Back to Top

Category: Parents

प्रगल्भता

प्रगल्भता म्हणजे काय?
· (what is MATURITY)
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं माणसांच्या बरोबर माणुसकीने बोलता, वागता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं न सुटणारे प्रश्न सोडून देता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला जाणीव होते कि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये.
· आणि शेवटी अती महत्वाचे
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा आपण अंतरीक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.
· Be Happy with Nothing, You will be Happy with Everything

मुले आणि शिक्षकांनी बघावेत असे सिनेमे

मुले आणि शिक्षकांनी बघावेत असे सिनेमे

1 तारे जमीन पर
2 एलिझाबेथ एकादशी
3 प्रकाश बाबा आमटे
4 टपाल
5 श्वास
6 कराटे किड
7 कुंग फ़ू पांडा
8 राजमाता जिजाऊ
9 रमाबाई भिमराव आंबेडकर
10 द लिजंड ओफ़ भगतसिंग
11 भाग मिल्खा भाग
12 मेरी कोम
13 आक्टोबर स्काय
14 होम
15 यलो
16 चिलर पार्टी
17 द किड
18 होम अलोन
19 तानी
20 सिंड्रेला
21 बेबीज डे आऊट
22 ज जंतरम म मंतरम
23 नाईट इन द म्युझियम 24 जबाब आयेगा
25 वनपुरुष
26 दहावी फ़
27 बभागो भूत आया
28 Two sollutions
29 twenty thousand leagues
30 under the sea
31 द ब्ल्यू अंब्रेला 32 चक दे इंडीया
33 शाळा
34 राजुचाचा
35 किंग अंकल
36 दोस्ती (हिंदी)
40 3 इडियटस
41 चल चले
42 चकोरी
43 चिंटू
44 चिंगी
45 I am Kalam
46 Park
47 graviti
48 jurasic world
49 सिंधूताई सपकाळ
50 castaway 51 भगतसिंग
52 चिमनी पाखरं
53 the berning train
54 Harry potter 55 mountain man
56 शिक्षणाच्या आईचा..
57 लोकमान्य
58 विटी दांडू
59 आक्टोबर स्काय
60 मासूम
61 क्रिश
62 एक डाव भुताचा,
63 छोटा चेतन
64 Sound of Music
65 Children of Heaven
66 Honey I Shrunk the kids
67 Spirited Away – Miyazaki
68 The white balloon
69 My neighbour Totoro – Miyazaki animations
70 Chaplin- the kid
71 Jaagte raho
72 The court jester
73 Modern Times
74 The red balloon
75 Ice Age – 1,2 & 3 ,4
76 Good Disnoar
77 Finding nemo
78 How to tame a dragon
79 Kekis delivery
80 Born free
81 Inside out
82 Madagascar
83 The king and I
84 Japanese Ghibli movies by Miyazaki
85 Mery poppins
86 Brother bear
87 Narnia all movies
88 Golmal
89 Lion king
90 Inside out,
91 big hero six,
92 rio
93 Karate kid
94 Home alone….
95 Real steel (robot)
96 Kunfu panda all parts
97 red balloon
98 absent minded professor
99 makdi,
100 blue umbrella,
101 black beard ghost
102 Black beard ghost
103 Hotel Transylvania
104 Ratatouille
105 Sarjaby
106 Malefficent
107 Shrek
108 star wars
109 Bug’s Life
110 Antz
111 sesame street
112 angoor
113 free willy
114 happy feet
115 laurel and hardy movies

SAVAY

दोन मुले दूरच्या प्रवासाला निघाली. एकाच्या आईने आपल्या मुलाला भाकरीची चव्वड बांधून दिली. तर दुसऱ्याच्या आईने भाकरी तयार करण्याचे सर्व साहित्य दिले. आईला मदत करता करता भाकरी तयार करण्याची कला तो शिकला होता.
दोन-तीन दिवस ज्याची तयार शिदोरी होती तो मजेत होता. पण काही दिवसच. पुढे दररोज भाकरी जास्त शिळी होत गेली. तसतसा त्याचा आनंदही कमी होत गेला. दुसरा मुलगा मात्र दररोज ताजी भाकरी करून खात होता. मजेत, आनंदात प्रवास करत होता. तयार भाकरी म्हणजे मुलासाठी संपत्ती कमावून ठेवणे आणि भाकरी तयार करता येणं म्हणजे शिक्षण होय.
संपत्ती गोळा करताना हा विचार अवश्य करा की आपल्या मुलांना आयतं काही देण्यापेक्षा, त्यांना ही शिकवण द्या की ती संपत्ती ते स्वतः कमवुन समाज आणि देशाच्या कार्यासाठी कसे उपयोगात आणू शकतील. ह्याने देश,समाज आणि आपल्या मुलांचाही विकास होईल.

