Back to Top

Category: Parents

*बालपण करपवू नका!* – _भाऊसाहेब चासकर_

*बालपण करपवू नका!*
– _भाऊसाहेब चासकर_
राज्यात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीचे वय यंदा सहा वर्षे ठेवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील काही प्रवेश परीक्षांपासून वंचित राहतात किंवा एक वर्ष उशिराने पात्र ठरतात. पहिलीत प्रवेशासाठीचे वय सहा वर्षे केल्याने मुलांचे नुकसान होते. ते पाच वर्षे करावे, असा पवित्रा घेत एका पालकाने याला आव्हान देणारी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. रवींद्र देशपांडे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. ऑनलाइन पिटिशनच्या माध्यमातून ते लोकसहभाग मिळवत आहेत. अनेक पालकांना त्यांचे मुद्दे पटत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा शाळाप्रवेशाचे वय नेमके किती असावे, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला अनेक कंगोरे, आयाम आहेत. त्याची चर्चा व्हायला हवी.

Read more

मुलांसाठी कोडींग – गरज की scam?

मुलांसाठी कोडींग – गरज की scam?
(प्रस्तुत लेख हा प्रत्येक पालकाने, पालक होऊ पाहणाऱ्याने आणि पालकांना ओळखणाऱ्या प्रत्येकाने वाचावा आणि शेयर करावा अशी अपेक्षा आहे, वेळ निघून जाण्याआधी.. का ते लेख वाचल्यावर कळेलच:)
– ©सुमित चव्हाण
आज बबलूचे शेजारी फार अचंबित झाले होते. उच्चभ्रू असे वाटणारे निरनिराळ्या वयाचे परदेशी लोक(ज्यामध्ये पुरुष आणि स्त्री दोघेही होते) बबलूच्या घराबाहेर सकाळीच जमा झाले होते आणि एकमेकांशी लाथ-बुक्क्यांनी मारामारी करत होते. आणि त्यांना थांबवायचं सोडून बबलूचे आईवडील घराच्या अंगणात निवांतपणे चहा पित बसले होते. शेजारच्या काकांनी न राहवून त्यांना विचारलं, ‘हे काय चाललंय तरी काय?’
बबलूची आई सांगू लागली, “आमच्या बबलूने ट्रेन मध्ये मिळणारं ‘एकवीस दिवसात डॉक्टर बना’ पुस्तक वाचलं, कोरोनाची लस बनवली, आणि आता त्याच्या लशीमध्ये गुंतवणूक करायला दुनियाभरचे आरोग्य विभागाचे अधिकारी आले आहेत.”

Read more

जरा कळ काढा

मुलांना शिकवण्याची एवढी घाई कशाला? लोकमतमध्ये आज प्रसिद्ध झालेला लेख.

जरा कळ काढा!
-भाऊसाहेब चासकर

काही काळ शिक्षणाची प्रक्रिया कदाचित बंद पडणार या भीतीने जो तो या ना त्या मार्गाने मुलांच्या डोक्यात शहाणपण ओतायच्या मागे नुसता धावत सुटलाय.काहीही करून मुलांना शिक्षण ‘भरवायची’ ही इतकी घाई कशाला?

कोरोना विषाणूने सर्वच क्षेत्रात अनिश्चितता निर्माण करून ठेवली आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकांमधला गोंधळ दिवसेंदिवस वाढतो आहे. नेहमीप्रमाणो 15 जूनला शाळा सुरू होणार नाहीत, हे जवळजवळ स्पष्ट झालंय. मग शाळा कधी सुरू होतील? कुठल्या, किती शाळा सुरू होतील? मुलं शाळेत येतील का? किती येतील? असे अनेक प्रश्न आहेत. कोरोनामुळे शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शासन यंत्रणा यांच्यात एकमत होणं कठीण दिसतंय. गेले अडीच महिने झालेत मुलं घरात आहेत. त्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्यातल्या ऊर्जेलाही विधायक वळण कसं द्यायचं हा एक मोठाच प्रश्न आहे.
आणि काही काळ शिक्षणाची प्रक्रिया कदाचित बंद पडणार या भीतीने जो तो या ना त्या मार्गाने मुलांच्या डोक्यात शहाणपण ओतायच्या मागे नुसता धावत सुटलाय.

