Back to Top

Tag Archives: वाचन कट्टा

उगवतीचे रंग

उगवतीचे रंग

‘ तेच ते…’

बऱ्याच रसिकांना कविवर्य विंदा करंदीकर यांची ‘ तेच ते…’ ही कविता माहिती असेल. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा विंदा चाळीसगावला आले होते. त्यावेळी प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ही कविता ऐकण्याचा योग आला होता. त्यावेळी मी लहान असल्याने त्या कवितेतला गहन अर्थ कळला नव्हता. पण आपल्या जीवनात त्याच त्या असलेल्या गोष्टी सारख्या कराव्या लागत असल्याने येणारा वैताग मात्र बालसुलभ मनाला कळला होता. आज विंदा असते तर अजून भरपूर विषय त्यांना या कवितेत भर घालायला मिळाले असते. Continue Reading

अढी…

अढी…

 

आईचं दिवसकार्य झालं आणि नातेवाईकांनी घरचा रस्ता धरला. उषानेही आपले कपडे बॅगेत भरायला सुरूवात केली.
रत्ना, तिची वहिनी म्हणाली, “उषा, तू पण लगेच निघणार? राहिली असतीस जरा…” पण दोघींनाही त्यातला पोकळपणा माहित होता.
आई असतानाही उषा क्वचितच माहेरी रहायला आली होती. आई दवाखान्यात अ‍ॅडमिट असताना, तिने कर्तव्य म्हणून सगळं केलं, पण आपल्या घरून येऊन – जाऊन. तिचा नवरा, महेशही सकाळी म्हणाला, “तुला रहायचं असेल तर माझी काही हरकत नाही. मी आणि आई दोघे जातो. तू तुझ्या मनाप्रमाणे ठरव.” पण उषा बॅग भरून त्यांच्याबरोबर निघालीच Continue Reading

मैत्री

त्याची अन् तीची सोशल मिडीयावर ओळख झाली. चॅटिंग करता करता गहिरी मैत्री झाली. दोघांनी ही वेळोवेळी मैत्री नितळ राहण्यावर भर दिला. नात्यातले पावित्र्य हाच त्यांच्या मैत्री चा आधार बनला.

एक दिवस दोघे भेटले अन चित्रपट पहायला गेले. चित्रपटातील आईचा संघर्ष अन वेदना बघून तो विव्हळ झाला. त्याचे संवेदनशील मन भरून आले. तिच्या नजरेने हे हेरले. अन् तीने हलकेच त्याला थोपटले.
तो तीच्या खांद्यावर डोके ठेउन अश्रुवला अन् तीनेही त्याचे सांत्वन केले. तो गेला स्वतःच्या गावी अन् sms केला कि काल तू मला आईचे वात्सल्य दिले. Thanks mom . ती गहिवरली. Continue Reading

रामराम

रामराम

रामराम ही अभिवादनाची पुरातन रीत आहे. खेड्यापाड्यांत अजूनही रामराम करणारी अनेक मंडळी आढळतात. प्रत्येक प्रहराला बदलते अभिवादन ही इंग्लिश लोकांची रीत आहे. गुड मॉर्निंग ते गुडनाईट असा हा त्यांचा सदिच्छा प्रवास असतो.

महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक श्री. अरविंद इनामदार प्रत्येक वेळी रामराम म्हणतात. गेल्या वीस वर्षात त्यांच्या मुखातून अभिवादनाचा अन्य कोणता शब्द त्यांनी उधारल्याचे माझ्या ऐकिवात नाही.

कुसुमाग्रजांच्या तोंडून अगदी अभावितपणे बाहेर पडणारा श्रीराम हा स्वगत उद्गार आणि अरविंद इनामदारांचा, रामराम ही वाणीभूषणे होत.

तुकाराम महाराजांनी एका अभंगात लोकांचा निरोप घेताना म्हटले होते, आम्ही जातो आमच्या गावा। आमचा राम राम घ्यावा।। Continue Reading

” साऊ “

!! ” साऊ “…!!

