Back to Top

Author Archives: swarda

पूर्व प्राथमिक शिक्षण

पूर्व प्राथमिक शिक्षण

पूर्व प्राथमिक शिक्षण, बालपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यांत शिक्षण, बालपणात प्रारंभ आणि प्राथमिक शाळेत प्रवेश केल्यावर सुमारे पाच, सहा, किंवा सात वर्षांच्या वय

शिक्षणासाठी संस्थात्मक व्यवस्था जगभरात मोठ्या प्रमाणात बदलतात, जसे संस्थांना लागू केलेली नावे. सामान्यत: अर्भकांच्या काळजीसाठी केंद्राला दिलेल्या अटी – लहानपणाच्या पहिल्या टप्प्यातील (सुमारे तीन महिने ते तीन वर्षे वयाची) – अर्भक शाळा, डे केअर, डे नर्सरी आणि क्रेच , सर्वात सामान्य म्हणजे  नर्सरी शाळा आणि बालवाडी. सामान्यतः,बालवाडीच्या आधी (चार किंवा पाच ते सहा वयोगटांसाठी) , जे शालेय वयाच्या मुलांसाठी आहे ज्यांना पुरेसे परिपक्व मानले जात नाही आणि म्हणून ते प्राथमिक शाळेसाठी एक प्रकारची तयारी शाळा म्हणून काम करतात. बालवाडी प्राथमिक शिक्षणाचा एक भाग मानली जाते.

 

पूर्व प्राथमिक शिक्षण इतिहास

Read more

सर्व शिक्षा अभियान

सर्व शिक्षा अभियान

#6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार देणा-या भारतीय राज्यघटनेच्या 86 व्या तरतुदीनुसार, प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी, केंद्र सरकार सर्व शिक्षा अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबवत आहे.
#1.1 दशलक्ष वसाहतींमधील 192 दशलक्ष मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची गरज भागवण्यासाठी, राज्य शासनांच्या भागीदारीसह सर्व शिक्षा अभियान राबवले जात आहे.
#शाळा नसलेल्या भागांमध्ये नव्या शाळा सुरु करणे आणि शाळा असतील त्या ठिकाणी अतिरिक्त वर्गखोल्या, प्रसाधनगृहे, पेयजल, देखभाल अनुदान आणि शाळेत सुधारणा घडवून आणण्यासाठी अनुदान प्राप्त करून देणे असे उपक्रम या कार्यक्रमांर्गत राबवले जातात.

Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

पुणे हे महाराष्ट्रातील मुख्य शैक्षणिक केंद्र आहे. भारत आणि जगाच्या कानाकोप यातून असंख्य विद्यार्थी पुण्यात येतात. इतर शैक्षणिक केंद्रांच्या तुलनेत हे शहर सुरक्षित आणि शांत शहर आहे. पुण्याचे वातावरण आरोग्यासाठी सुखद आणि चांगले आहे. पुणे शहरात अनेक नामांकित, स्थापित संस्था आणि महाविद्यालये आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शहरातील एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय शैक्षणिक केंद्र आहे. हे विज्ञान, वाणिज्य, कला, भाषा आणि व्यवस्थापन अभ्यास

Read more

नवोदय विद्यालय

नवोदय विद्यालय

जवाहर नवोदय विद्यालय (जेएनव्ही) ही मुख्यत्वे भारतातील ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती शाळांची एक प्रणाली आहे. नवोदय विद्यालय समिती, नवी दिल्ली ही संस्था भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय (एमएचआरडी) शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागांतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. जेएनव्ही पूर्णपणे केंद्रीय आणि माध्यमिक शिक्षण मंडळाशी संबंधित सीबीएसई (सीबीएसई) पूर्णपणे निवासी आणि सहा शैक्षणिक शाळा असून सहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग आहेत. जेएनव्हीला विशेषतः भारताच्या ग्रामीण भागात हुशार मुले शोधण्याची आणि त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा विचार न करता त्यांना उत्तम निवासी शाळा प्रणालीइतकेच शिक्षण प्रदान करण्याचे काम दिले जाते. ज्यामुळे ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट प्रतिभा बाहेर येईल. विशिष्ट प्रतिभा किंवा योग्यता असलेल्या मुलांना त्यांच्या देय देण्याच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करून चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण उपलब्ध करून वेगाने प्रगती करण्याची संधी दिली पाहिजे. अशा शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरी भागांशी समान पातळीवर स्पर्धा करता येईल.एक अनोखा प्रयोग म्हणून सुरू झालेली नवोदय विद्यालय प्रणाली आज भारत व इतरत्र शालेय शिक्षणाच्या इतिहासात अतुलनीय आहे. हे लक्ष्य गट म्हणून प्रतिभावान ग्रामीण मुलांची निवड आणि निवासी शाळा प्रणालीतील गुणवत्तेच्या तुलनेत गुणवत्तेचे शिक्षण देण्याच्या प्रयत्नात आहे.

Read more

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशि

देशात आरोग्य विज्ञान शिक्षणात समानता आणि या क्षेत्रात विद्यापीठीय श्रेष्ठता येण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने स्वतंत्रपणे आरोग्य विद्यापीठ स्थापन्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतला या धोरणानुसार देशात पहिले आरोग्य विज्ञान विद्यापीठ 1986 साली विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे स्थापित झाले आणि त्यास एन.टी.रामराव यांचे नांव दिले गेले.
महाराष्ट्र सरकारने नाषिक येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाची म.आ.वि.वि. कायदा 1998 द्वारे 3 जून 1998 रोजी स्थापना केली. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि भारतीय पध्दतीचे वैद्यकीय शिक्षण यांचा समतोल विकासासाठी तसेच आरोग्य विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता नियोजनबध्दरित्या वाढण्याच्या दृष्टीने राज्यात हया विद्यापीठाची निर्मिती केली.