(अ)समाधानी पालक

(अ)समाधानी पालक
काही माणसं ही त्यांच्या पालकपणाने फार गांजून गेलेली असतात. अशी काही माणसं आहेत. ते या स्वरूपाचे प्रश्न विचारतात –

मुलं कधी एकदा मोठी होणार?
कधी एकदा शहाणी होणार? कधी एकदा स्वतंत्र होणार? हे एवढे का भांडतात? किती हे प्रश्न? कधी सुटणार? कधी एकदा मुलांना त्यांचं स्वत:चं कळणार आणि कधी आपण सुटणार, असं त्यांना होऊन गेलेलं असतं.
मुलांचे हट्ट, भांडणं, अंगातली अतिरिक्त ऊर्जा, सततच्या मागण्या- काहीच सहन होत नाही. अशा पालकांना कदाचित मुलं म्हणजे ‘एक आदर्श चित्र’ असावं अशी अपेक्षा असते. असं कधी होतं का?
जसं आदर्श मूल हे भिंग घेऊन शोधावं लागेल तसंच आदर्श पालक हेदेखील शोधावेच लागतील. या दोन्ही गोष्टी अस्तित्वात आहेत की नाही, हेही आपल्याला माहीत नाही.
इतरांची मुलं थोडाच काळ भेटतात. तेव्हा ती चांगलीच वागतात. म्हणून आपलीही मुलं अशीच शहाणी असावीत, अशीच आदर्श असावीत, असं वाटत राहतं. अशा प्रकारे तुलना केल्याने कोणीच शहाणं होत नसतं किंवा परिस्थिती आपोआप सुधारत नसते.
समाधानी होणं हे आपल्याच हातात असतं. पालक असतानाच्या काळातला सर्वात सुंदर काळ कोणता? तर, आजचा क्षण.
मुलं वाढत असताना आता पुढे काय घडेल याचाच विचार करत राहिलो, तर त्या नात्यातली, त्या कामातली मजा कधी घेणार?
बाळांचे आवाज, पहिली पावलं, पहिले शब्द ऐकणं याचा आनंद फार महत्त्वाचा.
शाळेतल्या मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी मनापासून सोडवणं –
या अडचणी वाटून घेणं हा क्षणही किती महत्त्वाचा आहे! मूल किती ‘हुशारीने’ आणि ‘चलाखीने’ हट्ट करत आहे हासुद्धा निरीक्षणाचा भाग असायला हवा. टीन एजमधल्या मुलांबरोबर मोकळेपणाने गप्पा मारणं, हे तसं अवघड; पण जमायला हवं.
आनंदाचा काळ पुढे केव्हा तरी येईल या आशेवर आज त्रास सहन करत आहोत असे विचार काहीच कामाचे नाहीत.
त्यापेक्षा आज आणि आत्ता आनंदी राहाणं आपल्या हातात आहे…

“मुलानेच घेतली बापाची शाळा”

“मुलानेच घेतली बापाची शाळा”

(वयात आलेल्या सगळ्या आई – बाबांसाठी)
– योगेश गोखले

सो S S बाबा chill , असं म्हणून माझ्याच खांद्यावर थोपटून मुलगा बाहेर पडला. मी अजूनही कन्फ्युज्ड आहे.

माझा मुलगा यंदा १०वी ला आहे. तसा बऱ्यापैकी हुशार आहे. आजच सकाळी त्याचा प्रिलिम चा रिझल्ट लागला. आम्ही दोघे उभयता शाळेच्या बोलावण्यावरून पालक मिटिंग ला गेलो होतो. आमच्या मुलाचा रिझल्ट आमच्या कडे दिला (हल्ली मुलांकडे रिझल्ट द्यायला काय प्रॉब्लेम आहे माहित नाही, का मुलं फेरफार करतात , का घरी दाखवतच नाहीत , काय माहित ? पण आजकाल पालकांना बोलावून रिझल्ट द्यायची नवी पद्धत आहे ) आणि मग सगळ्या पालकांची “पेरेंट मिटिंग” झाली. मुलाला ८४% मिळाले होते. (पण हल्ली त्याने काय होतंय?).

क्लास टिचर ने सांगितलं की सगळ्याच मुलांना तसे कमी मार्क मिळाले आहेत. त्यामुळे आता पुढचे दोन महिने सगळ्यांनी माना मोडून , दिवसाचे १८ तास अभ्यास करणे गरजेचे आहे. मुलांनी अभ्यास कसा करावा , पालकांनी काय काळजी घ्यावी , मुलांना आहार काय दयावा, वगैरे वगैरे मार्गदर्शन झालं. मग प्रत्येक विषयाच्या टिचरनी अर्धा तासाचं सेशन घेतलं. प्रत्येकाने सांगितलं की सकाळी २, संध्याकाळी २ असा रोज त्यांच्या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. शेवटी क्लास टिचर ने परत अर्धा तास घेतला. हे ही सांगितलं की आम्ही मुद्दाम प्रिलिम चे पेपर खूप अवघड काढतो आणि तपासतोही खूप स्ट्रीक्ट. मुलांना कमी मार्क पडले की ती अजून अभ्यास करतात . आमच्या शाळेचा रिझल्ट कसा दर वर्षी १००% लागतो वगैरे.

आम्ही टिपिकल ओपन कॅटेगरी मध्यम वर्गीय असल्यामुळे लगेच हे सगळं सिन्सीयरली घेतलं. सौ ने सांगितलं की मी नेहमी त्याला सांगतच असते. तुम्ही जरा ओरडा. बाबांच्या सांगण्याने जरा वजन पडतं.
मी संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर चहा घेतला. चिरंजीव फुटबॉल खेळायला जायच्या तयारीत होते. मीच विषय काढला,

“काय , किती मार्क मिळाले?”

