कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात
येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते
कोणत्या बाबतीत आहे ?
.
जरा ओळखुन दाखव!”
मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले.
🔸क्या भात है!!🔸
सांप्रत काळात भारत देशात डाएट नावाच्या फॅडने किंवा स्टाईलने भात किंवा तांदूळ ह्या आपल्या लाडक्या आणि आवडत्या अशा पदार्थावर फार मोठी कुरघोडी करायला घेतलेली आहे. विकेट किपिंग करताना जांभया दिल्याबद्दल पाकिस्तानी कॅप्टन सरफराज अहमद जितका बदनाम झालाय त्यापेक्षा थोडी जास्तच बदनामी डाएट ह्या प्रकाराने भाताची केलेली आहे. भारतीयांसाठी ही गोष्ट खचितच चिंतेची आहे.
प्रक्रिया # ३
“शत्रूकडे असे काय जास्त होते आणि आमच्याकडे असे काय कमी होते?
इथे सह्याद्री होता, सातपुडा होता, समुद्र होता, समृद्ध संपत्ती होती, बलाढ्य मनगटे आणि धाडसी छाताडे होती, तरीही पराभव? का?
कारण कमी पडले अचूक नेतृत्व. कमी पडला भोवतालच्या जगाचा आणि शत्रूपक्षाचा अभ्यास.
आम्ही नरसिंहांच्या, श्रीकृषणांच्या आणि श्रीरामांच्या फक्त पूजा आणि आरत्या केल्या. अभ्यास आणि अनुकरण कधी केलेच नाही.
या आक्रमकां
पालकांसाठी …
१ ) आपला मुलगा /मुलगी भविष्यात कोणत्याही प्रकारच्या वाईट मार्गाला जावू नये ..व्यसनाधीन होऊ नये अशी सर्वच पालकांची इच्छा असते ..ही इच्छा साकार होण्यासाठी पालकांनी व्यसनमुक्त असणे गरजेचे आहे ..आपण जर कोणत्याही प्रकारचे व्यसन करत असू तर मुले त्या मार्गावर जाण्याची शक्यता वाढते …
२ ) साधारणपणे मुले बिघडण्याची अंशतः सुरवात इयत्ता आठवी पासून होऊ शकते ..तेव्हा पासूनच मुलांकडे बारकाईने लक्ष द्यायला सुरवात करा ..त्यांचा आभ्यास ..त्यांचे मित्र ..त्यांचे खेळ ..या बद्दल ची माहिती घेत रहा..आपल्या व्यस्त रुटीन मधून त्यांच्या साठी वेळ द्या ..त्यांना बोलते करा ..
सुनो ना सून लो ना!
पालक आणि मूल यांच्यातील भांडणाचं ९९.९९ टक्के वेळा एकच कारण असतं ते म्हणजे “अरे तू माझं ऐक जरा” आणि त्याला मिळणारा प्रतिसाद “दरवेळी मी तुमचंच का ऐकायचं?”
आणि मग आपापला किल्ला जोमाने लढवण्याच्या नादात कधी भांडण पेटतात, हे कळतच नाही.
मी माझ्या पंधरा वर्षाच्या पालकत्वाच्या प्रवासात ज्या चुका केल्या आणि त्या चुका आहेत या माझ्या लक्षात येऊन मी त्या सुधारण्याच्या प्रयत्नात आहे त्यातील महत्वाची चूक म्हणजे “सुनावणे”.
किती वेळ खेळायचं, किती वेळ अभ्यास करायचा, स्क्रीन टाईम किती असला पाहिजे, भाजी कोणती खाल्ली पाहिजे, दूध किती पिले पाहिजे, मित्र कोणते निवडले पाहिजेत, पाहुण्यांशी कसं बोललं पाहिजे, अक्षर कसं असलं पाहिजे, बोलताना शब्द कोणते वापरले पाहिजेत, उफ…
निर्णयशक्ती कमकुवत असणारे लोक खूप अहंकारी असतात. निर्णय घेता येत नाही हे मान्य न करता ते फक्त चिडचिड करतात.
सहकारातील अनेक सभांमध्ये निर्णय घेता येत नसल्याने खडाजंगी होऊन सभा संपतात.
निर्णय घेता न येणे हा शारिरीक कमकुवतपणा सारखा मानसिक कमकुवतपणा आहे. तो सवयीने घालवता येऊ शकतो.
