Back to Top

Author Archives: swarda

12

ऐका गोष्ट बाराची

12/12/12/12/12

बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक…

मोजण्यासाठी द्वादशमान
पध्दती…१२ची

फूट म्हणजे १२ इंच

एक डझन म्हणजे १२ नग.

Read more

लहान मुलांसाठी रेसिपी 2 वर्ष वरील मुलांसाठी

लहान मुलांसाठी रेसिपी 2 वर्ष वरील मुलांसाठी

【1】
Home-Made Cerelac:-
खिमटी

साहित्य:-
मूग दाळ १ वाटी,
तांदूळ १ वाटी ,
बदाम५-६.

कृती:-
दाळ व तांदूळ वेगवेगळे धुवून एका कपड्यावर सुकत ठेवायचे,चांगले सुकले की वेगवेगळे खमंग मंद गॅसवर भाजणे व बदाम पण थोडे शेकून घेणे.
मिक्सर मध्ये मिक्स करून बारीक करणे. ही खिमटी २-३ वीक राहते हवाबंद डब्यात ठेवणे.

पध्दत:-
१)एका वाटीमध्ये पाणी घेऊन 2 चमचे पावडर मिक्स करून मीठ चवीनुसार घेऊन मिक्स करून घेणे.
२)एका भांड्यात उकळून खिमटी बनवा,सतत ढवळत रहा गाठी होऊ नये म्हणून.
३) खमंग सुंगध व फेस किंवा भांडयाला खिमटी चिटकू लागली की समजा खिमटी तयार.
पौष्टिक अशी खिमटी मूल सहा महिन्यांचा झाले कि सुरु करावी,पचण्यास हलकी असते.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

【2】
नाचणी सत्व:-
साहित्य:-
नाचणी सत्व,मीठ,गूळ, वेलचीपूड.

कृती:-
१) खिमटी करतो त्याप्रमाणे एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात नाचणी सत्व 2-3 चमचे मिक्स करून त्यात थोडेसे मीठ घालावे.
२) एका टोपात घालून उकळी येऊ लागतात एक कप दूध,गूळ, वेलचीपूड, सुठं पावडर,तूप,काजू बदाम पावडर घालून सतत ढवळावे म्हणजे गाठी होणार नाही.
३) मंद गॅसवर शिजवूज घेणे,
४) हे सत्व आपणही ताकातून घेऊ शकतो किंवा खीर.
Calcium चा उत्तम source आहे नाचणी,हाडे मजबूत होतात.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆●◆

【3】रवा लापशी:-

साहित्य:-
लापशीचा रवा,तूप,साखर किंवा गूळ, वेलचीपूड.

कृती:-
१)लापशीचा रवा १-२ चमचे घेऊन तुपात छान परतने.
२) दूध एक वाटी, साखर वेलची पावडर घालून मस्त शिजवून घेऊन भरवणे.
३)अधूनमधून ढवळने,गाठी होणार नाहीत.
○●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●○
【4】
मिक्स दाळीचे सूप:-

साहित्य:-
तूरडाळ,मूगडाळ, मटकी डाळ, हिंग,मीठ,लसूण.
कृती:-
१) तूरडाळ,मूगडाळ, मटकी डाळ थोडी चना डाळ सगळ्या डाळी मिक्स करून कुकर मध्ये मऊ शिजवणे त्यात
२) 2-3 लसूण पाकळ्या व थोडे हिंग पावडर घालणे.
३) स्मॅश करून किंवा मिक्सर मध्ये बारीक करून घेऊन सर्व्ह करणे.
टीप: पाण्याचे प्रमाण जास्तच ठेवले तरी चालेल.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆◆◆◆

【5】
मूगतांदूळाची खिचडी

साहित्य

१) १ कप तांदूळ
२) १/२ कप मूग डाळ
३) तीन ते साडेतीन कप गरम पाणी
४) १ टेस्पून तेल
५) २ चिमटी मोहरी
६) १/४ टिस्पून जिरे
७) १ चिमटी हिंग
८) १/४ टिस्पून हळद
९) थोडे मटार
१०) १ टिस्पून गोडा मसाला
११) चवीपुरते मिठ

कृती

१) खिचडी करायच्या आधी तांदूळ आणि डाळ एकत्र करून पाण्याने स्वच्छ धुवावे.
२) पाणी काढून १/२ तास निथळत ठेवावे.
३) लहान कूकरमध्ये तेल गरम करावे त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, फोडणी करावी.
४) नंतर डाळ आणि तांदूळ घालून परतावे. साधारण ३-४ मिनीटे परतावे. डाळ-तांदूळ चांगले कोरडे झाले पाहिजेत.
५) नंतर यात गरम पाणी घालावे. गोडामसाला आणि मिठ घालावे. ढवळून पाण्याची चव पाहावी.
६) लागल्यास मिठ घालावे.
७) पाण्याला उकळी आली कि कूकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या होवू द्याव्यात.
८) वाफ मुरली (साधारण १० मिनीटे) कि कूकर उघडून खिचडी सर्व्ह करावी.
९) खिचडीवर १ चमचा तूप घालावे.
१०) मूगतांदूळाची खिचडी तयार आहे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

