Back to Top

Author Archives: swarda

माइंडफुलनेसचा उगम

माइंडफुलनेसचा उगम

माइंडफुलनेस हा शब्द, पाली भाषेतील सति आणि संस्कृतमधील स्मृति या शब्दासाठी इंग्रजीत वापरला जातो. गौतम बुद्धाने महासतिपट्टणसुत्त सांगितले आहे. विपश्यना शिबिरात गोएंका गुरुजी ते समजून सांगत. असेच विपश्यना सदृश ध्यानाचे शिबीर अमेरिकेत डॉ. जॉन काबात-झिन्न यांनी सत्तरच्या दशकात केले. त्यामुळे त्यांची तणावामुळे असलेली पाठदुखी बरी झाली. त्यानंतर त्यांनी या तंत्राचा लाभ रुग्णांना करून देण्यासाठी त्याला काही योगासनांची जोड देत ‘माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन’

Read more

फुलपाखरू जन्माची गाथा

फुलपाखरू जन्माची गाथा

इतर सर्व सजीवांपेक्षा फुलपाखरू जन्माची गाथा ही थोडी निराळीच म्हणावी लागेल. कारण फुलपाखराचा जन्म हा नुसता जन्म नसून ते अवस्थांतर किंवा स्थित्यंतर आहे. अंडी- अळी- कोष- फुलपाखरू अशा विविध अवस्थांमधून जाणारं हे अवस्थांतर! फुलपाखराची मादी खाद्य वनस्पतीवर अंडी घालते, मग या अंडय़ांमधून अळी बाहेर पडते.

नवजात बाळाकरिता आईचं दूध हे जसं प्रथम अन्न म्हणून समजलं जातं त्याचप्रमाणे फुलपाखराच्या अंडय़ांची टरफलं हे त्या फुलपाखराच्या अळीचं प्रथम अन्न होय. फुलपाखराच्या जीवनक्रमातील अळी ही एकमेव अशी अवस्था आहे, की ज्या अवस्थेमध्ये ‘तोंड’ असतं. म्हणूनच मग अळी त्या खाद्य वनस्पतीची पानं खायला सुरुवात करते. प्रचंड वेगाने पानांचा फडशा पाडत असते. पुढील सर्व आयुष्याला पुरेल एवढी शक्ती व सुदृढ शरीराची काळजी तिला याच अवस्थेत घ्यायची असते. झाडाची पानं खात असताना बाहेर पडणारी फुलपाखराच्या अळीची विष्ठा हे एक उच्च दर्जाचं नैसर्गिक खत म्हणून गणलं जातं. या अवस्थेत अळीची वाढ अत्यंत जोमाने सुरू असते.

Read more

माणसाचे वेगळेपण

माणसाचे वेगळेपण

वर्तन चिकित्सा ही संशोधनावर आधारित चिकित्सापद्धती आहे मात्र हे संशोधन प्रामुख्याने प्राण्यांवर केले जात असे. प्रयोगशाळेत वर्तन पाहता येते, मोजता येते त्यामुळे संशोधनात त्यालाच महत्त्व दिले जाऊ लागले. भावना आणि विचार हे दाखवता येत नसल्याने ते नाकारले जाऊ लागले. मात्र त्यामुळे माणसाची इच्छा, प्रेरणा यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. नवीन कल्पना कशा सुचतात, माणूस त्याग का करतो, कष्ट सहन करीत कठोर परिश्रम का करतो याची उत्तरे वर्तन चिकित्सा देत नाही.