“तुम्हालातर माहित आहेत की”

“अरे पण मग कमी पडले , ८४% नी आजकाल कुठे काय होतं. हवं ते कॉलेज सोड , सायन्स ला पण ऍडमिशन मिळणार नाही. कमीत कमी ९४% तरी पडायला हवेत तर काहीतरी खरं”

तो नुसता हसला. मला त्याच्या या हसण्याची फार चीड येते. ते कुत्सीत च्याही पलीकडचे आहे असं मला वाटतं. स्वाभाविक , मी त्याला जरा मोठ्या आवाजात विचारलं

“काय म्हणतोय मी …हसण्यासारख काय आहे त्यात?”

“नाही बाबा मला गंम्मत वाटते की तुम्ही परस्परच ठरवलं की मी सायन्स ला जाणार आहे… म्हणून हसलो”

मला त्यानी बरोब्बर पकडलं होतं ..पण मी मोठा होतो ना ..त्याच अधिकाराने मी दरडावून सांगितलं

“प्रश्न तो नाही आहे ..आधी ९४% टक्के तर मिळवून दाखव ..मग पुढे काय शिकायचं ते बघू ”

“हा ..ते मिळतील ..९२% – ९४% मिळतील”

“अरे पण कसे ?..तू ८४% वरून ९४% ला कसा जाणार आहेस ? हे खेळणं वगैरे कमी करा आता ..जरा टेस्ट सिरीज लावा ..वेळ लावून पेपर सोडवा”

“बाबा chill ..मिळतील ९२%+”

“अरे गाढवा ते काय वरून पडणार आहेत का ..chill करून चालणार नाही तुला”

“बाबा ..जरा मोबाईल द्या तुमचा”

त्याने माझा मोबाईल घेतला आणि त्याच्या ई-मेल मधून एक excel ओपन करून दाखवली. त्यात त्याच्या शाळेतील गेल्या ३ वर्षातल्या मुलांचा डेटा होता ..प्रत्येकाला पडलेले प्रिलिम चे मार्क आणि फायनल बोर्डाचे मार्क्स. स्पष्ट ट्रेंड होता की ऑन अन एव्हरेज ८ ते १० टक्के वाढतात.

“बाबा तुमच्या पेक्षा आमचं नेटवर्क आणि इंटेलिजन्स जास्त स्ट्रॉंग आहे, शाळा मुद्दामच पेपर अवघड काढते आणि कडक तपासते , जेणे करून मुलांना आणि त्याही पेक्षा पालकांना वाटावं की अजून खूप अभ्यास करायला पाहिजे. हे तुम्हालाही आज शाळेत सांगितलं असेल पण तुम्ही पण तसं काही सांगणार नाही. मला खरंच कळत नाही इतर वेळेस तुम्ही आम्हाला जे trust आणि transparency वर लेक्चर देता ते आमच्या अभ्यासाच्या वेळी कुठे जातं. जर मुलांना रिऍलिस्टीक मार्क दिले तर मुलं काय हुरळून जाणार आहेत का ? उलट चांगले मार्क टिकवायचं टेन्शन जास्त असतं या कॉम्पिटेटिव्ह जगात. आणि प्रत्येकाला वाटतंच ना की मागच्या पेक्षा चांगलं करावं . मग रिऍलिस्टिक मार्क्स दिले तर बिघडलं कुठे ? प्रत्येक विषयाचा जर रोज ४ तास अभ्यास करायचा तर २४ तास अभ्यास झाला. कोणीतरी जरा लॉजिकल सांगायला पाहिजे ना ..मग खरं मोटिवेशन येईल नाहीतर हे सगळं फार डिप्रेसिंग आहे”

“आहो माझं ठीक आहे ..मला खात्री आहे की मी ९२% पर्यंत कसाही जाईन …पण मला काळजी निशित ची आहे. खरं तर तो ८०%-८२% पर्यंत जाईलही. त्याने प्रिलिम ला भरपूर अभ्यास केला होता. मीच त्याला काही गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. पण या अवघड पेपर आणि आतिकडक तपासणीच्या नादात त्याला ६०% मिळाले. गेले २ दिवस डिप्रेस आहे. आता अभ्यासच करणार नाही म्हणतो कारण म्हणे मी काही बाकीच्यांसारखा हुशार नाही ..कितीही अभ्यास केला तरी ६०%. आई -बाबा पण खूप ओरडले त्याला. सहामाही ला ७०% वरून ६०% वर आला. लायकी काढली त्याची.”

“त्याच्या कडेच चाललोय फुटबॉल खेळायला.. हाच आता एक मार्ग आहे की त्याला या डिप्रेशन मधून बाहेर काढून परत अभ्यासाला लावण्याचा..अर्धा तास खेळणार आणि मग त्याच्या नकळत आज सायन्स चं काय वाचलं , काय डोक्यावरून गेलं ..काय कसं लक्षात ठेवलं ह्या गप्पा मारणार, म्हणजे माझी रिव्हिजन आणि त्याची नकळत तयारी…८-१० दिवसात त्याला पेपर सोडवायला लावतो..आमची आळी – मिळी गूप चळी. मीच तपासून रिऍलिस्टिक मार्क देणार. नाही त्याला ८०% + नेला तर नाव दुसरं”

