Back to Top

Category: वाचन कट्टा

पावकी, निमकी

पावकी, निमकी म्हणजे बालपणी छळणाऱ्या चेटकी !

गेल्या पिढ्यांमधील शालेय अभ्यासातील अनेक क्लिष्ट आणि वरकरणी निरुपयोगी वाटणाऱ्या अनेक गोष्टींचे चपखल वर्णन, पु. ल. देशपांडे यांनी आपल्या बिगरी ते मॅट्रिक या कार्यक्रमामध्ये केलेले आहे, त्यात त्यांनी या पाढ्यांचा उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात या पावकी, निमकी या चेटकीं नी आमचे बालपणच खाऊन टाकले. क्षेत्रफळ, घनफळ, काळ काम वेगाची गणिते, बाजारातील हिशेब, वस्तूंची किंमत अशा शेकडोवेळा उपयुक्त ठरणारे हे पाढे म्हणजे खरोखरच रम्य बालपणाच्या गळ्यातील एक मोठी धोंड होती.

सुमारे ६५ / ७० वर्षांपूर्वी ते बहुतेक सर्वांना पाठ करावेच लागत. पूर्वी प्राथमिक शालेय शिक्षण झालेली लोकंसुद्धा या पाढ्यांच्या आधारे, पूर्ण जमिनीला कुंपण घालायला किती खांब घालावे लागतील, तारेचे तीन किंवा चार वेढे
घालायला किती तार लागेल असे हिशेब अचूकपणे करीत असत. ते देखील अत्यंत कमी वेळामध्ये. त्यावेळी जमिनीची मापे यार्ड, फूट, कदम अशी असत. तारेचा भाव १२ आणे, पावणेदोन रुपये असा काहीतरी आडनिडा असे. सुदैवाने माझ्या बालपणी आमचे पाऊणकी पर्यंत पाठांतर झाल्यावर या ” चेटक्यांचा ” फास हळूहळू सैल झाला. नंतर तर आम्हाला शिकविणाऱ्या शिक्षकांनाच हे पाढे येत नसत. पण वैदिक गणित, अबॅकस, लॉग टेबल्स वगैरेपेक्षा हे परवडले असं वाटायचं. आता कॅलक्युलेटर, कॉम्पुटर, मोबाईल पर्यंतच्या प्रवासात सगळे ज्ञानच माणसाच्या मुठीत आले आहे. पण तरीसुद्धा ते मुठीत असणे आणि डोक्यात असणे यातील फरक जाणवतोच. हिशेबासाठी कॅल्क्युलेटरवर संख्या टाईप करीपर्यंत तोंडी हिशेब पूर्णसुद्धा होतो.

आता पुढे चाललेल्या जगात हे सर्व कालबाह्य झाले आहे. हे पाढे पाठ करा म्हणून कुणी म्हणणार नाही आणि म्हटले तरी ते कुणी ऐकणार नाही. पण पूर्वींच्या सगळ्या गणितशास्त्राचाच मूलाधार असलेल्या या पाढ्यांकडे एकदा नजर तरी टाकू या ! भविष्यात कदाचित ही कसली टेबल्स आहेत हेच कुणाला सांगता येणार नाही. माझ्या संग्रहातील हे पाढे आहेत. जुन्या मोडी पद्धतीने पाव म्हणजे -l-, अर्धा म्हणजे -ll-, पाऊण म्हणजे -lll- असे लिहिलेले आहे.

*** मकरंद करंदीकर.

संत तुकारामांचे अभंगशतक

।। संत तुकारामांचे अभंगशतक ।।
कर्जदारांची कर्ज माफ करणारे जगातील पहिले संत तुकाराम. हे सतराव्या शतकातील लोकसंत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म, अनागोंदी त्याचप्रमाणे लोकांच्या मनातील भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा संत तुकारामांनी प्रयत्न केला. लोकांच्यावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा, देण्याचं काम केलं. रोजचे जीवन जगताना कशा प्रकारे जगावे हे आपल्याला त्यांच्या अभंगातून दिले. त्यांचे सर्व अभंग मानवी जीवनाला हितकारक, उपकारक ठरले आहेत. तुकारामांचे अनेक अभंग आहेत त्यातील शंभर अभंगांचे संक्षिप्त विवेचन सरळ, साध्या, सोप्या भाषेत असणारा “संत तुकारामांचे अभंगशतक” असा ग्रंथ डॉ.आ.ह साळुंखे यांनी आपल्याला समोर ठेवला आहे. हा ग्रंथ 191 पृष्टी असून शंभर अभंग या ग्रंथात असल्याकारणाने ग्रंथाचे नाव ‘संत तुकारामांचे अभंगशतक’ असे दिले आहे. या ग्रंथात एकूण सतरा प्रकरणे दिली आहेत. हे सर्व प्रकरण जन्म, विवाह, मृत्यू , गृहप्रवेश, नामकरण, वाढदिवस, आनंद, उत्सव, मंगलकाम, प्रसंग, कृतज्ञता, समारंभ, विविध संस्कार इत्यादी प्रसंगी या अभंगाचे वाचन करू शकू असे अभंग आहेत. प्रथम ‘आईवडील’ या प्रकरणाने सुरुवात केली आहे. जगामधे जिथं आपलं मस्त नम्रपणानं झुकवावं असं आपलं पहिलं श्रद्धास्थान म्हणजे आपले आईवडील. या पहिल्या प्रकरणात आठ अभंग दिले आहेत. दुसरे प्रकरण संत असं दिलं आहे. यातील पहिल्या अभंगाची सुरुवात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले। या अभंगाने केली आहे.