त्यामुळे १९४०मध्ये कार्ल रॉजर्स यांनी मानवकेंद्रित मानसशास्त्र आणि समुपदेशन यांचा पाया घातला. आत्मभान, सर्जनशीलता, व्यक्तिस्वातंत्र्य अशा मानवी संकल्पनांना महत्त्व देत अब्राहम मास्लो यांनी या शाखेचा विस्तार केला. त्यांनी सांगितलेला गरजांचा पिरामिड आजही व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वाचा मानला जातो. याच परंपरेतील व्हिक्टर फ्रांक यांनी स्वत:च्या उदाहरणातून हे दाखवून दिले की माणसाचे वर्तन हे अन्य प्राण्यांसारखे चाकोरीबद्ध नसते. अन्य प्राण्यांची प्रतिक्रिया ही ठरलेली असते. माणूस मात्र अंध प्रतिक्रिया न देता वेगवेगळा प्रतिसाद निवडू शकतो.

Read more

चिमणीसाठी विकतचे घरटे नको

चिमणीसाठी विकतचे घरटे नको!

हल्ली विविध ठिकाणी आपल्याला पक्ष्यांकरिता घरटी विकत मिळू लागली आहेत. अनेकदा ती घरटी सजवलेली अगदी प्लायवूडने सुशोभित केलेली असतात. त्या घरटय़ांच्या किमतीही भन्नाट असतात. सहज म्हणून ती घरटी विकत घेणाऱ्यांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांच्या बोलण्यात अभिमान होता, त्यांना वाटत होते की ते निसर्गाची सेवा करत आहेत.

चिमण्या हरवत आहेत. आपल्या परिसरातील चिमण्या दिसायच्या बंद झाल्या आहेत. चिमण्या अदृश्य होण्याची अनेक कारणे आहेत. चिमण्यांना मिळणारे अन्नकण कमी झाले आहेत. पूर्वी इतस्तत पडलेले धान्य निवांतपणे टिपायला चिमण्या यायच्या. आता इतस्तत: पडलेले अन्नकण कमी झाले आहेत आणि निवांत टिपायला घराला अंगण राहिले नाही. चिमण्यांना मिळणाऱ्या अन्नकणांत म्हणजे टिपायच्या दाण्यांमध्ये प्रिझव्‍‌र्हेटिव्ह व विष इतके असते की कित्येक चिमण्या ते खाऊन मृत्युमुखी पडल्या आहेत. चिमण्या झुरळ व इतर उपद्रवी कीटकही खातात, परंतु आज या सर्व कीटकांना विष घालून मारले जाते. मग ते खाऊन चिमण्यांना मरावे लागते.

Read more

मनातील सुगंध

मनातील सुगंध

आपले मन घरासारखे आहे. त्यातील बाहेरची खोली म्हणजे जागरूक मन आणि आतील खोली म्हणजे सुप्त मन. या सुप्त मनातील कचरा स्वच्छ करण्यासाठी मनात येणाऱ्या विचारांकडे आणि शरीरातील संवेदनांकडे साक्षीभाव ठेवून पाहणे आवश्यक असते. असे करणे म्हणजे कचरा शोधून तो साफ करण्यासारखे आहे.

घरात कचरा खूप साठला असेल आणि दुर्गंधी येत असेल तर तो साफ करताना आपण मुद्दाम सुगंध निर्माण करण्यासाठी अगरबत्ती लावतो, रूम फ्रेशनर मारतो. शरीराला येणाऱ्या घामाचा वास कमी करण्यासाठीदेखील परफ्यूम मारतो. तसेच मनाच्या आरोग्यासाठी कर्ताभाव ठेवून समाधान, प्रेम, भक्ती, कृतज्ञता, क्षमा यांसारखे सुखद भाव मनात काही वेळ धरून ठेवणे आवश्यक असते. सर्व उपासना पद्धतीमधील प्रार्थना यासाठीच आहेत. दुर्दैवाने आरत्या मोठ्ठय़ा आवाजात म्हटल्या जातात. प्रेम,आर्तभक्ती या भावना मनात धारण करणे आवश्यक आहे हे लक्षात घेतले जात नाही.

Read more

वजाबाकी करण्याची एक ट्रिक

वजाबाकी करण्याची एक ट्रिक : __

अनेकवेळा दुकानात / भाजी,फळे ,तिकिट घेताना १०० , १००० ची नोट दिल्यावर किती पैसे परत मिळायला हवेत याचे गणित करायला ही ट्रिक आपल्यालाही उपयुक्त .