【6】
पालक भात:-

साहित्य:-
पालकची स्वच्छ धुतलेली पाने,१ छोटी वाटी तांदूळ,लसूण,हळद,जिरे,हिंग,अर्धा टोमॅटो.
कृती:-
स्वच्छ धुतलेली पाने बारीक चिरून घेणे,छोट्या कुकर मध्ये एक चमचा तेल घालणे.
२) त्यात जिरे,हळद,लसूण ठेचून,बारीक चिरलेला टोमॅटो व चिरलेली भाजी व तांदूळ घालणे.
३) १ ग्लास पाणी घालून ३-४ शिट्या घेणे.
४) पावभाजी च्या smasher ने स्मॅश करून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून भरवणे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

【7】
मुग भात:-

साहित्य:-
अर्धी वाटी मुग,१ छोटी वाटी तांदूळ,लसूण,हळद,जिरे,हिंग,अर्धा टोमॅटो.
कृती:-
१) मुग थोडेसे भाजून घेणे,छोट्या कुकर मध्ये एक चमचा तेल घालणे.
२) त्यात जिरे,हळद,लसूण ठेचून,बारीक चिरलेला टोमॅटो व भाजलेले मुग व तांदूळ घालणे.
३) १ ग्लास पाणी घालून ३-४ शिट्या घेणे.
४) पावभाजी च्या smasher ने स्मॅश करून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून भरवणे.
५) यात एक दोन फोडी गाजर,बटाटा,किंवा फरसबी घालू शकता.

Read more

डार्विन आजोबांची शिकवणी

शास्त्रज्ञ घडतो तरी कसा ? एखाद्या व्यक्तीमध्ये काही मुलभूत प्रेरणा , कुतूहल दडलेले असते का ? शाळेत असताना हि सारी मंडळी नेहमीच चमकली का ? चला डार्विन च्या लहानपणापासून त्याचा मागोवा घेऊ यात. ऐकू यात डार्विन आजोबांची शिकवणी-भाग १ लेखक – डॉ अनिल अवचट हा एक अफाट लेख आहे. म्हंटले तर गोष्ट, म्हंटले तर शोध निबंध – डार्विन ह्या महामानवाच्या वेडाचा , ध्यासाचा व कामाचा.


Here a new project especially for Teenager kids and those who enjoy literature and knowledge.
डार्विन आजोबांची शिकवणी – डार्विनचा अदभूत प्रवास आणि त्याचा उत्क्रांती वादाचा सिद्धांत गोष्ट रुपात समजून घेऊयात डॉ अनिल अवचट यांच्या लेखणीतून.
आपले आजचे जगणे, जगण्याची सुलभता याचा विचार केला की मग शास्त्र व शास्त्रज्ञ यांचा आपल्या जीवनावर असलेला प्रभाव दिसून येतो. त्यांचे हे उपकार आपण लक्षात ठेवतो का ? त्यांची आठवण ठेवतो का ? आपली समज इतकी छोटी की त्यांचे काम समजतच नाही. पण ते समजावून घेण्याचे कुतूहल तुम्हाला आहे का? डॉ अनिल अवचट किती साध्या सोप्या शब्दात इतका मोठा विषय आपल्याला उलगडून सांगतात. हा एक अफाट लेख आहे. म्हंटले तर गोष्ट, म्हंटले तर शोध निबंध – डार्विन ह्या महामानवाच्या वेडाचा , ध्यासाचा व कामाचा.

डार्विन आजोबांची शिकवणी – डॉ अनिल अवचट वाचन – प्रीतम रंजना, चित्रे – अर्णव गंभीर , तांत्रिक सहयोग – दीपक सातारकर

‘पंचपक्वान्नांचे भोजन’

नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचा शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते!

आपण दिवाळीत केलेल्या पदार्थानी युक्त भोजनाला ‘पंचपक्वान्नांचे भोजन’ असे म्हणतो. पैकी यातील पंच – पक्व -अन्न म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच महाभूतांपासून बनलेले भोजन. या प्रत्येक महाभूतांचा आकार वर्णन केलेला आहे. जसे की ‘पृथ्वी’ महाभूत हे स्थिर असल्या कारणाने चौकोनी सांगितले आहे. ‘जल आणि आकाश’ मात्र गोल सांगितले असून ‘अग्नी’चा आकार त्रिकोणी व वायूचा आकार अर्ध चंद्राकृती सांगितला आहे. आपल्या दिवाळीतील लाडू गोल, करंज्या अर्धचंद्राकृती, शंकरपाळ्या कधी त्रिकोणी कधी चौकोनी केलेल्या पाहायला मिळतात. या प्रत्येकाच्या मागे काही तरी गमक आहे. या सर्व पंचमहाभूतांची आपल्याला आठवण राहावी, पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ती आपल्या परंपरांमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

आपल्या आहारातील सहा रस पाच महाभूतांपासून बनलेले असतात. यापैकी पृथ्वी आणि आप महाभूतापासून मधुर रस बनतो. पृथ्वी आणि तेज महाभूतापासून आम्ल रस बनतो. अग्नी व जल महाभूतापासून लवण रस म्हणजे खारट. आकाश व वायूपासून कडू. अग्नी व वायूपासून तिखट आणि पृथ्वी व वायूपासून तुरट रसाची निर्मिती होते, असे आयुर्वेद शास्त्राचे मत आहे. या सहा रसांच्या संतुलित सेवनामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते.

