Back to Top

Category: वाचन कट्टा

गणित

आज 22 डिसेंम्बर. राष्ट्रीय गणित दिवस. थोर भारतीय गणितज्ञ रामानुजन यांचा जन्मदिवस..🙏🙏

आपल्या देशात लोकांना एक तर गणित आवडतं किंवा आवडत नाही अशा दोनच शक्यता. पण उपयोग मात्र सगळ्यांना करावाच लागतो. त्यातही जे गणित आवडत नाही म्हणतात, ते अशक्य creative कामं करताना दिसतात, गायक, वादक, नर्तक, चित्रकार, तंत्रज्ञ…कितीतरी उदाहरणे देता येतील.
🎼🥁🎹📽️🎨🌌

या सगळ्यांची कामं तर गणिताच्या भक्कम पायावर उभी आहेत.
मग नेमकी नावड कशाची? कशामुळे?
त्याच त्याच उदाहरणांचा सराव करावा लागल्यामुळे? शिक्षकांनी विचारांना चालना देणारे प्रश्न न विचारल्यामुळे?
सरावाच्या कंटाळ्यामुळे?

गणिताची शिक्षिका म्हणून मांडलेले काही विचार, अनुभव…

Read more

औद्योगिक मानसशास्त्र

औद्योगिक मानसशास्त्र

……….

• जेव्हा Netflix चा CEO मानवी झोपेला त्याचा सर्वात मोठा स्पर्धक मानतो यावरूनच मानवी जीवनात झोपेचे महत्व अधोरेखित होते. गेलेल दशक हे माध्यमांच होत, कधीच विचार न केलेल्या प्रकारचं मनोरंजन २४ तास आपल्या सोबत राहू लागलं.

आपल्या मेंदू मध्ये न मावेल एवढी माहिती त्याच्यावर आदळायला सुरवात झाली. ह्या माहिती ला process करण्यासाठी मेंदू तयारच नव्हता. Netflix भारतात २०१६ पासून सुरू झाले. भारतात जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने जगातील नामांकित कपन्यांनी भारतीय लोकांसाठी मनोरंजाचे कार्यक्रम बनवायला सुरवात केली जे मानवी मेंदू साठी

Read more

इ ५ वी ते ७ वी साठी वाचनीय पूस्तकं

इ ५ वी ते ७ वी साठी वाचनीय पूस्तकं

१)एक होता कार्व्हर
२)तोत्तोचान
३)पुण्यभूमी भारत सुधा मूर्ती
४)रस्कीन बॉण्डच्या कथा रोहन प्रकाशन
५) तुमचे आमचे हिरो मनोविकास प्रकाशन
६) पक्षी आमचे सखे शेजारी किरण पुरंदरे
७)सव्वाशे बोधकथा ग्रंथाली
८)शब्दमागच्या गंमत गोष्टी सुजॉय रघुकुल समकालीन प्रकाशन

Read more

राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते

राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते? काय आहे खासदार, आमदरांच्या मतांचे गणित ? घ्या जाणून. 🗳
भारतात राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी होणार असून मतमोजणी २१ जुलै रोजी होणार आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ६२ नुसार, वर्तमान कार्यकाळ संपण्यापूर्वी पुढील राष्ट्रपतीची निवड होणे आवश्यक आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सामान्य जनता मतदान करु शकत नाही. पण सर्व राज्यांचे आमदार आणि खासदार राष्ट्रपतींची निवड करतात. आता राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते. आणि खासदार आमदारांच्या मतांना किती

Read more

फुलपाखरू

फुलपाखरू…..

