Back to Top

Category: Parents

डिकोडिंग

पहले बच्चों को सूजी, मैदा और आटे में भेद करना सिखाइये

पहले बच्चों को मूंग, मसूर, उडद, चना और अरहर पहचानना सिखाइये

पहले बच्चों को मख्खन, घी, पनीर, चीज़ के बीच अंतर और उन्हें बनाने की जानकारी सिखाइये

पहले बच्चों को सोंठ और अदरक, अंगूर और किशमिश, खजूर और छुहारे के बीच का अंतर सिखाइये

पहले बच्चों को दालचीनी, कोकम, राई, सरसों, जीरा और सौंफ पहचानना सिखाइये

पहले बच्चों को आलू, अदरक, हल्दी, प्याज और लहसुन के पौधे दिखाइये

पहले बच्चों को मेथी, पालक, चौलाई, बथुआ, सरसों, लाल भाजी में फर्क सिखाइये

पहले बच्चों को फलों से लदे पेड़ों, फूलों की बगिया दिखाइए

पहले बच्चे को गाय, बैल, सांड का फर्क सिखाओ, गधे, घोड़े और ख़च्चर में अंतर समझाओ

पहले बच्चों को दिखाएं कि गाय, भैंस और बकरी से दूध कैसे दुहा जाता है।

पहले बच्चों को कीचड़ और मिट्टी में उलट पुलट होना सिखाइये, बरसात में भीगना और गर्मियों में पसीने से तरबतर होना सिखाइये

पहले बच्चों को बुजुर्गों के पास जाना, उनसे बातें करना, उनके साथ खेलना और मस्ती करना सिखाइये

बड़ों से तमीज़ से बात करना और घर के काम धाम में माँ-पिता का सहयोग करना सिखाइये

इन सब के बगैर आप बच्चों को कोडिंग सिखाना चाह रहे हैं तो आपका बच्चा ATM बनेगा, समस्याओं का

व्हाइटहैट जूनियर की जल्दी क्या है? कोडिंग भी सीख लेंगे, पहले डिकोडिंग तो कर लें, अपने आस-पास की…बचपन को ज़िंदा रखें, मरने न दें। हाथ जोड़कर निवेदन है।

