Back to Top

Category: Parents

खेळणं

खेळणं

लहान मुलांना खेळायला खूप आवडतं. खेळण्यांशी मुलं खूप आनंदाने खेळतात अशी सर्वसाधारण समजूत आहे. परंतु बहुतांश मुलं अशी असतात की ज्यांना विकत आणलेली खेळणी आवडतातच असं नाही, तर मोठी माणसं ज्या ज्या वस्तू हाताळतात, त्या वस्तूंशी ते जास्त काळ घालवतात. त्या सर्व वस्तू मुलांना हव्या असतात आणि हे नैसर्गिक आहे. अतिशय हौसेने आणलेल्या महागडय़ा खेळण्यांकडे अनेकदा मुलं ढुंकूनही पाहत नाहीत आणि त्याऐवजी आई-बाबांच्या हातातला मोबाइल मुलांना जास्त हवाहवासा वाटतो.

मुलांच्या मेंदूचा विचार केला तर त्यांच्यासाठी कोणतीही वस्तू ही वस्तूच असते. ‘खास आपल्यासाठी तयार केलेलं खेळणं’ असं काही नसतं. एखादी वस्तू रंगीबेरंगी दिसते, वाजते, हलते, पुढे सरकते, झोके घेते, गाते, नाचते, म्हणून मुलं काही काळ त्याच्यामध्ये रमतात. परंतु त्यांच्या दृष्टीने घरातलं लाटणं, पोळपाट, चपला, मोबाइल, लॅपटॉप, गरगर फिरणारा पंखा आणि खेळण्यातल्या ससा-बाहुल्या हे सर्व सुरुवातीच्या काळात तरी सारखंच असतात. मुलांना चेंडू खेळायला विशेष आवडतो. कारण तो सतत हालचाल करत असतो.

वयाच्या याच टप्प्यावर मुलांच्या हातात अत्यंत घातक पद्धतीने मोबाइल दिला जातो. लहानगी मुलंही त्यात गुंततात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते त्यातली चित्रं हलती असतात. त्याला वेग असतो. ते रंगीत-संगीत असतं. मात्र मोबाइल हे मुलांचं खेळणं कोणत्याही परिस्थितीत असू शकत नाही.

मुलांच्या हातात खेळणी दिलीच नाहीत तरी ती नक्कीच स्वत:च्या डोक्याने काही तरी शोधून काढतात. प्रकाश नारायण संत यांच्या कथेत मुलांनी एका पडक्या घराच्या मोडलेल्या दरवाजाचं खेळणं म्हणून वापर केला होता आणि त्यांचे काही दिवस त्या दरवाजाशी विविध प्रकारे खेळण्यात गेले होते. त्यात स्वत:च्या कल्पना वापरून मजा घेणं हे जास्त महत्त्वाचं होतं. लहान मुलं-मुली अशाच प्रकारे टाळ्यांचे भरपूर खेळ आणि त्यावरची असंबद्ध गाणी शोधून काढतात. स्वत:ला छान रमवतात. एकामागोमाग कितीही वेळ खेळू शकतात. कमीत कमी साधनांच्या साह्याने खेळले जाणारे टिक्करबिल्ला, डबा ऐसपस, विटीदांडू, लपाछपी, जोडसाखळी असे प्रकार अशा डोकेबाज मुलांनीच शोधून काढलेले आहेत.

🖋 डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

“आपण अभ्यासात हुशार नाही!

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

शाळेतील बर्‍याच विद्यार्थ्यांना का वाटते की, “आपण अभ्यासात हुशार नाही!” विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी विचार येतो की, “माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मला गणित अवघड जाते.“ मी हुशार विद्यार्थी/विद्यार्थींनी नाही..मी मठ्ठ आहे.. इत्यादी.

असे विचार विद्यार्थ्यांच्या मनात का येतात? याचा पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपण कधी विचार केला आहे का? या नकारात्मक भावनांचा शिक्षणपध्दतीशी काय संबंध आहे हे आपण नीट समजवूून घेऊ.

“गोबल्स” नावाचा हिटलरचा सल्लागार होता. त्याची एक पॉलिसी होती. एखादी गोष्ट खोटी असेल तर ती समाजात खरी आहे. असे सातत्याने बिंबवतात. पहिले समाज म्हणते ही गोष्ट खोटी आहे, पण सातत्याने बिंबवून नंतर समाज समजायला लागतो की, ही गोष्ट खरी आहे. आपण पण विद्यार्थ्यांशी वागतांना असेच बोलतो. आपण विद्यार्थ्याला बोलतो तु मूर्ख आहेस का रे? पहिले तो/ती नाही म्हणतो. पण पहिलीत, दुसरीत, तीसरी इयत्तेपासून सातत्याने लेबल लावले जाते. की तु मूर्ख आहे. तुला अक्कल नाही, तुला समजत नाही, मग पाचवी पासून तो /ती स्वत:ला समाजायला लागते की, मी मूर्ख आहे. ती मान्य करते की, मला अक्कल नाही.

लक्षात ठेवा पालकांनो, आपण विद्यार्थ्यांना जे समजतो तेच स्वत:ला तसेच समजतात.

तुम्ही जसे आपल्या मुलांबद्दल विचार कराल तसेच ते घडत जातात. तुम्हाला वाटत असेल की, आपला मुलगा/मुलगी विसरभोळी आहे. ते सर्वांसमोर, वर्गासमोर त्याला दहा दा बोलून दाखवले तर तो/ती विसरभोळीच बनणार आहे.

तुम्हाला वाटतयं त्याला परिक्षेत आठवणार नाही. तर त्याला खरंच परिक्षेत आठवणार नाही. तुम्हाला वाटतंय तो/ती चुकणार आहे आणि त्याला त्याची सातत्याने जाणिव करुन दिली तर तो/ती चुकणारच आहे. कारण ‘यश हे माणसाच्या इच्छेपासून सुरु होते.’