दुकानात असताना वैशालीचा फोन वाजला. आईंचा कॉल संध्याकाळी 7:30 ला कसा काय आला या विचारातच तिने फोन कानाला लावला

‘हॅलो वैशाली! खूप कामात आहेस का ग?’
‘नाही आई! बोला न?’
‘ अग पियुने वरच्या रूममध्ये खूप गोंधळ घातलाय! कोणाशीतरी फोनवर जोरजोरात बोलत होती… रडत होती.मग वरच्या रूममधून वस्तू फेकल्याचे आवाज आले म्हणून मी वर गेले तर माझ्या अंगावर ओरडली.. ‘पहिली खाली जा तू.. अजिबात वर येऊ नकोस.’ आणि आता दरवाजा लॉक करून बसलीये.नक्की काय झालंय ते कळत नाही ग!’ वैशालीच्या सासूबाईंनी चिंतीत स्वरात पण एका दमात सांगितलं.
‘बर बर ,मी येते. तुम्ही आणि पप्पा अजिबात काळजी करू नका आणि कुणीच वरती जाऊ नका. स्वराला ही जाऊन देऊ नका वरती.’
‘येशील न लवकर.’
‘निघालेच.१५-२० मिनिटात येतेच.’

घरापासून जवळच वैशालीच् कपड्यांचं छोटस बुटीक होत. तिचे मिस्टर कामावरून येताना दुकानातून तिला घेऊनच घरी येत. प्रियांका आणि स्वरा तिच्या दोन मुली. पियू नववीत तर स्वरा सहावीत.

संदीपला कॉल करून हाताखालच्या माणसांवर दुकान टाकून ती रिक्षात बसली. बंगल्याच्या जवळ येताच स्वरा धावत बाहेर आली.

‘ताईने खोलीची वाट लावलीये बहुतेक.’ती बोलली. स्वराच्या चेहेऱ्यावर वरती नक्की काय घडलंय याची उत्सुकता होती तर आजी आजोबांचे चेहेरे पडलेले होते.

‘ओके. नो प्रॉब्लेम. मी बघते न काय झालंय ते..’ वैशालीने तिच्या मागून वरती चढणाऱ्या स्वराला थांबवत म्हंटले.’ तुम्ही सर्वजण मस्त tv बघा. मी आलेच.’

‘पियू…!’दरवाज्यावर टकटक करत वैशालीने हाक दिली.’दरवाजा उघडतेस न बाळा?’
दरवाज्याच लॉक उघडल्याचा आवाज येताच वैशाली दरवाजा ढकलून आत गेली. खोलीत वादळ आलं होतं.टेबलावरची पुस्तक, नोट्स जमिनीवर आल्या होत्या. पलंगावरच्या उशानीही जमिनीवर उड्या मारल्या होत्या आणि चक्रीवादळ पलंगावर हुंदके देत पडलं होतं.

‘काय झालं माझ्या सोनूला?’तिने खोलीत शिरत विचारलं. पियुने अजूनच डोकं उशीत खुपसले.

‘तू नीट उठून बसलीस तरच आपल्याला बोलता येईल न राणी.’पियूच्या बाजूला बसत वैशाली बोलली.

हुंदके देतच ती उठून बसली.हुशार, गोरीपान, दिसायला ही गोड असणारी पियु आता मात्र रडूनरडून लाललाल झाली होती.

‘He left me. He said आता आपलं breakup झालंय’ रडतरडत पियु बोलली.

‘म्हणजे?’बसलेला आश्चर्याचा धक्का लपवत वैशाली बोलली. ‘ मला काही कळेल अस नीट बोलशील का तू?’

‘मम्मा..थोड्या वेळापूर्वी राजने मला कॉल केला होता.तो मला बोलला की यापुढे I am not your boyfriend. आपलं ब्रेकअप झालय’
‘अग ,पण राज तुझा फक्त friend होता न?’
‘Friend होता पण 4 months पासून boyfriend होता.’पियुने रडक्या आवाजात उत्तर दिलं. ‘मम्मा मी आता school ला कशी जाऊ. सर्वजण हसतील मला…चिडवतील.. मी स्कूलमध्ये कोणासोबत बोलू?मी काय करू मम्मा?’वैशालीच्या मांडीत पडत हुंदके देत देत ती बोलली.

