणं सोडुन साध जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला, पण ‘द ग्रेट ज्वेल थीफ आर्थर बेरी’ बद्द्ल लोकांचं कुतुहुल अद्यापही कमी झालं नव्हतं.

लोकांनी बदललेल्या आर्थर बेरीची एक सार्वजनिक मुलाखत घेतली, ती ऐकायला मोठा जमाव जमला होता, अनेक प्रश्न विचारले, आर्थरनेही दिलखुलास उत्तरे दिली.
मुलाखत खुप रंगली,

मुलाखतकाराने शेवटचा प्रश्न विचारला, “तुम्ही सर्वात मोठी चोरी कोणत्या माणसाकडे केली?, खरं खरं उत्तर द्या.”

“तुम्हाला खरचं, खरं खरं उत्तर ऐकायचं आहे का?” गर्दीकडे पाहुन आर्थरने विचारले.

“हो, हो!” एकच गलका झाला.

“मी सर्वात मोठी चोरी ज्या माणसाकडे केली, त्या माणसाचे नाव आहे, ‘आर्थर बेरी’, हो! मीच माझा सर्वात मोठा गुन्हेगार आहे.”

सगळे एकदम अवाक आणि शांत झाले.

“मी एक सफल व्यापारी होऊ शकलो असतो, मी वॉल स्ट्रीटचा अनाभिषिक्त सम्राट होवु शकलो असतो, मी समाजाची सेवा करणारा एक नशीबवान व्यक्ती बनु शकलो असतो, पण हे न करता मी चोरी करण्याचा मार्ग निवडला, आणि माझं एक तृतीयांश जीवन मी जेलमध्ये वाया घालवलं.”

चोर २ –

१८८७ चा एक पावसाळा, एका किराणा दुकाना मध्ये भिजत भिजत एक ग्राहक आत शिरला. त्याने काही वस्तु खरेदी केल्या, आणि काऊंटरवर वीस डॉलर्सची नोट दिली आणि तो बाहेर पडला.

कॅश काऊंटर वर असलेल्या स्त्रीने स्मितहास्य केले, आणि नोट गल्ल्ल्यात टाकली, तो त्यांचा नेहमीचा ग्राहक होता, दुकानाजवळच राहणारा तो एक होतकरु चित्रकार होता. एमानुअल निंगर त्याचं नाव!

नोटा ओल्या असल्याने तिच्या हाताला शाई लागली, तिने बारकाईने नोट पाहिली, ती हुबेहुब नोट होती, पण शाई सुटल्याने तिला बनावट नोट असल्याचा संशय आला,

शहानिशा करण्यासाठी, तिने पोलिसांना बोलावले.

ती एक बनावट नोट होती, पण इतकी हुबेहुब नक्कल पाहुन पोलिसही चक्रावले.

पोलिसांनी चित्रकाराच्या घरावर छापा मारला, त्याच्या पेंटींग्ज जप्त केल्या गेल्या. चित्रकार निंगर जेलमध्ये गेला. आतापर्यंत अनेक बनावट नोटा रंगवुन बाजारात वापरल्याचे त्याने कोर्टासमोर कबुल केले.

कोर्टाने त्याच्या चित्रांचा लिलाव करुन नुकसानभरपाईचे आदेश दिले.

तो जेलमध्ये असतानाच त्याच्या चित्रांचा लिलाव झाला, त्याचे प्रत्येक चित्र पाच हजार डॉलरहुन अधिक किमतीला विकले गेले. लाखो डॉलर्स जमा झाले.

विडंबना ही होती की पाच हजार डॉलर्सचे चित्र बनवणार्‍या निंगरला त्यापेक्षा जास्त वेळ, वीस डॉलर्सची नोट बनवायला लागायचा.

तात्पर्य

– आपली अंगभुत कला न
ओळखणारा, प्रत्येक जण चोर आहे.

– ती प्रत्येक व्यक्ती चोर आहे, जो आपल्या पुर्णपणे क्षमतेचा वापर करत नाही.

– ती व्यक्ती चोरच आहे, ज्याला, आपल्या स्वतःवर विश्वास नाही.

– तो प्रत्येक रिकामटेकडा चोर आहे, जो समाजाला काहीही देत नाही.

– आपल्या कामावर प्रेम न करणारा, कामाला न्याय न देणारा प्रत्येक जण चोर आहे.