गंमत पाहा, दिवाळीमध्ये बनवीत असलेल्या प्रत्येक पदार्थाचा आकार व चव, त्यात वापरली जाणारी घटकद्रव्ये वेगवेगळी असतात. तसेच त्या प्रत्येक पदार्थाची अवस्थासुद्धा वेगवेगळी असते. थोडक्यात, या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीमागे हे पंच महाभूतांचे शास्त्र दडलेले असते. त्यांच्या कमी-अधिक संयोगानेच पदार्थ, त्यांचा आकार, त्यांची चव व टिकाऊपणा ठरलेला असतो. या पंचमहाभूतांमुळेच आपल्याला त्या पदार्थाचे पंच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने ज्ञान होत असते. पृथ्वी महाभूत त्या पदार्थातील गंध ठरवीत असते. आप महाभूत त्या पदार्थाची चव ठरवत असते, तेज महाभूत त्या पदार्थाचे रूप म्हणजे दिसणे ठरवत असते तर वायू महाभूत त्या पदार्थाचा स्पर्श ठरवत असते. तो पदार्थ खाताना येणारा विशिष्ट आवाज हा त्या पदार्थातील आकाश महाभूतांमुळे येत असते. कारण आकाश महाभूत त्या पदार्थातील शब्द व्यक्त करत असतो. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा पदार्थ आवडत असतो. कोणाला भज्याचा वास आवडतो, कोणाला जिलेबीची चव आवडते, कोणाला शेव, चकलीचा कुरकुरीतपणा व खातानाचा आवाज आवडत असतो तर कोणाला स्पर्शाला अनारसे व दिसायला करंज्या आवडत असतात. त्यामुळे या पाचही महाभूतांचे त्या एकाच पदार्थातील उत्तम संतुलन हे प्रत्येकालाच त्या पदार्थाच्या मोहात पाडते. दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाचा रंग-रूप, आकार, चव, स्पर्श व आवाज वेगवेगळा आहे. म्हणून आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारी अशी दिवाळी आपल्याला इतर सणांपेक्षा जास्त आवडते.

बहुतांशी दिवाळीच्या फराळातील पदार्थांवर अग्नी व जल तत्त्वाचा संस्कार झालेला असतो. जसे की काही पदार्थ तेज व जल तत्त्व प्रधान अशा उष्ण तेलात तळलेले असणे. यामुळे त्या पदार्थावर या दोन महाभूतांचे संस्कार होतात. संस्कारांमुळेच त्या पदार्थात गुणपरिवर्तन होते. टणक पदार्थ मऊ होतात तर मऊ पदार्थ टणक होतात. म्हणून तर लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, कापण्या, चिरोटे, शेव, चिरमुरे, अनारसे, चकल्या या प्रत्येकाचे पांचभौतिकत्व वेगवेगळे असते. त्यामुळे लाडू टणक असतात. करंज्या पटकन फुटतात. शंकरपाळ्या, चिरोटे मऊ असतात. शेव, चकल्या कुरकुरीत असतात. तर गुलाबजामून, रसगुल्ले जल महाभूत युक्त पार्थिव असतात. काही मधुर रसाचे गोड, काही तिखट तर काही आंबटगोड असतात.

लाडू…

या, लाडूचे पांचभौतिक महत्त्व जाणून घेऊ यात. लाडू हा पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असा पदार्थ आहे. त्यामुळे तो अत्यंत पौष्टिक व बलवर्धक आहे. लाडूचे प्रकार जरी अगणित असले तरी त्याचा आकार मात्र गोलच असतो. पृथ्वीसारखा स्थिर व आप महाभूतासारखा गोल आकार धारण करतो. मुळात पृथ्वीसारख्या त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या गुणामुळे लाडू करण्याची पद्धत निर्माण झाली असावी. पूर्वीच्या काळी प्रवास मोठे असत. वाटेत आताच्यासारखी हॉटेल नसत. म्हणून खूप दिवस टिकणारा व प्रवासात नेता येणारा, सर्व लहान मुलांना आवडणारा, खाताना हात खराब न होणारा, कुठेही, केव्हाही, कधीही सहज खाता येणारा आणि यासोबत खाण्यासाठी कशाचीही गरज नसणारा, स्वादिष्ट व गोड असल्याकारणाने पटकन तरतरी आणून देणारा, खाताच पोट भरलेल्याची जाणीव करून देणारा, असा हा मजेशीर पदार्थ म्हणजे लाडू.