डॉ अतुल अग्रवाल
बाल्य एवं शिशु रोग विशेषज्ञ

*लहान मुलांसाठी रेसिपी*

*लहान मुलांसाठी रेसिपी* 2 वर्ष वरील मुलांसाठी
【1】
Home-Made Cerelac:-
खिमटी
साहित्य:-
मूग दाळ १ वाटी,
तांदूळ १ वाटी ,
बदाम५-६.
कृती:-
दाळ व तांदूळ वेगवेगळे धुवून एका कपड्यावर सुकत ठेवायचे,चांगले सुकले की वेगवेगळे खमंग मंद गॅसवर भाजणे व बदाम पण थोडे शेकून घेणे.
मिक्सर मध्ये मिक्स करून बारीक करणे. ही खिमटी २-३ वीक राहते हवाबंद डब्यात ठेवणे.
पध्दत:-
१)एका वाटीमध्ये पाणी घेऊन 2 चमचे पावडर मिक्स करून मीठ चवीनुसार घेऊन मिक्स करून घेणे.
२)एका भांड्यात उकळून खिमटी बनवा,सतत ढवळत रहा गाठी होऊ नये म्हणून.
३) खमंग सुंगध व फेस किंवा भांडयाला खिमटी चिटकू लागली की समजा खिमटी तयार.
पौष्टिक अशी खिमटी मूल सहा महिन्यांचा झाले कि सुरु करावी,पचण्यास हलकी असते.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
【2】
नाचणी सत्व:-
साहित्य:-
नाचणी सत्व,मीठ,गूळ, वेलचीपूड.
कृती:-
१) खिमटी करतो त्याप्रमाणे एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात नाचणी सत्व 2-3 चमचे मिक्स करून त्यात थोडेसे मीठ घालावे.
२) एका टोपात घालून उकळी येऊ लागतात एक कप दूध,गूळ, वेलचीपूड, सुठं पावडर,तूप,काजू बदाम पावडर घालून सतत ढवळावे म्हणजे गाठी होणार नाही.
३) मंद गॅसवर शिजवूज घेणे,
४) हे सत्व आपणही ताकातून घेऊ शकतो किंवा खीर.
Calcium चा उत्तम source आहे नाचणी,हाडे मजबूत होतात.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆●◆
【3】रवा लापशी:-
साहित्य:-
लापशीचा रवा,तूप,साखर किंवा गूळ, वेलचीपूड.
कृती:-
१)लापशीचा रवा १-२ चमचे घेऊन तुपात छान परतने.
२) दूध एक वाटी, साखर वेलची पावडर घालून मस्त शिजवून घेऊन भरवणे.
३)अधूनमधून ढवळने,गाठी होणार नाहीत.
○●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●○
【4】
मिक्स दाळीचे सूप:-
साहित्य:-
तूरडाळ,मूगडाळ, मटकी डाळ, हिंग,मीठ,लसूण.
कृती:-
१) तूरडाळ,मूगडाळ, मटकी डाळ थोडी चना डाळ सगळ्या डाळी मिक्स करून कुकर मध्ये मऊ शिजवणे त्यात
२) 2-3 लसूण पाकळ्या व थोडे हिंग पावडर घालणे.
३) स्मॅश करून किंवा मिक्सर मध्ये बारीक करून घेऊन सर्व्ह करणे.
टीप: पाण्याचे प्रमाण जास्तच ठेवले तरी चालेल.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆◆◆◆
【5】
मूगतांदूळाची खिचडी
साहित्य
१) १ कप तांदूळ
२) १/२ कप मूग डाळ
३) तीन ते साडेतीन कप गरम पाणी
४) १ टेस्पून तेल
५) २ चिमटी मोहरी
६) १/४ टिस्पून जिरे
७) १ चिमटी हिंग
८) १/४ टिस्पून हळद
९) थोडे मटार
१०) १ टिस्पून गोडा मसाला
११) चवीपुरते मिठ
कृती
१) खिचडी करायच्या आधी तांदूळ आणि डाळ एकत्र करून पाण्याने स्वच्छ धुवावे.
२) पाणी काढून १/२ तास निथळत ठेवावे.
३) लहान कूकरमध्ये तेल गरम करावे त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, फोडणी करावी.
४) नंतर डाळ आणि तांदूळ घालून परतावे. साधारण ३-४ मिनीटे परतावे. डाळ-तांदूळ चांगले कोरडे झाले पाहिजेत.
५) नंतर यात गरम पाणी घालावे. गोडामसाला आणि मिठ घालावे. ढवळून पाण्याची चव पाहावी.
६) लागल्यास मिठ घालावे.
७) पाण्याला उकळी आली कि कूकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या होवू द्याव्यात.
८) वाफ मुरली (साधारण १० मिनीटे) कि कूकर उघडून खिचडी सर्व्ह करावी.
९) खिचडीवर १ चमचा तूप घालावे.
१०) मूगतांदूळाची खिचडी तयार आहे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
【6】
पालक भात:-
साहित्य:-
पालकची स्वच्छ धुतलेली पाने,१ छोटी वाटी तांदूळ,लसूण,हळद,जिरे,हिंग,अर्धा टोमॅटो.
कृती:-
स्वच्छ धुतलेली पाने बारीक चिरून घेणे,छोट्या कुकर मध्ये एक चमचा तेल घालणे.
२) त्यात जिरे,हळद,लसूण ठेचून,बारीक चिरलेला टोमॅटो व चिरलेली भाजी व तांदूळ घालणे.
३) १ ग्लास पाणी घालून ३-४ शिट्या घेणे.
४) पावभाजी च्या smasher ने स्मॅश करून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून भरवणे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
【7】
मुग भात:-
साहित्य:-
अर्धी वाटी मुग,१ छोटी वाटी तांदूळ,लसूण,हळद,जिरे,हिंग,अर्धा टोमॅटो.
कृती:-
१) मुग थोडेसे भाजून घेणे,छोट्या कुकर मध्ये एक चमचा तेल घालणे.
२) त्यात जिरे,हळद,लसूण ठेचून,बारीक चिरलेला टोमॅटो व भाजलेले मुग व तांदूळ घालणे.
३) १ ग्लास पाणी घालून ३-४ शिट्या घेणे.
४) पावभाजी च्या smasher ने स्मॅश करून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून भरवणे.
५) यात एक दोन फोडी गाजर,बटाटा,किंवा फरसबी घालू शकता.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
【8】
ओटस पावडर रेसिपी
ओट्स थोडेसे भाजून घेणे, बदाम पण शेकून घेणे.
थंड झाले की दोन्ही मिक्सर मध्ये बारीक करून पावडर बनवणे.
****ओट्स रेसिपी****
Apple ओट्स:-
साहित्य:-
2-3 चमचे ओट्स पावडर व
एक छोटा किंवा 2-3 फोडी apple चा गर.
कृती:-
१) थोडेसे पाणी घेऊन त्यात 2-3 चमचे ओट्स पाउडर घेऊन मिक्स केली.
२) त्यात थोडेसा apple चा गर मिक्स केला व साखर व किंचित मीठ घालून उकळी येऊ दिली. ओट्स तयार.
●●साधे ओट्स:-
२-३ चमचे ओट्स पावडर मीठ घालून शिजवून घेणे.
ओट्स मध्ये वेगवेगळ्या भाज्या किंवा फळे घालुन बाळासाठी वेगवेगळ्या रेसिपी बनवणे.
टीप-सुरवातीला कोणताही पदार्थ मुलांना थोड्या प्रमाणात द्यावा व संडास जास्त होणे, खाल्यावर 1 तासाने रडून पोटाला दाबणे असे दिसल्यास अजून 2-3 महिन्यांनी देऊन निरीक्षण करावे. एकदम जास्त प्रमाणात पदार्थ खाण्यास न देता 15-15 दिवसांनी वाढ करत जावे.