गेल्या अडीच महिन्यांपासून घरबंद असल्यामुळे जीव गुदमरलेल्या मुलांसाठी ऑनलाईन लेक्चर्स ठेवली जाताहेत. आधीच अवघड जाणाऱ्या गणित विषयातली कठीण उदाहरणं सोडवायला सांगितली जाताहेत. भलीमोठाली होमवर्क दिले जाताहेत. नामांकित शाळांचे सध्याच्या शाळाबंद शिक्षणात असे प्रयोग सुरू आहेत. आणि पालकही हे अत्यंत कौतुकाने सांगताहेत. म्हणजे पालकांनाही मुलांना गुंतवून ठेवणारे हे प्रयोग आवडत असले पाहिजेत. किंबहुना काहीही करुन मुलांना शिकवून सोडायचा पालकाग्रहच असतो. लहान मुलांवर केली जाणारी ही शिक्षणाभ्यास सक्ती मला अमानुष आणि हिंसक कृती वाटते. मुलं दुबळी असतात, त्यांना आवाज नसतो. ती विरोध करू शकत नाहीत. लहान मुलांच्या मनावर याचे आघात होत नसतील? याचा विचार करायला फुरसत आहे कोणाकडे?

मुलांचं हित, किंवा भलंबुरं केवळ आम्हाला कळतं, अशी पालकांची मनोभूमिका मुलांच्या वाढ-विकासासाठी अत्यंत घातक आहे. तशीही भारतातल्या मुलांना जन्मत: पी.सी.(पेरेंटल कस्टडी) मिळालेली असतेच. खरं म्हणजे पृथ्वीवर हयात असलेल्या मानवी समुदायाच्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी अत्यंत खडतर आपत्ती आलीय. मुलं त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात कठोर काळामधून जात आहेत. तेव्हा संस्थाचालक आणि पालकांनो, जरा धीर धरा, कळ काढा. या ऑनलाईनमुळे शालेय शिक्षणाचा आभास निर्माण करता येईल. मात्र शिक्षण घडेलच असं अजिबात नाही!

स्वस्थ, आनंदी मन म्हणजेच भावनिक, मानसिक सुरक्षितता ही शिक्षणासाठीची पूर्वअट असते. खेळ नाही, मित्रांच्या गाठीभेटी नाहीत, कोविडची भीती मनात रुतून बसलीय. स्क्रीन टाईम वाढल्यामुळे मनात एका अस्वस्थेने घर केले आहे. आनंदी वृत्तीचा निर्देशांक घसरलाय. कोविडग्लानी आल्याने मरगळलेल्या दुष्टचक्रात डिजिटल माध्यमामधून शिक्षण कसं होईल? मुख्य म्हणजे शिक्षण ही आनंददायी आणि अर्थपूर्ण कृती असते, तशी असली पाहिजे. यासाठी शाळा भरायला हवी, शिक्षक-विद्यार्थी प्रत्यक्ष भेट व्हायला हवी. म्हणूनच सध्या जे काही सुरू आहे, त्याचं घाईघाईने स्वागत करायची भूमिका घेऊ नका. थोडी कळ काढा, एवढंच सुचवायचं आहे.

पालकांनो, सध्या एवढंच करा!

* अडीच महिने झालेत मुलं घरात आहेत. ग्रामीण भागातली मुलं घराबाहेर तरी पडू शकतात. शहरांतल्या मुलांना ही मुभा नाहीये. घरात कोंडल्यामुळं गुदमरलेल्या मुलांनाही मोकळा श्वास घ्यायचाय. त्रासात आणि ताणात असलेल्या मुलांना मस्त हुंदडायचंय, मनसोक्त खेळायचंय. मुलांमधल्या प्रचंड उर्जेला वळण देता येत नसल्यानं मुलं आणि पालक अशा दोघांचीही मोठी गोची झालीय. या काळात कमाल संयम ठेवायला लागेल.