वैद्यकिय शास्त्राचा जनक हिप्पोक्रिटसने २४०० वर्षापूर्वी म्हणाले, “माणसाचं यश आणि अपयश मेंदूतुन निर्माण होते.” लहान मुलाचा मेंदू कम्प्युटर सारखा असतो. त्याला जे इनपुट द्याल तेच आऊटपुट मिळते. म्हणून नेहमी विद्यार्थ्यांशी विधायक बोलले पाहिजे तरच विद्यार्थी खर्‍या अर्थाने हुशार बनतील. त्याच्यांत एक आत्मविश्‍वास राहिल.

असंख्य विद्यार्थ्यांचे समुपदेशन केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्‍न येत असतो. तो म्हणजे, “मी कसा आहे?’‘ याचे उत्तर तो आपल्याला आलेल्या अनुभवातून, त्याला मिळालेल्या यश-अपयशातून आणि सर्वात महत्त्वाचं कुटुंबाने, शाळेने, शिक्षकांनी त्याच्याविषयी प्रकट केलेले मत यातुन या सर्वांच्या आधारे तो स्वत:विषयी तो एक इमेज बनवतो. त्याची इमेज विधायक बनली तर प्रगती होते आणि इमेज नकारात्मक बनली तर प्रगती खुंटते. मग विद्यार्थी बोलतात की, मला गणित अवघड जाते, माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मी हुशार नाही, मी विसरभोळा आहे. विद्यार्थ्यांची इमेज बनविण्यात पालकांची आणि त्याहुनही जास्त शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.

बरेच शिक्षक एक वैज्ञानिक वास्तवतेपासून दूर असतात. ती वास्तविकता म्हणजे विद्यार्थ्यांकडे त्यांचे शिक्षक कोणत्या दृष्टीने पाहतात आणि त्यांंच्या विषयी कोणते मत बाळगता त्यावर त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण वर्तवणुक ठरत असते. म्हणून शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरीत केले पाहिजे. त्यांना निगेटीव्ह लेबल चिटकवले नाही पाहिजे.

लहान मुले सिमेंट प्लास्टर सारखी असतात. आपण जे बोलु ते शब्द मेंदूत कायमचे चिपकले जातात. विद्यार्थ्यांचे नेहमी कौतुक केले पाहिजे. शाळेत, वर्गात, घरात त्याचे/तीचे कौतुक होईल अशा संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. “तुला जमंतच” ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे. त्यासाठी शाळेत-घरात नेहमी उत्साही वातावरण, विधायक बोलणे, प्रयत्नाचे कौतुक व्हायला हवे.

एका गणित प्राध्यापकाने एक प्रयोग केला त्याने 30 विद्यार्थ्यांचे दोन ग्रुप केेले. 15 विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपला एका वर्गात बसविले आणि दुसर्‍या 15 विद्यार्थ्यांच्या गु्रपला दुसर्‍या वर्गात बसविले. ते प्राध्यापक पहिल्या वर्गात गेले आणि तेथे फळ्यावर एक गणित मांडले. गणिताचा प्रश्‍न लिहून ते म्हणाले हे जगातील सर्वात सोपे गणित आहे. ज्याला गणित जमत नाही त्याला सुध्दा हे गणित सोडवता येईल. हे सांगून ते दुसर्‍या वर्गात गेले. दुसर्‍या गु्रपला पण तेच गणित फळ्यावर मांडले आणि विद्यार्थ्यांना सांगितले हे जगातील सर्वात अवघड गणित आहे. खुद्द आईनस्टाईनला सुध्दा हे गणित सोडविता आले नव्हते. पाहु कोणाला गणिताच्या एखाद्या दोन पायर्‍या जमता का? थोड्या वेळाने ते प्राध्यापक दोन्ही वर्गात गेले. जिथे सांगितले होते की, हे जगातले सर्वात सोपे गणित आहे तेथील 15 पैकी 13 विद्यार्थ्यांना ते गणित बरोबर सोडविता आले. दुसर्‍या वर्गात जिथे सांगितले होते की, हे जगातील सर्वात अवघड गणित आहे तेथील 15 पैकी 14 विद्यार्थ्यांना ते गणित सोडविता आले नाही. काय झाले असेल या विद्यार्थ्यांना? काय घडले असेल त्यांच्या मनात? एकदा का मनाला हे पटले की एखादी गोष्ट आपल्याला जमु शकत नाही तर त्यांना ती जमत नाही. आपल्या बोलण्यावागण्यातुन विद्यार्थ्यांना समजले की, ही कठीण गोष्ट आहे आणि यात आपण अपयशी होवू तर विद्यार्थी मनाच्या पातळीवर तसाच विचार करतात. त्यांची ठाम समजूत होते की, आपल्याला हे जमू शकत नाही.

मला असे वाटते मुलांमध्ये “मला जमू शकते,“ “आय कॅन डू “ ही भावना खोलवर विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा शिक्षक रुजू होतील तेव्हा विद्यार्थी खऱ्या अर्थाने हुशार बनायला सुरुवात होतील.. त्यांना असं वाटणार नाही की मी विसरभोळे आहे.