‘मुलांना सतत बिझी ठेवण्याच्या आजाराचं करायचं तरी काय?’

‘मुलांना सतत बिझी ठेवण्याच्या आजाराचं करायचं तरी काय?’
#मुलांना_फुलू_द्या
– मनीषा उगले
‘Meaningfully engaging the classroom’ या मुद्द्यावर मनात आलेले काही विचार आपल्यासमोर ठेवते आहे.
मुलांना एंगेज ठेवायचं म्हणजे exactly काय अपेक्षित असतं आपल्याला?
वर्गात शिक्षक एकतर्फी अध्यापन करत नसतील, मुलांसोबत उत्तम interaction असेल तर तितका वेळ मुलं छान बिझी असतातच.
पण ज्यावेळी शिक्षकांना इतर काम असेल तर शिक्षक मुलांना काहीतरी काम देतात आणि गुंतवून ठेवतात. कारण मुलं रिकामी असली की गोंगाट करतील असं त्यांना वाटतं आणि एखाद्या वर्गातून गोंगाट ऐकू येणं हे शाळेत बेशिस्तपणाचं मानलं जातं.
मुलांना सतत गुंतवून ठेवणं अपेक्षित असल्याने अनेकदा मुलांवर ‘उपक्रमांचा’ मारा सुद्धा केला जातो.
एखाद्या वर्गात वर्गशिक्षक नसले तर ‘पाढे पाठ करा, स्वाध्याय सोडवा, वाचन करा किंवा गणितं सोडवा’ अशी सूचना दुसरे शिक्षक येऊन करतात. पण ‘तुमच्या आवडीचं काम करा, हवा असल्यास आराम करा’ अशी सूचना क्वचितच कोणी करत असेल. किती जपतो मुलांची मनं आपण?
मुलांना बिझी ठेवायचं असेल तर ते का ठेवायचं आहे? हे समजून उमजून आणि मुलांच्या चिकित्सक, सर्जनशील विचारप्रक्रियेला चालना देतील असे उपक्रम आपण डिझाईन करायला हवेत. (उपक्रम शब्दाची मी थोडी धास्ती घेतली आहे. उपक्रमाच्या नावाखाली हल्ली कोणत्या निरर्थक गोष्टीचा आपल्यावर मारा होईल हे सांगता येत नाही.)

