Back to Top

Author Archives: swarda

पावकी, निमकी

पावकी, निमकी म्हणजे बालपणी छळणाऱ्या चेटकी !

गेल्या पिढ्यांमधील शालेय अभ्यासातील अनेक क्लिष्ट आणि वरकरणी निरुपयोगी वाटणाऱ्या अनेक गोष्टींचे चपखल वर्णन, पु. ल. देशपांडे यांनी आपल्या बिगरी ते मॅट्रिक या कार्यक्रमामध्ये केलेले आहे, त्यात त्यांनी या पाढ्यांचा उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात या पावकी, निमकी या चेटकीं नी आमचे बालपणच खाऊन टाकले. क्षेत्रफळ, घनफळ, काळ काम वेगाची गणिते, बाजारातील हिशेब, वस्तूंची किंमत अशा शेकडोवेळा उपयुक्त ठरणारे हे पाढे म्हणजे खरोखरच रम्य बालपणाच्या गळ्यातील एक मोठी धोंड होती.

सुमारे ६५ / ७० वर्षांपूर्वी ते बहुतेक सर्वांना पाठ करावेच लागत. पूर्वी प्राथमिक शालेय शिक्षण झालेली लोकंसुद्धा या पाढ्यांच्या आधारे, पूर्ण जमिनीला कुंपण घालायला किती खांब घालावे लागतील, तारेचे तीन किंवा चार वेढे
घालायला किती तार लागेल असे हिशेब अचूकपणे करीत असत. ते देखील अत्यंत कमी वेळामध्ये. त्यावेळी जमिनीची मापे यार्ड, फूट, कदम अशी असत. तारेचा भाव १२ आणे, पावणेदोन रुपये असा काहीतरी आडनिडा असे. सुदैवाने माझ्या बालपणी आमचे पाऊणकी पर्यंत पाठांतर झाल्यावर या ” चेटक्यांचा ” फास हळूहळू सैल झाला. नंतर तर आम्हाला शिकविणाऱ्या शिक्षकांनाच हे पाढे येत नसत. पण वैदिक गणित, अबॅकस, लॉग टेबल्स वगैरेपेक्षा हे परवडले असं वाटायचं. आता कॅलक्युलेटर, कॉम्पुटर, मोबाईल पर्यंतच्या प्रवासात सगळे ज्ञानच माणसाच्या मुठीत आले आहे. पण तरीसुद्धा ते मुठीत असणे आणि डोक्यात असणे यातील फरक जाणवतोच. हिशेबासाठी कॅल्क्युलेटरवर संख्या टाईप करीपर्यंत तोंडी हिशेब पूर्णसुद्धा होतो.

आता पुढे चाललेल्या जगात हे सर्व कालबाह्य झाले आहे. हे पाढे पाठ करा म्हणून कुणी म्हणणार नाही आणि म्हटले तरी ते कुणी ऐकणार नाही. पण पूर्वींच्या सगळ्या गणितशास्त्राचाच मूलाधार असलेल्या या पाढ्यांकडे एकदा नजर तरी टाकू या ! भविष्यात कदाचित ही कसली टेबल्स आहेत हेच कुणाला सांगता येणार नाही. माझ्या संग्रहातील हे पाढे आहेत. जुन्या मोडी पद्धतीने पाव म्हणजे -l-, अर्धा म्हणजे -ll-, पाऊण म्हणजे -lll- असे लिहिलेले आहे.

*** मकरंद करंदीकर.

10 Ways to Say Thank You

10 Ways to Say Thank You

1. Thanks.
2. Thanks a lot.
3. Thank you so much.
4. Thanks a million!
5. Thanks for your help. / Thanks for helping me.
6. I really appreciate it.

Read more

नील्स बोर

नील्स बोर

भौतिकशास्त्रज्ञ

जन्म – ऑक्टोबर ७, १८८५

संशोधन
नील हेनरिक डेव्हिड बोर (डॅनिश: [nils b̥oɐ̯ˀ] ७ ऑक्टोबर १८८५ – १८ नोव्हेंबर १९६२) हे एक डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ होते. आण्वीय संरचना आणि पुंजभौतिकी सिद्धान्त या विषयांत त्यांनी मूलभूत योगदान दिले. त्याबद्दल १९२२ मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. बोर हे एक तत्त्वज्ञानी आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तक देखील होते.

Read more

एल्मर स्पेरी

एल्मर स्पेरी

जायरोकंपासचा (गायरोकंपास(Gyrocompass) शोध

जन्मदिन – १२ ऑक्टोबर १८६०

एखादी वस्तू आपल्या गुरुत्वमध्यातून जाणाऱ्या अक्षाभोवती पुरेशा वेगाने फिरत असेल, तर तिला घूर्णी असे म्हणतात. विशेषकरून ज्याचा अक्ष कोणत्याही दिशेत वळू शकेल अशी बैठक दिलेल्या व ज्याच्या अक्षावरील एक बिंदू स्थिर असतो अशा चक्राला ही संज्ञा दिली जाते. इतर काही प्रेरणा न मिळाल्यास घूर्णीच्या अंगी आपल्या परिवलन अक्षाची दिशा टिकवून धरण्याचा गुण असतो.