“आणि माझी काळजी करू नका , मी तुम्हाला ९२%+ ची गॅरेंटी देतो. पण त्या पुढच्या २% साठी उगाच माझ्या मागे लागू नका. मी मनापासून प्रयत्न करीन पण त्या ऍडीशनल २% ची काही गॅरंटी नाही आणि उगाच त्या खात्री नसलेल्या गोष्टी साठी मला माझा संध्याकाळचा खेळ , तबल्याचा क्लास , मित्र बंद करायचे नाही आहेत. या जगात मध्यमवर्ग नामोशेष होत चालला आहे. तोच तर एक वर्ग होता ज्याने सगळं बॅलेन्स ठेवलं होतं, इन्कलुडींग सहिष्णुता आणि संस्कृती. ऑल इसम्स आर गुड आदर दॅन एक्सट्रीझम. एक्सट्रीझम दहशदवादाला जन्म देतो. मार्कांचेही तेच झालेय, अतिरेकी मार्क पाहिजेत .. ‘९८%’ नाहीतर मग ‘पास झाला तरी बास’ कॅटेगरी. हा पण एक दहशवादच नाही का ? ८०%-९०% मार्क , खेळ , मित्र , छंद , तबला-गाणं -नाटकं अशी मध्यममार्गी मुलं नकोच आहेत कुणाला. एक तर IIT नाहीतर ITI. खरंच अवघड आहे. अरे TII पण असू शकत ना..

अजूनही माझ्यातला बाप जागा होता. मी त्याला दरडावून विचारले

“तुला काय म्हणायच आहे ..आम्ही दहशदवादी आहोत का ? का आम्ही तुला दहशदवादी करतोय”

तो परत एकदा तसा हसला ..कुत्सित च्या पलीकडचा.

“बाबा प्रश्न माझा नाही आहे , शाळा आणि सुज्ञ पालक त्या निशित ला दहशदवादी करायला निघाले आहेत आणि कोणीतरी, म्हणजे मी, हे थांबवलेच पाहिजे”

“पण बाबा तुम्ही माझी काळजी करू नका – ९२% नक्की मिळवतो …chill”

“चला मी निशित कडे जावून तासाभरात येतो ..आल्यावर मॅथ्स चा पेपर सोडवायचाय”

माझ्याही नकळत मी उठलो आणि बोलून गेलो “मी पण येऊ का फुटबॉल खेळायला ?”

मुलाने येऊन मला खांद्यावर थोपटले .. “बाबा chill ..तुला झेपणार नाही”

“ए आई बाबासाठी एक कप आल्याचा चहा टाक”

तो बाय करून हसत गेला सुद्धा.

तो निशितला ८०% पर्यंत आणायला गेलाय. त्याने ९२% मिळवले आणि निशितला ८०% मिळाले तर माझ्या दृष्टीने ते १००% ठरतील हे नक्की !

गेमिंग

गेमिंग करणार्या मुलांचे पालक भेटले की हमखास म्हणतात आमचा मुलगा/ मुलगी अगदी एडिक्ट झाली आहे..

मुलांच्या अति मोबाईल वापरासाठी किंवा स्क्रीन टाइमसाठी त्यांना दोषी ठरवू नका. त्यांच्या नावाने कटकट करण्याआधी ही सवय कुणी लावली ते आठवून बघा. दोष कुणाला द्यायचाच झाला तर स्वतःला द्यायला हवा. माझी मुलगी/मुलगा मोबाईल एडिक्ट आहे हे वाक्य चूक आहे. हे वाक्य असं वापरून पालक म्हणून आपण स्वतःची सुटका करून घेतो आपल्याही नकळत. काहीवेळा जे म्हणायचंय तेच शब्दप्रयोग आवश्यक आहे. पालक म्हणून आपण सोयीच्या गोष्टी करतो आणि मुलांना व्यसनाधीन म्हणतो. हा त्यांच्यावर अन्याय आहे. बाजारात जाऊन महागडी गॅजेट्स, मोबाईल, टॅब मुलं विकत आणत नाहीत. आपण घेऊन देतो, त्याचं कौतुक असतं आपल्याला, आपल्या आर्थिक क्षमतेचा गर्व, अभिमान आणि काय काय ही असतं. सुप्त मानसिक अवस्थेत. परिणाम मुलांना सवयी लागतात.
दुसरं बऱ्याच पालकांना वाटतं मोबाईल काढून घ्यायचा तर इतर महागडे पर्याय दिले पाहिजेत. तर मुळीच नाही. उलट एक रुपया ही खर्च न करता मुलांना असंख्य गोष्टींमध्ये गुंतवता येऊ शकतं. त्यांना स्वयंपाक घरात मदतीला घ्या. पाटपाणी घ्यायला सांगा. त्यांना कपड्यांच्या घड्या करायला शिकवा. त्यांना भाज्या निवडायला शिकवा. त्यांच्याशी तुम्ही खेळा. घरातल्या आवरा आवरीत मदतीला घ्या. त्यांची खेळणी स्वच्छ करायला, आवरून ठेवायला सांगा.
किंवा काहीही पर्याय देऊ नका.
तुझा तू शोध असं सांगा.
मुलं मोबाईल मिळाला नाही, टिव्हीही मिळाला नाही तर त्यांचे म्हणून पर्याय शोधतात. त्यांना ते कसे शोधायचं हे माहीत असतं. काहीच सापडलं नाही तर इतर मुलांशी जास्तवेळ खेळतात. प्रॉब्लेम आपला म्हणजे पालकांचा असतो. आपल्याला सगळं भरवायला आवडतं. त्यांनी काय करायचं, कसं करायचं, निराळे पर्याय कसे निवडायचे, कुठले निवडायचे सगळं आपण ठरवतो आणि बरहुकूम मुलांना करायला लावतो. त्यापेक्षा पर्याय द्या, त्यांना आवडले तर ठीक नाही आवडले तर त्यांचे त्यांना शोधू द्या..
स्पून फिडिंग बंद करणं ही पालकांसाठी सगळ्यात कठीण गोष्ट असते. कारण त्याचं व्यसन असतं पालकांना.
मुलं एडिक्ट नसतात, पालक असतात, वेगवेगळ्या गोष्टींचे.
एक रुपयाही खर्च न करता, कुठलंही नवं खेळणं विकत न आणता मुलांना मोबाईल पासून दूर नेता येतं… जस्ट थिंक!