संस्कार

संस्कार

लहान मुलं, तारुण्यात येणारी मुलं किंवा अगदीच सर्वच वयोगटातील माणसं यांच्यावर भले किंवा चांगले संस्कार होण्यासाठी एकूणच देशभरात अनेक प्रकारच्या गोष्टींचा, प्रयोगांचा सततचा मारा चहुबाजूंनी सुरू असलेला दिसतो. मुळात संस्कार म्हणजे काय? तर ज्या गोष्टी चांगल्या, मानवी मुल्य जपणाऱ्या असतात त्या. लहान मुलांवर संस्कार चांगले व्हावेत याचा ठेका जणू तमाम पालक, शिक्षक, नातेवाईक यांच्याकडेच दिलेला असतो. आणि ते मग आपापल्या परिनं गोड बोलून, समज देऊन, प्रसंगी मारझोड करून पोरांना संस्कार शिकवण्याचा आटापिटाही करत राहतात. अगदीच दमछाक होईपर्यंत. तरीसुद्धा पोरांना जे करायचं ते करतही राहतात. मला नेहमी प्रश्न पडतो, एकूणच देशातल्या प्रत्येक नागरीकावर त्यांच्या लहानपणापासून अनेक चांगले संस्कार शिकवले गेलेले असताना सुद्धा देशात वाईटपणा, भ्रष्टाचार, चोऱ्या, व्याभिचार, बलात्कार, खुन, भांडणं यासारख्या वाईट गोष्टी सुरूच आहेत किंवा त्या थांबायचं नाव घेत नाहीत. कारण, काय असावं? तर अगदी साधं उत्तर आहे. संस्कार ही देण्याची नव्हे, घेण्याची गोष्ट आहे. मग भले ते तुम्ही समोरच्या माणसाला कशाही प्रकारे शिकवण्याचा किंवा लादण्याचा प्रयोग करा. समोरचा माणूस त्याला पाहिजे तसंच तो जगणार असतो. माझा बहुतेकदा पालकांशी संपर्क येतो. एक पालक तोंडात तंबाखू टाकत म्हणाले,
आमचं पोरगं नको म्हटलं, तरीसुद्धा अमूक अमूक एखादी वाईट गोष्ट करतंच. हल्ली तर गुटखाही खायला लागलंय. सगळे भले-बुरे उपाय करून झालेत. तुम्ही सांगा काय करावं?
मी चिडून म्हणालो, जी गोष्ट तुम्ही स्वतः इतक्या आवडीने खाता, तीच गोष्ट तुमच्या मुलानं खाल्ली तर त्यात वाईट ते काय? मुळात पालक म्हणून तुम्ही स्वतः किती संस्कारक्षम आहात याचा विचार कधी केलायं काय? त्यामुळे त्याला जे करायचंय ते करू द्या. बिघडला तर बिघडू द्या. तो आणि त्याचं कर्म.
साधी गोष्ट आहे. नेहमी खरे बोलावे हा सुविचार, मुल्य आपण सगळेच शाळेय वयापासून शिकलेलो आहोत. तरीसुद्धा आपण उभ्या आयुष्यात कितीवेळा खरे बोलतो? असा प्रश्न स्वतःलाच एकदा विचार पहा. म्हणजे लक्षात येईल दुसऱ्यांना संस्काराची भाषा शिकवणं योग्ययं कि अयोग्य? जे संस्कार आपणच कधी घेतले नाहीत ते आपल्या मुलांना शिकवण्याचा आपल्याला काय अधिकार? आणि मुलांनी ते अंगीकारावेत याची अपेक्षा तरी कशी बाळगायची?
दिवसातून ४ वेळा तंबाखू खाणारा माणूस स्वतःच्या मुलांकडून र्निव्यसनी राहण्याची अपेक्षा कशी काय करू शकतो? आपण आपल्या तारुण्यात दिसेल त्या पोरींवर लाईनी मारायच्या, एखादी पोरगी पटावी म्हणून जीवाची घालमेल करून घ्यायची आणि कधीतरी आपण म्हातारे झाल्यावर आपल्या ऐन तारुण्यात आलेल्या पोरांनी मात्र तसलं काही न करता सज्जनपणे जगायचं ही भलतीच अपेक्षा नाही काय? पोरांनी लाईनी मारल्या तर त्याला वाईट म्हणायचं. मात्र आपण केलं तर रितीप्रमाणे म्हणायचं. हा दुजाभाव कशाला?
म्हणून मला वाटतं, पोरांना संस्कार वगैरे शिकवण्याच्या फंदात न पडता, पालक, शिक्षक म्हणून आपणच आधी निट, सरळमार्गी जगण्याचा प्रयत्न करूत. आपापल्या तत्वांवर ठामपणा ठेवूत. पोरांना आपल्याकडे बघून जेवढं चांगलं घेता येईल तेवढं ते घेतील. बाकी गोष्टींना पर्याय नाही. कारण, घराबाहेरील जगातून देखिल पोरं काहीतरी भलं- बुरं शिकणारचं असतात. आईबाप म्हणून आपण पोरांच्या किती किती गोष्टींवर बंधनं आणणार?
आता मी माझ्या घरातील गमंत सांगतो. मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही पुस्तकं वाचण्याचा नाद आहे. आमच्या घरात हजारांहून जास्त पुस्तकं आहेत. छोटं ग्रंथालय आहे. आम्हाला १० वर्षाचं एक पोरंगयं. तर आम्ही त्याला पुस्तकं वगैरे वाच असं आजतागायत सांगितलेलं नाही. नि सांगणारही नाही. पण प्रत्येक महिण्याला शे – दोनशेची लहान मुलांची पुस्तकं आम्ही बाजारातून नित्यनियमाने आणतही असतो. जमेल तसं त्याच्या समोर बसुन वाचत असतो. आता वाढत्या वयानुसार पोराला समजलंच की, आईबाप जे वाचतात ते आपणही वाचू तर वाचेल की तो. त्याकरीता त्याच्यावर जबरदस्ती कशाला?
शेवटी महत्वाचं सांगतो, मुलं वाढवताना त्यांचे पालक (पालनपोषण करणारेच)व्हा. जन्मदाते व्हायला गेलात की, मग सगळा मामला बिघडतो. मला काय म्हणायंचय, ते कळलं असेलच तुम्हाला? आँ???