लाडूचे प्रकारही असंख्य आहेत. विविध डाळी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी यांपासून विविध प्रकारचे लाडू बनविता येतात. बदाम, काजू, मनुके यांमुळे लाडू अधिकच पौष्टिकहोतात. तुपामुळे त्यांमध्ये स्निग्धपणा आलेला असतो. आपल्याकडे रव्याचे लाडू, हरभरा डाळीचे लाडू, बेसनाची जाड शेव तयार करून तिचे तुकडे गुळाच्या पाकात पाडून तयार केलेले शेवकांडीचे लाडू, फक्त चुरमुरे व गुळाचा पाक यांपासून बनविलेले लाडू असे अनेक प्रकार आहेत. मधुमेहाचे रुग्ण सोडले तर बाकी सर्वाना विशेषत: लहान मुलांना तर पोषक असा दिवाळीचा एक परिपूर्ण आहारीय पदार्थ म्हणजे लाडू. यापैकी दिवाळीत फारसा न केला जाणारा मात्र लहान मुलांसाठी अत्यंत वृष्य, बलदायक व पौष्टिक असा लाडू म्हणजे फक्त खजूर व गुलकंद वापरून तूप लावून केलेला लाडू. ज्यांनी केला नसेल त्यांनी या दिवाळीत हा आवर्जून करावा. मुले फार खूश होतात. तसेच गुलकंद पित्तशामक असल्याने याने फार उष्णताही वाढत नाही. मुलांना चॉकलेटपेक्षा हाच लाडू द्या.

करंजी..

आता आपण करंजीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ यात. करंज या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात. म्हणून यास करंजी असे म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे अधिक्य यामध्ये असते. म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असेल तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत कारंजी छान दिसते. म्हणून करंजी बनविताना याची काळजी घ्यावी लागते.

चकली..

वर्तुळाकृती व अर्धचंद्राकृती आणखी एक पदार्थ म्हणजे चकली. यामध्ये आकाश व वायू महाभूताचे आधिक्य असते. म्हणूनच ती त्या त्या महाभूताचा आकारही धारण करताना दिसतात. यामध्ये आपण जेवढे तिखट मिसळू तेवढे त्याचे तेज तत्त्व वाढते. त्याचबरोबर तिच्यावर अग्निसंस्कार किती झाला आहे यावरून चकलीचे रूप ठरते. म्हणून चकलीची भाजणी उत्तम व्हावी लागते. तसेच ती तळणे हे सुद्धा एक अत्यंत कौशल्याचे काम आहे. चकली कमी तापलेल्या तेलात टाकली तर तिचे महाभूत संघटन बिघडते व ती मऊ होते. तिचा बाहेरील भाग कडक होत नाही. म्हणून योग्य प्रमाणात तापलेल्या तेलातच चकली तळली तर तिच्यातील संघटन उत्तम बनते व चकली कडक व खुसखुशीत बनते. यावरून आपल्याला एखाद्या पदार्थाच्या निर्मितीतील पंचमहाभूतांचे महत्त्व चटकन समजते.

चिवडा..

तिखट पदार्थामधला आपल्या सर्वाचा आवडता आणि आकाश व वायू महाभूत प्रधान असा आणखी एक पदार्थ म्हणजे चिवडा. बहुतेक घरांमध्ये पातळ पोहय़ांचा चिवडा बनविला जातो. पोहे हा शब्दच मुळी ‘पृथु’ या शब्दापासून निर्माण झाला आहे. लाहय़ांना चपटे केले, पृथु केले की त्यास पोहे असे म्हणतात. त्यामुळे काही ठिकाणी लाहय़ांचा चिवडा केला जातो तर काही ठिकाणी त्याच लाहय़ांपासून बनविलेल्या पोहय़ांचा चिवडा केला जातो. लाहय़ांमधील आकाश महाभूत काढून टाकले व त्यास ‘पृथु’ करून त्यातील पर्यायाने अल्प पृथ्वी महाभूत वाढवले की झाले पोहे. मात्र या पोहय़ांमध्ये भरपूर प्रमाणात छिद्रे असल्याने यात वायू महाभूताधिक्य हे असतेच. म्हणून पोहे, भेळ, लाहय़ा असे पदार्थ खाल्ले की आपला वात वाढतो. असो. म्हणून पोहे नुसतेच जर कढईत भाजायला घेतले तर उष्णता जास्त असल्याने पोहय़ांमध्ये जागा व्यापलेल्या हवेचे प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते व पोहे आक्रसतात. म्हणून पातळ पोहय़ांचा चिवडा करताना ते आधी भाजू नयेत. फोडणी झाल्यावर त्यावर पोहे टाकून परतले की तेलाचे सूक्ष्म आवरण त्या पोहय़ांवर चढते. हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात. म्हणून पोहे अशा प्रकारे परतले की आक्रसत नाहीत. मंद विस्तवावर परतले की त्यातील अंगभूत पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे तेलाचे रेणू आतपर्यंत जाऊ शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. दगडी पोहय़ांसारखे जाड पोहे असल्यास ते तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करतात. तसेच काही ठिकाणी भाजक्या पोहय़ांचाही चिवडा करतात. ते आधीच भाजके असल्याने कुरकुरीतच असतात. त्यामुळे ते तळावे लागत नाहीत किंवा जास्त भाजावेही लागत नाहीत. तर थोडक्यात हा सर्व खेळ त्या पोहय़ांमध्ये दडलेल्या आकाश आणि वायू महाभूताचा आहे. त्यावर अग्नी महाभूताचा आपण संस्कार करतो व त्यास अधिकच रुचकर बनवतो.