मुक्ता चैतन्य

#noscreenday #arunsadhufellowship #socialmedia #noscreenforkids

भांडणं, मारामारी, चुगल्या, तक्रारी. हे सगळं मुलं का करतात?

c&p
एका जागेवर शांतपणो तासन्तास बसून राहिलेलं मूल कोणी पाहिलंय का? मुलं सतत चालत असतात, पळत असतात. दंगा करत असतात. उद्योग-उपद्व्याप करत असतात. अखंड बडबड करतात. कितीतरी मोठय़ा माणसांना या दंग्याचा फार त्रस होत असतो. ऑफिसमधून थकून घरी आलेल्या आईबाबांना हा उत्साहसुद्धा कधीकधी पेलवत नाही. आजी-आजोबांना तर हा प्रकार पेलवतच नाही. घरात दोन मुलं असली की या उद्योग आणि दंग्याच्या जोडीला भांडणं, मारामारी, चुगल्या, तक्रारी आणि दुप्पट दंगा चालतो. त्यामुळे घरची माणसं फारच जिकिरीला येतात. एकदा का मुलं झोपली की घर कसं शांत शांत होतं. वादळ उठेर्पयत सगळे लोक आपापली कामं करून घेतात. विश्रंती घेतात. कधी एकदा ही मुलं मोठी होतात, असं घरातल्यांना होतं. 

मुलं एवढी चळवळी का असतात?
मूल कुठेही असलं तरी शांत बसत नाही. याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं कारण शास्रीय आहे. वयाच्या आठ वर्षार्पयत मुलांच्या मेंदूत एक महत्त्वाची घडामोड होत असते. ही घडामोड त्यांना आयुष्यभर पुरणारी असते. मेंदूच्या डाव्या आणि  उजव्या गोलार्धाना जोडणारा ‘कॉर्पस कलोझम’ नावाचा अवयव असतो. तो अवयव अजून विकसित झालेला नसतो. त्याची वाढ होत असते. वयाच्या साधारणपणो आठव्या वर्षाच्या आतबाहेर ही वाढ ब-यापैकी पूर्ण होते. त्यानंतर मुलांच्या शरीराला हळूहळू स्थिरता यायला लागते. दहा वर्षाच्या आसपास मुलं क्रमाक्रमानं स्थिर होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांनी या वयात शारीरिक दंगा, भरपूर हालचाल केलीच पाहिजे. कारण तसं झालं नाही तर हा अवयव योग्य प्रकारे विकसित होणार नाही. तो विकसित झाला नाही तर पन्नाशी-साठीनंतर त्यांना शरीराचा समतोल साधून चालणं अवघड जाईल. 

अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे निरीक्षण. एवढा दंगा चाललेला असला तरी त्यातही मुलं वस्तू, व्यक्ती, एखादा प्रसंग, खेळ, खेळणी,  एखादी प्रक्रिया, लोकांचं बोलणं याचं संपूर्ण निरीक्षण करत असतात. हा तर संपूर्ण शिक्षणाचा पायाच. दुपटय़ातून बाहेर पडून ज्या क्षणी मूल हालचाल करायला लागतं त्याच क्षणापासून ते सतत, प्रत्येक क्षणी काहीना काही शिकत असतं. आपण म्हणजे मोठय़ांनी न सांगता- सवरता त्याचा मेंदू त्याला आज्ञा देत असतो. त्या आज्ञेनुसार तो कामाची यादी पार पाडत असतो. त्याला आपली मदत होवो किंवा न होवो तो ज्ञान मिळवत राहातो. या काळात तो खरा ज्ञानार्थी असतो. पहिल्या काही वर्षात मुलांच्या शिकण्याचा वेग प्रचंड असतो. कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ ही पाच ज्ञानेंद्रियं अतिशय महत्त्वाची असतात. या ज्ञानेंद्रियांमधून  अनेक प्रकारची माहिती सतत मेंदूकडे पोहोचत असते. या पाचही ज्ञानेंद्रियांतून मूल नित्यनवे अनुभव घेत असतं. हे मूल एखाद्या शहरातलं असो, गावातलं. कोणत्याही आर्थिक स्तरातलं असो- मुलांना या वयात निरीक्षण करायचंच असतं आणि नवीन काहीतरी शिकायचंच असतं. 

मुलांच्या मेंदूची जडणघडण होण्यासाठी

◆ छानसं, आल्हाददायक संगीत ऐकवावं. वाद्यसंगीत, मंद संगीत ऐकवावं. आवाजाकडे लक्ष वेधून घ्यायला हवं. साधेसुधे नैसर्गिक आवाज त्याच्या कानावर पडायला हवेत.