प्रगल्भता

प्रगल्भता म्हणजे काय?
· (what is MATURITY)
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं माणसांच्या बरोबर माणुसकीने बोलता, वागता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं न सुटणारे प्रश्न सोडून देता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला जाणीव होते कि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये.
· आणि शेवटी अती महत्वाचे
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा आपण अंतरीक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.
· Be Happy with Nothing, You will be Happy with Everything

मुले आणि शिक्षकांनी बघावेत असे सिनेमे

मुले आणि शिक्षकांनी बघावेत असे सिनेमे

1 तारे जमीन पर
2 एलिझाबेथ एकादशी
3 प्रकाश बाबा आमटे
4 टपाल
5 श्वास
6 कराटे किड
7 कुंग फ़ू पांडा
8 राजमाता जिजाऊ
9 रमाबाई भिमराव आंबेडकर
10 द लिजंड ओफ़ भगतसिंग
11 भाग मिल्खा भाग
12 मेरी कोम
13 आक्टोबर स्काय
14 होम
15 यलो
16 चिलर पार्टी
17 द किड
18 होम अलोन
19 तानी
20 सिंड्रेला
21 बेबीज डे आऊट
22 ज जंतरम म मंतरम
23 नाईट इन द म्युझियम 24 जबाब आयेगा
25 वनपुरुष
26 दहावी फ़
27 बभागो भूत आया
28 Two sollutions
29 twenty thousand leagues
30 under the sea
31 द ब्ल्यू अंब्रेला 32 चक दे इंडीया
33 शाळा
34 राजुचाचा
35 किंग अंकल
36 दोस्ती (हिंदी)
40 3 इडियटस
41 चल चले
42 चकोरी
43 चिंटू
44 चिंगी
45 I am Kalam
46 Park
47 graviti
48 jurasic world
49 सिंधूताई सपकाळ
50 castaway 51 भगतसिंग
52 चिमनी पाखरं
53 the berning train
54 Harry potter 55 mountain man
56 शिक्षणाच्या आईचा..
57 लोकमान्य
58 विटी दांडू
59 आक्टोबर स्काय
60 मासूम
61 क्रिश
62 एक डाव भुताचा,
63 छोटा चेतन
64 Sound of Music
65 Children of Heaven
66 Honey I Shrunk the kids
67 Spirited Away – Miyazaki
68 The white balloon
69 My neighbour Totoro – Miyazaki animations
70 Chaplin- the kid
71 Jaagte raho
72 The court jester
73 Modern Times
74 The red balloon
75 Ice Age – 1,2 & 3 ,4
76 Good Disnoar
77 Finding nemo
78 How to tame a dragon
79 Kekis delivery
80 Born free
81 Inside out
82 Madagascar
83 The king and I
84 Japanese Ghibli movies by Miyazaki
85 Mery poppins
86 Brother bear
87 Narnia all movies
88 Golmal
89 Lion king
90 Inside out,
91 big hero six,
92 rio
93 Karate kid
94 Home alone….
95 Real steel (robot)
96 Kunfu panda all parts
97 red balloon
98 absent minded professor
99 makdi,
100 blue umbrella,
101 black beard ghost
102 Black beard ghost
103 Hotel Transylvania
104 Ratatouille
105 Sarjaby
106 Malefficent
107 Shrek
108 star wars
109 Bug’s Life
110 Antz
111 sesame street
112 angoor
113 free willy
114 happy feet
115 laurel and hardy movies

SAVAY

दोन मुले दूरच्या प्रवासाला निघाली. एकाच्या आईने आपल्या मुलाला भाकरीची चव्वड बांधून दिली. तर दुसऱ्याच्या आईने भाकरी तयार करण्याचे सर्व साहित्य दिले. आईला मदत करता करता भाकरी तयार करण्याची कला तो शिकला होता.
दोन-तीन दिवस ज्याची तयार शिदोरी होती तो मजेत होता. पण काही दिवसच. पुढे दररोज भाकरी जास्त शिळी होत गेली. तसतसा त्याचा आनंदही कमी होत गेला. दुसरा मुलगा मात्र दररोज ताजी भाकरी करून खात होता. मजेत, आनंदात प्रवास करत होता. तयार भाकरी म्हणजे मुलासाठी संपत्ती कमावून ठेवणे आणि भाकरी तयार करता येणं म्हणजे शिक्षण होय.
संपत्ती गोळा करताना हा विचार अवश्य करा की आपल्या मुलांना आयतं काही देण्यापेक्षा, त्यांना ही शिकवण द्या की ती संपत्ती ते स्वतः कमवुन समाज आणि देशाच्या कार्यासाठी कसे उपयोगात आणू शकतील. ह्याने देश,समाज आणि आपल्या मुलांचाही विकास होईल.

(अ)समाधानी पालक

(अ)समाधानी पालक
काही माणसं ही त्यांच्या पालकपणाने फार गांजून गेलेली असतात. अशी काही माणसं आहेत. ते या स्वरूपाचे प्रश्न विचारतात –