* टाळेबंदी हळूहळू शिथिल होतेय. शहरी पालक कामावर जाऊ लागलेत. पाळणाघरं बंद आहेत. नोकरी वाचवायची आहे आणि मुलांचंही बघायचंय, अशा कात्रीत सापडलेल्या पालकांच्या जीवाची घालमेल साहजिक आहे. यातून शाळा सुरू करा, असा आग्रह सुरू होतो. पण परिस्थिती निवळून शाळा सुरू होण्याची वाट बघायला हवी.

* मोठ्यांच्या मनात मोठी भीती आहे. लहान मुलांना सांगता येत नसलं तरी त्यांच्या मनाला कोविडजन्य भीती कुरतडत असणार. अशा वेळेस मुलांसोबत सतत बोलत राहायला हवं.

* मुलांचं मन कशात तरी गुंतवून, त्यांना सक्रीय ठेवायला हवं. वाचन, भाषिक खेळ, गप्पागोष्टी, मातीकाम, कागदकाम, चिकटवही, कात्रणवही, कोलाज, चित्र, गायन, वादन, नृत्य यांसारख्या अन्य पर्यायांचा विचार करता येईल.

* केवळ आदेश, उपदेश करणं शक्यतो टाळावं. मुलांनी वाचावं, असं वाटत असल्…

घरच्या घरी (भाग चार)

घरच्या घरी (भाग चार)

– वर्षा सहस्रबुद्धे
Varsha Sahasrabuddhe

(ही लेखमाला द फर्स्ट थ्री इंस्टीट्यूट फॉर चाईल्ड डेव्हलपमेंट यांच्या फेसबुक पेजवर प्रसारित केली जात आहे. जून २०२०)

“मी ना… बाबाच्या मदतीनी भिंतीचं कोळिष्टक काढलं. मला वाटलं ते सोप्पं असेल! …तर…आधी मी ते काढताना भिंतीलाच चिकटलं. मग मी काढायचा प्रयत्न केला तर ते अजूनच चिकटलं.” पूर्वी चौथीच्या बालभारतीत ‘मला माझ्या आईचा अभिमान वाटतो’ हा पाठ होता. त्याला जोडून, मुलांना घरी कोणतंही श्रमाचं काम करून त्याविषयी लिहून आणायला सांगितलं होतं. अंकितानी कोळिष्टक काढायचं काम केलं होतं. इतर मुलांपैकी कोणी स्वतःचं ताट घासलं होतं, कोणी केर काढला होता, कोणी स्वतःचे कपडे धुतले होते, कोणी ते झटकून वाळत घालायला शिकलं होतं.

सहजपणे दिनक्रमातली कामं करणारी गावांमधली, पाड्यांवरची, शहरी वस्त्यांमधली कितीतरी मुलं मला कामाच्या निमित्तानं भेटली आहेत. आपली कामं आपापली करायची असतात हे शहरी मध्यमवर्गातल्या मुलांनाही सहज शिकायला मिळेल अशी संधी या घरातल्या काळात आपसूकच निर्माण झाली आहे!

मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय घरांमध्ये रोजची बरीचशी कामं दुसऱ्याकडून करून घेतली जातात. भांडीवाल्या मावशी, केर काढणाऱ्या मावशी, स्वयंपाकाला येणाऱ्या काकू, जिना पुसणाऱ्या काकू, गाडी पुसून देणारे काका, कचरा नेणारे दादा अशा कितीतरी व्यक्ती आपला रोजचा दिवस सुंदर करत असतात.

आपण वापरतो त्या वस्तू, जागा स्वच्छ आणि नीटनेटक्या ठेवण्यासाठी आपणच काम करण्यातून एक प्रकारचं समाधान मिळतं. त्याचा अनुभव आपणही घ्यायला हवा आणि मुलांनाही मिळायला हवा. श्रमाची कामं करण्यातून शरीर-मनाला येणारा तजेला आणि नम्रपणाची, कृतज्ञतेची भावना ही नुसती वर्णन करून समजणारी गोष्टच नाही! ती प्रत्यक्ष अनुभवण्याचीच गोष्ट आहे!