चौदा वर्षाच्या मुलीला पडलेले गहन प्रश्न ऐकून हसावं, रडावं की चिडाव हेच वैशालीला कळत नव्हतं. मनात विचारांचं चक्र चालू झाले. हे काय वय आहे का पियुच boyfriend असण्याचं. हिच्या वयाची मी असताना घरात अस काही बोलले असते तर घरातल्यानी माझं काय केलं असत देवास ठाऊक.हिला चांगल दमात घ्यावं अस वाटतंय.. पण याक्षणी तिच्यावर रागावले तर ही परत कधीही कोणतीही गोष्ट मला विश्वासात घेऊन सांगणार नाही.

आजपर्यंतचे सर्वच प्रश्न आपण समजुतीने, संवाद साधूनच सोडवलेतआणि म्हणूनच विश्वासाने पियुने ही गोष्ट माझ्याशी share केली. मग हा प्रश्नही शांतपणेच हाताळला पाहिजे. क्षणार्धात वैशालीच्या मनात हे सर्व विचार येऊन गेले. तिने पियुकडे बघितले. तिच्या केसांमधून हात फिरवत थोडा विचार करून ती बोलली..

‘पियू तुला माहीतच आहे पप्पांच आणि माझं lovemarriage आहे.पप्पा नोकरीला लागले तेव्हा त्यांनी मला लग्नासाठी विचारलं.. मी घरीं सांगितलं आणि दोन्ही घरच्या संमतीने आमच लग्न झाले. त्यामुळे boyfriend वगैरे या गोष्टीबद्दल मला थोडं कमीच कळते. मला काही शंका आहेत तू समजावून सांगशील का मला काही गोष्टी.’

‘हो. विचार की.’
‘मग पहिलं मला सांग boyfriend आणि bestfriend मधला फरक काय?’

‘अग bestfriend म्हणजे फक्त मित्र.आणि बॉयफ्रेंड म्हणजे … love. आपण त्याच्यासोबत सतत राहतो. Lunch time, free periods, school मधला जास्तीत जास्त वेळ आपण त्याच्यासोबतच घालवतो. आणि न मम्मा .. ज्या मुलींना बॉयफ्रेंड असतो न त्यांना school मध्ये cool समजलं जातं’ आपल्या परीने extra knowledge देत पियू मम्मीला समजावत होती.

‘ओके. मग या boyfriend सोबत लग्न करते का ग त्याची girlfriend?’
‘ईsss…. काहीही काय बोलतेस ग मम्मा. यात लग्नाचा काय संबंध आहे?’ मम्मीच्या अज्ञानाची कीव करत ती बोलली. वैशालीने सुटकेचा निश्वास टाकला आणि मनातच म्हंटल चला हे प्रकरण वरवरचच दिसतय.

‘पियू, सर्व छोट्याछोट्या गोष्टि तर तू मला सांगतेस मग ही boyfriend ची गोष्ट विसरलीस का सांगायला?’

‘अग मम्मा..मी सांगणारच होते पण राज बोलला नको सांगूस मम्मीला. सर्वच गोष्टी तिला सांगायला तू आता लहान नाहीस आणि तुझीही काही सिक्रेटस हवीतच न!’ पियू माझ्या नजरेला नजर न देता बोलली.

‘ओके! आणखी काय काय बोलतो ग राज?’ मी तिला बोलत करायचा प्रयत्न केला.

‘तो बोलतो की.. पियू.. तू अजिबात चांगली दिसत नाहीस.. मी म्हणून तुला विचारलं नाहीतर तुला दुसरं कोणी विचारलही नसत.’ उदास स्वरात वैशालीची सुंदर मुलगी बोलत होती. ‘विशाल, श्रेया, स्मिता माझे bestfriends होते न.. पण मी आता त्यांच्याशी जास्त बोलत नाही कारण त्यांच्याशी बोललेलं राजला आवडत नाही. सध्या राजशिवाय मला कुणीही friends नाहित.. मी आता school ला जाऊन काय करू मम्मा. कुणाशी बोलू?’ डोळयातून येणार पाणी पुसत पियू बोलली.

अस आहे तर सर्व. म्हणजे पियूच्या मनाचा पूर्ण ताबा आता राजने घेतला होता किंबहुना पियुने तो त्याला घेऊन दिला होता. वैशाली मनातच हसली.