 

नाशिकच्या दिंडोरीरोड म्हसरूळ शिवारात 51 एकर क्षे़त्रात म.आ.वि.वि.ची निर्मिती करण्यात आली आहे. या परिसरात मुख्य प्रशासकीय भवन, शिक्षक प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, आतिथीगृह, माननीय कुलगुरूंचे निवासस्थान व अधिकाऱ्‍यांसाठी क्वार्टर्सच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आहे. उत्तम व तत्पर प्रशासनासाठी विद्यापीठाने प्रशासन, अॅकॅडमिक, वित व परीक्षा विभागाचे संगणकीकरण केले आहे. व्हीडिओ काॅन्फरन्सच्या दृष्टीने विद्यापीठ व मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद प्रादेशिक विभाग जोडण्यात आले आहे.
अनेक आरोग्य विज्ञान महाविद्यालये जे पूर्वी परंपरागत विद्यापीठाषी संलग्न होते ते म.आ.वि.वि.नाशिकच्या कार्यक्षेत्रात आले आहेत. विद्यापीठ स्थापन करण्याच्या वेळी 193 आरोग्य विज्ञान महाविद्यालये एकूण 11995 विद्याथ्र्यांच्या जागासहित आणि  संस्था विद्यापीठाशी संलग्न झाल्या आहेत.

गेल्या 15 वर्शात विद्यापीठाने विविध प्रकारे संलग्न महाविद्यालयांच्यात सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जात अमुल्य चांगल्या सुधारणा तसेच महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा आणि हाॅस्पिटलच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांची सक्तीने उपस्थिती, अभ्यासक्रमात नियमित अद्ययावतीकरण, वेळापत्रकाची निष्चिती, विद्यार्थीनिहाय शिक्षण कार्यक्रम, सर्व विभागाच्या अभ्यासक्रमाचे नियोजन फिरत्या स्वरूपात सक्तीच्या इंटर्नशीप कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची क्षमता सुधारीत करण्याचा प्रयत्न केला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मुल्यतत्वे आणि शिष्टाचार अंगिकारून सामजिक प्रश्नांची उकल करण्याचे शिक्षण देण्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न केले आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात सापेक्ष डाॅक्टर विद्यार्थ्यांची संवाद कला सुयोग्य व सुधारीत करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचा सहभाग सुकर होणार आहे. विद्यापीठाने ‘डिजिटल’ ग्रंथालय निर्माण केले आहे. त्यामुळे सुमारे 2500 जर्नल्समध्ये महाविद्यालयांचा आणि व्यक्तीशः विद्यार्थ्यांचा सहभागाचा दुवा साधण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. पी.एच.डी.साठी विद्यार्थ्यांना प्रवेश सुलभ केला आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एजन्सीशी सांगड घालून विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय शिक्षणातील बदलत्या जागतिकीकरणा संदर्भात थरार संपन्न कल निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याद्वारे सामाजिक व्यावसायिकक्षम डाॅक्टर्स निर्मितीचा ध्यास विद्यापीठाने सुरू ठेवला आहे. आरोग्य विज्ञान महाविद्यालयांची संलग्नता

  • मेडिकल 35
  • डेंटल 28
  • आयुर्वेद 62
  • युनानी 06
  • होमिओपॅथी 45

इतर:-बी.पी.टी.एच.,बी.ओ.टी.एच.,बीएससी नर्सिंग,पीबीबीएससी नर्सिंग,
बी.ए.एस.एल.पी., बी.पी.ओ. – 154.
एकूण मआवि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये: 330
Quality Policy(गुणवत्तेचे धोरण)

आम्ही म.आ.वि.वि. वचनबध्द आहोत.
आरोग्य विज्ञानाच्या शिक्षणाबाबत उच्च दर्जाची गुणवत्ता असलेले आंतरराष्ट्रीय केंद्र निर्माण करण्याचा मआवि विद्यापीठाचा प्रयत्न राहील. आरोग्य विज्ञान शिक्षणात नैतिक मुल्यावर आधारीत शिक्षणाचे वातावरण, अष्टपैलु आणि आंतरशिस्तबध्द संशोधन व प्रशिक्षण दिले जाईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानातून गुणवत्तापूर्ण तसेच कौशल्ययुक्त शिक्षण अंगिकारले जाईल. आरोग्य रक्षणाचा व्यावसायिक ध्यास-दृष्टिकोन असलेल्यांच्या हातून सापेक्ष स्वरूपात समाजाच्या आरोग्याची काळजी करणारी सेवा उत्तम प्रयत्न करील.
परिणामकारक प्रषासनातून प्रामाणिक, पारदर्शक, जबाबदारीची पध्दत अवलंब करून प्रगतशील तंत्रज्ञानाद्वारे एक सर्वोत्तम माॅडेल उभारण्याचा आणि सर्वांचेच समाधान देणारा दर्जा निर्माण केला जाईल.

विद्यापीठाचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम

वैद्यकीय

 

एम.बी.बी.एस. (बॅचलर ऑफ मेडिसिन अ‍ॅन्ड सर्जरी)

 

बी.पी.एम.टी. (बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी)

 

एमडी (डॉक्टर ऑफ मेडिसिन)

 

एम.एस. (मास्टर ऑफ सर्जरी)

 

डी.एम. (डॉक्टर ऑफ मेडिसिन)

 

एम.एच.एच. (चिरुगीचे मॅजिस्टर)

 

दंत

 

बी.डी.एस. (दंत शस्त्रक्रिया आणि औषध पदवी)

 

एम.डी.एस. (मास्टर ऑफ डेंटल सर्जरी)

 

आयुर्वेद

 

बी.ए.एम.एस. (आयुर्वेद चिकित्सा व शस्त्रक्रिया पदवी)

 

एमडी (डॉक्टर ऑफ मेडिसिन) (आयुर्वेद वाचस्पती)

 

एम.एस. (सर्जरीचे डॉक्टर) (आयुर्वेद धनवंतरी)

 

युनानी

 

बी.यू.एम.एस. (युनानी वैद्यकीय औषध व शस्त्रक्रिया)

 

एमडी (डॉक्टर ऑफ मेडिसीन) (माहिर-ए-टिब)

 

एम.एस. (सर्जरीचे डॉक्टर) (माहिर-ए-जराहत)

 

अलाइड हेल्थ सायन्सेस

 

बी.पी.टी.एच. (बॅचलर ऑफ फिजिओथेरपी)

 