बालवाडी आणि पहिलीच्या वयोगटासाठी:

आपापला कप, पाणी प्यायचं भांडं, ताट-वाटी धुवून ठेवायला मुलांना आवडतं. सुरुवातीला कदाचित थोडी सांडलवंड होईलही, पण तो अवकाश मुलांना द्यायला हवा. काहीही शिकताना आपलं काय चुकलं, काय दुरुस्त करयला हवं, काय बदलायला हवं हे आपलं आपण हेरता येणं, हा शिकण्याच्या कौशल्यामधला महत्त्वाचा भाग असतो. सांडलं, तर ते पुसून घायला हवं हे मुलांना समजेल आणि पुसून घ्यायलाही मुलांना आवडेल!
सगळ्यांनीच आपापली ताट-वाटी घासून टाकली तर भांडी घासणाऱ्याचं काम किती हलकं होऊन जातं!

घासलेली कोणती भांडी घरात कुठे ठेवायची असतात, हे मुलांनी आधी नक्की पाहिलेलं असणार. भांडी अडगवायला, जागेवर लावायला मुलांना मदतीला घ्या. वर्गीकरण आणि व्यवस्था लावण्याचं आणि रोज नेमानं काही काम करण्याचं हे कौशल्य पुढे अनेक प्रसंगी खूप उपयोगी पडणारं आहे.
पुढे मावशी यायला लागल्यावरही आपापलं ताट-वाटी धुण्याचा प्रघात जरूर चालूच ठेवा.

फरशी पुसायला या वयाच्या मुलांना अपार आवडतं! सुरुवात गॅलरी पुसण्यापासून करायची. फडकं पाण्यात बुचकळून ते हातानी पिळताना मुलांना थोडी मदत करा. एक टोक आपण आणि दुसरं टोक मुलानी धरून पिळताना, आणखी घट्ट पिळताना खरंच धमाल येते! फडक्यात पाणी थोडं जास्त झालं तरी, गॅलरी ते सामावून घेऊ शकते! काही दिवस गॅलरीत पुसापूस करून जरा हात बसला, की खोल्या पुसायला द्या.

कोणतंच काम “तू फरशी पूस” “तू भांडी घास” या पद्धतीनं करायला गेलं, तर त्यातली मजा निघून जाईल. “आपण … करूया” ही या वयाला लागू पडणारी कळीची भाषा आहे. मुलानं हट्ट करून ‘मी करते, मी करतो’ म्हटलं, तर मात्र जरूर त्याला एकट्याला ते करू द्या. एखादी छोटीशी गोष्ट जबाबदारीनं करण्यातून येणारा आत्मविश्वास कायम मुलांपाशी राहतो.

कपडे झटकायला मुलांना हाक मारा. उडणारे तुषार, सुरकुत्या जाऊन कपडा ताठ होतो, याकडे मुलांचं लक्ष वेधा. साडीसारखा लांबलचक कपडा वाळत घालताना कशा घड्या करून वाळत घालतात हे दाखवा. आणि अर्थातच वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालताना, ते जागेवर ठेवताना त्यांना मदतीला बोलवा.

दुसरी ते चौथीच्या वयोगटासाठी:

केर काढताना मुलांना मदतीला बोलवा. झाडू कसा धरायचा, केर न उडवता कसा गोळा करत न्यायचा, सुपलीमध्ये भरताना सुपली कशी धरायची याकडे मुलांचं लक्ष वेधा.

कचरा कमीतकमी तयार व्हावा, यासाठी, कायकाय पुन्हा वापरण्यासारखं आहे याबद्दल मुलांशी बोला. याविषयी बोलताना, तुमच्याकडच्या त्या दिवशीच्या विशिष्ट कचऱ्यातल्या वस्तूंविषयी त्यांना जे सुचेल त्याची दखल घ्या. त्या वस्तू स्वच्छ करून बाजूला ठेवा.

एरवी कपडे यंत्रात धुतले जात असतील, तर आपापले कपडे हातानी चोळून, ब्रशनी घासून धुवायचा अनुभव मुलांना घेऊदे. कुटुंबाच्या आठवड्याच…

‘मार्क’म्हणजेच गुणवत्ता नाही!

‘मार्क’म्हणजेच गुणवत्ता नाही!

डॉ. अरुण नाईक, (मानसोपचारतज्ञ)

नुकतीच एक बातमी वाचली….
नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी तिने आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही. पण मुलगी संपली.

मागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने शेवटच्या वर्षाला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले, म्हणून आत्महत्या केली होती. माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला घाबरतो.

एका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की, “सर्वजण त्यांना काय म्हणतात?”
मुले म्हणाली, की ‘स्कॉलर’.
मी विचारले ‘का?’,
मुले म्हणाली, “कारण आम्हाला चांगले मार्क मिळतात.”
मी समीकरण मांडले.

Read more

खत

मुलांना वाया जाऊ द्यायचे नाही ना..
मग दोन मिनिटे वेळ काढून वाचाचं..🙏🏽

शेजारच्या दोन घरांमध्ये दोघे राहत होते. एका घरामध्ये एक आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये अति श्रीमंत डॉक्टर ! घरच्या अंगणात शोभेची झाडं दोघांनी लावली होती. डॉक्टर आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत.

हळूहळू दोघांकडे असलेली झाडे वाढत होती. मात्र डॉक्टर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं मात्र टुमदार, छान असली तरी अंग धरून होती.

एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी बागेचं नेमकं काय घडलय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून डॉक्टरला धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती. डॉक्टर विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून डॉक्टरने आजोबांना याचे कारण विचारले.

त्या आजोबांचे उत्तर डोळ्यात अंजन घालणारे होते !!

आजोबा म्हणाले “तुम्ही झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गरजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. तुमच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत.”

Note : आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते.. जितके जास्त जपाल,जितक्या जास्त सुविधा द्याल,तितके मुलांना कमकुवत कराल. निसर्गाने प्रत्येकाला लढण्याची शक्ती दिलेली असते. ती खच्ची करू नका. उलट थोडेफार ऊन वारा पाऊस त्याला सोसू द्या ! तरच तो मजबूत बनेल. मग जीवनात कितीही वादळे आली तरी तो पालकांच्या (खत पाण्यावर) म्हणजेच भरोशावर जगणार नाही !
हेच खरे पालकत्व आहे !!!!

बाप माझा कधी जगलाच नाही

बाप माझा कधी जगलाच नाही

जन्माला घातलं पण बालपण आईच्या कुशीत गेलं,
बापाला वाटूनही झोपताना कधी कुशीत घेता आलं नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही…

शाळेत पाठवून कर्तव्य केलं,आईनेच मग पुढचं कर्तव्य पार पाडलं,
कामाच्या ओझ्याखाली ईच्छा असूनही अभ्यास कधी घेता आला नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही..

प्रत्येक आनंदाला आईचे हास्य पाहून हसलो आणि दुःखाला अश्रू पाहून रडलो,
पण माझ्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःचा आनंद विसरून गेलेला बाप मला कधी दिसला नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही

माझ्या आजारपणात आई कायम जवळ बसून रडत होती तिला मी विसरू शकलो नाही,
पण बाहेर डॉक्टर ला भेटून उपचारासाठी खस्ता खाणारा बाप मला कधी दिसलाच नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही..

नोकरीसाठी आईने केलेली प्रार्थना बघून हळवा झालो,
पण बापाने चार ठिकाणी टाकलेल्या शब्दाची किंमत कधी कळलीच नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही..

लग्न लावून सुखाने संसार करा म्हणणाऱ्या आईचे प्रेम आटलेले कधीच जाणवले नाही,
पण डोळ्यात सुख आणि आनंदाच्या पाणावलेल्या कडा जपून खर्चाचे हफ्ते भरणारा बाप कधी दिसलाच नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही..

मोठा असूनही आयुष्यभर आईच्या मायेने लहान असलेला मी,
मृत्यू झाल्यावर अर्धी संपत्ती नावावर करून गेलेला बाप मला कधी कळलाच नाही,
खरंच बाप माझा कधी जगलाच नाही..

कोणी लिहले माहीत नाही
पण खूप अर्थपूर्ण लिहले आहे.

आपल्या मुलांचं चांगलं व्हावं, असंच प्रत्येकाला वाटत असतं. तर मग भाषा का अशी?