Read more

*बालपण करपवू नका!* – _भाऊसाहेब चासकर_

*बालपण करपवू नका!*
– _भाऊसाहेब चासकर_
राज्यात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीचे वय यंदा सहा वर्षे ठेवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील काही प्रवेश परीक्षांपासून वंचित राहतात किंवा एक वर्ष उशिराने पात्र ठरतात. पहिलीत प्रवेशासाठीचे वय सहा वर्षे केल्याने मुलांचे नुकसान होते. ते पाच वर्षे करावे, असा पवित्रा घेत एका पालकाने याला आव्हान देणारी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. रवींद्र देशपांडे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. ऑनलाइन पिटिशनच्या माध्यमातून ते लोकसहभाग मिळवत आहेत. अनेक पालकांना त्यांचे मुद्दे पटत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा शाळाप्रवेशाचे वय नेमके किती असावे, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला अनेक कंगोरे, आयाम आहेत. त्याची चर्चा व्हायला हवी.

Read more

मुलांसाठी कोडींग – गरज की scam?

मुलांसाठी कोडींग – गरज की scam?
(प्रस्तुत लेख हा प्रत्येक पालकाने, पालक होऊ पाहणाऱ्याने आणि पालकांना ओळखणाऱ्या प्रत्येकाने वाचावा आणि शेयर करावा अशी अपेक्षा आहे, वेळ निघून जाण्याआधी.. का ते लेख वाचल्यावर कळेलच:)
– ©सुमित चव्हाण
आज बबलूचे शेजारी फार अचंबित झाले होते. उच्चभ्रू असे वाटणारे निरनिराळ्या वयाचे परदेशी लोक(ज्यामध्ये पुरुष आणि स्त्री दोघेही होते) बबलूच्या घराबाहेर सकाळीच जमा झाले होते आणि एकमेकांशी लाथ-बुक्क्यांनी मारामारी करत होते. आणि त्यांना थांबवायचं सोडून बबलूचे आईवडील घराच्या अंगणात निवांतपणे चहा पित बसले होते. शेजारच्या काकांनी न राहवून त्यांना विचारलं, ‘हे काय चाललंय तरी काय?’
बबलूची आई सांगू लागली, “आमच्या बबलूने ट्रेन मध्ये मिळणारं ‘एकवीस दिवसात डॉक्टर बना’ पुस्तक वाचलं, कोरोनाची लस बनवली, आणि आता त्याच्या लशीमध्ये गुंतवणूक करायला दुनियाभरचे आरोग्य विभागाचे अधिकारी आले आहेत.”

Read more

जरा कळ काढा

मुलांना शिकवण्याची एवढी घाई कशाला? लोकमतमध्ये आज प्रसिद्ध झालेला लेख.

जरा कळ काढा!
-भाऊसाहेब चासकर

काही काळ शिक्षणाची प्रक्रिया कदाचित बंद पडणार या भीतीने जो तो या ना त्या मार्गाने मुलांच्या डोक्यात शहाणपण ओतायच्या मागे नुसता धावत सुटलाय.काहीही करून मुलांना शिक्षण ‘भरवायची’ ही इतकी घाई कशाला?