◆ इतर भाषेतली गाणी, इतर भाषेतले शब्द ऐकवावेत. इतर भाषा बोलणारे शेजारी, नातेवाईक असतील तर त्यांना मुलांशी त्यांच्या भाषेतच बोलायला सांगावे. 

 ◆ मुलांशी बोलणारी भरपूर माणसं आसपास असतील तर त्याच्या  भाषाविकासासाठी ते चांगलंच. वेगवेगळी माणसं भेटली की मुलं आनंदी होतात. 

 ◆ मुलांना गोष्टी सांगाव्यात; पण मोबाइल/टॅब/ कॉम्प्युटरवर दाखवू नयेत. स्क्रीन मुळीच दाखवू नये.

◆ कौतुकाचा स्पर्श करणं, सतत बोलणं, गाणी म्हणणं- ऐकवणं, हे आपण अवश्य करावंच. त्यातही विविध भाषेतली गाणी ऐकवली तर जास्त चांगलं. 

◆ पावसाचे थेंब अनुभवणं, फूल- माती- दगड- मांजरासारखे प्राणी असे विविध स्पर्श देणं.

◆ जमतील तेवढे रंग, भरपूर आकार दाखवणं.

◆ मुलांना टेकडीवर, नदी- समुद्रावर,  घराच्या खिडकीत, गच्चीत नेऊन खाली-वर, डावीकडे- उजवीकडे त्यांची नजर जाईल असं करायला पाहिजे. मुला- मुलींची नजर लांबच्या वस्तूंवर जायला लागली की, समोरची टेकडी, ढग, उडणारे पक्षी, झाडावर विसावलेले पक्षी, झाडांवरची फुलं, हलणारी पानं अशा अनेक गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष वेधून घेणं. 

◆ दिवसा आणि रात्रीच्या वेळा दाखवल्या पाहिजेत.

◆ पहिल्या काही वर्षात मूल असं चैतन्यानं रसरसलेलं असतं. चळवळ, दंगा, हालचाली करणं ही त्यांच्यातली शारीरिक प्रेरणा असते. त्यांना थांबवण्यापेक्षा, त्रागा करण्यापेक्षा किंवा चिडचिड करून धपाटे घालण्याऐवजी मुलं असं का करतात, हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीचा काही काळ त्रस होणार आहे ही मनाची तयारी ठेवणंही आवश्यक आहे. तीव्र कुतूहल हीच प्रेरणा या वयातल्या मुलांच्या एकूण वर्तनामागे असते. कितीही झोप आली, दमलं तरी झोपण्याची तयारी नसते. कारण हेच. झोपण्यातला वेळ वाया कसा घालवायचा?

must show to your kids

This is very interesting as u scroll down you go deeper and deeper in the sea… this is really amazing.. Show it to your children, let them learn it.

Scroll down to 10000 ft deep in an ocean 😱

https://neal.fun/deep-sea/

Don’t miss
निळ्या लिंक वर क्लीक करा व खाली खाली या.. आणि समुद्रातील गंमत बघा… मुलांना पण दाखवा..

pune darshan for kids

Puneites NOW get a Golden opportunity to witness a mesmerizing LIGHT AND SOUND SHOW at the NATIONAL WAR MEMORIAL along with a visit to the SOUTHERN COMMAND MUSEUM near Ghorpadi, Pune.

Pune has had a rich warrior culture and has been a home to well known warriors since time immemorial. The city has been blessed with a number of defence establishments of Southern Command in its vicinity. True to its legacy, the associated soldiers have been contributing immensely in various operations of the Nation.

Recently, since 1st November 2019, Headquarters, Dakshin Maharashtra and Goa Sub Area has started organizing a LIGHT AND SOUND SHOW at National War Memorial, Ghorpadi, Pune on EVERY Friday, Saturday and Sunday evening. The show has been conceptualized and implemented as a joint civil military venture.

The show is open for ALL.

It will definitely inculcate national spirit in every Indian citizen. It will be an inspiration, especially for the children and youth and will motivate them to join the armed forces.

What can you expect in the LIGHT AND SOUND SHOW?

45 minutes of scintillating audio visual extravaganza highlighting stellar contribution of the Indian Army from independence till date in the field of operations training, disaster response and nation building.

Apart from the Light and Sound show, you may also plan to experience the wreath laying parade (on Saturdays only) and visit the Museum at the Memorial.

Schedule:

Light and Sound Show:
Every Friday, Saturday, Sunday from 6.45 to 7.30 pm (in winters)

Wreath Laying parade to commemorate sacrifices of valiant men:
Every Saturday from 5.30 pm to 6 pm (in winters).

Museum showcasing History of Indian Army and acts of valour of gallant warriors of the Nation:
Open on all days except Tuesday from 9.30 am to 8 pm.

Charges: Entry tickets to the Museum as well as the show are a nominal rate of Rs. 20/- per head.

Returns are guaranteed to be priceless.

It is an appeal to every proud Indian & Punekar to plan a visit with your families, friends and your near and dear ones to the National War Memorial on one of the coming weekends.

Tourists and visitors should plan so as to include it in their travel itinerary for Pune.

Schools and Colleges can contact Headquarters, Dakshin Maharashtra and Goa Sub Area for assistance for any organized visit of their institution.

सहाव्या वर्षीपासून शिकणे अपेक्षित असलेल्या कौशल्यांसाठी तीन वर्षांच्या मुलांची ‘तयारी’ करवून घेण्याच्या हव्यासाने नुकसानच होते आहे..