Read more

सरदार यशवंतराव आनंदराव पवार

[10:02 am, 14/12/2020] +91 86230 64224: सरदार यशवंतराव आनंदराव पवार

( पानिपतच्या लढाईत मर्दुमकी गाजवणारे रणमर्द सरदार )

” धार” संस्थानचे दुसरे मराठा पवार राजे …! ( इ . स. १७३५ ते १७६१ )

वडील आनंदराव सर्पदंशाने मरण पावले (१७३६). त्यांचा सरंजाम मुलगा यशवंतराव याजकडे आला. बाजीरावाच्या दिल्लीवरील स्वारीत तुकोजी, जिवाजी व यशवंतराव यांनी त्याजकडे सोपविलेली कामे उत्तम रीतीने पार पाडली. वसईच्या रणसंग्रामातही त्यांनी भाग घेतला होता. १७५२ मध्ये दिल्लीच्या बादशाहाशी मराठ्यांचा जो प्रसिद्ध अहदनामा (काररनामा) झाला, तो पेशव्यांतर्फे पाळला जाईल याची हमी शिंदे, होळकर व पवार या तिघांनी घेतली होती. यशवंतराव पानिपतच्या तिसऱ्‍या लढाईत मराठ्यांच्या बाजूने लढताना कामी आले (१७६१).

माळवा भागातील मराठ्यांचा अंमल पक्का करण्यात आणि पेशव्यांच्या मोहिमांत वेळोवेळी सामिल होउन मराठ्यांचा शत्रुचा मोड करण्यात यशवंतरावानी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली .

कर्तबगार व करारी स्वभावाचे यशवंतराव पवार आपल्या कारकिर्दीत मराठा सत्तेचे प्रमुख आधारस्तंभ बनुन राहीले .

शाहू छत्रपतींचे अगदी मर्जीतले सरदार म्हणून पवारांचे नाव घेतले जाते.

अशा कर्तबगार सेनानींच्‍यामुळेच माळवा प्रा
[10:02 am, 14/12/2020] +91 86230 64224: सरदार यशवंतराव आनंदराव पवार

( पानिपतच्या लढाईत मर्दुमकी गाजवणारे रणमर्द सरदार )

” धार” संस्थानचे दुसरे मराठा पवार राजे …! ( इ . स. १७३५ ते १७६१ )

वडील आनंदराव सर्पदंशाने मरण पावले (१७३६). त्यांचा सरंजाम मुलगा यशवंतराव याजकडे आला. बाजीरावाच्या दिल्लीवरील स्वारीत तुकोजी, जिवाजी व यशवंतराव यांनी त्याजकडे सोपविलेली कामे उत्तम रीतीने पार पाडली. वसईच्या रणसंग्रामातही त्यांनी भाग घेतला होता. १७५२ मध्ये दिल्लीच्या बादशाहाशी मराठ्यांचा जो प्रसिद्ध अहदनामा (काररनामा) झाला, तो पेशव्यांतर्फे पाळला जाईल याची हमी शिंदे, होळकर व पवार या तिघांनी घेतली होती. यशवंतराव पानिपतच्या तिसऱ्‍या लढाईत मराठ्यांच्या बाजूने लढताना कामी आले (१७६१).

माळवा भागातील मराठ्यांचा अंमल पक्का करण्यात आणि पेशव्यांच्या मोहिमांत वेळोवेळी सामिल होउन मराठ्यांचा शत्रुचा मोड करण्यात यशवंतरावानी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली .

Read more

12

ऐका गोष्ट बाराची

12/12/12/12/12

बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक…

मोजण्यासाठी द्वादशमान
पध्दती…१२ची

फूट म्हणजे १२ इंच

एक डझन म्हणजे १२ नग.