मुलं कधी एकदा मोठी होणार?
कधी एकदा शहाणी होणार? कधी एकदा स्वतंत्र होणार? हे एवढे का भांडतात? किती हे प्रश्न? कधी सुटणार? कधी एकदा मुलांना त्यांचं स्वत:चं कळणार आणि कधी आपण सुटणार, असं त्यांना होऊन गेलेलं असतं.
मुलांचे हट्ट, भांडणं, अंगातली अतिरिक्त ऊर्जा, सततच्या मागण्या- काहीच सहन होत नाही. अशा पालकांना कदाचित मुलं म्हणजे ‘एक आदर्श चित्र’ असावं अशी अपेक्षा असते. असं कधी होतं का?
जसं आदर्श मूल हे भिंग घेऊन शोधावं लागेल तसंच आदर्श पालक हेदेखील शोधावेच लागतील. या दोन्ही गोष्टी अस्तित्वात आहेत की नाही, हेही आपल्याला माहीत नाही.
इतरांची मुलं थोडाच काळ भेटतात. तेव्हा ती चांगलीच वागतात. म्हणून आपलीही मुलं अशीच शहाणी असावीत, अशीच आदर्श असावीत, असं वाटत राहतं. अशा प्रकारे तुलना केल्याने कोणीच शहाणं होत नसतं किंवा परिस्थिती आपोआप सुधारत नसते.
समाधानी होणं हे आपल्याच हातात असतं. पालक असतानाच्या काळातला सर्वात सुंदर काळ कोणता? तर, आजचा क्षण.
मुलं वाढत असताना आता पुढे काय घडेल याचाच विचार करत राहिलो, तर त्या नात्यातली, त्या कामातली मजा कधी घेणार?
बाळांचे आवाज, पहिली पावलं, पहिले शब्द ऐकणं याचा आनंद फार महत्त्वाचा.
शाळेतल्या मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी मनापासून सोडवणं –
या अडचणी वाटून घेणं हा क्षणही किती महत्त्वाचा आहे! मूल किती ‘हुशारीने’ आणि ‘चलाखीने’ हट्ट करत आहे हासुद्धा निरीक्षणाचा भाग असायला हवा. टीन एजमधल्या मुलांबरोबर मोकळेपणाने गप्पा मारणं, हे तसं अवघड; पण जमायला हवं.
आनंदाचा काळ पुढे केव्हा तरी येईल या आशेवर आज त्रास सहन करत आहोत असे विचार काहीच कामाचे नाहीत.
त्यापेक्षा आज आणि आत्ता आनंदी राहाणं आपल्या हातात आहे…

“मुलानेच घेतली बापाची शाळा”

“मुलानेच घेतली बापाची शाळा”

(वयात आलेल्या सगळ्या आई – बाबांसाठी)
– योगेश गोखले

सो S S बाबा chill , असं म्हणून माझ्याच खांद्यावर थोपटून मुलगा बाहेर पडला. मी अजूनही कन्फ्युज्ड आहे.

माझा मुलगा यंदा १०वी ला आहे. तसा बऱ्यापैकी हुशार आहे. आजच सकाळी त्याचा प्रिलिम चा रिझल्ट लागला. आम्ही दोघे उभयता शाळेच्या बोलावण्यावरून पालक मिटिंग ला गेलो होतो. आमच्या मुलाचा रिझल्ट आमच्या कडे दिला (हल्ली मुलांकडे रिझल्ट द्यायला काय प्रॉब्लेम आहे माहित नाही, का मुलं फेरफार करतात , का घरी दाखवतच नाहीत , काय माहित ? पण आजकाल पालकांना बोलावून रिझल्ट द्यायची नवी पद्धत आहे ) आणि मग सगळ्या पालकांची “पेरेंट मिटिंग” झाली. मुलाला ८४% मिळाले होते. (पण हल्ली त्याने काय होतंय?).

क्लास टिचर ने सांगितलं की सगळ्याच मुलांना तसे कमी मार्क मिळाले आहेत. त्यामुळे आता पुढचे दोन महिने सगळ्यांनी माना मोडून , दिवसाचे १८ तास अभ्यास करणे गरजेचे आहे. मुलांनी अभ्यास कसा करावा , पालकांनी काय काळजी घ्यावी , मुलांना आहार काय दयावा, वगैरे वगैरे मार्गदर्शन झालं. मग प्रत्येक विषयाच्या टिचरनी अर्धा तासाचं सेशन घेतलं. प्रत्येकाने सांगितलं की सकाळी २, संध्याकाळी २ असा रोज त्यांच्या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. शेवटी क्लास टिचर ने परत अर्धा तास घेतला. हे ही सांगितलं की आम्ही मुद्दाम प्रिलिम चे पेपर खूप अवघड काढतो आणि तपासतोही खूप स्ट्रीक्ट. मुलांना कमी मार्क पडले की ती अजून अभ्यास करतात . आमच्या शाळेचा रिझल्ट कसा दर वर्षी १००% लागतो वगैरे.

आम्ही टिपिकल ओपन कॅटेगरी मध्यम वर्गीय असल्यामुळे लगेच हे सगळं सिन्सीयरली घेतलं. सौ ने सांगितलं की मी नेहमी त्याला सांगतच असते. तुम्ही जरा ओरडा. बाबांच्या सांगण्याने जरा वजन पडतं.
मी संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर चहा घेतला. चिरंजीव फुटबॉल खेळायला जायच्या तयारीत होते. मीच विषय काढला,

“काय , किती मार्क मिळाले?”

“तुम्हालातर माहित आहेत की”

“अरे पण मग कमी पडले , ८४% नी आजकाल कुठे काय होतं. हवं ते कॉलेज सोड , सायन्स ला पण ऍडमिशन मिळणार नाही. कमीत कमी ९४% तरी पडायला हवेत तर काहीतरी खरं”

तो नुसता हसला. मला त्याच्या या हसण्याची फार चीड येते. ते कुत्सीत च्याही पलीकडचे आहे असं मला वाटतं. स्वाभाविक , मी त्याला जरा मोठ्या आवाजात विचारलं

“काय म्हणतोय मी …हसण्यासारख काय आहे त्यात?”