(माझे फेव्हरेट) अनारसे..

अनारसे बनवताना मात्र जल महाभूताच्या संतुलनाला महत्त्व असते. म्हणून अनारशासाठी तांदूळ तीन दिवस भिजवून मगच कुटले जाते. तीन दिवस भिजल्याने त्यामध्ये आंबवण्याची क्रिया आधीच झालेली असते. त्यामुळे त्या पिठात वायू महाभूतही वाढलेला असतो. अर्थात या ठिकाणी हा वायू महाभूत म्हणजे आंबविण्याच्या क्रियेत तयार झालेला कार्बन डायॉक्साइड. त्यामुळे अनारसा तुपात टाकला की वायू व अंगीभूत पाण्याची वाफ बाहेर येऊ लागते. म्हणून अनारशावर तूप उडवीत राहिले कीत्या छिद्रांमधून ते आतपर्यंत जाऊ शकते आणि अनारशाला जाळी पडते. उष्ण तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास त्यास छान सोनेरी रंगही प्राप्त होतो.

अशा प्रकारे आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ वर्णन केला आहे. त्यामुळे संक्रांत, दिवाळी, दसरा, कोजागरी, नवरात्र, श्रावण या प्रत्येक काळात आहारीय पदार्थ वेगवेगळे सांगितले आहेत. आपण मात्र एकसाखेच वागून किंवा त्यांचे चुकीचे अनुसरण करून आजार वाढवून घेतो. दिवाळीच्या काळात निसर्ग आपल्याला बल द्यायला सुरुवात करतो. बाहेर थंडी सुरू झालेली असते. त्यामुळे त्वचेवरील रोम रंध्रे बंद होऊ लागतात व अग्नी शरीरात कोंडला गेल्याने तो अधिकच वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. म्हणून ही भूक भागविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन स्वत:च्या शरीराचे पांचभौतिक संघटन ओळखून दिवाळीतील पदार्थाचा आनंद घ्यावा

डिकोडिंग

पहले बच्चों को सूजी, मैदा और आटे में भेद करना सिखाइये

पहले बच्चों को मूंग, मसूर, उडद, चना और अरहर पहचानना सिखाइये

पहले बच्चों को मख्खन, घी, पनीर, चीज़ के बीच अंतर और उन्हें बनाने की जानकारी सिखाइये

पहले बच्चों को सोंठ और अदरक, अंगूर और किशमिश, खजूर और छुहारे के बीच का अंतर सिखाइये

पहले बच्चों को दालचीनी, कोकम, राई, सरसों, जीरा और सौंफ पहचानना सिखाइये

पहले बच्चों को आलू, अदरक, हल्दी, प्याज और लहसुन के पौधे दिखाइये

पहले बच्चों को मेथी, पालक, चौलाई, बथुआ, सरसों, लाल भाजी में फर्क सिखाइये

पहले बच्चों को फलों से लदे पेड़ों, फूलों की बगिया दिखाइए

पहले बच्चे को गाय, बैल, सांड का फर्क सिखाओ, गधे, घोड़े और ख़च्चर में अंतर समझाओ

पहले बच्चों को दिखाएं कि गाय, भैंस और बकरी से दूध कैसे दुहा जाता है।

पहले बच्चों को कीचड़ और मिट्टी में उलट पुलट होना सिखाइये, बरसात में भीगना और गर्मियों में पसीने से तरबतर होना सिखाइये

पहले बच्चों को बुजुर्गों के पास जाना, उनसे बातें करना, उनके साथ खेलना और मस्ती करना सिखाइये

बड़ों से तमीज़ से बात करना और घर के काम धाम में माँ-पिता का सहयोग करना सिखाइये

इन सब के बगैर आप बच्चों को कोडिंग सिखाना चाह रहे हैं तो आपका बच्चा ATM बनेगा, समस्याओं का

व्हाइटहैट जूनियर की जल्दी क्या है? कोडिंग भी सीख लेंगे, पहले डिकोडिंग तो कर लें, अपने आस-पास की…बचपन को ज़िंदा रखें, मरने न दें। हाथ जोड़कर निवेदन है।

डॉ अतुल अग्रवाल
बाल्य एवं शिशु रोग विशेषज्ञ

वेगळ्या प्रकारचा व्हिडीओ

हा अतिशय वेगळ्या प्रकारचा व्हिडीओ बघितला मी.
भारताची शान असलेल्या INS विक्रमादित्य या विमानवाहू जहाजाची गायडेड टूर आहे सर्व माहितीसह पूर्ण ३६० डिग्री ३D मध्ये शूट केलेला आहे.
मोबाईल वर बघायला जास्त चांगला वाटतो. हातात मोबाईल घेऊन स्वतः भोवती गोल फिरवा, मोबाईल खाली वर करा तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी उभे राहून स्वतःच सगळे बघत आहेत असा फील येतो. एक वेगळा व्हर्चुअल रिऍलिटी चा अनुभव मला आवडला म्हणून तुम्हाला शेयर केलाय.
कॉम्पुटरवर बघत असाल तर माउस क्लीक करून ड्रॅग करू शकता पण मोबाईलवर बघण्याची मजा त्यात नाही.