स्वतः मधील टॅलेंट ओळखा

समिधा

समिधा

सकाळी फिरायला निघालो होतो. बरोबर कोणीही नव्हतं. मला अनेकवेळा ही परिस्थिती आवडते. एकटा असलो म्हणजे आजूबाजूला बघत, वेगवेगळ्या गोष्टींची मनाशी नोंद करत जाता येतं. अनेक आवाज, वाद, संवाद कानावर पडतात. एका वळणावर दोन गुरुजी स्कूटरवरून माझ्या शेजारून गेले. आता ही गुरुजी मंडळी सुद्धा खूप ‘हायटेक’ झाली आहेत. गाड्या वापरतात, मोबाईल वापरतात, सोशल मीडियाचा व्यवसायासाठी उत्तम उपयोग करून घेतात. पण व्यावसायिक गप्पा त्याच विषयाभोवती फिरतात. तर त्यातले एक गुरुजी दुसऱ्या गुरुजींना म्हणत होते की, ‘अरे समिधांची काय एव्हढी काळजी करतोस? त्यांचं काम फक्त अग्नीला अर्पण केलेल्या वस्तू अग्नीपर्यंत पोचवायचं…’

बस्स एव्हढंच? ह्या पलीकडे त्या समिधांच्या जळून जाण्याला काहीच महत्व नाही. खरं तर ह्या अशा अनेक समिधा आहेत ज्यांनी मूकपणे जळून जाऊन अनेक यज्ञ यशस्वी केलेत. विचारांच्या वावटळीवर स्वार होऊन मन प्रवासाला निघालं.

पहिलीच आठवली ती उर्मिला. लक्ष्मण तर गेला निघून भावामागून चौदा वर्षं वनवासाला. रामसीतेच्या बरोबरीनं लक्ष्मणाचं कौतुक झालं, भरताचंही झालं. पण अयोध्येत राहूनसुद्धा चौदा वर्षं वनवास, तेही एकटीनं भोगणाऱ्या, उर्मिलेच्या आयुष्याच्या आहुतीची दखल वाल्मीकींनीही घेतली नाही. मला नेहमी वाटतं की त्या उर्मिलेला कुणीतरी बोलतं करायला हवं. रामराज्याच्या आदर्शवादी यज्ञात ह्या एका समिधेची आहुती अशीच पडून गेली.

मग आठवतात त्या काशीबाई, सकवारबाई आणि इतर तिघी. शिवाजी महाराजांच्या आठ राण्यांपैकी तीन, सईबाई, सोयराबाई व पुतळाबाई आपल्याला माहीत असतात. त्यांच्याबद्दलच्या खऱ्याखोट्या गोष्टीही आपण ऐकलेल्या असतात. पण बाकीच्या पाच? केवळ राजकीय कारणासाठी जिजाबाईंनी ह्या पाचजणींबरोबर महाराजांचा विवाह लावला. पण नंतर? अफझलखान येतोय म्हणल्यावर ह्या पाचजणींना चिंता वाटली नसेल? आपला नवरा औरंगजेबाच्या कैदेत अडकलाय म्हणल्यावर यांचा जीवही सैरभैर झाला नसेल? निश्चितच झाला असणार. पण स्वराज्याच्या यज्ञात ह्या पाच समिधा तशाच जळून गेल्या.

बहुतेक सर्व समिधा ह्या स्त्रियाच. कारण हे निमूटपणे जळून जाणं त्यांच्या अंगवळणीच पडलेलं असतं जणू. गोपाळराव जोशांसारखा एखादा अपवाद की आपल्या पत्नीला, आनंदीबाईला, डॉक्टर करण्यासाठी स्वतः समिधा झाला. काही थोड्याफार समिधा, कस्तुरबा म्हणा, सावित्रीबाई फुले म्हणा, स्वकर्तृत्वाने उजळूनही गेल्या. पण बाकीच्या? टिळकांनी, सावरकरांनी मांडलेल्या स्वराज्याच्या यज्ञात पहिली आहुती सौ. टिळकांची व सौ. सावरकरांची पडली. या आणि अशा अनेक.

विचारांच्या चक्रात घरी आलो. आमच्या घरच्या समिधेनं दार उघडलं. मुलाचा अभ्यास आणि नवऱ्याचं करीअर यासाठी स्वतःचं चोवीस वर्षांचं यशस्वी करीअर सहजपणे सोडून देणाऱ्या त्या समिधेला पाहून मला एकदम भरून आलं. घरोघरी अशा समिधा रोज आहुती देत असतात. घर उभं धरत असतात, सावरत असतात. माझं घर हा काही अपवाद नव्हे. मात्र यापुढे या समिधांची आहुती दुर्लक्षित जाऊ न देणं गरजेचं आहे.