“नाही बाबा मला गंम्मत वाटते की तुम्ही परस्परच ठरवलं की मी सायन्स ला जाणार आहे… म्हणून हसलो”

मला त्यानी बरोब्बर पकडलं होतं ..पण मी मोठा होतो ना ..त्याच अधिकाराने मी दरडावून सांगितलं

“प्रश्न तो नाही आहे ..आधी ९४% टक्के तर मिळवून दाखव ..मग पुढे काय शिकायचं ते बघू ”

“हा ..ते मिळतील ..९२% – ९४% मिळतील”

“अरे पण कसे ?..तू ८४% वरून ९४% ला कसा जाणार आहेस ? हे खेळणं वगैरे कमी करा आता ..जरा टेस्ट सिरीज लावा ..वेळ लावून पेपर सोडवा”

“बाबा chill ..मिळतील ९२%+”

“अरे गाढवा ते काय वरून पडणार आहेत का ..chill करून चालणार नाही तुला”

“बाबा ..जरा मोबाईल द्या तुमचा”

त्याने माझा मोबाईल घेतला आणि त्याच्या ई-मेल मधून एक excel ओपन करून दाखवली. त्यात त्याच्या शाळेतील गेल्या ३ वर्षातल्या मुलांचा डेटा होता ..प्रत्येकाला पडलेले प्रिलिम चे मार्क आणि फायनल बोर्डाचे मार्क्स. स्पष्ट ट्रेंड होता की ऑन अन एव्हरेज ८ ते १० टक्के वाढतात.

“बाबा तुमच्या पेक्षा आमचं नेटवर्क आणि इंटेलिजन्स जास्त स्ट्रॉंग आहे, शाळा मुद्दामच पेपर अवघड काढते आणि कडक तपासते , जेणे करून मुलांना आणि त्याही पेक्षा पालकांना वाटावं की अजून खूप अभ्यास करायला पाहिजे. हे तुम्हालाही आज शाळेत सांगितलं असेल पण तुम्ही पण तसं काही सांगणार नाही. मला खरंच कळत नाही इतर वेळेस तुम्ही आम्हाला जे trust आणि transparency वर लेक्चर देता ते आमच्या अभ्यासाच्या वेळी कुठे जातं. जर मुलांना रिऍलिस्टीक मार्क दिले तर मुलं काय हुरळून जाणार आहेत का ? उलट चांगले मार्क टिकवायचं टेन्शन जास्त असतं या कॉम्पिटेटिव्ह जगात. आणि प्रत्येकाला वाटतंच ना की मागच्या पेक्षा चांगलं करावं . मग रिऍलिस्टिक मार्क्स दिले तर बिघडलं कुठे ? प्रत्येक विषयाचा जर रोज ४ तास अभ्यास करायचा तर २४ तास अभ्यास झाला. कोणीतरी जरा लॉजिकल सांगायला पाहिजे ना ..मग खरं मोटिवेशन येईल नाहीतर हे सगळं फार डिप्रेसिंग आहे”

“आहो माझं ठीक आहे ..मला खात्री आहे की मी ९२% पर्यंत कसाही जाईन …पण मला काळजी निशित ची आहे. खरं तर तो ८०%-८२% पर्यंत जाईलही. त्याने प्रिलिम ला भरपूर अभ्यास केला होता. मीच त्याला काही गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. पण या अवघड पेपर आणि आतिकडक तपासणीच्या नादात त्याला ६०% मिळाले. गेले २ दिवस डिप्रेस आहे. आता अभ्यासच करणार नाही म्हणतो कारण म्हणे मी काही बाकीच्यांसारखा हुशार नाही ..कितीही अभ्यास केला तरी ६०%. आई -बाबा पण खूप ओरडले त्याला. सहामाही ला ७०% वरून ६०% वर आला. लायकी काढली त्याची.”

“त्याच्या कडेच चाललोय फुटबॉल खेळायला.. हाच आता एक मार्ग आहे की त्याला या डिप्रेशन मधून बाहेर काढून परत अभ्यासाला लावण्याचा..अर्धा तास खेळणार आणि मग त्याच्या नकळत आज सायन्स चं काय वाचलं , काय डोक्यावरून गेलं ..काय कसं लक्षात ठेवलं ह्या गप्पा मारणार, म्हणजे माझी रिव्हिजन आणि त्याची नकळत तयारी…८-१० दिवसात त्याला पेपर सोडवायला लावतो..आमची आळी – मिळी गूप चळी. मीच तपासून रिऍलिस्टिक मार्क देणार. नाही त्याला ८०% + नेला तर नाव दुसरं”

“आणि माझी काळजी करू नका , मी तुम्हाला ९२%+ ची गॅरेंटी देतो. पण त्या पुढच्या २% साठी उगाच माझ्या मागे लागू नका. मी मनापासून प्रयत्न करीन पण त्या ऍडीशनल २% ची काही गॅरंटी नाही आणि उगाच त्या खात्री नसलेल्या गोष्टी साठी मला माझा संध्याकाळचा खेळ , तबल्याचा क्लास , मित्र बंद करायचे नाही आहेत. या जगात मध्यमवर्ग नामोशेष होत चालला आहे. तोच तर एक वर्ग होता ज्याने सगळं बॅलेन्स ठेवलं होतं, इन्कलुडींग सहिष्णुता आणि संस्कृती. ऑल इसम्स आर गुड आदर दॅन एक्सट्रीझम. एक्सट्रीझम दहशदवादाला जन्म देतो. मार्कांचेही तेच झालेय, अतिरेकी मार्क पाहिजेत .. ‘९८%’ नाहीतर मग ‘पास झाला तरी बास’ कॅटेगरी. हा पण एक दहशवादच नाही का ? ८०%-९०% मार्क , खेळ , मित्र , छंद , तबला-गाणं -नाटकं अशी मध्यममार्गी मुलं नकोच आहेत कुणाला. एक तर IIT नाहीतर ITI. खरंच अवघड आहे. अरे TII पण असू शकत ना..

अजूनही माझ्यातला बाप जागा होता. मी त्याला दरडावून विचारले

“तुला काय म्हणायच आहे ..आम्ही दहशदवादी आहोत का ? का आम्ही तुला दहशदवादी करतोय”

तो परत एकदा तसा हसला ..कुत्सित च्या पलीकडचा.