पत्र लिहिणे हे आजकाल आपण सारेच विसरत चाललोय. मात्र कधीकाळी पत्र हेच संपर्काचे व सानिध्याचेही माध्यम होते आपल्या समाजात. एक वेळ अशीही होती की , वर्षानुवर्षे पती पत्नी बोलतही नसत की एकमेकांचा हात इतरासमोर हाती देखील घेऊ शकत नसत. अशावेळी पत्र लिहून एकमेकांना आपल्या भावना पोचवल्य जायच्या . ते पण कधी तर दोघांपैकी कुणी एक परगावी जाई तेव्हाच . सावित्री – जोतीराव यांचे सहजीवन एका संपूर्ण पुस्तकाचाच विषय आहे.या सहजीवनात देखील एक बाब आहे की , त्या काळात सावित्रीने जोतीरावांना पत्र लिहिली आहेत. पण उपलब्ध असणारी तीन पत्रे हा खरेतर त्या दोघांच्या सहजीवनाचा कसलाही विषय नसून समाजातील विविध घडामोडींची माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिली गेली आहेत. इतके ” समाजमय गुंतणे ” सावित्री जोतीरावांनी त्यांच्या जीवनात अवलंबले होते. सावित्रीची तीन पत्रे काही वेगळ्या मुल्यमापनातून पाहण्याची गरज आहे.,,.पाहूया. Continue Reading

आनंद लांबणीवर टाकणारी माणसं “

” आनंद लांबणीवर टाकणारी माणसं ”
✍️
बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला.
दारात शिवराम.
शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.

‘साहेब, जरा काम होतं.’

‘पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?’

‘नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.’

‘अरे व्वा ! या आत या.’

आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता. Continue Reading

“समाधानाचे पेढे”

परिक्षा व निकाल, तणावाचं वातावरण, मुलांपेक्षा आई बापालाच टेंशन जास्त. पण एवढ्यात क्लास, इंटर्नल मार्कस् मुळे गुणांची टक्केवारी वधारली असली तरी सर्वांच्या चांगल्या गुणांमुळे पुढील प्रवेशांसाठी स्पर्धा ही वाढली आहे व हे पालकांसाठी एक अजून टेंशन देणारं होत आहे. आता ही ‘कहानी घर घर की’ झाली आहे. पण यात ही आनंद आहेच. याच आनंदाचा नमुना, घरातील प्रेमाचा उमाळा, निर्मळ आनंद, यांचा प्रत्यय आज सामायिक करीत असलेल्या कथेत वाचायला मिळतो. ज्यांच्या घरात दहावी, बारावी होती त्यांनी ही अनुभवला असेलच.

–🌼–
“समाधानाचे पेढे”

लेखक – योगिया

या वर्षी आमच्याकडे एकाची १०वी आणि दुसऱ्याची १२वी आहे. १२ वी वाला HSC ला आणि १०वी वाला CBSE ला. १२ वीचा रिझल्ट लागून आता त्याच्या JEE, CET आणि बाकी इंजिनिअरिंग कॉलेज च्या एंट्रन्स चालू आहेत. Continue Reading

आपुला संवाद आपणासी

आपुला संवाद आपणासी

आत्मसंवाद कसा कराल

लेखक: शाड हेल्मस्टेटर

अनुवाद: रोहिणी पेठे

मूल्य: २२५₹ टपाल ३५₹ एकूण २६०₹

तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणणारी आणि आयुष्य जगण्याचे नियंत्रण पुन्हा तुमच्या हातात देणारी आत्मसंवादाची साधीसोपी पण महत्वाची तंत्रं Continue Reading

“सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण”

“सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण”

 

“काकू, जयेश आहे का घरी?”
“कोण रे?”
“मी हर्षवर्धन. जयेश आणि मी कॉलेजमध्ये एकाच वर्गात आहोत. काल दसऱ्याची सुट्टी होती, त्यामुळे आमच्या प्रोजेक्ट चं प्रिंटिंग राहिलंय. मी तीच हार्डडिस्क घ्यायला आलो होतो.”
“ये ना आत. पहिल्यांदाच आलास ना आमच्या घरी? जयेश पूजेला बसलाय. दहा-पंधरा मिनिटात होईलच त्याची पूजा.”
हर्षवर्धन बैठकीच्या खोलीत बसला. साधं पण स्वच्छ आणि अतिशय टापटीप असलेलं ते घर होतं. कसलीही महागडी सजावट नव्हती. देशोदेशीच्या आकर्षक वस्तूंनी भरलेल्या शोकेस नव्हत्या. चकचकाट नव्हता. त्या साधेपणाचा विचार करता करताच त्याचे डोळे दाराच्या उंबऱ्यापाशी खिळले. उंबऱ्यावर सुबक रांगोळी काढली होती. दाराला छान ‘खऱ्या’ फुलांचं तोरण होतं. तो खुर्चीतून उठला आणि जवळ जाऊन पाहू लागला, तोच जयेशची आई आली Continue Reading