Read more

डार्विन आजोबांची शिकवणी

शास्त्रज्ञ घडतो तरी कसा ? एखाद्या व्यक्तीमध्ये काही मुलभूत प्रेरणा , कुतूहल दडलेले असते का ? शाळेत असताना हि सारी मंडळी नेहमीच चमकली का ? चला डार्विन च्या लहानपणापासून त्याचा मागोवा घेऊ यात. ऐकू यात डार्विन आजोबांची शिकवणी-भाग १ लेखक – डॉ अनिल अवचट हा एक अफाट लेख आहे. म्हंटले तर गोष्ट, म्हंटले तर शोध निबंध – डार्विन ह्या महामानवाच्या वेडाचा , ध्यासाचा व कामाचा.


Here a new project especially for Teenager kids and those who enjoy literature and knowledge.
डार्विन आजोबांची शिकवणी – डार्विनचा अदभूत प्रवास आणि त्याचा उत्क्रांती वादाचा सिद्धांत गोष्ट रुपात समजून घेऊयात डॉ अनिल अवचट यांच्या लेखणीतून.
आपले आजचे जगणे, जगण्याची सुलभता याचा विचार केला की मग शास्त्र व शास्त्रज्ञ यांचा आपल्या जीवनावर असलेला प्रभाव दिसून येतो. त्यांचे हे उपकार आपण लक्षात ठेवतो का ? त्यांची आठवण ठेवतो का ? आपली समज इतकी छोटी की त्यांचे काम समजतच नाही. पण ते समजावून घेण्याचे कुतूहल तुम्हाला आहे का? डॉ अनिल अवचट किती साध्या सोप्या शब्दात इतका मोठा विषय आपल्याला उलगडून सांगतात. हा एक अफाट लेख आहे. म्हंटले तर गोष्ट, म्हंटले तर शोध निबंध – डार्विन ह्या महामानवाच्या वेडाचा , ध्यासाचा व कामाचा.

डार्विन आजोबांची शिकवणी – डॉ अनिल अवचट वाचन – प्रीतम रंजना, चित्रे – अर्णव गंभीर , तांत्रिक सहयोग – दीपक सातारकर

‘पंचपक्वान्नांचे भोजन’

नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचा शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते!

आपण दिवाळीत केलेल्या पदार्थानी युक्त भोजनाला ‘पंचपक्वान्नांचे भोजन’ असे म्हणतो. पैकी यातील पंच – पक्व -अन्न म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच महाभूतांपासून बनलेले भोजन. या प्रत्येक महाभूतांचा आकार वर्णन केलेला आहे. जसे की ‘पृथ्वी’ महाभूत हे स्थिर असल्या कारणाने चौकोनी सांगितले आहे. ‘जल आणि आकाश’ मात्र गोल सांगितले असून ‘अग्नी’चा आकार त्रिकोणी व वायूचा आकार अर्ध चंद्राकृती सांगितला आहे. आपल्या दिवाळीतील लाडू गोल, करंज्या अर्धचंद्राकृती, शंकरपाळ्या कधी त्रिकोणी कधी चौकोनी केलेल्या पाहायला मिळतात. या प्रत्येकाच्या मागे काही तरी गमक आहे. या सर्व पंचमहाभूतांची आपल्याला आठवण राहावी, पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ती आपल्या परंपरांमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

आपल्या आहारातील सहा रस पाच महाभूतांपासून बनलेले असतात. यापैकी पृथ्वी आणि आप महाभूतापासून मधुर रस बनतो. पृथ्वी आणि तेज महाभूतापासून आम्ल रस बनतो. अग्नी व जल महाभूतापासून लवण रस म्हणजे खारट. आकाश व वायूपासून कडू. अग्नी व वायूपासून तिखट आणि पृथ्वी व वायूपासून तुरट रसाची निर्मिती होते, असे आयुर्वेद शास्त्राचे मत आहे. या सहा रसांच्या संतुलित सेवनामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते.