10, 100, 1000, 10000 अशा संख्येतून कोणतीही संख्या कशी वजा करायची

उदा: आपल्याला 1000- 674 वजा करायचे?
यासाठी आपणाला पहिले अंक 9 मधून वजा करून घ्यायचे व शेवटचा अंक 10 मधून वजा करून घ्यायचा.

म्हणजेच 9-6 =3
9-7 = 2
10- 4= 6
तुमचं उत्तर तयार= 326

Read more

‘मार्क’म्हणजेच गुणवत्ता नाही!

‘मार्क’म्हणजेच गुणवत्ता नाही!

डॉ. अरुण नाईक, (मानसोपचारतज्ञ)

नुकतीच एक बातमी वाचली….
नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी तिने आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही. पण मुलगी संपली.

मागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने शेवटच्या वर्षाला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले, म्हणून आत्महत्या केली होती. माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला घाबरतो.

एका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की, “सर्वजण त्यांना काय म्हणतात?”
मुले म्हणाली, की ‘स्कॉलर’.
मी विचारले ‘का?’,
मुले म्हणाली, “कारण आम्हाला चांगले मार्क मिळतात.”
मी समीकरण मांडले.

Read more

टीप

टीप
टेबल वर ऑर्डर घेऊन आलेला सुखदेव टेबलावरची माणसे बघून हबकून गेला.
तब्बल २५ वर्षानंतर तो हे चेहरे पुन्हा बघत होता. कदाचित त्या चौघांनी त्याला ओळखले नव्हते, किवा ओळख दाखवत नव्हते.
चौघापैकी दोघेजण मोबाईल मध्ये व्यस्त होते आणि दुसरे दोघे लॅपटॉप मध्ये.
कदाचित आत्ताच झालेल्या डील ची आकडेमोड चालली होती.
शाळेतील मित्र खुप पुढे निघून गेले होते, आणि स्वतः मात्र कॉलेज पर्यंत सुद्धा पोहचू शकला नव्हता.
नंतर दोन तीन वेळा त्यांच्या टेबल वर तो गेला, पण सुखदेव ने स्वतःची ओळख लपवून पदार्थ वाढले.
चारी बिझनेसमन मित्र जेवण संपवून निघून गेले.
आता परत कधी इकडे न आले तर बर, असा विचार त्याच्या मनात आला.
स्वतःच्या निष्फलते मुळे शाळेतील मित्रांना ओळखसुधा दाखवता आली नाही, म्हणून सुखदेव ला फार वाईट वाटले.
सुखदेव, टेबल साफ कर. तीन हजारचे बिल केले पण एक पैसा टीप म्हणून ठेवला नाही साल्यानी, मॅनेजर वैतागून बोलला.
टेबल साफ करता करता सुखदेव ने टेबलावर पडलेला पेपर नॅपकिन उचलला,
त्या चार बिझनेस मननी पेनानी कदाचित त्या नॅपकिन वर पण आकडेमोड केली होती.
पेपर टाकता टाकता सहज त्याच्या कडे लक्ष गेले,
त्यावर लिहिले होते….
तुला टीप द्यायला आमचा जीव झाला नाही, ह्या हॉटेल शेजारीच आम्ही एक फॅक्टरी घेतलीय, म्हणजे आता येणे जाणे सुरूच राहील, तू आमच्या बरोबर जेवायला बसला नाहीस, उलट आम्हाला तू वाढतोय हे कस वाटते❓
आपण तर शाळेत एकमेकाच्या डब्ब्यातून खाणारे,
आज तुझा ह्या नोकरीचा शेवटचा दिवस,. फॅक्ट्रिमध्ये कॅन्टीन तर कोणालातरी चालवलीच पाहिजे ना❓
शाळेतील तुझेच मित्र.
खाली कंपनीचे नाव आणि फोन no. लिहिला होता.
आत्तापर्यंत मिळालेल्या सर्वात मोठ्या टीप ला सुखदेव नी ओठांना लावून तो कागद खिशात व्यवस्थित ठेवला.