‘पियू, तुला माहीत आहे न माझे किती मित्र मैत्रिणी आहेत..’ तिच्या पाठीवर हात ठेवत वैशाली बोलली,’आणि प्रकाशकाका तर माझे सर्वात bestfriend आहेत. त्यांच्याशी बोलू नकोस अस पप्पानी मला कधी सांगितलेलं तू ऐकलयस का?’
‘नाही.’विचार करत पियू बोलली.

‘Boyfriend, friend किंवा lifepartner असा हवा की जो आपला आत्मविश्वास वाढवेल. ना की कमी करेल.आज तुझ्या पप्पांमुळेच मी आत्मविश्वासाने बुटीक चालवतेय. हो की नाही?’
पियुने मानेनेच होकार दिला.

‘जो मुलगा तुला इतर friends शी बोलू नकोस सांगतो, तू सुंदर दिसत नाहीस अस सांगतो तो तुझा boyfriend or friend असूच शकत नाही.. मित्र पाय ओढणारे नसावेत सपोर्ट करणारे असावेत.. अग उलट आज तर तू खुश झालं पाहिजेस कारण आज तुझा independence day आहे?’

‘तो कसा काय?’प्रश्नार्थक चेहेऱ्याने पियूने मम्मीकडे बघितलं.

‘सांगते..’ हसतच वैशाली बोलली,’पियू या वयातली तुम्ही मूल म्हणजे फुलपाखरासारखी असता.. आजूबाजूला असणारे मित्र मैत्रिणी म्हणजे तुमची फुल. सर्व फुलांतून आनंदाने मध गोळा करायचे तुमचे हे दिवस. मध म्हणजे आपल्या friends च्या चांगल्या गोष्टी शिकणं बर का.. पण या छोट्या वयात तुम्ही एकाच फुलात अडकून पडता.. भुंगा कमळात अडकतो न तसा.. मग ते कमळच् भुंग्याला जग वाटत इतर फुलांचा त्याला विसर पडतो…’

‘जसा मला पडला तसा..’ मम्मीचा हात पकडत पियू बोलली.

‘अगदी बरोबर…’ वैशाली तिला जवळ घेत बोलली.’ जस तू मम्माशी गोष्ट share नाही केलीस, इतर मित्र मैत्रिणींना विसरलीस अगदी तसाच… हे वय मुळी प्रेमात पडायचं नसतंच ग .. या वयात लव्हस्टोरीज आवडतात आणि खऱ्या ही वाटतात..आवडणारा प्रत्येक मुलगा लव्हस्टोरीतला हिरो वाटू लागतो.. या वयात मुलांबद्दल वाटणार attraction हे फक्त harmones मुळे होत हे science मध्ये शिकता तुम्ही..हे वय असत अनुभवाने आणि शिक्षणाने समृद्ध होण्याचं. मग आज breakup मुळे तू त्या कमळातून मुक्त झालीस.. आता तुला तुझे हरवलेले friends परत मिळतील..म्हणूनच आज तुझा independence day.’
आता पियूचा चेहेरा हसरा झाला होता.

‘आता उद्या स्कूलला गेलीस न की विकास, श्रेया ,आणि स्मिताशी परत बोलायला लाग पहिल्यासारखी.. आणि कोणी राजबद्दल विचारलं न तर सांग की मी breakup केलय म्हणून..’
‘खोट बोलू?’
‘खोट कशाला.. breakup करूया अस तो बोलला तेव्हा तू मनापासून तयार नव्हतीस पण आता.. आता माझं सुंदर फुलपाखरू आहे न तय्यार breakupला?’
पियूच्या चेहेऱ्यावर पुसटस हसू होतं.

‘फुलपाखरा खोली आवरूया का?’वैशालीने पलंगावरून उठताना हसतच विचारले.
‘मी आवरेन मम्मा ..तू कपडे बदल..’पियू पुस्तक उचलत बोलली.

पुढचा आठवडा वैशालीने पियुकडे शाळेचा विषय काढलाच नाही पण तिचे बारकाईने लक्ष होते पियूकडे. पियू नॉर्मल होती. आज मात्र शाळेतून घरी येताच पियुने वैशालीला घट्ट मिठी मारली.