आज नव्या वर्षाच्या, नव्या दशकाच्या आव्हानांना भिडण्याची तयारी करताना, जी आनंदाने स्वतःची आहुती देऊन आपल्याला ऊर्जा देणार आहे, त्या आपल्या प्रत्येकाच्या घरच्या समिधेला एक सलाम तो ‘बनता है….’

pune darshan for kids

Puneites NOW get a Golden opportunity to witness a mesmerizing LIGHT AND SOUND SHOW at the NATIONAL WAR MEMORIAL along with a visit to the SOUTHERN COMMAND MUSEUM near Ghorpadi, Pune.

Pune has had a rich warrior culture and has been a home to well known warriors since time immemorial. The city has been blessed with a number of defence establishments of Southern Command in its vicinity. True to its legacy, the associated soldiers have been contributing immensely in various operations of the Nation.

Recently, since 1st November 2019, Headquarters, Dakshin Maharashtra and Goa Sub Area has started organizing a LIGHT AND SOUND SHOW at National War Memorial, Ghorpadi, Pune on EVERY Friday, Saturday and Sunday evening. The show has been conceptualized and implemented as a joint civil military venture.

The show is open for ALL.

It will definitely inculcate national spirit in every Indian citizen. It will be an inspiration, especially for the children and youth and will motivate them to join the armed forces.

What can you expect in the LIGHT AND SOUND SHOW?

45 minutes of scintillating audio visual extravaganza highlighting stellar contribution of the Indian Army from independence till date in the field of operations training, disaster response and nation building.

Apart from the Light and Sound show, you may also plan to experience the wreath laying parade (on Saturdays only) and visit the Museum at the Memorial.

Schedule:

Light and Sound Show:
Every Friday, Saturday, Sunday from 6.45 to 7.30 pm (in winters)

Wreath Laying parade to commemorate sacrifices of valiant men:
Every Saturday from 5.30 pm to 6 pm (in winters).

Museum showcasing History of Indian Army and acts of valour of gallant warriors of the Nation:
Open on all days except Tuesday from 9.30 am to 8 pm.

Charges: Entry tickets to the Museum as well as the show are a nominal rate of Rs. 20/- per head.

Returns are guaranteed to be priceless.

It is an appeal to every proud Indian & Punekar to plan a visit with your families, friends and your near and dear ones to the National War Memorial on one of the coming weekends.

Tourists and visitors should plan so as to include it in their travel itinerary for Pune.

Schools and Colleges can contact Headquarters, Dakshin Maharashtra and Goa Sub Area for assistance for any organized visit of their institution.

सहाव्या वर्षीपासून शिकणे अपेक्षित असलेल्या कौशल्यांसाठी तीन वर्षांच्या मुलांची ‘तयारी’ करवून घेण्याच्या हव्यासाने नुकसानच होते आहे..

‘असर’च्या पूर्वप्राथमिक शिक्षणविषयक अहवालात खासगी, महाग पूर्वप्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांची प्रगती तुलनेने बरी आढळली. त्यामुळे अंगणवाडय़ांचे आपण काय करणार आहोत, हा प्रश्न निर्माण होतो..