THIS IS THE QUALITY OF REAL FRIENDS

कुतूहल. 1

🤔 कुतूहल 🤔

🎯 सहावा वस्तुमान लोप

पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मिती काळापासून सुरुवात केली तर पृथ्वीवरील जीवांना आत्तापर्यंत एकूण पाच वेळा ‘वस्तुमान लोप’ या गोष्टीला सामोरे जावे लागले. त्याला केवळ नैसर्गिक कारणे होती. आता सहावा नामशेष/ वस्तुमान लोप होऊ घातला आहे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. वस्तुमान लोप म्हणजे पृथ्वीवरील अनेक प्रजातींचा अगदी कमी काळात विनाश होणे अथवा त्या नामशेष होणे. खरे म्हणजे गेल्या काही दशकांतील वन्यजीवांच्या प्रजातींचा विनाश पाहता सहावा मोठा नामशेष येऊ घातला आहे हे पटते. अर्थात यामध्ये मतमतांतरे आहेत.

पहिला नामशेष ४४३ दशलक्ष वर्षांपूर्वी झाला ज्यामध्ये अस्तित्वात असलेल्या एकूण प्रजातींच्या ८५ टक्के प्रजाती नामशेष झाल्या. दुसरा नामशेष आला ३७४ दशलक्ष वर्षांपूर्वी, ज्यात ७५ टक्के प्रजाती नष्ट झाल्या. त्यानंतरचा वस्तुमान लोप २५० दशलक्ष वर्षांपूर्वी झाला ज्यात ९५ टक्के इतक्या प्रजाती नष्ट झाल्या. चौथा नामशेष झाला २०० दशलक्ष वर्षांपूर्वी ज्यामध्ये ८० टक्के प्रजाती नष्ट झाल्या, परंतु डायनोसोरची भरभराट झाली. १४५ दशलक्ष वर्षांपूर्वी, आलेला पाचवा वस्तुमान लोप ७६ टक्के इतक्या प्रजातींना नष्ट करून गेला. ज्यामध्ये डायनोसोर नाहीसे झाले परंतु सस्तन प्राण्यांची भरभराट झाली.

भूशास्त्रीय कालश्रेणीवर आत्ताच्या युगाला ‘होलोसीन’ अथवा ‘अन्थरोपोसीन’ असे संबोधले जाते ज्यामध्ये सगळीकडे मानवाचे वर्चस्व दिसते. सध्याचा प्रजाती नामशेष होण्याचे प्रमाण नैसर्गिकरीत्या प्रजाती नामशेष होण्याच्या प्रमाणाच्या तुलनेत १००-१००० पटीने जास्त आहे. ही प्रजाती तयार होण्याच्या आणि नष्ट होण्याच्या प्रमाणातील तफावत अनेक कारणांमुळे आहे. जागतिक वन्यजीव निधी या संस्थेनुसार गेल्या ४० वर्षांत पृथ्वीवरील अध्र्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. माणसाला पर्यावरणीयदृष्टय़ा अभूतपूर्व असा ‘जागतिक सुपर प्रिडेटर’ असे संबोधले आहे. प्रचंड प्रमाणात वाढणारी लोकसंख्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापर, वाढणारे सर्व प्रकारचे प्रदूषण, नैसर्गिक अधिवासाचा गरवापर, प्राण्यांची शिकार, वातावरणबदल, प्रचंड प्रमाणातील जंगलतोड, खाणकाम, कार्बन उत्सर्जन, जागतिक तापमानवाढ.. अशा अनेक गोष्टी या येणाऱ्या वस्तुमान लोपासाठी, प्रजातींच्या नामशेषासाठी कारणीभूत आहेत.

