मनातील सुगंध

आपले मन घरासारखे आहे. त्यातील बाहेरची खोली म्हणजे जागरूक मन आणि आतील खोली म्हणजे सुप्त मन. या सुप्त मनातील कचरा स्वच्छ करण्यासाठी मनात येणाऱ्या विचारांकडे आणि शरीरातील संवेदनांकडे साक्षीभाव ठेवून पाहणे आवश्यक असते. असे करणे म्हणजे कचरा शोधून तो साफ करण्यासारखे आहे.

घरात कचरा खूप साठला असेल आणि दुर्गंधी येत असेल तर तो साफ करताना आपण मुद्दाम सुगंध निर्माण करण्यासाठी अगरबत्ती लावतो, रूम फ्रेशनर मारतो. शरीराला येणाऱ्या घामाचा वास कमी करण्यासाठीदेखील परफ्यूम मारतो. तसेच मनाच्या आरोग्यासाठी कर्ताभाव ठेवून समाधान, प्रेम, भक्ती, कृतज्ञता, क्षमा यांसारखे सुखद भाव मनात काही वेळ धरून ठेवणे आवश्यक असते. सर्व उपासना पद्धतीमधील प्रार्थना यासाठीच आहेत. दुर्दैवाने आरत्या मोठ्ठय़ा आवाजात म्हटल्या जातात. प्रेम,आर्तभक्ती या भावना मनात धारण करणे आवश्यक आहे हे लक्षात घेतले जात नाही.

Read more