नजीकच्या भविष्यात भारतातील पूर्वप्राथमिक शिक्षणाची बाजारपेठ किती आणि कशी फोफावेल, याबद्दलचे भाकीत करणारा ‘असर’ या स्वयंसेवी संस्थेचा यंदाचा अहवाल, शिक्षणाच्या राष्ट्रीय धोरणाच्या अंमलबजावणीचा कसा फज्जा उडाला आहे, याचे दर्शन घडवतो. या संस्थेतर्फे केवळ शैक्षणिक गुणवत्तेशी संबंधित विषयांवरच पाहणी करण्यात येत असली, तरीही नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या अहवालामुळे अनेक नवे मुद्दे पुढे आले आहेत. मागील वर्षी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यात पहिली इयत्तेच्या आधी घेतल्या जाणाऱ्या म्हणजे पूर्वप्राथमिक शिक्षणावर भर देण्यात आला आणि त्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरजही त्यात व्यक्त करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर ‘असर’ या संस्थेने देशातील चोवीस राज्यांतील २६ जिल्ह्य़ांमधील सुमारे ३७ हजार विद्यार्थ्यांची पाहणी केली आणि त्यातून जो निष्कर्ष मिळाला, तो या शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढणाराच आहे. मूल तीन वर्षांचे होताच, त्याला शिशूशाळेत किंवा अंगणवाडीत किंवा ‘मिनी केजी’च्या वर्गात बसवले जाते. गेल्या साडेचार दशकांत देशपातळीवर अंगणवाडी ही संकल्पना फोफावली. केवळ पोषण एवढय़ाच विषयासाठी देशात चालविण्यात येत असलेल्या पंधरा लाखांहून अधिक अंगणवाडय़ा देशातील सहा वर्षांखालील मुलांमध्ये विविध कौशल्ये विकसित करण्यासाठीही झटत असूनही प्रत्यक्षात मुलांच्या हाती फारसे काही लागलेले दिसत नाही, असे या अहवालाचे सांगणे आहे. दुसरीकडे खासगी क्षेत्रातील पूर्वप्राथमिक शिक्षणाची बाजारपेठ प्रचंड प्रमाणात वाढली. केवळ महाराष्ट्रात ही बाजारपेठ सुमारे बाराशे कोटी रुपयांच्या घरातील आहे, यावरून येत्या काळात त्याकडे किती अधिक लक्ष दिले जाईल, हे लक्षात येऊ शकते. बदलती जीवनशैली आणि शिक्षण क्षेत्रातील वाढती स्पर्धा यामुळे मुलाच्या वाढीच्या वयात त्याच्या अंगी जे गुण निर्माण व्हायला हवेत, त्याकडे लक्ष न देता, त्याच्या मेंदूच्या क्षमतेपेक्षा किती तरी अधिक कौशल्यांच्या विकासाचा आग्रह ही पूर्वप्राथमिक शिक्षण व्यवस्था धरते.

अक्षर आणि अंकओळख या मुद्दय़ावर या पाहणीतून जे आढळले, ते खासगी क्षेत्रातील गुणवत्तेची भलामण करणारे आहे. म्हणजे अंगणवाडय़ांमधील ४६.८ टक्के मुलांना अंक-अक्षरओळख आहे. मात्र खासगी संस्थांमधील मुलांमध्ये हेच प्रमाण ७७ टक्के एवढे आहे. एक ते दहा अंक ओळखण्याबाबतही अंगणवाडीतील विद्यार्थ्यांपेक्षा खासगी क्षेत्रातील मुलांची ५४.४ ही टक्केवारी किती तरी अधिक, म्हणजे ८२.७ टक्के आहे. कोणत्या वयात कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यावे, याबाबत केंद्र सरकारने मागील वर्षी एक सर्वसमावेशक अभ्यासक्रम तयार केला होता. त्याची अंमलबजावणी देशातील फार तर तीन-चार राज्यांनी केली. शिक्षण हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असल्याने देशातील अनेक राज्यांनी त्याबाबत पुढाकार घेतला नाही. महाराष्ट्राने तर पूर्वप्राथमिक शाळांच्या अभ्यासक्रमाची रूपरेषा मागील दशकातच जाहीर केली होती. त्याच वेळी पूर्वप्राथमिक शिक्षण हे राज्याच्या अधिकृत शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट करण्याचीही शिफारस करण्यात आली होती. मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही. आजही महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये शिक्षण व्यवस्थेत इयत्ता पहिली हीच पहिली पायरी राहिली आहे. गेल्या काही दशकांत पहिलीच्या आधी शिक्षण देणाऱ्या या समांतर शिक्षण व्यवस्थेशी राज्य सरकारांनी आपला कोणताही संबंध जोडून घेण्याबाबत उत्सुकता दाखवली नाही. याचे खरे कारण पहिली ते पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शिक्षण खात्याकडे असलेले आर्थिक बळ इतके तुटपुंजे असते, की त्यात पूर्वप्राथमिक शिक्षणाचा अधिकचा बोजा स्वीकारणे म्हणजे पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे, अशीच राज्यांची मानसिकता राहिली आहे. केंद्रातील सरकारने २०१४ मध्ये शिक्षणावरील खर्चात मोठय़ा प्रमाणात वाढ करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण होण्याची शक्यता दरवर्षी मावळत चालली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यातही शिक्षणावरील खर्चात बचत करण्याकडेच अधिक कल दिसतो आहे.