🖊 डॉ. नीलिमा कुलकर्णी office@mavipamumbai.org
➖➖➖➖➖➖➖

Board Exam 2020 :

Board Exam 2020 :

आता आपल्या हातात आहे थोडाच वेळ, कशी कराल परीक्षेची तयारी?

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना आता शेवटच्या टप्प्यात आपल्याला अधिक वेगानं अभ्यास करायचा असतो.
अशावेळी आपल्याला सगळं पुस्तक वाचणं शक्य नसतं मात्र काही छोट्या टिप्स तुम्ही केल्यात तर आपला अभ्यास कमी वेळात अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो.

यासाठी खालील काही खास महत्वाच्या टिप्स चा तुम्हाला निश्चित उपयोग होईल.

5R या तत्वाचा वापर करून अभ्यास करा.

Research- आपल्याला काय कठीण जातं हे शोधून काढा. त्यावर रनिंग छोट्या पॉकेट नोट्स तयार करा.

Read- आपल्याला कठीण जाणारा भाग अथवा विषय पुन्हा पुन्हा वाचा

Remind- वाचलेल डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करा.

Rewrite- त्यानंतर कागदावर मुद्दे लिहून काढा

Review- आपलं उत्तर बरोबर आले की नाही हे पुन्हा तपासून पाहा.

रनिंग नोट्स, पॉकेट नोट्स कशा काढाल,
गणितातील सूत्र किंवा भाषा आणि साहित्यातील महत्त्वाचे मुद्दे डोळ्यासमोर कायम रहावेत यासाठी पॉकेट नोट्सचा वापर होतो.
त्यासाठी तुम्ही नोट्स काढायला हव्या. त्या तुमच्या शब्दात आणि लक्षात राहतील अशा असाव्यात.
चालता फिरता उठता बसता फक्त पुढचे काही दिवस आपल्याला अवघड जाणाऱ्या विषयातील न येणारा भाग आठवून पाहण्याचा प्रयत्न करा.

पुढचे काही दिवस वेळेचं चोख नियोजन करा.

खाणं, जेवणं, झोपणं आणि अभ्यास करणं यांच्या वेळा ठरवून घ्या.

दिवसातील किमान 1 तास हा खेळ अथवा व्यायाम 1 तास तुमचा आवडता छंद जोपासण्यासाठी द्या. त्यामुळे तुमचं मन आणि मेंदू दोन्ही प्रसन्न राहिल.

घोकंपट्टीवर भर नको

महत्त्वाचे मुद्दे आपल्या भाषेत लिहून काढा. घोकंपट्टी केल्यानं मुद्दे अथवा विषय विसरण्याची भीती राहाते. त्यामुळे एखाद वाक्य किंवा शब्द विसरला तर पुढंचं काहीही आठवत नाही. त्यासाठी महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करून लिहून काढा आणि आपल्या भाषेत पेपरमध्ये मांडा.

गणिताची सूत्र, विज्ञानातील सूत्र आणि आकृत्या जशाच्या तशा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.

दिवसातील 1 तास मेडिटेशन आणि रिव्हिजन

संपूर्ण दिवसाचा अभ्यास झाल्यानंतर आज आपण दिवसभरात काय केलं. किती केलं आणि कशापद्धतीनं केलं याचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे.

मेडिटेशनमुळे मन शांत आणि स्थिर होतं. त्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते.

वरील सर्व गोष्टी अमलात आणा.

शाळेतील सर्व विषयांचे स्वाध्याय, प्रयोगाच्या वह्या, निबंध वह्या, काही प्रकल्प असतील ते पूर्ण करून जमा केल्याची खात्री करा. कारण या सर्व गोष्टी पूर्ण केल्यावरच अंतर्गत गुण मिळतात.

खूप अभ्यास करा

मन प्रसन्न ठेवा

घरातील व्यक्तींशी संवाद साधा

शिक्षकांसोबत संवाद ठेवून आपल्या समस्यांचे निराकारण करा

परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा

यश तुमचेच आहे

यशस्वी भव!!!💐👍