‘असर’च्या पूर्वप्राथमिक शिक्षणविषयक अहवालात खासगी, महाग पूर्वप्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांची प्रगती तुलनेने बरी आढळली. त्यामुळे अंगणवाडय़ांचे आपण काय करणार आहोत, हा प्रश्न निर्माण होतो..

नजीकच्या भविष्यात भारतातील पूर्वप्राथमिक शिक्षणाची बाजारपेठ किती आणि कशी फोफावेल, याबद्दलचे भाकीत करणारा ‘असर’ या स्वयंसेवी संस्थेचा यंदाचा अहवाल, शिक्षणाच्या राष्ट्रीय धोरणाच्या अंमलबजावणीचा कसा फज्जा उडाला आहे, याचे दर्शन घडवतो. या संस्थेतर्फे केवळ शैक्षणिक गुणवत्तेशी संबंधित विषयांवरच पाहणी करण्यात येत असली, तरीही नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या अहवालामुळे अनेक नवे मुद्दे पुढे आले आहेत. मागील वर्षी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यात पहिली इयत्तेच्या आधी घेतल्या जाणाऱ्या म्हणजे पूर्वप्राथमिक शिक्षणावर भर देण्यात आला आणि त्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरजही त्यात व्यक्त करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर ‘असर’ या संस्थेने देशातील चोवीस राज्यांतील २६ जिल्ह्य़ांमधील सुमारे ३७ हजार विद्यार्थ्यांची पाहणी केली आणि त्यातून जो निष्कर्ष मिळाला, तो या शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढणाराच आहे. मूल तीन वर्षांचे होताच, त्याला शिशूशाळेत किंवा अंगणवाडीत किंवा ‘मिनी केजी’च्या वर्गात बसवले जाते. गेल्या साडेचार दशकांत देशपातळीवर अंगणवाडी ही संकल्पना फोफावली. केवळ पोषण एवढय़ाच विषयासाठी देशात चालविण्यात येत असलेल्या पंधरा लाखांहून अधिक अंगणवाडय़ा देशातील सहा वर्षांखालील मुलांमध्ये विविध कौशल्ये विकसित करण्यासाठीही झटत असूनही प्रत्यक्षात मुलांच्या हाती फारसे काही लागलेले दिसत नाही, असे या अहवालाचे सांगणे आहे. दुसरीकडे खासगी क्षेत्रातील पूर्वप्राथमिक शिक्षणाची बाजारपेठ प्रचंड प्रमाणात वाढली. केवळ महाराष्ट्रात ही बाजारपेठ सुमारे बाराशे कोटी रुपयांच्या घरातील आहे, यावरून येत्या काळात त्याकडे किती अधिक लक्ष दिले जाईल, हे लक्षात येऊ शकते. बदलती जीवनशैली आणि शिक्षण क्षेत्रातील वाढती स्पर्धा यामुळे मुलाच्या वाढीच्या वयात त्याच्या अंगी जे गुण निर्माण व्हायला हवेत, त्याकडे लक्ष न देता, त्याच्या मेंदूच्या क्षमतेपेक्षा किती तरी अधिक कौशल्यांच्या विकासाचा आग्रह ही पूर्वप्राथमिक शिक्षण व्यवस्था धरते.

अक्षर आणि अंकओळख या मुद्दय़ावर या पाहणीतून जे आढळले, ते खासगी क्षेत्रातील गुणवत्तेची भलामण करणारे आहे. म्हणजे अंगणवाडय़ांमधील ४६.८ टक्के मुलांना अंक-अक्षरओळख आहे. मात्र खासगी संस्थांमधील मुलांमध्ये हेच प्रमाण ७७ टक्के एवढे आहे. एक ते दहा अंक ओळखण्याबाबतही अंगणवाडीतील विद्यार्थ्यांपेक्षा खासगी क्षेत्रातील मुलांची ५४.४ ही टक्केवारी किती तरी अधिक, म्हणजे ८२.७ टक्के आहे. कोणत्या वयात कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यावे, याबाबत केंद्र सरकारने मागील वर्षी एक सर्वसमावेशक अभ्यासक्रम तयार केला होता. त्याची अंमलबजावणी देशातील फार तर तीन-चार राज्यांनी केली. शिक्षण हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असल्याने देशातील अनेक राज्यांनी त्याबाबत पुढाकार घेतला नाही. महाराष्ट्राने तर पूर्वप्राथमिक शाळांच्या अभ्यासक्रमाची रूपरेषा मागील दशकातच जाहीर केली होती. त्याच वेळी पूर्वप्राथमिक शिक्षण हे राज्याच्या अधिकृत शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट करण्याचीही शिफारस करण्यात आली होती. मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही. आजही महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये शिक्षण व्यवस्थेत इयत्ता पहिली हीच पहिली पायरी राहिली आहे. गेल्या काही दशकांत पहिलीच्या आधी शिक्षण देणाऱ्या या समांतर शिक्षण व्यवस्थेशी राज्य सरकारांनी आपला कोणताही संबंध जोडून घेण्याबाबत उत्सुकता दाखवली नाही. याचे खरे कारण पहिली ते पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शिक्षण खात्याकडे असलेले आर्थिक बळ इतके तुटपुंजे असते, की त्यात पूर्वप्राथमिक शिक्षणाचा अधिकचा बोजा स्वीकारणे म्हणजे पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे, अशीच राज्यांची मानसिकता राहिली आहे. केंद्रातील सरकारने २०१४ मध्ये शिक्षणावरील खर्चात मोठय़ा प्रमाणात वाढ करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण होण्याची शक्यता दरवर्षी मावळत चालली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यातही शिक्षणावरील खर्चात बचत करण्याकडेच अधिक कल दिसतो आहे.

