महाराष्ट्रामध्ये दिवाळी मध्ये शिवाजी महाराजांचा किल्ला बनवण्याची परंपरा आहे . त्याअनुषंगाने मी आणि माझा मुलगा घरासमोर दरवर्षीच किल्ला बनवत असतो . परंतु दोन तीन वर्षापासून आम्ही सोसायटीच्या मुलांना बरोबर घेऊन किल्ला बनवत आहोत . सोसायटी मध्ये एक छोटा भारत वसलेला आहे विविध राज्यातील मुले असल्याने त्यांना आपल्या या परंपरेची माहीत नाही त्यामुळे रोज शिवाजी महाराज यांच्या विषयी ची एक गोष्ट आणि एका किल्ल्याची माहिती आणि त्याचबरोबर किल्ला तयार करण्याची तयारी असे दिवाळीच्या आधीच पंधरा दिवसांपूर्वीच सुरुवात केली गेली. .
सुरुवातीला सोसायटीच्या आवारात फेरफटका मारून गडासाठी कोणकोणत्या गोष्टी उपयोगात येऊ शकतील याची चाचपणी करणे , आजूबाजूला बांधकाम चालू आहे तिथून कोणत्या गोष्टी ,साहित्य मिळू शकेल हे नजरेने अचूक अंदाज घेत शोधणे या बाबी मुलांच्या सुरू झाल्या साहित्य मिळवताना त्या साहित्याचा वापर गडासाठी कसा कल्पकतेने करता येऊ शकेल याबाबत वेगवेगळी चर्चा करणे शिवाय साहित्य दुसऱ्याचे असेल तर परवानगी घेणे ,याबाबीची सुरुवात वय वर्ष 2ते 13वयोगटातील 12-15मुलांमध्ये सुरू झाले गडाचे काम सुरू झाले. .
मुलांचे रोजचे खेळ ही बदलले
मुले खेळताना तानाजी,बाजीप्रभू देशपांडे,मुघल,बाबर,शिवाजी,जीवा महाल,लाल महाल ,शहीतेखान,उदयभान,रायबा अशी नावे घेऊन विविध खेळ खेळू लागली. .
गडाची बांधणी करत असताना अंधारकोठड्या ,अंबरखाने ,उष्ट्रखाना
औषधीखाना ,रथखाना कडा,कडेलोटाची जागा,कलारगा ,कुरणे ,कुसू ,कोठी जिन्नसखाना
खंदक ,खासगी वस्तुसंग्रह गुहा ,
झरोकेकिंवाछिद्रे,जंग्या ,जामदारखाना ,टांके, तलाव, विहीर ,टोक ,ढालकाठी तट ,तवा ,थट्टी (पागा) ,दगडी जिने ,दरवाजे ,उपदरवाजे ,दिंडी दरवाजा ,चोर दरवाजा ,दारूची कोठारे ,देवड्या ,देवळे, समाध्या, स्मारकशिला, कबरी,धान्यकोठ्या,नगारखाना,पाऊलवाटा,पागा(थट्टी),पायथा ,पीलखाना ,पुस्तकशाळा ,पेठा,(पेठ-कारखाना),प्रवेशद्वार,प्रवेशमार्ग,फरासखाना,बागकारखाना,बारादरी,
बालेकिल्ला,बुरूज,भुयार,माची,
राजमंदिर,शिलेखाना,सडा ,सदर ,
सरपणखाना ,स्तंभ आणि दीपमाळा
इ किल्ल्याच्या विविध भागाची माहिती मुलांना करून दिली आणि त्याबाबतची माहिती व्हावी म्हणून गडावरही त्या त्या प्रकारचे किल्ल्याचे भाग करून नावे ही दिली त्यामुळे मुलांना इतिहासातील आणि गडाची सखोल माहिती झाली
मुलांनी गडावर एक रोप वे ही बनवला.
मुलाची कल्पनाशक्तीला वाव दिला व स्वतंत्र पने काही त्यांच्या वर जबाबदारी दिली तर मुले खूप काही गोष्टी करू शकतात .
मुलांना मुक्त पने माती,दगड,पाणी,रंग,मोठया च्या दृष्टीने जो कचरा असतो त्या गोष्टी मुलांना उपलब्ध करून दिल्या तर मुलांची प्रतिभा विकसित होण्यास मदत होते,सर्जनशील मुले अश्याच प्रकारे तयार होतात.अश्या छोट्या छोट्या कृती मुलामध्ये एकत्र काम करण्याची वृत्ती वाढवतात आणि त्याची जपवणूक करणे ही स्वतःची जबाबदारीही समजतात त्यामुळेच थोडा पाऊस पडला किंवा जोराचा वारा आला तर गडाला काही झाले की काय हे मुले स्वतः पुढाकार पाहत होती आणि परत परत पडलेल्या भाग,किंवा एखादी तटबंदी पुन्हा पुन्हा जाऊन लावत होती . ..
सजावट,दिवे लावणे पणती जपून ठेवणे याबाबी मुले आवडीने करत होती
अश्याप्रकरे आमचा दिवाळीचा किल्ला बनविला गेला..