गंमत पाहा, दिवाळीमध्ये बनवीत असलेल्या प्रत्येक पदार्थाचा आकार व चव, त्यात वापरली जाणारी घटकद्रव्ये वेगवेगळी असतात. तसेच त्या प्रत्येक पदार्थाची अवस्थासुद्धा वेगवेगळी असते. थोडक्यात, या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीमागे हे पंच महाभूतांचे शास्त्र दडलेले असते. त्यांच्या कमी-अधिक संयोगानेच पदार्थ, त्यांचा आकार, त्यांची चव व टिकाऊपणा ठरलेला असतो. या पंचमहाभूतांमुळेच आपल्याला त्या पदार्थाचे पंच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने ज्ञान होत असते. पृथ्वी महाभूत त्या पदार्थातील गंध ठरवीत असते. आप महाभूत त्या पदार्थाची चव ठरवत असते, तेज महाभूत त्या पदार्थाचे रूप म्हणजे दिसणे ठरवत असते तर वायू महाभूत त्या पदार्थाचा स्पर्श ठरवत असते. तो पदार्थ खाताना येणारा विशिष्ट आवाज हा त्या पदार्थातील आकाश महाभूतांमुळे येत असते. कारण आकाश महाभूत त्या पदार्थातील शब्द व्यक्त करत असतो. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा पदार्थ आवडत असतो. कोणाला भज्याचा वास आवडतो, कोणाला जिलेबीची चव आवडते, कोणाला शेव, चकलीचा कुरकुरीतपणा व खातानाचा आवाज आवडत असतो तर कोणाला स्पर्शाला अनारसे व दिसायला करंज्या आवडत असतात. त्यामुळे या पाचही महाभूतांचे त्या एकाच पदार्थातील उत्तम संतुलन हे प्रत्येकालाच त्या पदार्थाच्या मोहात पाडते. दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाचा रंग-रूप, आकार, चव, स्पर्श व आवाज वेगवेगळा आहे. म्हणून आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारी अशी दिवाळी आपल्याला इतर सणांपेक्षा जास्त आवडते.

बहुतांशी दिवाळीच्या फराळातील पदार्थांवर अग्नी व जल तत्त्वाचा संस्कार झालेला असतो. जसे की काही पदार्थ तेज व जल तत्त्व प्रधान अशा उष्ण तेलात तळलेले असणे. यामुळे त्या पदार्थावर या दोन महाभूतांचे संस्कार होतात. संस्कारांमुळेच त्या पदार्थात गुणपरिवर्तन होते. टणक पदार्थ मऊ होतात तर मऊ पदार्थ टणक होतात. म्हणून तर लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, कापण्या, चिरोटे, शेव, चिरमुरे, अनारसे, चकल्या या प्रत्येकाचे पांचभौतिकत्व वेगवेगळे असते. त्यामुळे लाडू टणक असतात. करंज्या पटकन फुटतात. शंकरपाळ्या, चिरोटे मऊ असतात. शेव, चकल्या कुरकुरीत असतात. तर गुलाबजामून, रसगुल्ले जल महाभूत युक्त पार्थिव असतात. काही मधुर रसाचे गोड, काही तिखट तर काही आंबटगोड असतात.

लाडू…

या, लाडूचे पांचभौतिक महत्त्व जाणून घेऊ यात. लाडू हा पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असा पदार्थ आहे. त्यामुळे तो अत्यंत पौष्टिक व बलवर्धक आहे. लाडूचे प्रकार जरी अगणित असले तरी त्याचा आकार मात्र गोलच असतो. पृथ्वीसारखा स्थिर व आप महाभूतासारखा गोल आकार धारण करतो. मुळात पृथ्वीसारख्या त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या गुणामुळे लाडू करण्याची पद्धत निर्माण झाली असावी. पूर्वीच्या काळी प्रवास मोठे असत. वाटेत आताच्यासारखी हॉटेल नसत. म्हणून खूप दिवस टिकणारा व प्रवासात नेता येणारा, सर्व लहान मुलांना आवडणारा, खाताना हात खराब न होणारा, कुठेही, केव्हाही, कधीही सहज खाता येणारा आणि यासोबत खाण्यासाठी कशाचीही गरज नसणारा, स्वादिष्ट व गोड असल्याकारणाने पटकन तरतरी आणून देणारा, खाताच पोट भरलेल्याची जाणीव करून देणारा, असा हा मजेशीर पदार्थ म्हणजे लाडू.

लाडूचे प्रकारही असंख्य आहेत. विविध डाळी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी यांपासून विविध प्रकारचे लाडू बनविता येतात. बदाम, काजू, मनुके यांमुळे लाडू अधिकच पौष्टिकहोतात. तुपामुळे त्यांमध्ये स्निग्धपणा आलेला असतो. आपल्याकडे रव्याचे लाडू, हरभरा डाळीचे लाडू, बेसनाची जाड शेव तयार करून तिचे तुकडे गुळाच्या पाकात पाडून तयार केलेले शेवकांडीचे लाडू, फक्त चुरमुरे व गुळाचा पाक यांपासून बनविलेले लाडू असे अनेक प्रकार आहेत. मधुमेहाचे रुग्ण सोडले तर बाकी सर्वाना विशेषत: लहान मुलांना तर पोषक असा दिवाळीचा एक परिपूर्ण आहारीय पदार्थ म्हणजे लाडू. यापैकी दिवाळीत फारसा न केला जाणारा मात्र लहान मुलांसाठी अत्यंत वृष्य, बलदायक व पौष्टिक असा लाडू म्हणजे फक्त खजूर व गुलकंद वापरून तूप लावून केलेला लाडू. ज्यांनी केला नसेल त्यांनी या दिवाळीत हा आवर्जून करावा. मुले फार खूश होतात. तसेच गुलकंद पित्तशामक असल्याने याने फार उष्णताही वाढत नाही. मुलांना चॉकलेटपेक्षा हाच लाडू द्या.