Pan tilt and move your phone as the video plays to get the 360° VR tour.

घरच्या घरी

घरच्या घरी (भाग पाच)
– वर्षा सहस्रबुद्धे
Varsha Sahasrabuddhe
(ही लेखमाला द फर्स्ट थ्री इंस्टीट्यूट फॉर चाईल्ड डेव्हलपमेंट यांच्या फेसबुक पेजवर प्रसारित केली जात आहे. जून २०२०)
अंदाज करणं, कायकाय लागेल याचा विचार करून तयारी करणं, क्रमानं एकएक गोष्ट करत जाणं, जराशी वाट पाहणं, नेटानं नंतरची आवराआवरी करणं, आपण कष्टानं आणि प्रेमानं केलेलं काहीतरी सगळ्यांना हवंय-आवडतंय हे पाहणं या सगळ्याला एखादा पदार्थ करताना पुरेपूर वाव मिळतो.
एखादा पदार्थ करताना वर्गातल्या प्रत्येकाला सहभागी करून घ्यायचं, तर आम्हा शिक्षकांना जंगी तयारी करावी लागते! सबंध वर्गासाठी किती सामान लागेल आणि कोण काय आणेल याच्या याद्यांपासून, वर्गाची बैठकव्यवस्था कशी करायची, मुलांना सूचना काय द्यायच्या, एकाला काम करायला पुढे बोलावलं तर तोपर्यंत बाकीची मुलं काय करतील, स्वच्छता पाळण्यासाठी काय दक्षता घ्यायला लागेल, हे सगळं अभ्यासविषयांशी कसं जोडून घ्यायचं, त्या दिवशी वेळापत्रकाचं नियोजन कसं करायचं इथपर्यंत अनेकानेक बाजूंनी विचार करावा तेव्हा कुठे एक पदार्थ करून होतो!
घरी स्वयंपाकघर आणि सामान असतंच. लागणारं बहुतेकसं साहित्यही सहज उपलब्ध असतं. एक-दोन मुलांना सामावून घेऊन पदार्थ करताना लक्ष ठेवण्याचा ताण येत नाही. जे करतोय त्याबद्दल करताकरता सहज बोलता येतं. असं असल्यामुळे मुलांना अगदी रोज, किमान दिवसाआड एखादा पदार्थ करायला मदतीला घ्यायला काहीच हरकत नाही. त्यातून खूप गोष्टी शिकण्याशी जोडता येतील.
बालवाडी आणि पहिलीच्या वयोगटासाठी:

Read more

*लहान मुलांसाठी रेसिपी*

*लहान मुलांसाठी रेसिपी* 2 वर्ष वरील मुलांसाठी
【1】
Home-Made Cerelac:-
खिमटी
साहित्य:-
मूग दाळ १ वाटी,
तांदूळ १ वाटी ,
बदाम५-६.
कृती:-
दाळ व तांदूळ वेगवेगळे धुवून एका कपड्यावर सुकत ठेवायचे,चांगले सुकले की वेगवेगळे खमंग मंद गॅसवर भाजणे व बदाम पण थोडे शेकून घेणे.
मिक्सर मध्ये मिक्स करून बारीक करणे. ही खिमटी २-३ वीक राहते हवाबंद डब्यात ठेवणे.
पध्दत:-
१)एका वाटीमध्ये पाणी घेऊन 2 चमचे पावडर मिक्स करून मीठ चवीनुसार घेऊन मिक्स करून घेणे.
२)एका भांड्यात उकळून खिमटी बनवा,सतत ढवळत रहा गाठी होऊ नये म्हणून.
३) खमंग सुंगध व फेस किंवा भांडयाला खिमटी चिटकू लागली की समजा खिमटी तयार.
पौष्टिक अशी खिमटी मूल सहा महिन्यांचा झाले कि सुरु करावी,पचण्यास हलकी असते.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
【2】
नाचणी सत्व:-
साहित्य:-
नाचणी सत्व,मीठ,गूळ, वेलचीपूड.
कृती:-
१) खिमटी करतो त्याप्रमाणे एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात नाचणी सत्व 2-3 चमचे मिक्स करून त्यात थोडेसे मीठ घालावे.
२) एका टोपात घालून उकळी येऊ लागतात एक कप दूध,गूळ, वेलचीपूड, सुठं पावडर,तूप,काजू बदाम पावडर घालून सतत ढवळावे म्हणजे गाठी होणार नाही.
३) मंद गॅसवर शिजवूज घेणे,
४) हे सत्व आपणही ताकातून घेऊ शकतो किंवा खीर.
Calcium चा उत्तम source आहे नाचणी,हाडे मजबूत होतात.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆●◆
【3】रवा लापशी:-
साहित्य:-
लापशीचा रवा,तूप,साखर किंवा गूळ, वेलचीपूड.
कृती:-
१)लापशीचा रवा १-२ चमचे घेऊन तुपात छान परतने.
२) दूध एक वाटी, साखर वेलची पावडर घालून मस्त शिजवून घेऊन भरवणे.
३)अधूनमधून ढवळने,गाठी होणार नाहीत.
○●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●○
【4】
मिक्स दाळीचे सूप:-
साहित्य:-
तूरडाळ,मूगडाळ, मटकी डाळ, हिंग,मीठ,लसूण.
कृती:-
१) तूरडाळ,मूगडाळ, मटकी डाळ थोडी चना डाळ सगळ्या डाळी मिक्स करून कुकर मध्ये मऊ शिजवणे त्यात
२) 2-3 लसूण पाकळ्या व थोडे हिंग पावडर घालणे.
३) स्मॅश करून किंवा मिक्सर मध्ये बारीक करून घेऊन सर्व्ह करणे.
टीप: पाण्याचे प्रमाण जास्तच ठेवले तरी चालेल.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆◆◆◆
【5】
मूगतांदूळाची खिचडी
साहित्य
१) १ कप तांदूळ
२) १/२ कप मूग डाळ
३) तीन ते साडेतीन कप गरम पाणी
४) १ टेस्पून तेल
५) २ चिमटी मोहरी
६) १/४ टिस्पून जिरे
७) १ चिमटी हिंग
८) १/४ टिस्पून हळद
९) थोडे मटार
१०) १ टिस्पून गोडा मसाला
११) चवीपुरते मिठ
कृती
१) खिचडी करायच्या आधी तांदूळ आणि डाळ एकत्र करून पाण्याने स्वच्छ धुवावे.
२) पाणी काढून १/२ तास निथळत ठेवावे.
३) लहान कूकरमध्ये तेल गरम करावे त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, फोडणी करावी.
४) नंतर डाळ आणि तांदूळ घालून परतावे. साधारण ३-४ मिनीटे परतावे. डाळ-तांदूळ चांगले कोरडे झाले पाहिजेत.
५) नंतर यात गरम पाणी घालावे. गोडामसाला आणि मिठ घालावे. ढवळून पाण्याची चव पाहावी.
६) लागल्यास मिठ घालावे.
७) पाण्याला उकळी आली कि कूकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या होवू द्याव्यात.
८) वाफ मुरली (साधारण १० मिनीटे) कि कूकर उघडून खिचडी सर्व्ह करावी.
९) खिचडीवर १ चमचा तूप घालावे.
१०) मूगतांदूळाची खिचडी तयार आहे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
【6】
पालक भात:-
साहित्य:-
पालकची स्वच्छ धुतलेली पाने,१ छोटी वाटी तांदूळ,लसूण,हळद,जिरे,हिंग,अर्धा टोमॅटो.
कृती:-
स्वच्छ धुतलेली पाने बारीक चिरून घेणे,छोट्या कुकर मध्ये एक चमचा तेल घालणे.
२) त्यात जिरे,हळद,लसूण ठेचून,बारीक चिरलेला टोमॅटो व चिरलेली भाजी व तांदूळ घालणे.
३) १ ग्लास पाणी घालून ३-४ शिट्या घेणे.
४) पावभाजी च्या smasher ने स्मॅश करून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून भरवणे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
【7】
मुग भात:-
साहित्य:-
अर्धी वाटी मुग,१ छोटी वाटी तांदूळ,लसूण,हळद,जिरे,हिंग,अर्धा टोमॅटो.
कृती:-
१) मुग थोडेसे भाजून घेणे,छोट्या कुकर मध्ये एक चमचा तेल घालणे.
२) त्यात जिरे,हळद,लसूण ठेचून,बारीक चिरलेला टोमॅटो व भाजलेले मुग व तांदूळ घालणे.
३) १ ग्लास पाणी घालून ३-४ शिट्या घेणे.
४) पावभाजी च्या smasher ने स्मॅश करून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून भरवणे.
५) यात एक दोन फोडी गाजर,बटाटा,किंवा फरसबी घालू शकता.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
【8】
ओटस पावडर रेसिपी
ओट्स थोडेसे भाजून घेणे, बदाम पण शेकून घेणे.
थंड झाले की दोन्ही मिक्सर मध्ये बारीक करून पावडर बनवणे.
****ओट्स रेसिपी****
Apple ओट्स:-
साहित्य:-
2-3 चमचे ओट्स पावडर व
एक छोटा किंवा 2-3 फोडी apple चा गर.
कृती:-
१) थोडेसे पाणी घेऊन त्यात 2-3 चमचे ओट्स पाउडर घेऊन मिक्स केली.
२) त्यात थोडेसा apple चा गर मिक्स केला व साखर व किंचित मीठ घालून उकळी येऊ दिली. ओट्स तयार.
●●साधे ओट्स:-
२-३ चमचे ओट्स पावडर मीठ घालून शिजवून घेणे.
ओट्स मध्ये वेगवेगळ्या भाज्या किंवा फळे घालुन बाळासाठी वेगवेगळ्या रेसिपी बनवणे.
टीप-सुरवातीला कोणताही पदार्थ मुलांना थोड्या प्रमाणात द्यावा व संडास जास्त होणे, खाल्यावर 1 तासाने रडून पोटाला दाबणे असे दिसल्यास अजून 2-3 महिन्यांनी देऊन निरीक्षण करावे. एकदम जास्त प्रमाणात पदार्थ खाण्यास न देता 15-15 दिवसांनी वाढ करत जावे.