कोरोना विषाणूने सर्वच क्षेत्रात अनिश्चितता निर्माण करून ठेवली आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकांमधला गोंधळ दिवसेंदिवस वाढतो आहे. नेहमीप्रमाणो 15 जूनला शाळा सुरू होणार नाहीत, हे जवळजवळ स्पष्ट झालंय. मग शाळा कधी सुरू होतील? कुठल्या, किती शाळा सुरू होतील? मुलं शाळेत येतील का? किती येतील? असे अनेक प्रश्न आहेत. कोरोनामुळे शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शासन यंत्रणा यांच्यात एकमत होणं कठीण दिसतंय. गेले अडीच महिने झालेत मुलं घरात आहेत. त्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्यातल्या ऊर्जेलाही विधायक वळण कसं द्यायचं हा एक मोठाच प्रश्न आहे.
आणि काही काळ शिक्षणाची प्रक्रिया कदाचित बंद पडणार या भीतीने जो तो या ना त्या मार्गाने मुलांच्या डोक्यात शहाणपण ओतायच्या मागे नुसता धावत सुटलाय.

गेल्या अडीच महिन्यांपासून घरबंद असल्यामुळे जीव गुदमरलेल्या मुलांसाठी ऑनलाईन लेक्चर्स ठेवली जाताहेत. आधीच अवघड जाणाऱ्या गणित विषयातली कठीण उदाहरणं सोडवायला सांगितली जाताहेत. भलीमोठाली होमवर्क दिले जाताहेत. नामांकित शाळांचे सध्याच्या शाळाबंद शिक्षणात असे प्रयोग सुरू आहेत. आणि पालकही हे अत्यंत कौतुकाने सांगताहेत. म्हणजे पालकांनाही मुलांना गुंतवून ठेवणारे हे प्रयोग आवडत असले पाहिजेत. किंबहुना काहीही करुन मुलांना शिकवून सोडायचा पालकाग्रहच असतो. लहान मुलांवर केली जाणारी ही शिक्षणाभ्यास सक्ती मला अमानुष आणि हिंसक कृती वाटते. मुलं दुबळी असतात, त्यांना आवाज नसतो. ती विरोध करू शकत नाहीत. लहान मुलांच्या मनावर याचे आघात होत नसतील? याचा विचार करायला फुरसत आहे कोणाकडे?

मुलांचं हित, किंवा भलंबुरं केवळ आम्हाला कळतं, अशी पालकांची मनोभूमिका मुलांच्या वाढ-विकासासाठी अत्यंत घातक आहे. तशीही भारतातल्या मुलांना जन्मत: पी.सी.(पेरेंटल कस्टडी) मिळालेली असतेच. खरं म्हणजे पृथ्वीवर हयात असलेल्या मानवी समुदायाच्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी अत्यंत खडतर आपत्ती आलीय. मुलं त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात कठोर काळामधून जात आहेत. तेव्हा संस्थाचालक आणि पालकांनो, जरा धीर धरा, कळ काढा. या ऑनलाईनमुळे शालेय शिक्षणाचा आभास निर्माण करता येईल. मात्र शिक्षण घडेलच असं अजिबात नाही!

स्वस्थ, आनंदी मन म्हणजेच भावनिक, मानसिक सुरक्षितता ही शिक्षणासाठीची पूर्वअट असते. खेळ नाही, मित्रांच्या गाठीभेटी नाहीत, कोविडची भीती मनात रुतून बसलीय. स्क्रीन टाईम वाढल्यामुळे मनात एका अस्वस्थेने घर केले आहे. आनंदी वृत्तीचा निर्देशांक घसरलाय. कोविडग्लानी आल्याने मरगळलेल्या दुष्टचक्रात डिजिटल माध्यमामधून शिक्षण कसं होईल? मुख्य म्हणजे शिक्षण ही आनंददायी आणि अर्थपूर्ण कृती असते, तशी असली पाहिजे. यासाठी शाळा भरायला हवी, शिक्षक-विद्यार्थी प्रत्यक्ष भेट व्हायला हवी. म्हणूनच सध्या जे काही सुरू आहे, त्याचं घाईघाईने स्वागत करायची भूमिका घेऊ नका. थोडी कळ काढा, एवढंच सुचवायचं आहे.