करंजी..

आता आपण करंजीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ यात. करंज या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात. म्हणून यास करंजी असे म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे अधिक्य यामध्ये असते. म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असेल तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत कारंजी छान दिसते. म्हणून करंजी बनविताना याची काळजी घ्यावी लागते.

चकली..

वर्तुळाकृती व अर्धचंद्राकृती आणखी एक पदार्थ म्हणजे चकली. यामध्ये आकाश व वायू महाभूताचे आधिक्य असते. म्हणूनच ती त्या त्या महाभूताचा आकारही धारण करताना दिसतात. यामध्ये आपण जेवढे तिखट मिसळू तेवढे त्याचे तेज तत्त्व वाढते. त्याचबरोबर तिच्यावर अग्निसंस्कार किती झाला आहे यावरून चकलीचे रूप ठरते. म्हणून चकलीची भाजणी उत्तम व्हावी लागते. तसेच ती तळणे हे सुद्धा एक अत्यंत कौशल्याचे काम आहे. चकली कमी तापलेल्या तेलात टाकली तर तिचे महाभूत संघटन बिघडते व ती मऊ होते. तिचा बाहेरील भाग कडक होत नाही. म्हणून योग्य प्रमाणात तापलेल्या तेलातच चकली तळली तर तिच्यातील संघटन उत्तम बनते व चकली कडक व खुसखुशीत बनते. यावरून आपल्याला एखाद्या पदार्थाच्या निर्मितीतील पंचमहाभूतांचे महत्त्व चटकन समजते.

चिवडा..

तिखट पदार्थामधला आपल्या सर्वाचा आवडता आणि आकाश व वायू महाभूत प्रधान असा आणखी एक पदार्थ म्हणजे चिवडा. बहुतेक घरांमध्ये पातळ पोहय़ांचा चिवडा बनविला जातो. पोहे हा शब्दच मुळी ‘पृथु’ या शब्दापासून निर्माण झाला आहे. लाहय़ांना चपटे केले, पृथु केले की त्यास पोहे असे म्हणतात. त्यामुळे काही ठिकाणी लाहय़ांचा चिवडा केला जातो तर काही ठिकाणी त्याच लाहय़ांपासून बनविलेल्या पोहय़ांचा चिवडा केला जातो. लाहय़ांमधील आकाश महाभूत काढून टाकले व त्यास ‘पृथु’ करून त्यातील पर्यायाने अल्प पृथ्वी महाभूत वाढवले की झाले पोहे. मात्र या पोहय़ांमध्ये भरपूर प्रमाणात छिद्रे असल्याने यात वायू महाभूताधिक्य हे असतेच. म्हणून पोहे, भेळ, लाहय़ा असे पदार्थ खाल्ले की आपला वात वाढतो. असो. म्हणून पोहे नुसतेच जर कढईत भाजायला घेतले तर उष्णता जास्त असल्याने पोहय़ांमध्ये जागा व्यापलेल्या हवेचे प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते व पोहे आक्रसतात. म्हणून पातळ पोहय़ांचा चिवडा करताना ते आधी भाजू नयेत. फोडणी झाल्यावर त्यावर पोहे टाकून परतले की तेलाचे सूक्ष्म आवरण त्या पोहय़ांवर चढते. हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात. म्हणून पोहे अशा प्रकारे परतले की आक्रसत नाहीत. मंद विस्तवावर परतले की त्यातील अंगभूत पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे तेलाचे रेणू आतपर्यंत जाऊ शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. दगडी पोहय़ांसारखे जाड पोहे असल्यास ते तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करतात. तसेच काही ठिकाणी भाजक्या पोहय़ांचाही चिवडा करतात. ते आधीच भाजके असल्याने कुरकुरीतच असतात. त्यामुळे ते तळावे लागत नाहीत किंवा जास्त भाजावेही लागत नाहीत. तर थोडक्यात हा सर्व खेळ त्या पोहय़ांमध्ये दडलेल्या आकाश आणि वायू महाभूताचा आहे. त्यावर अग्नी महाभूताचा आपण संस्कार करतो व त्यास अधिकच रुचकर बनवतो.