एम.पी.टी. (मास्टर ऑफ फिजिओथेरपी)

 

BOP.TH. (बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी)

 

एम.ओ.टी. (ऑपरेशनल थेरपीचे मास्टर)

 

बी.ए.एस.एल.पी. (ऑडिओलॉजी आणि भाषण भाषा पॅथॉलॉजी मध्ये बॅचलर)

 

बी.एस.सी. (एच. एल. एस.) (विज्ञान पदवी (सुनावणी, भाषा आणि भाषण)

 

एम.ए.एस.एल.पी. (मास्टर ऑफ ऑडिओलॉजी स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजी)

 

बी.पी.ओ. (प्रोस्थेटिक्स बॅचलर)

 

एम.पी.ओ. (मास्टर ऑफ सायन्स (प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स)

 

बी.एस.सी. नर्सिंग (नर्सिंगमधील विज्ञान पदवी)

 

बेसिक बी.एस.सी. नूरसिंग (नर्सिंगमधील मूलभूत विज्ञान पदवी)

 

पी.बी.बी.एससी. नर्सिंग (पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग)

 

पी.बी.बी.एस.सी. नूरसिंग (नर्सिंगमधील विज्ञान पदवी मध्ये मूलभूत प्रमाणपत्र)

 

पी.सी.बी.एस.सी. नूरसिंग (नर्सिंगमधील विज्ञान पदवी प्रमाणपत्र)

 

एम.एस्सी. नर्सिंग (मेडिकल सर्जिकल नर्सिंग)

 

(इतर आरोग्य विज्ञान अंतर्गत इतर पदव्युत्तर पदवी, पदविका, फेलोशिप आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम)

 

प्राध्यापक, पीएचडी, आय.पी.पी.सी इंटर पोस्ट ग्रॅज्युएट पेडियाट्रिक सर्टिफिकेट कोर्स, आंतरराष्ट्रीय सहयोगी
Course with University of Sydney Australia)

अव्वल दर्जाचे श्रेष्ठतापूर्ण डिपार्टमेंटस्

  • डिपार्टमेंट आॅफ इंटरडिसीप्लीनरी रिसर्च अॅण्ड टेक्नाॅलाॅजी नाशिक.
  • डिपार्टमेंट आॅफ इन्फेक्शियस डिसीजेस, मुंबई.
  • डिपार्टमेंट आॅफ मायक्रो डेंन्टीस्ट्री, मुंबई.
  • इन्स्टिटयूट आॅफ मेडिकल एज्युकेशन टेक्नाॅलाॅजी अॅण्ड टिचर्स ट्रेनिंग,पुणे.
  • डिपार्टमेंट आॅफ जेनेटिक्स, इम्युनाॅलाॅजी, बायोकेमिस्ट्री अॅण्ड न्युस्ट्रेशन ,पुणे.
  • स्कुल आॅफ हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेशन , पुणे.
  • डिपार्टमेंट आॅफ कम्युनिटी आॅप्थॅलमाॅलाॅजी अॅण्ड पब्लिक हेल्थ  औरंगाबाद.
  • डिपार्टमेंट आॅफ ट्रायबल हेल्थ, नागपूर.
  • डिपार्टमेंट आॅफ आयुष, नाशिक.

लवकरच सुरू होणारे नवीन डिपार्टमेंटस्

  • डिपार्टमेंट आॅफ हेल्थ कम्युनिकेशन,
  • डिपार्टमेंट आॅफ डिसॅस्टर मेडिसिन,
  • डिपार्टमेंट आॅफ इंटरनॅशनल स्टडीज्

संशोधन कार्यासाठी विद्यापीठाकडून योजना राबविल्या जात आहेत. पीएच.डी. ही सन्मान्य पदवी प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. या संशोधनासाठी 41 संशोधन केंद्रे ठरविण्यात आली आहेत. लॅनसेट च्या धर्तीवर एज्युकेशन फाॅर हेल्थ या नावाचे जर्नल सुरु करण्याचे ठरले आहे. संपूर्ण भारतात आगळे वेगळे ठरणारे आंतरविद्याशाखा संशोधन विभाग विद्यापीठात सुरु करण्यात आला आहे. अॅलोपॅथी, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, तत्सम विद्याशाखा यांचा समन्वय साधून संशोधनाला चालना देणारे विभाग येथे आहे.
मेडिकल टुरिझम क्षेत्रात भारत जगभरात आघाडीवर आहे. अत्यंत कुशल व तज्ज्ञ वैद्यकीय तज्ज्ञांची उपलब्धता, अत्याधुनिक रुग्णालये, अद्ययावत तंत्रज्ञान आदिंनी सुसज्ज असलेले काॅर्पोरेट हाॅस्पिटलमधील उपचार हे युरोप-अमेरिकेपेक्षा खुपच स्वस्त आहेत. यामुळे आज जगभरातून रुग्ण भारतात उपचारासाठी येत आहे. अश्या सर्व बाजूंनी विकसित होणाऱ्‍या हेल्थ केअर इंडस्ट्रीला गरज आहे. ती कुशल मनुष्यबळाची. आरोग्य सेवा देणाऱ्‍या तज्ज्ञांची जशी गरज आहे. तशी या क्षेत्राचे सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन सांभाळू शकणाऱ्‍या हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेटर्सची देखील मोठया प्रमाणावर आवश्यकता आहे. वेगाने वाढणाऱ्‍या इंडस्ट्रीजची गरज लक्षात घेऊन विद्यापीठातर्फे वैद्यकीय व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी एम.बी.ए. (हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेेशन) हा दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केला आहे. तसेच विविध फेलोशिप व सर्टिफिकेट कोर्स सुरु करण्यात आले आहे. यात वैद्यकीय विद्याशाखेतील सहासष्ट फेलोशिप कोर्सेस आणि चार ट्रेनिंग प्रोग्राम, दंत विद्याशाखेसाठी दोन फेलोशिप कोर्स, आयुर्वेद विद्याशाखेसाठी दोन फेलोशिप कोर्स आणि चार सर्टिफिकेट कोर्स तसेच तत्सम विद्याशाखेसाठी चार फेलोशिप कोर्स आणि तीन सर्टिफिकेट कोर्स असे एकूण चैऱ्या‍हत्तर फेलोशिप आणि चैदा सर्टिफिकेट कोर्स सुरु करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सर्टिफिकेट कोर्स इन डिझास्टर मेडिसिन आणि फेलोशिप कोर्स इन एमेर्जन्सी मेडिसिन अॅन्ड ट्राॅमा केअर कोर्सेस लवकरच सुरु होणार आहे. आयुर्वेद संशोधनासाठी आयुष विभागाची स्थापना करण्यात आली आहे. विविध रुग्णांवर उपचार करुन चिकित्सा पध्दतीची प्रमाणताही सिध्द केली जाणार असून विद्यापीठाच्या परिसरात दुर्मिळ वनौषधींचे उद्यानही साकारले जात आहे. लवकरच क्लिनिकल इंजिनियरिंग हा नवा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. विद्यापीठ अधिकारी