पालकांनो, सध्या एवढंच करा!

* अडीच महिने झालेत मुलं घरात आहेत. ग्रामीण भागातली मुलं घराबाहेर तरी पडू शकतात. शहरांतल्या मुलांना ही मुभा नाहीये. घरात कोंडल्यामुळं गुदमरलेल्या मुलांनाही मोकळा श्वास घ्यायचाय. त्रासात आणि ताणात असलेल्या मुलांना मस्त हुंदडायचंय, मनसोक्त खेळायचंय. मुलांमधल्या प्रचंड उर्जेला वळण देता येत नसल्यानं मुलं आणि पालक अशा दोघांचीही मोठी गोची झालीय. या काळात कमाल संयम ठेवायला लागेल.

* टाळेबंदी हळूहळू शिथिल होतेय. शहरी पालक कामावर जाऊ लागलेत. पाळणाघरं बंद आहेत. नोकरी वाचवायची आहे आणि मुलांचंही बघायचंय, अशा कात्रीत सापडलेल्या पालकांच्या जीवाची घालमेल साहजिक आहे. यातून शाळा सुरू करा, असा आग्रह सुरू होतो. पण परिस्थिती निवळून शाळा सुरू होण्याची वाट बघायला हवी.

* मोठ्यांच्या मनात मोठी भीती आहे. लहान मुलांना सांगता येत नसलं तरी त्यांच्या मनाला कोविडजन्य भीती कुरतडत असणार. अशा वेळेस मुलांसोबत सतत बोलत राहायला हवं.

* मुलांचं मन कशात तरी गुंतवून, त्यांना सक्रीय ठेवायला हवं. वाचन, भाषिक खेळ, गप्पागोष्टी, मातीकाम, कागदकाम, चिकटवही, कात्रणवही, कोलाज, चित्र, गायन, वादन, नृत्य यांसारख्या अन्य पर्यायांचा विचार करता येईल.

* केवळ आदेश, उपदेश करणं शक्यतो टाळावं. मुलांनी वाचावं, असं वाटत असल्…

घरच्या घरी (भाग चार)

घरच्या घरी (भाग चार)

– वर्षा सहस्रबुद्धे
Varsha Sahasrabuddhe

(ही लेखमाला द फर्स्ट थ्री इंस्टीट्यूट फॉर चाईल्ड डेव्हलपमेंट यांच्या फेसबुक पेजवर प्रसारित केली जात आहे. जून २०२०)

“मी ना… बाबाच्या मदतीनी भिंतीचं कोळिष्टक काढलं. मला वाटलं ते सोप्पं असेल! …तर…आधी मी ते काढताना भिंतीलाच चिकटलं. मग मी काढायचा प्रयत्न केला तर ते अजूनच चिकटलं.” पूर्वी चौथीच्या बालभारतीत ‘मला माझ्या आईचा अभिमान वाटतो’ हा पाठ होता. त्याला जोडून, मुलांना घरी कोणतंही श्रमाचं काम करून त्याविषयी लिहून आणायला सांगितलं होतं. अंकितानी कोळिष्टक काढायचं काम केलं होतं. इतर मुलांपैकी कोणी स्वतःचं ताट घासलं होतं, कोणी केर काढला होता, कोणी स्वतःचे कपडे धुतले होते, कोणी ते झटकून वाळत घालायला शिकलं होतं.