इतिहास
अशा तऱ्हेचे फिरते चक्र प्रथम १८१० मध्ये बोननबर्गर यांनी बनविले. त्यानंतर १८३६ मध्ये एडवर्ड लांग यांनी एका प्रबंधात असे सुचविले की, अशा फिरत्या घूर्णीच्या साहाय्याने पृथ्वीच्या आपल्या आसाभोवतीचे परिवलन पडताळून पाहता येईल. यासंबंधीचा प्रत्यक्ष प्रयोग फूको यांनी पॅरिसमध्ये १८५२ मध्ये केला. घूर्णीविषयक संशोधनाला फूको यांच्या प्रयोगामुळे बरीच चालना मिळाली. याविषयीचे सैद्धांतिक विवेचन स्विस गणिती ऑयलर यांच्या ग्रंथात भरपूर केलेले आहे. घूर्णी परिणामाच्या काही प्रासंगिक उपयोगांखेरीज अनेक वर्षे घूर्णी ही केवळ कुतूहलजनक वस्तूच मानण्यात येत होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस घूर्णीचा व्यावहारिक उपयोग करण्यासंबंधी प्रयत्न सुरू झाले व या दृष्टीने एल्मर स्पेरी यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले. या प्रयत्नातूनच स्पेरी जायरोस्कोप कंपनीची स्थापना झाली. या कंपनीतर्फे जहाजे व विमाने यांना लागणाऱ्या अनेक प्रकारच्या यंत्रणांत उपयुक्त असणाऱ्या घूर्णी प्रयुक्त्या तयार करण्यात येतात. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत घूर्णीच्या उपयोगास मोठी चालना मिळाली व हळूहळू अनेक प्रकारच्या यंत्रणांमध्ये घूर्णीचा समावेश करण्यात येऊ लागला.

थॉमस अल्वा एडिसन

थॉमस अल्वा एडिसन

विजेच्या दिव्याचा शोध

स्मृतिदिन – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१

थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.
जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच.

Read more

किल्ले माहीती- मार्कंड्या

🦋किल्ले माहीती🦋

📙 मार्कंड्या 📙
*******

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा सातमाळ
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडापासून सुरु होणार्‍या डोंगररांगेत अनेक किल्ले वसलेले आहेत. सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप इ. किल्ले या डोंगररांगेत येतात. सप्तशृंगी गडासमोरच दिसणार्‍या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रावळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पूरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो.

Read more

इतिहासकालीन प्रसिद्ध आणि महाकाय तोफा

इतिहासकालीन प्रसिद्ध आणि महाकाय तोफा

चौदाव्या आणि पंधराव्या शतकात जगात तोफांचा बराच प्रसार होऊ लागला होता. मोठमोठय़ा तोफा बनवण्याची अहमहमिका लागली होती. त्यात बॉम्बार्ड नावाचा तोफांचा प्रकार प्रामुख्याने अस्तित्वात होता. या प्रकारच्या तोफा कॅनन आणि मॉर्टर या वर्गात मोडत आणि त्या मोठय़ा कॅलिबरच्या म्हणजे बॅरलचा व्यास खूप मोठा असलेल्या असत. त्यांचा उपयोग मुख्यत्वे शत्रूच्या किल्ल्यांची आणि नगरांची तटबंदी भेदणे हा असे.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज

बसून कंटाळा आला तर मुलांनाही टीव्ही मोबाईल त्याच्या शिवाय वेगळा पर्याय नाही चला तर मग मुलांना दाखवायचे तर काहीतरी चांगलं दाखवूया यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि आपल्या काही संतांचे चित्रपट असलेली युट्युब ची लिंक पाठवत आहे याच्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे तसेच जुन्या संतांचे बरेचसे चित्रपट पाहायला मिळतील

जास्तीतजास्त शेयर करा आजच्या बच्चेकंपनी ला छञपती काय होतें हे समजणे आवश्यक आहे असें मला वाटते….

जय महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज व संतावरील सर्व
जुने चित्रपट YOUTUBE LINK