सहा वर्षांखालील वयात भाषा, लिपी, अंक यांची ओळख करण्याच्या हट्टापायी मुलांच्या सर्वागीण विकासावर दीर्घकालीन विपरीत परिणाम होऊ शकतो, असे जगभरातील संशोधनाअंती तज्ज्ञांचे मत. याकडे दुर्लक्ष करून शिक्षणातील अतिरेकी स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी मुलांचा मेंदू शिणवण्याचा उद्योग सध्या सर्वत्र सुरू आहे. शिकण्यासाठीचे वय सहावरून तीनपर्यंत कमी होण्याचे हे परिणाम. असरच्या पाहणीत असेही आढळून आले, की अनेक ठिकाणी सहा वर्षांखालील मुले इयत्ता पहिलीत बसवण्यात आली आहेत. त्या मुलांना पहिलीचा अभ्यासक्रम शिकताना साहजिकच अडचणी निर्माण होतात. देशातील सहा वर्षे वयाखालील मुलांच्या जाणून घेण्याच्या आणि शारीरिक हालचालींद्वारे कौशल्ये आत्मसात करण्याच्या प्रक्रियेवरच ‘असर’चा हा अहवाल प्रश्नचिन्ह निर्माण करतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यात पूर्वप्राथमिक शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे देशातील अंगणवाडय़ांच्या संख्येत केवळ भर पडून उपयोग होणार नाही. खासगी क्षेत्राने प्रचंड मोठी गुंतवणूक आरंभल्यामुळे पंचतारांकित म्हणता येईल, अशा बालवाडय़ांचे पेव गेल्या दोन दशकांत फुटले आणि त्याने उच्च मध्यम आणि श्रीमंत वर्गाला आकर्षितही केले. या शाळांमधील सुविधांशी अंगणवाडय़ा कधीच स्पर्धा करू शकणार नाहीत, हे सत्य. परंतु या खासगी बालवाडय़ांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा विकास अन्य व्यवस्थेपेक्षा बरा ठरल्याचेही असरच्याच पाहणीत आढळून आले आहे.

अशिक्षित पालकांनाही आपल्या मुलांनी उत्तम शिक्षण घ्यावे, असे वाटणे, हा बदल अलीकडचा. सुशिक्षित आई-वडील दोघेही नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असल्याने मुलांच्या वाढीकडे लक्ष देता येत नसल्याची खंत प्रारंभी पाळणाघरे आणि नंतर ‘प्ले ग्रुप’, ‘मिनी केजी’, ‘सीनिअर केजी’ या व्यवस्थेद्वारे दूर केली जाते. पहिलीत प्रवेशासाठी मुलाच्या अंगी असलेल्या कौशल्यांचीही पूर्वपरीक्षा घेण्याच्या नव्या पद्धतीमुळे पालकांची आणखीच धांदल उडते. अशा परिस्थितीत मूल तीन वर्षांचे होताच, ते सहा वर्षांचे झाल्यानंतर त्याच्या अंगी आवश्यक असणाऱ्या गुणांचा विकास करण्याची तयारी सुरू होते. या सगळ्या मानसिक ताणाचा परिणाम तीन वर्षांच्या लहानग्यांवरही होणे स्वाभाविक असते. असरचा हा अहवाल नेमक्या याच मुद्दय़ावर बोट ठेवतो. केवळ प्रचंड संख्येने मुले शाळेत प्रवेश घेतात, ही समाधानाची बाब असता कामा नये. त्यापेक्षा या मुलांना मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा अधिक चांगला कसा राहील, याची चिंता करणे अधिक महत्त्वाचे आहे, ही गोष्ट या अहवालामुळे अधोरेखित झाली आहे. वयाच्या सहाव्या वर्षी पहिलीत प्रवेश घेणे आवश्यक असताना देशातील २७.८ टक्के मुले त्यापूर्वीच प्रवेश घेत असल्याचे ‘असर’च्या मागील वर्षांच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. अशा कमी वयाच्या मुलांपैकी केवळ ३७ टक्के मुलेच अक्षर ओळखू शकतात, तर हेच प्रमाण सहा वर्षांवरील मुलांमध्ये ७० टक्के एवढे आहे. याचा अर्थ मुलांना त्यांच्या वयाला आवश्यक असेल, एवढेच शिक्षण देण्याने त्यांची वाढ योग्य पद्धतीने होऊ शकते.

‘असर’च्या पाहणीतून पुढे आलेले मुद्दे या देशाच्या भविष्याची चिंता वाढवणारे तर आहेतच, परंतु शिक्षण व्यवस्थेकडे किती गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे, हेही स्पष्ट करणारे आहेत. हे गांभीर्य नसल्यास, जगातील सर्वाधिक संख्येने युवक असण्याचा फायदा होण्याऐवजी तोटा होण्याची शक्यताच दाट. वेळीच सावध होऊन योग्य ती पावले उचलली नाहीत, तर धडा शिकण्याचे वय निघून गेल्यासारखी धोरणकर्त्यांची अवस्था होईल.