सहजपणे दिनक्रमातली कामं करणारी गावांमधली, पाड्यांवरची, शहरी वस्त्यांमधली कितीतरी मुलं मला कामाच्या निमित्तानं भेटली आहेत. आपली कामं आपापली करायची असतात हे शहरी मध्यमवर्गातल्या मुलांनाही सहज शिकायला मिळेल अशी संधी या घरातल्या काळात आपसूकच निर्माण झाली आहे!

मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय घरांमध्ये रोजची बरीचशी कामं दुसऱ्याकडून करून घेतली जातात. भांडीवाल्या मावशी, केर काढणाऱ्या मावशी, स्वयंपाकाला येणाऱ्या काकू, जिना पुसणाऱ्या काकू, गाडी पुसून देणारे काका, कचरा नेणारे दादा अशा कितीतरी व्यक्ती आपला रोजचा दिवस सुंदर करत असतात.

आपण वापरतो त्या वस्तू, जागा स्वच्छ आणि नीटनेटक्या ठेवण्यासाठी आपणच काम करण्यातून एक प्रकारचं समाधान मिळतं. त्याचा अनुभव आपणही घ्यायला हवा आणि मुलांनाही मिळायला हवा. श्रमाची कामं करण्यातून शरीर-मनाला येणारा तजेला आणि नम्रपणाची, कृतज्ञतेची भावना ही नुसती वर्णन करून समजणारी गोष्टच नाही! ती प्रत्यक्ष अनुभवण्याचीच गोष्ट आहे!

बालवाडी आणि पहिलीच्या वयोगटासाठी:

आपापला कप, पाणी प्यायचं भांडं, ताट-वाटी धुवून ठेवायला मुलांना आवडतं. सुरुवातीला कदाचित थोडी सांडलवंड होईलही, पण तो अवकाश मुलांना द्यायला हवा. काहीही शिकताना आपलं काय चुकलं, काय दुरुस्त करयला हवं, काय बदलायला हवं हे आपलं आपण हेरता येणं, हा शिकण्याच्या कौशल्यामधला महत्त्वाचा भाग असतो. सांडलं, तर ते पुसून घायला हवं हे मुलांना समजेल आणि पुसून घ्यायलाही मुलांना आवडेल!
सगळ्यांनीच आपापली ताट-वाटी घासून टाकली तर भांडी घासणाऱ्याचं काम किती हलकं होऊन जातं!

घासलेली कोणती भांडी घरात कुठे ठेवायची असतात, हे मुलांनी आधी नक्की पाहिलेलं असणार. भांडी अडगवायला, जागेवर लावायला मुलांना मदतीला घ्या. वर्गीकरण आणि व्यवस्था लावण्याचं आणि रोज नेमानं काही काम करण्याचं हे कौशल्य पुढे अनेक प्रसंगी खूप उपयोगी पडणारं आहे.
पुढे मावशी यायला लागल्यावरही आपापलं ताट-वाटी धुण्याचा प्रघात जरूर चालूच ठेवा.

फरशी पुसायला या वयाच्या मुलांना अपार आवडतं! सुरुवात गॅलरी पुसण्यापासून करायची. फडकं पाण्यात बुचकळून ते हातानी पिळताना मुलांना थोडी मदत करा. एक टोक आपण आणि दुसरं टोक मुलानी धरून पिळताना, आणखी घट्ट पिळताना खरंच धमाल येते! फडक्यात पाणी थोडं जास्त झालं तरी, गॅलरी ते सामावून घेऊ शकते! काही दिवस गॅलरीत पुसापूस करून जरा हात बसला, की खोल्या पुसायला द्या.

कोणतंच काम “तू फरशी पूस” “तू भांडी घास” या पद्धतीनं करायला गेलं, तर त्यातली मजा निघून जाईल. “आपण … करूया” ही या वयाला लागू पडणारी कळीची भाषा आहे. मुलानं हट्ट करून ‘मी करते, मी करतो’ म्हटलं, तर मात्र जरूर त्याला एकट्याला ते करू द्या. एखादी छोटीशी गोष्ट जबाबदारीनं करण्यातून येणारा आत्मविश्वास कायम मुलांपाशी राहतो.