कुलगुरु-

महाराष्ट्र सरकार

माननीय श्रीभगत सिंह कोश्यारी

प्रो कुलगुरू

वैद्यकीय शिक्षण मंत्री

माननीय श्री अमीत देशमुख

कुलगुरू

प्रा.दिलीप म्हैसेकर

प्रति कुलगुरु-

प्रो कुलगुरू

प्रा.डॉ. मोहन खामगावकर

 

ध्येय आणि उद्दिष्टे ( Aims and Objectives )

  • राज्यात आरोग्य विज्ञान शिक्षणात सर्वंकश वाढ करणे.
  • सामाजिक, कौषल्य आणि व्यावसायिक चांगले पदवीधर निर्माण करणे.
  • शिक्षकांची गुणवत्ता वाढविणे.
  • संशोधन कार्यास प्रोत्साहित करणे.
  • समाजाशी वचनबध्द असणे.
  • शिक्षण व संशोधनासाठी श्रेष्ठदर्जाचे व उत्तरदायी प्रशासन, वैज्ञानिक व्यवस्थापन व विकास संघटीत करणे.
  • विद्याथ्र्यांमध्ये विद्यापीठीय आणि तत्संबंधी विषयात गुणवत्तापूर्ण स्पर्धात्मक व कसोटीपूर्ण पात्रता निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्टा करणे.
  • ज्ञानाची निर्मिती, संवर्धन आणि प्रसार करण्याची जबाबदारी अंगिकारणे.
  • आरोग्य विज्ञान व शिक्षणाच्या सोयीसुविधांचे समाज वितरणासाठी प्रयत्न करणे.

संशोधन वाढीची कार्यक्षमतापूर्ण कृती (Research promoting Activities)

  • शिक्षकांना संशोधन अनुदान (शिष्यवृत्ती).
  • शिक्षकांना प्रवास अनुदान (शिष्यवृत्ती).
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशनांत लेखांच्या प्रसिध्दीसाठी पुरस्कार.
  • विद्याथ्र्यांना संशोधन शिष्यवृत्ती.
  • राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यशाळेंना अनुदान.
  • चिकित्सालयीन संशोधन पध्दती कार्यशाळेंना अनुदान.
  • पी.एच.डी. पूर्व प्रवेश परीक्षा घेणे.
  • पी.एच.डी. नोंदणी करणे.
  • सहामाही अहवाल.
  • विभागीय पी.एच.डी. सेमिनार.
  • लेखनचैर्यावरदक्षता.

विद्यार्थी कल्याण योजना (Student Welfare Scheme)

  • धन्वंतरी विद्याधन योजना – विद्याथ्र्याने घेतलेल्या शैक्षणिक कर्जाचे व्याजासाठी आर्थिक साहाय्य विद्यापीठ देते.
  • सावित्रीबाई फुले योजना-गरजू गरीब विद्यार्थीनीला रू.25,000/- ची षिश्यवृत्ती.
  • पुस्तक पेढी योजना-गरजू गरीब विद्याथ्र्यांना पुस्तकांसाठी रू. 30,000/- चा फंड.
  • नैतिक मुल्यासाठी विशेष बोर्ड – समाजाला उपयुक्त ठरेल अषा वैशिष्टयपूर्ण इतर जादा शैक्षणिक कार्यासाठी प्रत्येक महाविद्यालयांना रू.10,000/- विद्यापीठाकडून वितरीत.
  • सुरक्षेसाठी विद्यार्थी संजीवनी सुरक्षा योजना – गरजू विद्याथ्र्यांना वैद्यकीय उपचारासाठी रू.2,000/- ते रू.1,00,000/- दिले जातात.
  • विद्याथ्र्याचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास पालकास रू.1,00,000/- दिले जातात.
  • शिका अन् कमवा – विद्यापीठ षिका अन् कमवा योजनेखाली प्रत्येक विद्याथ्र्याला रू.16,000/- चे साहाय्य देते. त्यामुळे त्याला षिक्षण घेतांना कामाचे महत्व कळते आणि त्याचवेळी उत्पन्नामुळे त्यास मदतही मिळते.

सांस्कृतिक विभाग
कुटुंब दत्तक योजना- या योजनेनुसार प्रत्येक महाविद्यालय एक गांव दत्तक घेते आणि त्या परिसरात प्राथमिक आरोग्य रक्षा सुविधा पुरवते. तसेच गावकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करते. प्रत्येक विद्यार्थी 3 ते 4 कुटुंब दत्तक घेतात.
मानसिक समुपदेषन – ताणतणावाखाली विद्याथ्र्याला अभ्यासात अपयष आल्यास त्याला औदासिन्य आणि नैराश्यपासून परावृत्त करण्यासाठी विद्यापीठाने नवीन कार्यक्रम हाती घेतला असून त्याला मानसिक समुपदेशानाद्वारे ताण-तणाव व शैक्षणिक अपयशापसून परावृत्त केले जाते. एन.एस.एस.विभाग – नॅशनल सव्र्हिस स्कीम छैै हा केंद्र व राज्य शासनाचा संयुक्त कार्यक्रम आहे.