Read more

संत तुकारामांचे अभंगशतक

।। संत तुकारामांचे अभंगशतक ।।
कर्जदारांची कर्ज माफ करणारे जगातील पहिले संत तुकाराम. हे सतराव्या शतकातील लोकसंत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म, अनागोंदी त्याचप्रमाणे लोकांच्या मनातील भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा संत तुकारामांनी प्रयत्न केला. लोकांच्यावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा, देण्याचं काम केलं. रोजचे जीवन जगताना कशा प्रकारे जगावे हे आपल्याला त्यांच्या अभंगातून दिले. त्यांचे सर्व अभंग मानवी जीवनाला हितकारक, उपकारक ठरले आहेत. तुकारामांचे अनेक अभंग आहेत त्यातील शंभर अभंगांचे संक्षिप्त विवेचन सरळ, साध्या, सोप्या भाषेत असणारा “संत तुकारामांचे अभंगशतक” असा ग्रंथ डॉ.आ.ह साळुंखे यांनी आपल्याला समोर ठेवला आहे. हा ग्रंथ 191 पृष्टी असून शंभर अभंग या ग्रंथात असल्याकारणाने ग्रंथाचे नाव ‘संत तुकारामांचे अभंगशतक’ असे दिले आहे. या ग्रंथात एकूण सतरा प्रकरणे दिली आहेत. हे सर्व प्रकरण जन्म, विवाह, मृत्यू , गृहप्रवेश, नामकरण, वाढदिवस, आनंद, उत्सव, मंगलकाम, प्रसंग, कृतज्ञता, समारंभ, विविध संस्कार इत्यादी प्रसंगी या अभंगाचे वाचन करू शकू असे अभंग आहेत. प्रथम ‘आईवडील’ या प्रकरणाने सुरुवात केली आहे. जगामधे जिथं आपलं मस्त नम्रपणानं झुकवावं असं आपलं पहिलं श्रद्धास्थान म्हणजे आपले आईवडील. या पहिल्या प्रकरणात आठ अभंग दिले आहेत. दुसरे प्रकरण संत असं दिलं आहे. यातील पहिल्या अभंगाची सुरुवात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले। या अभंगाने केली आहे.

Read more

सरदार यशवंतराव आनंदराव पवार

[10:02 am, 14/12/2020] +91 86230 64224: सरदार यशवंतराव आनंदराव पवार

( पानिपतच्या लढाईत मर्दुमकी गाजवणारे रणमर्द सरदार )

” धार” संस्थानचे दुसरे मराठा पवार राजे …! ( इ . स. १७३५ ते १७६१ )

वडील आनंदराव सर्पदंशाने मरण पावले (१७३६). त्यांचा सरंजाम मुलगा यशवंतराव याजकडे आला. बाजीरावाच्या दिल्लीवरील स्वारीत तुकोजी, जिवाजी व यशवंतराव यांनी त्याजकडे सोपविलेली कामे उत्तम रीतीने पार पाडली. वसईच्या रणसंग्रामातही त्यांनी भाग घेतला होता. १७५२ मध्ये दिल्लीच्या बादशाहाशी मराठ्यांचा जो प्रसिद्ध अहदनामा (काररनामा) झाला, तो पेशव्यांतर्फे पाळला जाईल याची हमी शिंदे, होळकर व पवार या तिघांनी घेतली होती. यशवंतराव पानिपतच्या तिसऱ्‍या लढाईत मराठ्यांच्या बाजूने लढताना कामी आले (१७६१).

माळवा भागातील मराठ्यांचा अंमल पक्का करण्यात आणि पेशव्यांच्या मोहिमांत वेळोवेळी सामिल होउन मराठ्यांचा शत्रुचा मोड करण्यात यशवंतरावानी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली .

कर्तबगार व करारी स्वभावाचे यशवंतराव पवार आपल्या कारकिर्दीत मराठा सत्तेचे प्रमुख आधारस्तंभ बनुन राहीले .

शाहू छत्रपतींचे अगदी मर्जीतले सरदार म्हणून पवारांचे नाव घेतले जाते.

अशा कर्तबगार सेनानींच्‍यामुळेच माळवा प्रा
[10:02 am, 14/12/2020] +91 86230 64224: सरदार यशवंतराव आनंदराव पवार

( पानिपतच्या लढाईत मर्दुमकी गाजवणारे रणमर्द सरदार )

” धार” संस्थानचे दुसरे मराठा पवार राजे …! ( इ . स. १७३५ ते १७६१ )

वडील आनंदराव सर्पदंशाने मरण पावले (१७३६). त्यांचा सरंजाम मुलगा यशवंतराव याजकडे आला. बाजीरावाच्या दिल्लीवरील स्वारीत तुकोजी, जिवाजी व यशवंतराव यांनी त्याजकडे सोपविलेली कामे उत्तम रीतीने पार पाडली. वसईच्या रणसंग्रामातही त्यांनी भाग घेतला होता. १७५२ मध्ये दिल्लीच्या बादशाहाशी मराठ्यांचा जो प्रसिद्ध अहदनामा (काररनामा) झाला, तो पेशव्यांतर्फे पाळला जाईल याची हमी शिंदे, होळकर व पवार या तिघांनी घेतली होती. यशवंतराव पानिपतच्या तिसऱ्‍या लढाईत मराठ्यांच्या बाजूने लढताना कामी आले (१७६१).

माळवा भागातील मराठ्यांचा अंमल पक्का करण्यात आणि पेशव्यांच्या मोहिमांत वेळोवेळी सामिल होउन मराठ्यांचा शत्रुचा मोड करण्यात यशवंतरावानी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली .

Read more