“बाबा प्रश्न माझा नाही आहे , शाळा आणि सुज्ञ पालक त्या निशित ला दहशदवादी करायला निघाले आहेत आणि कोणीतरी, म्हणजे मी, हे थांबवलेच पाहिजे”

“पण बाबा तुम्ही माझी काळजी करू नका – ९२% नक्की मिळवतो …chill”

“चला मी निशित कडे जावून तासाभरात येतो ..आल्यावर मॅथ्स चा पेपर सोडवायचाय”

माझ्याही नकळत मी उठलो आणि बोलून गेलो “मी पण येऊ का फुटबॉल खेळायला ?”

मुलाने येऊन मला खांद्यावर थोपटले .. “बाबा chill ..तुला झेपणार नाही”

“ए आई बाबासाठी एक कप आल्याचा चहा टाक”

तो बाय करून हसत गेला सुद्धा.

तो निशितला ८०% पर्यंत आणायला गेलाय. त्याने ९२% मिळवले आणि निशितला ८०% मिळाले तर माझ्या दृष्टीने ते १००% ठरतील हे नक्की !

गेमिंग

गेमिंग करणार्या मुलांचे पालक भेटले की हमखास म्हणतात आमचा मुलगा/ मुलगी अगदी एडिक्ट झाली आहे..

मुलांच्या अति मोबाईल वापरासाठी किंवा स्क्रीन टाइमसाठी त्यांना दोषी ठरवू नका. त्यांच्या नावाने कटकट करण्याआधी ही सवय कुणी लावली ते आठवून बघा. दोष कुणाला द्यायचाच झाला तर स्वतःला द्यायला हवा. माझी मुलगी/मुलगा मोबाईल एडिक्ट आहे हे वाक्य चूक आहे. हे वाक्य असं वापरून पालक म्हणून आपण स्वतःची सुटका करून घेतो आपल्याही नकळत. काहीवेळा जे म्हणायचंय तेच शब्दप्रयोग आवश्यक आहे. पालक म्हणून आपण सोयीच्या गोष्टी करतो आणि मुलांना व्यसनाधीन म्हणतो. हा त्यांच्यावर अन्याय आहे. बाजारात जाऊन महागडी गॅजेट्स, मोबाईल, टॅब मुलं विकत आणत नाहीत. आपण घेऊन देतो, त्याचं कौतुक असतं आपल्याला, आपल्या आर्थिक क्षमतेचा गर्व, अभिमान आणि काय काय ही असतं. सुप्त मानसिक अवस्थेत. परिणाम मुलांना सवयी लागतात.
दुसरं बऱ्याच पालकांना वाटतं मोबाईल काढून घ्यायचा तर इतर महागडे पर्याय दिले पाहिजेत. तर मुळीच नाही. उलट एक रुपया ही खर्च न करता मुलांना असंख्य गोष्टींमध्ये गुंतवता येऊ शकतं. त्यांना स्वयंपाक घरात मदतीला घ्या. पाटपाणी घ्यायला सांगा. त्यांना कपड्यांच्या घड्या करायला शिकवा. त्यांना भाज्या निवडायला शिकवा. त्यांच्याशी तुम्ही खेळा. घरातल्या आवरा आवरीत मदतीला घ्या. त्यांची खेळणी स्वच्छ करायला, आवरून ठेवायला सांगा.
किंवा काहीही पर्याय देऊ नका.
तुझा तू शोध असं सांगा.
मुलं मोबाईल मिळाला नाही, टिव्हीही मिळाला नाही तर त्यांचे म्हणून पर्याय शोधतात. त्यांना ते कसे शोधायचं हे माहीत असतं. काहीच सापडलं नाही तर इतर मुलांशी जास्तवेळ खेळतात. प्रॉब्लेम आपला म्हणजे पालकांचा असतो. आपल्याला सगळं भरवायला आवडतं. त्यांनी काय करायचं, कसं करायचं, निराळे पर्याय कसे निवडायचे, कुठले निवडायचे सगळं आपण ठरवतो आणि बरहुकूम मुलांना करायला लावतो. त्यापेक्षा पर्याय द्या, त्यांना आवडले तर ठीक नाही आवडले तर त्यांचे त्यांना शोधू द्या..
स्पून फिडिंग बंद करणं ही पालकांसाठी सगळ्यात कठीण गोष्ट असते. कारण त्याचं व्यसन असतं पालकांना.
मुलं एडिक्ट नसतात, पालक असतात, वेगवेगळ्या गोष्टींचे.
एक रुपयाही खर्च न करता, कुठलंही नवं खेळणं विकत न आणता मुलांना मोबाईल पासून दूर नेता येतं… जस्ट थिंक!

मुक्ता चैतन्य

#noscreenday #arunsadhufellowship #socialmedia #noscreenforkids

भांडणं, मारामारी, चुगल्या, तक्रारी. हे सगळं मुलं का करतात?

c&p
एका जागेवर शांतपणो तासन्तास बसून राहिलेलं मूल कोणी पाहिलंय का? मुलं सतत चालत असतात, पळत असतात. दंगा करत असतात. उद्योग-उपद्व्याप करत असतात. अखंड बडबड करतात. कितीतरी मोठय़ा माणसांना या दंग्याचा फार त्रस होत असतो. ऑफिसमधून थकून घरी आलेल्या आईबाबांना हा उत्साहसुद्धा कधीकधी पेलवत नाही. आजी-आजोबांना तर हा प्रकार पेलवतच नाही. घरात दोन मुलं असली की या उद्योग आणि दंग्याच्या जोडीला भांडणं, मारामारी, चुगल्या, तक्रारी आणि दुप्पट दंगा चालतो. त्यामुळे घरची माणसं फारच जिकिरीला येतात. एकदा का मुलं झोपली की घर कसं शांत शांत होतं. वादळ उठेर्पयत सगळे लोक आपापली कामं करून घेतात. विश्रंती घेतात. कधी एकदा ही मुलं मोठी होतात, असं घरातल्यांना होतं. 