अनेकदा पटापट निर्णय घेऊ शकणारा माणूस बुद्धीच्या वापराच्या बाबतीत कमजोर असतो. त्याचे निर्णय भावनाप्रधान होऊन चुकतात.
माझी शिक्षणाची व्याख्या व माझी मुलाच्या शिक्षणातील भूमिका..
शिक्षण या विषयावर गेली काही वर्षे, माझे जे वाचन झाले, स्नेहच्या शिक्षणाच्या निमित्ताने माझे जे निरीक्षण झाले, त्यानुसार माझ्यापुरती मी शिक्षणाची व्याख्या तयार केली आहे, ती म्हणजे,
उत्सुकतेपोटी नवीन गोष्टींचा शोध घेणे, शोध घेता घेता आपल्या क्षमतांचा अंदाज बांधणे, त्या क्षमतांच्या जोरावर शिकलेल्या गोष्टी वापरून बघणे आणि त्यातून आपल्या “कम्युनिटी”तील आपले स्थान बळकट करणे, म्हणजे शिक्षण.
या शिक्षणाच्या प्रक्रियेत पालक म्हणून माझी भूमिका या व्याख्येला अनुसरून काय असली पाहिजे? माझ्या अनुभवानुसार मी माझी भूमिका पुढीलप्रमाणे निवडली आहे.
बंडू आणि रघु, दोघांनाही दूध आवडत नाही.
पण रोज अर्धाकप दूध घेणं दोघांना अनिवार्य आहे.
बंडू दूध घेताना खूप कटकट करतो, त्रास देतो, दोन तास लावतो.
रघुला हा त्रासदायक क्षण लवकरात लवकर संपवून टाकायचा आहे, तो एका घोटात दूध संपवून मोकळा होतो.
बंडू घरातील सर्वात लाडका असेल तर घरातले सगळे बंडूच्या पुढे पुढे करतात, बंडू आपले महत्व वाढवून घेतो, बंडू घरातल्यांनाही निगोशिएट करायला सुरुवात करतो, पुढे जाऊन त्याचे व्यक्तिमत्व नकारात्मक घडू शकते.
लहान मुलांना सहज प्रश्न विचारतात मोठेपणी तू काय होणार ?
हे खरंच असं विचारणं कितपत योग्य आहे?
बऱ्याचदा लहान मुलांवर मोठ्या लोकांच्या अतृप्त इच्छा लादल्या जातात. आपल्याला जे करता आले नाही ते तू कर सांगितले जाते. किंवा पालकांनाही निट समजत नसतय कि आपले मुल नक्की काय करायला जन्माला आलय तर त्या मुलाला काय समजणार डोंबल ?
मोठ्यांच निम्म लाईफ संपते तरी समजत नाही तर लहान मुलांना आपण कोणीतरी काय व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं ? हे खरंच माहिती असतं का ?
मला वाटतं त्यांना ते समजत नाही . तुम्हाला तरी माहिती होतं का हो लहानपणी की मोठेपणी तुम्ही काय होणार ? पण तरी आपण लहान मुलांना विचारत राहतो तू मोठेपणी कोण होणार ?
स्मार्ट फोन
#पुणे
#शिक्षणाचेमाहेरघर
#कृतज्ञता
सध्याचा हॉट टॉपिक म्हणजे शाळेत फोन न्यायला परवानगी असणे. तसा हा विषय अगदी नवीन नाही, पूर्वीही शाळेत फोन, विशेषतः स्मार्ट फोन नेऊन मुलांनी अनेक उद्योग केल्याची उदाहरणे घडलेली आहेत. लॉक डाऊन काळात मात्र स्मार्ट फोनवर अवलंबून असणे अपरिहार्य झाले. आता शाळा, क्लास, इतर रुटीन नियमित सुरू झाले, पण फोनची सवय काही सुटत नाही. मुलांचं शाळेत फोन आणण्याचं, गरज नसताना तो वेगवेगळ्या प्रकारे वापरण्याचं प्रमाण वाढत आहे. पालकही सोयीसाठी म्हणून मुलांना शाळेत फोन नेऊ देतात. त्याची वेगवेगळी कारणं सांगतात. ती कदाचित पालकांच्या बाजूने योग्यही असतील. काही मुलं पालकांच्या नकळत फोन आणतात. पण मुलांना अजून परिणामांचे गांभीर्य कळले आहे असे वाटत नाही.
स्मार्ट फोन असावा की न