 

शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी

सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण (Continuing Medical Education) आणि सातत्यपूर्ण व्यावसायिक कौशल्य विकास (Continuing Professional Development) या कनिष्ठ मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील शिक्षकांच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणाऱ्या बाबी असतात. यामुळे विशिष्ट विषयातले अद्ययावत ज्ञान व माहिती शिक्षकांना प्राप्त होऊ शकते. या मध्यवर्ती संकल्पनांमधूनच शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीची अद्ययावत व देखणी वास्तू आरोग्य विद्यापीठाच्या प्रांगणात उभी राहिली आहे. यामध्ये आरोग्यशास्त्र शाखांच्या शिक्षकांसाठी अभ्यासक्रमाचा विकास, शिकवण्याची नवनवीन तंत्रे व पध्दती, मूल्यमापनाच्या पध्दती आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी करावयाचे प्रयत्न या बाबतचे प्रशिक्षण देणे असा या मागील उद्देश आहे. या प्रबोधिनीमध्ये 1000 आसन क्षमतेचे प्रेक्षागृह, 108 आसन क्षमतेचे बहुद्देशीय सभागृह, 80 आसन क्षमतेचे सभागृह, अत्याधुनिक सोयीसुविधा युक्त काॅन्फरन्स, व्हीआयपी बहुद्देशीय रुम, 150 आसन क्षमतेचे अत्याधुनिक विजेवरील उपकरणे असलेले अॅम्पीथिएटर आदी सर्व वातानुकुलित असलेली शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीची वास्तू आहे.

 

वैद्यकीयशास्त्र इतिहास संग्रहालय

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संपूर्ण आशिया खंडात आगळे वेगळे ठरले असे आरोग्य विद्याशाखांचे वस्तुसंग्रहालय(Museum of History of Medicine) विद्यापीठाच्या मुख्यालयातील आवारामध्ये आकाराला आले आहे. आरोग्यशाखांच्या पाचही विद्याशाखांच्या उगमापासूनच्या आजवरचा सर्व प्रवास या वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून दर्शविला आहे. वैद्यकशास्त्राच्या विविध शाखांच्या अभ्यासासाठी व भविष्यातील संशोधनाची दिशा ठरविण्यासाठी भूतकाळाचा अभ्यास, संदर्भ विशेष उपयुक्त ठरतात. या संग्रहालयामध्ये व्यक्ति चित्रे, कालदर्शिका, अर्धपुतळे साधने, छायाचित्रे, तक्ते, विविध वस्तू, त्रिमितीय देखावे आदींच्या सहाय्याने हा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाशिकमधील हे आगळे वेगळे वस्तुसंग्रहालय केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील जिज्ञासंूना ज्ञानाचा आगळा वेगळा खजिनाच उघडून देणारे आहे. –

 

 

संदर्भ_

 

1वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग, शासन महाराष्ट्राचा

2संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन

3मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया

4डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया

5सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन

6केंद्रीय होमिओपॅथीची परिषद

7भारतीय पुनर्वसन परिषद

8भारतीय नर्सिंग कौन्सिल

9इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट

10विद्यापीठ अनुदान आयोग

11भारतीय विद्यापीठांची संघटना

12शिक्षण शुल्का समिती

13आयुर्वेद संशोधन डेटाबेस

14कोहम संग्रहालय

16वेबबेस्ड शैक्षणिक संसाधने

17ऑनलाईन सर्वेक्षण (सर्व्हेनेकी डॉट कॉम)

18आरोग्यासाठी शिक्षण (एमयूएचएस द्वारे व्यवस्थापित आंतरराष्ट्रीय जर्नल)

उच्च शिक्षणावर अखिल भारतीय सर्वेक्षण

20शैक्षणिक संप्रेषणासाठी कन्सोर्टियम (सीईसी)

21भारतीय विद्यार्थी संसद

22राष्ट्रीय प्रशिक्षु प्रशिक्षण योजना (एनएटीएस)

23राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय

24ओपन सोर्स डिजिटल लायब्ररी

एमयूएचएस कायदा 1998

http://www.muhs.ac.in/upload/Lind%20_of%20affused_%20 महाविद्यालये 10020_141013.

“शैक्षणिक वर्ष २०११-१२ साठी आरोग्य विज्ञान महाविद्यालयाच्या संबद्ध स्थितीबद्दल महत्त्वपूर्ण सूचना”

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

महाराष्ट्र-डीएमईआर

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये

महाराष्ट्रातील विद्यापीठे

कॅटेगरीज: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्यापीठे भारतातील वैद्यकीय महाविद्यालये महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालये नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था १ 1998 1998 19-9 in मध्ये प्रतिष्ठान स्थापना केली.