(माझे फेव्हरेट) अनारसे..

अनारसे बनवताना मात्र जल महाभूताच्या संतुलनाला महत्त्व असते. म्हणून अनारशासाठी तांदूळ तीन दिवस भिजवून मगच कुटले जाते. तीन दिवस भिजल्याने त्यामध्ये आंबवण्याची क्रिया आधीच झालेली असते. त्यामुळे त्या पिठात वायू महाभूतही वाढलेला असतो. अर्थात या ठिकाणी हा वायू महाभूत म्हणजे आंबविण्याच्या क्रियेत तयार झालेला कार्बन डायॉक्साइड. त्यामुळे अनारसा तुपात टाकला की वायू व अंगीभूत पाण्याची वाफ बाहेर येऊ लागते. म्हणून अनारशावर तूप उडवीत राहिले कीत्या छिद्रांमधून ते आतपर्यंत जाऊ शकते आणि अनारशाला जाळी पडते. उष्ण तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास त्यास छान सोनेरी रंगही प्राप्त होतो.

अशा प्रकारे आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ वर्णन केला आहे. त्यामुळे संक्रांत, दिवाळी, दसरा, कोजागरी, नवरात्र, श्रावण या प्रत्येक काळात आहारीय पदार्थ वेगवेगळे सांगितले आहेत. आपण मात्र एकसाखेच वागून किंवा त्यांचे चुकीचे अनुसरण करून आजार वाढवून घेतो. दिवाळीच्या काळात निसर्ग आपल्याला बल द्यायला सुरुवात करतो. बाहेर थंडी सुरू झालेली असते. त्यामुळे त्वचेवरील रोम रंध्रे बंद होऊ लागतात व अग्नी शरीरात कोंडला गेल्याने तो अधिकच वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. म्हणून ही भूक भागविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन स्वत:च्या शरीराचे पांचभौतिक संघटन ओळखून दिवाळीतील पदार्थाचा आनंद घ्यावा