सहा वर्षांखालील वयात भाषा, लिपी, अंक यांची ओळख करण्याच्या हट्टापायी मुलांच्या सर्वागीण विकासावर दीर्घकालीन विपरीत परिणाम होऊ शकतो, असे जगभरातील संशोधनाअंती तज्ज्ञांचे मत. याकडे दुर्लक्ष करून शिक्षणातील अतिरेकी स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी मुलांचा मेंदू शिणवण्याचा उद्योग सध्या सर्वत्र सुरू आहे. शिकण्यासाठीचे वय सहावरून तीनपर्यंत कमी होण्याचे हे परिणाम. असरच्या पाहणीत असेही आढळून आले, की अनेक ठिकाणी सहा वर्षांखालील मुले इयत्ता पहिलीत बसवण्यात आली आहेत. त्या मुलांना पहिलीचा अभ्यासक्रम शिकताना साहजिकच अडचणी निर्माण होतात. देशातील सहा वर्षे वयाखालील मुलांच्या जाणून घेण्याच्या आणि शारीरिक हालचालींद्वारे कौशल्ये आत्मसात करण्याच्या प्रक्रियेवरच ‘असर’चा हा अहवाल प्रश्नचिन्ह निर्माण करतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यात पूर्वप्राथमिक शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे देशातील अंगणवाडय़ांच्या संख्येत केवळ भर पडून उपयोग होणार नाही. खासगी क्षेत्राने प्रचंड मोठी गुंतवणूक आरंभल्यामुळे पंचतारांकित म्हणता येईल, अशा बालवाडय़ांचे पेव गेल्या दोन दशकांत फुटले आणि त्याने उच्च मध्यम आणि श्रीमंत वर्गाला आकर्षितही केले. या शाळांमधील सुविधांशी अंगणवाडय़ा कधीच स्पर्धा करू शकणार नाहीत, हे सत्य. परंतु या खासगी बालवाडय़ांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा विकास अन्य व्यवस्थेपेक्षा बरा ठरल्याचेही असरच्याच पाहणीत आढळून आले आहे.

अशिक्षित पालकांनाही आपल्या मुलांनी उत्तम शिक्षण घ्यावे, असे वाटणे, हा बदल अलीकडचा. सुशिक्षित आई-वडील दोघेही नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असल्याने मुलांच्या वाढीकडे लक्ष देता येत नसल्याची खंत प्रारंभी पाळणाघरे आणि नंतर ‘प्ले ग्रुप’, ‘मिनी केजी’, ‘सीनिअर केजी’ या व्यवस्थेद्वारे दूर केली जाते. पहिलीत प्रवेशासाठी मुलाच्या अंगी असलेल्या कौशल्यांचीही पूर्वपरीक्षा घेण्याच्या नव्या पद्धतीमुळे पालकांची आणखीच धांदल उडते. अशा परिस्थितीत मूल तीन वर्षांचे होताच, ते सहा वर्षांचे झाल्यानंतर त्याच्या अंगी आवश्यक असणाऱ्या गुणांचा विकास करण्याची तयारी सुरू होते. या सगळ्या मानसिक ताणाचा परिणाम तीन वर्षांच्या लहानग्यांवरही होणे स्वाभाविक असते. असरचा हा अहवाल नेमक्या याच मुद्दय़ावर बोट ठेवतो. केवळ प्रचंड संख्येने मुले शाळेत प्रवेश घेतात, ही समाधानाची बाब असता कामा नये. त्यापेक्षा या मुलांना मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा अधिक चांगला कसा राहील, याची चिंता करणे अधिक महत्त्वाचे आहे, ही गोष्ट या अहवालामुळे अधोरेखित झाली आहे. वयाच्या सहाव्या वर्षी पहिलीत प्रवेश घेणे आवश्यक असताना देशातील २७.८ टक्के मुले त्यापूर्वीच प्रवेश घेत असल्याचे ‘असर’च्या मागील वर्षांच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. अशा कमी वयाच्या मुलांपैकी केवळ ३७ टक्के मुलेच अक्षर ओळखू शकतात, तर हेच प्रमाण सहा वर्षांवरील मुलांमध्ये ७० टक्के एवढे आहे. याचा अर्थ मुलांना त्यांच्या वयाला आवश्यक असेल, एवढेच शिक्षण देण्याने त्यांची वाढ योग्य पद्धतीने होऊ शकते.

‘असर’च्या पाहणीतून पुढे आलेले मुद्दे या देशाच्या भविष्याची चिंता वाढवणारे तर आहेतच, परंतु शिक्षण व्यवस्थेकडे किती गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे, हेही स्पष्ट करणारे आहेत. हे गांभीर्य नसल्यास, जगातील सर्वाधिक संख्येने युवक असण्याचा फायदा होण्याऐवजी तोटा होण्याची शक्यताच दाट. वेळीच सावध होऊन योग्य ती पावले उचलली नाहीत, तर धडा शिकण्याचे वय निघून गेल्यासारखी धोरणकर्त्यांची अवस्था होईल.