#आशिया खंडातील सर्वांत मोठे रांजणखळगे

#family time
#आशिया खंडातील सर्वांत मोठे रांजणखळगे
अहमदनगर मधील पारनेर तालुका अनेक आश्चर्याने भरलेला आहे त्यातच निघोज चे रांजणखळगे म्हणजे आशियातील सर्वात मोठे रांजणखळगे..
या गावात “श्री मळगंगा माउली”चे सुंदर संगमरवरी मंदिर आहे. याची उंची ८५ फ़ूट आहे व संपूर्ण देवळावर संगमरवरात अप्रतीम कोरीव काम आहे. आणि मातेची स्वयंभू मूर्ती आहे.
या मंदिरासमोर २५ फ़ुटी, दीपमाळ आहे.
गावापासून तीन कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या पात्रात रांजणखळगे आहेत.
तिथे पोचल्यावर दिसणारा अभूतपूर्व नजारा नजरेत/कॅमेऱ्यात किती आणि कसा साठवू असं होऊन जातं. आणि निसर्गाच्या करामतीचा क्षणोक्षणी प्रत्यय यायला लागतो.
सपाट पसरलेल्या काळ्या कभिन्न कातळांवरून सावधपणे चालायला लागत होतं. कारण याच कातळात शिल्पं कोरावीत तसे निसर्गनिर्मित रांजण खळगे कोरले गेले होते. आम्हीही हा चमत्कार डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो.
नदीच्या पात्रात २०० मि. लांब आणि ६० मि. रुंद अश्या भागात अनेक रांजणखळग्यांनी चित्तवेधक शिल्पे तयार केली आहेत. काही रांजणखळगे खूप खोल आणि बरेच लांब आहेत भूशास्त्रद्न्यांच्या मते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती झाली आहे. कुकडी नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक आहेत. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठिण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रीयेमुळे नदीच्या पात्रात हे रांजण खळगे तयार झाले आहेत.
या खळग्यातून लांबून जोरात वहात आलेले पाणी तिथल्या तिथेच एखाद्या छोट्या धबधब्याप्रमाणे कोसळत होते. काही खळग्यांच्या धारदार काठांवरून पाण्याचे तुषार उडताना दिसतात.
कुकडी मातेचे पाणी एका रांजण खळग्यातून दुसऱ्यात लपंडाव खेळत उड्या मारत पुढे जाताना बघून आपण जणू संमोहितच होतो.
काही कुंडात पाणी साठून राहिल्याने त्यात दुर्मीळ अशी हायड्रिला वनस्पती तयार होते. या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी इथे वनस्पती शास्त्रज्ञ भेटी देतात.
या रांजणखळग्यातून वहात पुढे ही कुकडी नदी खडकांच्या तयार झालेल्या दोन अजस्र भिंतींमधून वाहते
या रांजणखळग्यांच्या वरच्या भागात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. एकंदरीतच सगळीकडे पाणी आणि हिरवाई बघून डोळे निवतात.
या रांजण खळग्यांना क्रॉस करून गेलं की इथेही मळगंगा मातेचं मंदिर आणि भक्त निवास आहे. एक मोठा सभामंडप आहे.
गेल्या दोन तीन वर्षात रांजण खळग्यांचा हा प्रवाह क्रॉस करण्यासाठी एक सुंदर झुलता पूल बांधला आहे. यामुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे आणि या पुलामुळे पर्यटनस्थळ म्हणून या जागेचे सौंदर्य वाढले आहे.
या ठिकाणाच्या भौगोलिक, शास्त्रीय आणि धार्मिक महत्वामुळे इथे वनस्पतीशास्त्रद्न्य, भाविक, पक्षीप्रेमी, इतिहास संशोधक, भूगोल अभ्यासक, विद्यार्थी असे विविध स्तरातील पर्यटक भेटी देतात.
बाकी चैत्रात यात्रा, नवरात्रात उत्सव, उरूस यांची धामधूम संपूर्ण वर्षभर चालूच असते.
+17
Dattatraya Gawade, Shashank Khedekar and 84 others
11 Comments
1 Share
Like

Comment
Share

11 Comments

View 8 more comments

#लवणस्तंभ

रांजणखळगे पाहून झाल्यावर अजुन एक पारनेर मधील आश्चर्यकारक ठिकाण म्हणजे वडगाव दर्या पाहायचे ठरले.. . वडगाव दर्या म्हणजेच प्रसिद्ध माकडाचे वडगाव जसे हे ठिकाण माकडासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते लवनस्तंभा साठीही प्रसिद्ध आहे .
लवणस्तंभ ….एक नैसर्गिक भुरूप !गुहांमधील क्षारयुक्त द्रव्यामुळे तयार झालेले स्तंभ म्हणजे लवणस्तंभ . पठार ,मैदान ,पर्वत,डोंगर,दरी, घळई इत्यादी भुरूपा सारखे हे सुद्धा एक भुरूप आहे .परंतु हे भुरूप आपल्याला पहाण्यासाठी दुर्मिळ असते .ब्रिटन,युगोस्लाव्हिया ,यु एस ए ,आदी देशात हे पहायला मिलते ,भारतात ते फक्त दोन ठिकाणी पहायला मिळतं एक म्हणजे उत्तरभारत आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या या ठिकाणी …. येथे दोन गुहा आहेत आणि त्यात अधोमुखी लवणस्तंभ तयार झालेले आहेत ….हा एक नैसर्गिक अविष्कार आहे. ……
वडगाव मध्ये कातळ खडकात दोन गुहा आहेत. एक वेल्हाबाईची आणि दुसरी दर्याबाईची. गुहेतून आत जाताना कातळ आहेत. वरच्या छताच्या बाजुनेच सतत पाणी ठिबकत असते. ते साठवण्यासाठी खाली टाक्या, हौद बांधलेले आहेत. ठिबकणारे पाणी त्यात साठते. जंगलातील प्राणी, पक्षी यांना प्यायला उपयोगी पडते. या पाण्यात कलशियम कार्बोनेट आहे. पाण्यातील क्षारांपासून लवण स्तंभ तयार होतात. येथे अधोमुख म्हणजे खाली आणि उधोमुखी म्हणजे वर असे दोन्ही प्रकारचे लवण स्तंभ आहेत. म्हणजे वरून खाली येणारे खालून वर जाणारे. वरचे पाणी खालच्या पाण्याला खेचते. त्यामुळे खालीही वर झेपावणारे उभट लवण स्तंभ तयार होतात. ही अनेक वर्षांपासून मंदगतिने चालणारी क्रीया अजूनही सुरू आहे. चुनखडीच्या प्रदेशात गुहा निर्माण होतात. तिथले पाणी क्षारयुक्त असते. अशा सतत टपकणाऱ्या पाण्यापासून लवण स्तंभ तयार झालेले आहेत. खडकाला चिकटलेले हे स्तंभ आहेत. एका ठिकाणी गोमुखातून पाणी पडते. हा निसर्गाचा चमत्कार पाहून आम्ही स्तिमित झालो.खूपच थंडगार पाणी तेथे आहे.
खूप सारे माकडे येथे पहिल्यापासून होती सध्या कोरोना काळामध्ये माकडाची संख्या कमी झाली आहे येथील माकडे खूप लोकांना त्रास देत नाही उलट सर्वांच्या जवळ जाऊन हाताने खाणे खातात . . मुलांसाठी ही खूप छान one day पिकनिक आहे.
+7
Shashank Khedekar, Sunita Lahane Dhok and 49 others
4 Comments
Like