*लहान मुलांसाठी रेसिपी*

*लहान मुलांसाठी रेसिपी* 2 वर्ष वरील मुलांसाठी
【1】
Home-Made Cerelac:-
खिमटी
साहित्य:-
मूग दाळ १ वाटी,
तांदूळ १ वाटी ,
बदाम५-६.
कृती:-
दाळ व तांदूळ वेगवेगळे धुवून एका कपड्यावर सुकत ठेवायचे,चांगले सुकले की वेगवेगळे खमंग मंद गॅसवर भाजणे व बदाम पण थोडे शेकून घेणे.
मिक्सर मध्ये मिक्स करून बारीक करणे. ही खिमटी २-३ वीक राहते हवाबंद डब्यात ठेवणे.
पध्दत:-
१)एका वाटीमध्ये पाणी घेऊन 2 चमचे पावडर मिक्स करून मीठ चवीनुसार घेऊन मिक्स करून घेणे.
२)एका भांड्यात उकळून खिमटी बनवा,सतत ढवळत रहा गाठी होऊ नये म्हणून.
३) खमंग सुंगध व फेस किंवा भांडयाला खिमटी चिटकू लागली की समजा खिमटी तयार.
पौष्टिक अशी खिमटी मूल सहा महिन्यांचा झाले कि सुरु करावी,पचण्यास हलकी असते.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
【2】
नाचणी सत्व:-
साहित्य:-
नाचणी सत्व,मीठ,गूळ, वेलचीपूड.
कृती:-
१) खिमटी करतो त्याप्रमाणे एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात नाचणी सत्व 2-3 चमचे मिक्स करून त्यात थोडेसे मीठ घालावे.
२) एका टोपात घालून उकळी येऊ लागतात एक कप दूध,गूळ, वेलचीपूड, सुठं पावडर,तूप,काजू बदाम पावडर घालून सतत ढवळावे म्हणजे गाठी होणार नाही.
३) मंद गॅसवर शिजवूज घेणे,
४) हे सत्व आपणही ताकातून घेऊ शकतो किंवा खीर.
Calcium चा उत्तम source आहे नाचणी,हाडे मजबूत होतात.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆●◆
【3】रवा लापशी:-
साहित्य:-
लापशीचा रवा,तूप,साखर किंवा गूळ, वेलचीपूड.
कृती:-
१)लापशीचा रवा १-२ चमचे घेऊन तुपात छान परतने.
२) दूध एक वाटी, साखर वेलची पावडर घालून मस्त शिजवून घेऊन भरवणे.
३)अधूनमधून ढवळने,गाठी होणार नाहीत.
○●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●○
【4】
मिक्स दाळीचे सूप:-
साहित्य:-
तूरडाळ,मूगडाळ, मटकी डाळ, हिंग,मीठ,लसूण.
कृती:-
१) तूरडाळ,मूगडाळ, मटकी डाळ थोडी चना डाळ सगळ्या डाळी मिक्स करून कुकर मध्ये मऊ शिजवणे त्यात
२) 2-3 लसूण पाकळ्या व थोडे हिंग पावडर घालणे.
३) स्मॅश करून किंवा मिक्सर मध्ये बारीक करून घेऊन सर्व्ह करणे.
टीप: पाण्याचे प्रमाण जास्तच ठेवले तरी चालेल.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆◆◆◆
【5】
मूगतांदूळाची खिचडी
साहित्य
१) १ कप तांदूळ
२) १/२ कप मूग डाळ
३) तीन ते साडेतीन कप गरम पाणी
४) १ टेस्पून तेल
५) २ चिमटी मोहरी
६) १/४ टिस्पून जिरे
७) १ चिमटी हिंग
८) १/४ टिस्पून हळद
९) थोडे मटार
१०) १ टिस्पून गोडा मसाला
११) चवीपुरते मिठ
कृती
१) खिचडी करायच्या आधी तांदूळ आणि डाळ एकत्र करून पाण्याने स्वच्छ धुवावे.
२) पाणी काढून १/२ तास निथळत ठेवावे.
३) लहान कूकरमध्ये तेल गरम करावे त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, फोडणी करावी.
४) नंतर डाळ आणि तांदूळ घालून परतावे. साधारण ३-४ मिनीटे परतावे. डाळ-तांदूळ चांगले कोरडे झाले पाहिजेत.
५) नंतर यात गरम पाणी घालावे. गोडामसाला आणि मिठ घालावे. ढवळून पाण्याची चव पाहावी.
६) लागल्यास मिठ घालावे.
७) पाण्याला उकळी आली कि कूकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या होवू द्याव्यात.
८) वाफ मुरली (साधारण १० मिनीटे) कि कूकर उघडून खिचडी सर्व्ह करावी.
९) खिचडीवर १ चमचा तूप घालावे.
१०) मूगतांदूळाची खिचडी तयार आहे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
【6】
पालक भात:-
साहित्य:-
पालकची स्वच्छ धुतलेली पाने,१ छोटी वाटी तांदूळ,लसूण,हळद,जिरे,हिंग,अर्धा टोमॅटो.
कृती:-
स्वच्छ धुतलेली पाने बारीक चिरून घेणे,छोट्या कुकर मध्ये एक चमचा तेल घालणे.
२) त्यात जिरे,हळद,लसूण ठेचून,बारीक चिरलेला टोमॅटो व चिरलेली भाजी व तांदूळ घालणे.
३) १ ग्लास पाणी घालून ३-४ शिट्या घेणे.
४) पावभाजी च्या smasher ने स्मॅश करून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून भरवणे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
【7】
मुग भात:-
साहित्य:-
अर्धी वाटी मुग,१ छोटी वाटी तांदूळ,लसूण,हळद,जिरे,हिंग,अर्धा टोमॅटो.
कृती:-
१) मुग थोडेसे भाजून घेणे,छोट्या कुकर मध्ये एक चमचा तेल घालणे.
२) त्यात जिरे,हळद,लसूण ठेचून,बारीक चिरलेला टोमॅटो व भाजलेले मुग व तांदूळ घालणे.
३) १ ग्लास पाणी घालून ३-४ शिट्या घेणे.
४) पावभाजी च्या smasher ने स्मॅश करून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून भरवणे.
५) यात एक दोन फोडी गाजर,बटाटा,किंवा फरसबी घालू शकता.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
【8】
ओटस पावडर रेसिपी
ओट्स थोडेसे भाजून घेणे, बदाम पण शेकून घेणे.
थंड झाले की दोन्ही मिक्सर मध्ये बारीक करून पावडर बनवणे.
****ओट्स रेसिपी****
Apple ओट्स:-
साहित्य:-
2-3 चमचे ओट्स पावडर व
एक छोटा किंवा 2-3 फोडी apple चा गर.
कृती:-
१) थोडेसे पाणी घेऊन त्यात 2-3 चमचे ओट्स पाउडर घेऊन मिक्स केली.
२) त्यात थोडेसा apple चा गर मिक्स केला व साखर व किंचित मीठ घालून उकळी येऊ दिली. ओट्स तयार.
●●साधे ओट्स:-
२-३ चमचे ओट्स पावडर मीठ घालून शिजवून घेणे.
ओट्स मध्ये वेगवेगळ्या भाज्या किंवा फळे घालुन बाळासाठी वेगवेगळ्या रेसिपी बनवणे.
टीप-सुरवातीला कोणताही पदार्थ मुलांना थोड्या प्रमाणात द्यावा व संडास जास्त होणे, खाल्यावर 1 तासाने रडून पोटाला दाबणे असे दिसल्यास अजून 2-3 महिन्यांनी देऊन निरीक्षण करावे. एकदम जास्त प्रमाणात पदार्थ खाण्यास न देता 15-15 दिवसांनी वाढ करत जावे.