कपडे झटकायला मुलांना हाक मारा. उडणारे तुषार, सुरकुत्या जाऊन कपडा ताठ होतो, याकडे मुलांचं लक्ष वेधा. साडीसारखा लांबलचक कपडा वाळत घालताना कशा घड्या करून वाळत घालतात हे दाखवा. आणि अर्थातच वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालताना, ते जागेवर ठेवताना त्यांना मदतीला बोलवा.

दुसरी ते चौथीच्या वयोगटासाठी:

केर काढताना मुलांना मदतीला बोलवा. झाडू कसा धरायचा, केर न उडवता कसा गोळा करत न्यायचा, सुपलीमध्ये भरताना सुपली कशी धरायची याकडे मुलांचं लक्ष वेधा.

कचरा कमीतकमी तयार व्हावा, यासाठी, कायकाय पुन्हा वापरण्यासारखं आहे याबद्दल मुलांशी बोला. याविषयी बोलताना, तुमच्याकडच्या त्या दिवशीच्या विशिष्ट कचऱ्यातल्या वस्तूंविषयी त्यांना जे सुचेल त्याची दखल घ्या. त्या वस्तू स्वच्छ करून बाजूला ठेवा.

एरवी कपडे यंत्रात धुतले जात असतील, तर आपापले कपडे हातानी चोळून, ब्रशनी घासून धुवायचा अनुभव मुलांना घेऊदे. कुटुंबाच्या आठवड्याच…

‘मार्क’म्हणजेच गुणवत्ता नाही!

‘मार्क’म्हणजेच गुणवत्ता नाही!

डॉ. अरुण नाईक, (मानसोपचारतज्ञ)

नुकतीच एक बातमी वाचली….
नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी तिने आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही. पण मुलगी संपली.

मागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने शेवटच्या वर्षाला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले, म्हणून आत्महत्या केली होती. माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला घाबरतो.

एका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की, “सर्वजण त्यांना काय म्हणतात?”
मुले म्हणाली, की ‘स्कॉलर’.
मी विचारले ‘का?’,
मुले म्हणाली, “कारण आम्हाला चांगले मार्क मिळतात.”
मी समीकरण मांडले.

Read more

खत

मुलांना वाया जाऊ द्यायचे नाही ना..
मग दोन मिनिटे वेळ काढून वाचाचं..🙏🏽

शेजारच्या दोन घरांमध्ये दोघे राहत होते. एका घरामध्ये एक आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये अति श्रीमंत डॉक्टर ! घरच्या अंगणात शोभेची झाडं दोघांनी लावली होती. डॉक्टर आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत.

हळूहळू दोघांकडे असलेली झाडे वाढत होती. मात्र डॉक्टर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं मात्र टुमदार, छान असली तरी अंग धरून होती.

एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी बागेचं नेमकं काय घडलय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून डॉक्टरला धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती. डॉक्टर विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून डॉक्टरने आजोबांना याचे कारण विचारले.

त्या आजोबांचे उत्तर डोळ्यात अंजन घालणारे होते !!

आजोबा म्हणाले “तुम्ही झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गरजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. तुमच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत.”

Note : आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते.. जितके जास्त जपाल,जितक्या जास्त सुविधा द्याल,तितके मुलांना कमकुवत कराल. निसर्गाने प्रत्येकाला लढण्याची शक्ती दिलेली असते. ती खच्ची करू नका. उलट थोडेफार ऊन वारा पाऊस त्याला सोसू द्या ! तरच तो मजबूत बनेल. मग जीवनात कितीही वादळे आली तरी तो पालकांच्या (खत पाण्यावर) म्हणजेच भरोशावर जगणार नाही !
हेच खरे पालकत्व आहे !!!!