Comment
Share

ती’ वयात येताना

ती’ वयात येताना…
15 वर्षांच्या नेहाच्या दप्तरात तिच्या बाबांना एका मुलाचे प्रेम पत्र सापडते.. नेहाचे बाबा अत्यंत काळजीत.. त्या अवस्थेत ती चिठ्ठी ते नेहाच्या आईला दाखवितात.. आई थोडी गंभीर होते परंतु ही चिठ्ठी आपल्याला सापडली आहे हे नेहाला न कळून देण्याबाबत व तिच्याशी रोजच्या प्रमाणे वागण्याबद्दल नेहाच्या बाबांना विनंती करते… दुसऱ्या दिवशी सकाळी, आई नेहाला आवडणाऱ्या गरमा गरम पोह्यांची डिश घेऊन तिच्या खोलीत जाते.
अभ्यास करत बसलेल्या नेहाला म्हणते; नेहा अभ्यास जरा बाजूला ठेव बरं आणि हे गरमगरम पोहे खात माझ्याशी मस्त गप्पा मार. नेहाशी गप्पा मारता मारता आई म्हणते. अगं नेहा; आता आपण दोघी मैत्रिणी झालोत. नेहा थोडी बावचळते. अगं तू मोठी झालीस ना आता.आज तुझी आई म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. नेहाच्या चेहऱ्यावर थोडे प्रश्नार्थक भाव उमटतात.
“नेहा, ज्याप्रमाणे शरीरात बदल व्हायला सुरुवात होते त्याचप्रमाणे मानसिक आणि भावनिक बदलही सुरु होतात. छोट्याछोट्या गोष्टींचा राग यायला लागतो, आपली चीडचीड वाढते, कधी कधी खूप उदास वाटतं, एकटं वाटतं आणि खूप रडू येतं तर कधी कारण नसतानाही उगीच हसू येतं, आणि हो कधी कधी माझा आणि बाबाचाही राग येऊ शकतो हं तुला.. या सगळ्या बदलांबरोबरच वयात येताना अजून एक निसर्गतः मोठा बदल आपल्यात होत असतो तो म्हणजे आपल्याला विरुद्ध लिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू लागतं; एखादी व्यक्ती इतकी आवडू लागते की आपण त्या आकर्षणलाच प्रेम समजून बसतो, पण बाळा या वयात जे होतं ते आकर्षण असतं.. प्रेम नसतं.. जसं एखाद्या मॉल मध्ये गेल्यावर आपल्याला चटकिनी एखादा ड्रेस आवडून जातो अगदी त्याचप्रमाणे एखादा मुलगा या वयातील मुलींना आवडू शकतो.
कोणाला त्याचं दिसणं, आवाज, डोळे तर कोणाला त्याची स्टाईल, त्याचं बोलणं आवडतं आणि मुलांच्या बाबतीतही अगदी असंच होतं असतं. थोडक्यात हे बाह्य आकर्षण असतं. या वयातील मुलामुलींचं शरीर व मन अजून परिपक्व झालेलं नसतं. कोणावर प्रेम करण्याइतकी प्रगल्भता अजून त्यांच्यात आलेली नसते. आज एक, तर उद्या कोणी दुसरीच व्यक्ती आवडू लागते.. या वयात मनही थोडं अस्थिर आणि चंचल झालेलं असतं.. कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यावं तेच कळत नसतं.
थोडक्यात सांगायचं तर; जसं जेवणाच्या ताटात विविध पदार्थांचा समावेश असतो; अगदी तसंच आपलं आयुष्य म्हणजे जेवणाचं ताट आणि त्यातील पदार्थ म्हणजे आपले आई-वडील, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, शाळा, आपल्याला प्रिय असणारी व्यक्ती, हे सगळे! हे सर्व आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत ते म्हणजे आयुष्य नाही. परंतु ज्यावेळी आपण कोणा एका व्यक्तीलाच आयुष्य समजायला लागतो त्यावेळी अडचण निर्माण होते.
हे वय खूप नाजूक असतं गं बाळा. सगळं जग या वयात सुंदर दिसत असतं पण त्या सुंदरतेमागचं भयाण रूप मात्र दिसत नसतं.. या साठी सतत सावधान राहून या वयातील मुलांनी प्रवास केला पाहिजे, आकर्षणचा कितीही मोठा खड्डा या प्रवासात आला तरी तो चुकवून पुढे जाणंच फायद्याचं असतं. आकर्षणात अडकणं हा आपल्या ध्येयामधील खूप मोठा अडथळा असतो.
तो अडथळा आपल्या मार्गात येऊ नं देता आपण मार्गक्रमण करणं गरजेचं असतं. आपल्या आईचं हे सगळं बोलणं ऐकून नेहाला रडू अवरत नाही. ती उठून आईला कडकडून मीठी मारते आणि आतून आपल्या दप्तरातून ती चिठ्ठी आणून आईला दाखवत म्हणते; आई मी ही या खड्ड्यात पडणार होते गं; पण तू वाचवलंस मला.. आता कितीही मोठे खड्डे आले तरी मी ते सहज पार करू शकेन ही आता खात्री वाटते कारण आता या प्रवासात मी एकटी नाही तू ही आहेस माझ्याबरोबर..आई ही तिला जवळ घेऊन; आपण तिच्या बरोबर असल्याचा विश्वास तिला स्पर्शाने देते.
वयात आलेल्या प्रत्येक मुलांच्या पालकांचा त्यांच्याशी अत्यंत मोकळेपणाचा संवाद असणे गरजेचे असते.. या संवादाच्या अभावामुळेच बहुतांशी वयात आलेली मुले ही चुकीच्या दिशेने वाहवत जाण्याची शक्यता असते.. अनेक शंका, उत्सुकता यांनी त्यांना घेरून टाकलेले असते त्यामुळे त्यांच्या शकांचे निरसन व दमन झालेल्या उत्सुकतांचे शमन हे पालकांमार्फत योग्य पद्धतीने झाल्यास मुले त्यांचा टीन एजमधील प्रवास नक्कीच हसत खेळत पार करू शकतील..
– मृणाल घोळे मापुस्कर (लेखिका क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असून पंख संस्थेच्या समुपदेशक आहेत)