‘मुलांना सतत बिझी ठेवण्याच्या आजाराचं करायचं तरी काय?’

‘मुलांना सतत बिझी ठेवण्याच्या आजाराचं करायचं तरी काय?’
#मुलांना_फुलू_द्या
– मनीषा उगले
‘Meaningfully engaging the classroom’ या मुद्द्यावर मनात आलेले काही विचार आपल्यासमोर ठेवते आहे.
मुलांना एंगेज ठेवायचं म्हणजे exactly काय अपेक्षित असतं आपल्याला?
वर्गात शिक्षक एकतर्फी अध्यापन करत नसतील, मुलांसोबत उत्तम interaction असेल तर तितका वेळ मुलं छान बिझी असतातच.
पण ज्यावेळी शिक्षकांना इतर काम असेल तर शिक्षक मुलांना काहीतरी काम देतात आणि गुंतवून ठेवतात. कारण मुलं रिकामी असली की गोंगाट करतील असं त्यांना वाटतं आणि एखाद्या वर्गातून गोंगाट ऐकू येणं हे शाळेत बेशिस्तपणाचं मानलं जातं.
मुलांना सतत गुंतवून ठेवणं अपेक्षित असल्याने अनेकदा मुलांवर ‘उपक्रमांचा’ मारा सुद्धा केला जातो.
एखाद्या वर्गात वर्गशिक्षक नसले तर ‘पाढे पाठ करा, स्वाध्याय सोडवा, वाचन करा किंवा गणितं सोडवा’ अशी सूचना दुसरे शिक्षक येऊन करतात. पण ‘तुमच्या आवडीचं काम करा, हवा असल्यास आराम करा’ अशी सूचना क्वचितच कोणी करत असेल. किती जपतो मुलांची मनं आपण?
मुलांना बिझी ठेवायचं असेल तर ते का ठेवायचं आहे? हे समजून उमजून आणि मुलांच्या चिकित्सक, सर्जनशील विचारप्रक्रियेला चालना देतील असे उपक्रम आपण डिझाईन करायला हवेत. (उपक्रम शब्दाची मी थोडी धास्ती घेतली आहे. उपक्रमाच्या नावाखाली हल्ली कोणत्या निरर्थक गोष्टीचा आपल्यावर मारा होईल हे सांगता येत नाही.)

Read more

*बालपण करपवू नका!* – _भाऊसाहेब चासकर_

*बालपण करपवू नका!*
– _भाऊसाहेब चासकर_
राज्यात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीचे वय यंदा सहा वर्षे ठेवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील काही प्रवेश परीक्षांपासून वंचित राहतात किंवा एक वर्ष उशिराने पात्र ठरतात. पहिलीत प्रवेशासाठीचे वय सहा वर्षे केल्याने मुलांचे नुकसान होते. ते पाच वर्षे करावे, असा पवित्रा घेत एका पालकाने याला आव्हान देणारी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. रवींद्र देशपांडे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. ऑनलाइन पिटिशनच्या माध्यमातून ते लोकसहभाग मिळवत आहेत. अनेक पालकांना त्यांचे मुद्दे पटत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा शाळाप्रवेशाचे वय नेमके किती असावे, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला अनेक कंगोरे, आयाम आहेत. त्याची चर्चा व्हायला हवी.

Read more

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
देशात आरोग्य विज्ञान शिक्षणात समानता आणि या क्षेत्रात विद्यापीठीय श्रेष्ठता येण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने स्वतंत्रपणे आरोग्य विद्यापीठ स्थापन्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतला या धोरणानुसार देशात पहिले आरोग्य विज्ञान विद्यापीठ 1986 साली विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे स्थापित झाले आणि त्यास एन.टी.रामराव यांचे नांव दिले गेले.
महाराष्ट्र सरकारने नाषिक येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाची म.आ.वि.वि. कायदा 1998 द्वारे 3 जून 1998 रोजी स्थापना केली. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि भारतीय पध्दतीचे वैद्यकीय शिक्षण यांचा समतोल विकासासाठी तसेच आरोग्य विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता नियोजनबध्दरित्या वाढण्याच्या दृष्टीने राज्यात हया विद्यापीठाची निर्मिती केली

Read more