मेंदूशी मैत्री
शब्दांच्या नकारात्मक जोडण्या

काही घरांत मुलांना उद्देशून बरेचदा तुच्छ उद्गार ऐकू येतात. ‘तो हा असाच आहे मठ्ठ’, ‘तिला दोन वेळा समजून सांग, म्हणजे एकदा तरी कळेल’ , ‘किती मंद आहेस तू!’ असं बोलणं मुलांच्या कानावर सतत पडत असतं. हे खूपच साधेसुधे उद्गार इथे लिहिले आहेत. प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी पटींनी वाईट दूषणं, काही वेळा शिव्या आणि सोबत हाताचा वापरही चालतो. यामुळे वाढत्या वयातल्या मुलां-मुलींच्या मनात ‘आपले पालक जसे म्हणतात, तसाच मी असणार’, यावर विश्वास बसतो. कारण मुलांचं आईबाबांवर अतिशय प्रेम असतं. क्षणिक संतापातून उद्गारलेल्या शब्दातून त्यांच्या मनात केवढी खळबळ माजत असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही.
लहान मुलांच्या मनात तर ‘आई / बाबा म्हणतात म्हणून आपण चांगले’/ ‘ते वाईट म्हणतात म्हणून आपण वाईट’ हे पक्कं होऊन बसतं. या संवादातून, प्रसंगातून त्यांचं मन घडत असतं.

मुलांच्या मनात स्वत:विषयीची प्रतिमा तयार होत असते. आत्मविश्वास निर्माण होण्याचा तो काळ असतो. आपण जसे आहोत, तसे खूप चांगलेच आहोत, याबद्दल त्यांच्या मनात काही दुमत नसतं. स्व-प्रतिमा दृढ होण्याचा हा काळ असतो. अशा वेळी दुसऱ्यांमधले दोष वास्तविक पद्धतीने सांगायला हवेत. अतिगोड किंवा अतिवाईट नव्हे; तर योग्य शब्दात सांगण्याची गरज असते. त्यांना न खचवताही हे काम आई-बाबा चांगल्या पद्धतीने करू शकतात. अभ्यासामुळे तर नात्यात दरी पडायलाच नको; किंवा आधीच दरी निर्माण झाली असेल तर ती रुंदावायला नकोच नको. शिक्षण हे महत्त्वाचं आहेच. शिक्षणाला नाकारून किंवा कमी महत्त्व देऊन चालण्यासारखं नाही. पण अडचणी समजून घ्यायला घेणंही तितकंच गरजेचं आहे. मुलांच्या मेंदूत न्युरॉन्समध्ये नकारात्मक शब्दांच्या जोडण्या तयार करण्याचं काम आसपासच्या माणसांकडून होत असतं. ते व्हायला नको.
आईबाबा जेव्हा शांतपणे, योग्य शब्दात मुलांशी प्रेमाने संवाद साधतात, तेव्हा ऑक्सिटोसिनच्या प्रभावामुळे मुलांच्या मनात आईबाबांबद्दल विश्वास निर्माण होतो. मुलं त्यांच्या सूचनांचा नक्कीच विचार करतात. स्वत:मध्ये असलेल्या त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण वाईट शब्दांचा सतत भडिमार केला तर त्यांना योग्य मार्ग सापडत तर नाहीच. उलट मानसिक गोंधळ मात्र वाढतो.

POEM

I found this beautiful so am sharing 😊

My Child.

My child isn’t my easel to paint,

Nor my diamond to polish!

My child isn’t my trophy to flaunt,

Nor my dummy to taunt!

My child isn’t my badge or my honour,

Nor my respect that he/she must protect!

My child isn’t an idea or a fantasy,

Nor my reflection or legacy!

My child isn’t my puppet or my project,

Nor my pawn or my cadet!

My child is here to fumble & stumble

To get in & out of trouble!

My child is here to try,

To fall & to cry!

My child is here to unravel the mysteries,

To educate oneself & rewrite histories!

My child is here to make his/her own choices,

To exercise his/her freewill & experience the consequences!

As a Parent,
My task is to make my child able & capable,

To keep aside my ego & be by his/her side!

My task is to guide & educate,

To let be & not frustrate!
My task is allow him/her to ponder,

And see my child grow into a Wonder!

This poem is for all parents