पुणेरी विभाग

पुणेरी विभाग
1बाग आहे पण फुले नाहीत –तुळशी बाग
२ वहात्या पाण्याचा थांबा – नळ स्टॉप
३ सांगायला दगड पण आहे गाव – पाषाण
४ थकल्या भागल्यांची वाडी – विश्रांत वाडी
५ मदतीचा हात पुढे करणारे – सहकारनगर
६ ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको –
७ आडवी तिडवी वस्ती -वाकडेवाडी
८ लहान पाखरू ढेरी मोठी – चिमण्या गणपती
९ फॉरेनची गल्ली –
१० थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती – लोकमान्य कॉलनी
११ कवडी कवडीने संपत्ती मिळवली – धनकवडी
१२ मिठाई वाला हनुमान –जिलब्या मारुती
१३ बेवडा ब्रीज –दारुवाला पूल
१४ पिडाकारी दैवताचा ओटा – शनिपार
१५ हार आहे तोही दगडाचा – खडक माळ
१६ याचे थालीपीठ होत नाही – विद्यापीठ
१७ नकार देणारी पेठ –नाना पेठ
१८ नमुनेदार वसाहत – मॉडेल कॉलनी
१९ या बागेत सुवर्ण लंकार नाहीत – हिराबाग
२० इथे बांगडीवाले आहेत का हो? – कासारवाडी
२१ कोंढाणा जिंकायला हिने मदत केली – घोरपडी पेठ
२२ गिळंकृत करणारे मास्तर – हडपसर
२३ सगळे इथे ऐटीत – हिंजवडी
२४ सुगंधित नगर-
२५ हा भितीदायक पट्टा आता-मगरपट्टा चांगलाच सुधारलाय!

आईमुलीचं नातं

आईमुलीचं नातं

मला वाटतं, या साध्याशा दोन ओळीत आई मुलीच्या नात्याचं सारं सार सामावलं आहे.
पुत्र जन्मानं सामाजिक उंची लाभत असली तरी भावनांच्या हिंदोळ्यावर उंच उंच अनुभव देते ती कन्याच.
किती ही लाडाकोडानं जोपासा, पण मुलगा हा आपल्या विश्वात रमणारा, आपली वाट चालतांना कळत नकळत नाळेपासून वेगळा होणारा. अन् मुलगी? ती गगनाला गवसणी का घालेना, पतंगासारखी जोडली असते जमीनीशी, आपल्या जन्मदात्यांशी. सुरवातीची काही वर्षं पित्याकडे कल असणारी मुलगी, मोठी होता होता आईच्या कष्टांना, तिच्या भावनांना, तिच्या विचारसरणीला, तिच्या कुटुंबातल्या, समाजातल्या स्थानाला समजू लागते . स्त्री सुलभ कोमलता, कणव, माया, आणि आईबरोबरची एकरूपता यामुळे आईला समंजस सोबत देऊ लागते, आईची कड घेऊ लागते, आईची काळजी घेऊ लागते, ती कायमचीच.
म्हणूनच, जगात डावी ठरविली गेली आणि लेकीच्या भविष्याबद्दल जराशी साशंक असली, तरी ही, मुलीच्या जन्मानंतर आई आपल्या स्वत:च्या भावविश्वा बद्दल निश्चितच नि:शंक होते. दूर माहेरी सोडून आलेल्या आपल्या आई, बहिणी, मैत्रिणी या सर्वांसारखं ‘या हृदयीचे त्या हृदयी’ कळणारा कुणी तरी हक्काचा जीव आपल्याला जन्मभरासाठी लाभलाय, या विचाराने ती तरारून येते. मुलीच्या संगोपनात रमते, हिरीरीने तिला घडवते, सक्षम बनवते.
आपल्या या नाजुक गुलाब कळीचं टप्पोरं फुल व्हावं आणि त्याच्या घमघमटानं आसमंत दाटून जावा अशी मनिषा ती कायम उरात बाळगते. त्यानुसार तिची निगा राखते, तिला उत्तम खतपाणी पुरविते, उगाच वेड्या वाकड्या वाढणाऱ्या फांद्यांना छाटते आणि वेळप्रसंगी बोचऱ्या काट्यांचं कुंपण घालून तिची रक्षा ही करते. या सर्व प्रवासात कधी आनंदते, कधी चिंतातूर होते, कधी दु:खी होते तर कधी नाराज ही होते. पण, या संवर्धन सोहळ्याच्या विविध छटा सांभाळण्यातच तिचं आईपण खुलून येतंय हे ही ती जाणते. मायेनं ओथंबलेलं तिचं हृदय क्षणमात्र किती ही कठोर झालं तरी त्याला पुन्हा पुन्हा वात्सल्याचा फुटलेला पाझर ती आकंठ अनुभवते आणि आपल्या लेकी पर्यंत तो पोचवते ही.
या लोभस प्रवासात ती डोळे लावून बसलेली असते त्या दिवसाकडे, जेव्हा तिच्या लेकीची सावली तिच्यापेक्षा मोठी होते. लेक सुजाण, सुघड झाली याचे दाखले मिळू लागले की माय आपल्या कष्टांचं चीज झालं समजते. हरखून जाते. पण कोडकौतुक करण्याचा तिचा ओघ न संपणारा! आपलं दुखणं खुपणं, कुरकुरणारं शरीर, मरगळणारं मन साभाळते आणि लेकीसाठी आपला हुरूप जपून ठेवते. बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचं तर ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते…!’
आणि अशा या लेकीत गुंतलेल्या मातेला तिची छबि तसाच उबदार प्रतिसाद देते. एकीचं हसू दोन गाली पसरतं तर एकीचा आसू दोन गाली ओघळतो. या काळजाचे ठोके तिथे वाजतात तर या जीवाचं शल्य त्याला खुपतं. मग मोठेपणाचा अंगरखा पांघरून मुलगी आईला जवळ घेते, कधी शिकवते, कधी सल्ले देते, कधी कान टोचते, तर कधी नुसती शांतपणे तिचं हृद्गत ऐकून घेते. आपल्या विस्तारलेल्या पंखांखाली दुबळ्या होत जाणाऱ्या आईला सामावून घेते. हे हक्काचं पुन्हा नव्यानं मिळालेलं माहेरघर आंजारत गोंजारत आई समाधानानं शांत समईसारखी तेवत असते, स्निग्धता पसरत असते, तेलाचा शेवटचा थेंब संपेपर्यंत!