‘काय ग..आज स्वारी खुशीत दिसतेय..’
वैशालीचा हात हातात घेत पियू बोलली, ‘हो मम्मा.. आज मी खूप खुश आहे.तुला खर सांगते ममा.. तू त्या दिवशी समजावलं खर पण दुसऱ्या दिवशी मला स्कूलला जायचं खूप टेन्शनच आलं होतं. पण मी तुझं ऐकायचं ठरवलं. सर्वात पहिले मी विकास श्रेया आणि स्मिताला sorry बोलले आणि त्यांनीही मला माफ केलं इतकंच नाही तर मला कोणी राजवरून काही बोलल तर ते माझ्या बाजूने उभेही राहिले आणि तेव्हाच मला कळलं की खरे friends कसे असतात ते. आज तर अजूनच गंम्मत झाली.. राज मला sorry बोलला. परत girlfriend होतेस का म्हणून विचारत होता?’
‘मग?’ वैशाली उत्सुकता न लपवता बोलली.
‘मग काय मम्मा.. मी त्याला सरळ बोलले तुझीच काय कोणाचीच girlfriend होऊन मला कमळात अडकायच नाही .. त्यापेक्षा मम्माच फुलपाखरू बनून मला उंचउंच उडायचय.हे सुंदर जग पाहायचं आहे…. मम्मा ..त्याला न काहीच कळलं नाही बहुतेक..’ वैशालीच्या हातावर टाळी देत खळखळून हसत पियू बोलली.

पियूला जवळ घेत वैशाली समाधानाने म्हणाली,’त्याला नाही कळलं .. पण मला काय म्हणायचं आहे हे माझ्या लाडक्या फुलपाखराला कळलं न यातच माझं खर यश आहे…’

डॉ. अपर्णा प्रल्हाद निजाई
सुनील इनामदार

मुलांनी सुटीत करायलाच हव्यात या गमती जमती

मुलांनी सुटीत करायलाच हव्यात
या गमती जमती

01. आपल्या परिसरात अंध, अपंग, कर्णबधिर, गतिमंद अशी काही खास मुले असतात. सुटीच्या दिवसातील काही दिवस त्यांच्यासाठी राखून ठेवा. त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवा. त्यांना बागेत फिरायला घेऊन जा. त्यांच्याशी खेळा. तुमच्या मदतीची नाही तर तुमच्या मैत्रीची त्यांना गरज आहे, हे लक्षात ठेवा. मला खात्री आहे त्यांच्या सहवासात तुम्हाला खूप नवीन गोष्टी कळतील.
02. या सुटीत कणिक मळायला शिकाच म्हणजे ‘मळणे’ याचा खरा अर्थ तुम्हाला अनुभवता येईल. तीन ते चार दिवसांच्या अथक सरावानंतर कणिक व्यवस्थित मळता येईल पण तोपर्यंत कपडे मळणार नाहीत याची काळजी घ्या.
03. एक दिवस घरातला शिवणाचा डबा घेऊन ‘शिवाशिवी’ करा. बटण लावणे, हुक लावणे, शिवणे, टीप किंवा धावदोरा घालणे, टाका घालणे याचा अनुभव मोठ्या माणसांसोबत घ्या.

Read more

ऑफलाईन आई

ऑफलाईन आई

इयत्ता पाचवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर वर्ग शिक्षकांनी त्यांना कशी ‘आई’  आवडते यावर निबंध लिहायला दिला.
प्रत्येकाने आपल्या आईचे कौतुक करणारे  वर्णन लिहिले.

राहुलच्या मजकुरात त्याने शिर्षक लिहीले – “ऑफलाइन आई!”

मला “आई” पाहिजे, पण “ऑफ लाईन” पाहिजे.
मला एक “अशिक्षित” आई हवी आहे जिला “मोबाईल” कसा वापरायचा हे माहित नाही पण माझ्याबरोबर सर्वत्र जाण्यासाठी ती उत्सुक असेल.