आम्ही प्रेग्नंट आहोत!!

आपली समज विस्तारित करणारा हा लेख जरूर वाचा.
आम्ही प्रेग्नंट आहोत!!!
डॉ. शंतनु अभ्यंकर
“डॉक्टर, आम्ही प्रेग्नंट आहोत!!!”
माझ्या हॅलोचीही वाट न बघता एक अधीर स्वर फोनवर उमटला. बोलणारी व्यक्ती, अस्तंगत राजेशाहीचे ओझे वहाताना, स्वतःला आदरार्थी बहुवचन वापरणारी, कोणी घरंदाज स्त्री नव्हती. तो होता, पुरोगामित्वचं पाणी प्यायलेला आणि ते पुरोगामित्व आचरणात आणायला आसुसलेला माझा मित्र.
“अभिनंदन!, तुझं हे ‘आम्ही प्रेग्नंट आहोत’ जाम आवडलं यार मला.”
“सर, आम्ही इथे ज्या डॉक्टरना दाखवलंय, तिथे मी केसपेपरवरसुद्धा दोघांचं नाव घालायला लावलं, रिसेप्शनिस्टला.”
“अरे व्वा, अगदी भारी केलंस हे.”
बायकांचा डॉक्टर असलो तरी पुरुषांची बरीच रूपं बघायला मिळतात मला. पण हे रुपडं नवीन होतं, मोहक होतं. किती खरी होती त्याची भावना. मूल होणार ते दोघांना मग दोघंही प्रेग्नंट आहेत असं समजलं तर छानच की. नवऱ्याची अगदी पहिल्यापासून अशी समजून उमजून मिळालेली साथ दोघांचं नातं अधिक फुलवत नेईल, नाही का?

Read more

‘मुलांना सतत बिझी ठेवण्याच्या आजाराचं करायचं तरी काय?’

‘मुलांना सतत बिझी ठेवण्याच्या आजाराचं करायचं तरी काय?’
#मुलांना_फुलू_द्या
– मनीषा उगले
‘Meaningfully engaging the classroom’ या मुद्द्यावर मनात आलेले काही विचार आपल्यासमोर ठेवते आहे.
मुलांना एंगेज ठेवायचं म्हणजे exactly काय अपेक्षित असतं आपल्याला?
वर्गात शिक्षक एकतर्फी अध्यापन करत नसतील, मुलांसोबत उत्तम interaction असेल तर तितका वेळ मुलं छान बिझी असतातच.
पण ज्यावेळी शिक्षकांना इतर काम असेल तर शिक्षक मुलांना काहीतरी काम देतात आणि गुंतवून ठेवतात. कारण मुलं रिकामी असली की गोंगाट करतील असं त्यांना वाटतं आणि एखाद्या वर्गातून गोंगाट ऐकू येणं हे शाळेत बेशिस्तपणाचं मानलं जातं.
मुलांना सतत गुंतवून ठेवणं अपेक्षित असल्याने अनेकदा मुलांवर ‘उपक्रमांचा’ मारा सुद्धा केला जातो.
एखाद्या वर्गात वर्गशिक्षक नसले तर ‘पाढे पाठ करा, स्वाध्याय सोडवा, वाचन करा किंवा गणितं सोडवा’ अशी सूचना दुसरे शिक्षक येऊन करतात. पण ‘तुमच्या आवडीचं काम करा, हवा असल्यास आराम करा’ अशी सूचना क्वचितच कोणी करत असेल. किती जपतो मुलांची मनं आपण?
मुलांना बिझी ठेवायचं असेल तर ते का ठेवायचं आहे? हे समजून उमजून आणि मुलांच्या चिकित्सक, सर्जनशील विचारप्रक्रियेला चालना देतील असे उपक्रम आपण डिझाईन करायला हवेत. (उपक्रम शब्दाची मी थोडी धास्ती घेतली आहे. उपक्रमाच्या नावाखाली हल्ली कोणत्या निरर्थक गोष्टीचा आपल्यावर मारा होईल हे सांगता येत नाही.)

Read more