मुलं एवढी चळवळी का असतात?
मूल कुठेही असलं तरी शांत बसत नाही. याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं कारण शास्रीय आहे. वयाच्या आठ वर्षार्पयत मुलांच्या मेंदूत एक महत्त्वाची घडामोड होत असते. ही घडामोड त्यांना आयुष्यभर पुरणारी असते. मेंदूच्या डाव्या आणि  उजव्या गोलार्धाना जोडणारा ‘कॉर्पस कलोझम’ नावाचा अवयव असतो. तो अवयव अजून विकसित झालेला नसतो. त्याची वाढ होत असते. वयाच्या साधारणपणो आठव्या वर्षाच्या आतबाहेर ही वाढ ब-यापैकी पूर्ण होते. त्यानंतर मुलांच्या शरीराला हळूहळू स्थिरता यायला लागते. दहा वर्षाच्या आसपास मुलं क्रमाक्रमानं स्थिर होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांनी या वयात शारीरिक दंगा, भरपूर हालचाल केलीच पाहिजे. कारण तसं झालं नाही तर हा अवयव योग्य प्रकारे विकसित होणार नाही. तो विकसित झाला नाही तर पन्नाशी-साठीनंतर त्यांना शरीराचा समतोल साधून चालणं अवघड जाईल. 

अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे निरीक्षण. एवढा दंगा चाललेला असला तरी त्यातही मुलं वस्तू, व्यक्ती, एखादा प्रसंग, खेळ, खेळणी,  एखादी प्रक्रिया, लोकांचं बोलणं याचं संपूर्ण निरीक्षण करत असतात. हा तर संपूर्ण शिक्षणाचा पायाच. दुपटय़ातून बाहेर पडून ज्या क्षणी मूल हालचाल करायला लागतं त्याच क्षणापासून ते सतत, प्रत्येक क्षणी काहीना काही शिकत असतं. आपण म्हणजे मोठय़ांनी न सांगता- सवरता त्याचा मेंदू त्याला आज्ञा देत असतो. त्या आज्ञेनुसार तो कामाची यादी पार पाडत असतो. त्याला आपली मदत होवो किंवा न होवो तो ज्ञान मिळवत राहातो. या काळात तो खरा ज्ञानार्थी असतो. पहिल्या काही वर्षात मुलांच्या शिकण्याचा वेग प्रचंड असतो. कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ ही पाच ज्ञानेंद्रियं अतिशय महत्त्वाची असतात. या ज्ञानेंद्रियांमधून  अनेक प्रकारची माहिती सतत मेंदूकडे पोहोचत असते. या पाचही ज्ञानेंद्रियांतून मूल नित्यनवे अनुभव घेत असतं. हे मूल एखाद्या शहरातलं असो, गावातलं. कोणत्याही आर्थिक स्तरातलं असो- मुलांना या वयात निरीक्षण करायचंच असतं आणि नवीन काहीतरी शिकायचंच असतं. 

मुलांच्या मेंदूची जडणघडण होण्यासाठी

◆ छानसं, आल्हाददायक संगीत ऐकवावं. वाद्यसंगीत, मंद संगीत ऐकवावं. आवाजाकडे लक्ष वेधून घ्यायला हवं. साधेसुधे नैसर्गिक आवाज त्याच्या कानावर पडायला हवेत.

◆ इतर भाषेतली गाणी, इतर भाषेतले शब्द ऐकवावेत. इतर भाषा बोलणारे शेजारी, नातेवाईक असतील तर त्यांना मुलांशी त्यांच्या भाषेतच बोलायला सांगावे. 

 ◆ मुलांशी बोलणारी भरपूर माणसं आसपास असतील तर त्याच्या  भाषाविकासासाठी ते चांगलंच. वेगवेगळी माणसं भेटली की मुलं आनंदी होतात. 

 ◆ मुलांना गोष्टी सांगाव्यात; पण मोबाइल/टॅब/ कॉम्प्युटरवर दाखवू नयेत. स्क्रीन मुळीच दाखवू नये.

◆ कौतुकाचा स्पर्श करणं, सतत बोलणं, गाणी म्हणणं- ऐकवणं, हे आपण अवश्य करावंच. त्यातही विविध भाषेतली गाणी ऐकवली तर जास्त चांगलं. 

◆ पावसाचे थेंब अनुभवणं, फूल- माती- दगड- मांजरासारखे प्राणी असे विविध स्पर्श देणं.

◆ जमतील तेवढे रंग, भरपूर आकार दाखवणं.

◆ मुलांना टेकडीवर, नदी- समुद्रावर,  घराच्या खिडकीत, गच्चीत नेऊन खाली-वर, डावीकडे- उजवीकडे त्यांची नजर जाईल असं करायला पाहिजे. मुला- मुलींची नजर लांबच्या वस्तूंवर जायला लागली की, समोरची टेकडी, ढग, उडणारे पक्षी, झाडावर विसावलेले पक्षी, झाडांवरची फुलं, हलणारी पानं अशा अनेक गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष वेधून घेणं. 

◆ दिवसा आणि रात्रीच्या वेळा दाखवल्या पाहिजेत.

◆ पहिल्या काही वर्षात मूल असं चैतन्यानं रसरसलेलं असतं. चळवळ, दंगा, हालचाली करणं ही त्यांच्यातली शारीरिक प्रेरणा असते. त्यांना थांबवण्यापेक्षा, त्रागा करण्यापेक्षा किंवा चिडचिड करून धपाटे घालण्याऐवजी मुलं असं का करतात, हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीचा काही काळ त्रस होणार आहे ही मनाची तयारी ठेवणंही आवश्यक आहे. तीव्र कुतूहल हीच प्रेरणा या वयातल्या मुलांच्या एकूण वर्तनामागे असते. कितीही झोप आली, दमलं तरी झोपण्याची तयारी नसते. कारण हेच. झोपण्यातला वेळ वाया कसा घालवायचा?