मला “जीन्स” आणि “टी-शर्ट” घातलेली “आई” नको तर छोटूच्या आईसारखी साडी नेसलेली “आई” हवी आहे.  मी जिच्या मांडीवर डोके ठेवून बाळाप्रमाणे झोपू शकतो अशी आई पाहिजे .

Read more

मुलांवर संस्कार कसा करावा??

मुलांवर संस्कार कसा करावा??
सिनेमे बघून, टीव्ही बघून, युट्युब, इंस्टा वगैरेमुळे मुलं बिघडतात हे तद्दन खोटं तर आहेच शिवाय एकूण समाजाने आपली जबाबदारी झटकून टाकण्यासाठी मारलेली ही लोणकढी थाप आहे.
मुलांची जगण्याची रीत, नियम हे आजूबाजूच्या जगाविषयीच्या त्यांच्या अकलनावर अवलंबून आहे. हे आकलन मुलांनी केलेली कृती, त्या कृतीला मिळालेला प्रतिसाद, त्यांना आजूबाजूच्या जगाविषयी आलेले अनुभव यांवर अवलंबून असते.

Read more

बेलाग सह्याद्री.

गडकोट ककल्ले म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते उं च, प्रचंड, दगु मग डोंगर, वेड्यावाकड्या ऊं चच उं च
डोंगररांगा, आणि अफाट, बेलाग सह्याद्री.
खरतर दगु मग पिा कहच गडाची खरी ओळख, परंतुडोंगर नुसता दगु मग असला उंच असला तरी दगु ग
बांधिी करताना इतरही बाबी लक्षात घ्याव्या लागत असत, जसे की आसपासची भौगोललक रचना, स्थान –
लनणिती, संरक्षिात्मक बाजू, गडाची बांधिी, संरक्षि,मानवाच्या मूलभूत गरजा, इ. अनेक बाजू ववचारात
घेऊनच दगु बग ांधनी केली जात असे.
आज महाराष्ट्रातील गडककल्ल्यांचा ववचार के ला तर, या अफाट सह्याद्री मध्ये प्रत्येक डोंगराआड,
लिखराआड, एखादा लहानसा, मोठा तटबंदीने वेढलेला डोंगर/गड आपले लक्ष वेधून घेतो, इतकी वैभविाली
दगु सग ंपत्ती असलेला हा महाराष्ट्र.
तर या गडकोटांचे उपयोग काय? वापर काय? फायदा काय? इतके वेगवेगळे गड बांधले कसे? गडावर
अविेष काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि सवग प्रश्नांची उत्तरे लिवछ्त्रपतींच्या आज्ञापरात
लमळतात.

Read more

पूर्व प्राथमिक शिक्षण

पूर्व प्राथमिक शिक्षण

पूर्व प्राथमिक शिक्षण, बालपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यांत शिक्षण, बालपणात प्रारंभ आणि प्राथमिक शाळेत प्रवेश केल्यावर सुमारे पाच, सहा, किंवा सात वर्षांच्या वय

शिक्षणासाठी संस्थात्मक व्यवस्था जगभरात मोठ्या प्रमाणात बदलतात, जसे संस्थांना लागू केलेली नावे. सामान्यत: अर्भकांच्या काळजीसाठी केंद्राला दिलेल्या अटी – लहानपणाच्या पहिल्या टप्प्यातील (सुमारे तीन महिने ते तीन वर्षे वयाची) – अर्भक शाळा, डे केअर, डे नर्सरी आणि क्रेच , सर्वात सामान्य म्हणजे  नर्सरी शाळा आणि बालवाडी. सामान्यतः,बालवाडीच्या आधी (चार किंवा पाच ते सहा वयोगटांसाठी) , जे शालेय वयाच्या मुलांसाठी आहे ज्यांना पुरेसे परिपक्व मानले जात नाही आणि म्हणून ते प्राथमिक शाळेसाठी एक प्रकारची तयारी शाळा म्हणून काम करतात. बालवाडी प्राथमिक शिक्षणाचा एक भाग मानली जाते.

 

पूर्व प्राथमिक शिक्षण इतिहास

Read more